विसर
भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव
आता तुला गाठायचा आहे तुझा गाव
आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा
आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा
तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ
तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ
विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या
हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या
हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ
हरवुदे वाट आडवळणी खट्याळ
खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा
तुला-मला जोडणारा तोड आता धागा
नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू
जायचीच निसटून हातातली वाळू
सोसायचा तुझ्या-माझ्या नात्याला दुरावा
जायचे जरी तुला ग सखे तुझ्या गावा...
राहीन मी तुझ्या उरामध्ये ग दाटून
कधी तुझ्या डोळ्यातून येईन बरसून .....
-अदिती शरद जोशी
💬 प्रतिसाद
(5)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/28/2014 - 05:26
नवीन
छान!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/28/2014 - 11:38
नवीन
ठीक!
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 04/29/2014 - 14:17
नवीन
फारच सुंदर!! एका जोडीदाराचा जीवनप्रवास संपताना अशाच काही भावना सहचराच्या होत असाव्यात :(
- Log in or register to post comments
म
मनीषा
Tue, 04/29/2014 - 18:59
नवीन
सुंदर
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 05/02/2014 - 10:59
नवीन
सुरेख! नि:शब्द.
- Log in or register to post comments