Welcome to misalpav.com
लेखक: बाबा पाटील | प्रसिद्ध:
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे,अश्वस्थाम्याच्या भळभळणार्‍या जखमेसारख!त्याला जिवंत ठेवण्यासाठी अजुन ही पैदा होतायेत्,कोनी तरी मंडेला,लामा आणी आण्णा कारण जो पर्यंत शोषण आणी शोषक आहेत्,तो पर्यंत त्याला निशस्त्र प्रतिकार करणारा गांधी परत परत जिवंत होणार आहे कारण प्रत्येकाच्या मनात फक्त हिंसेलाच स्थान नसत्,कुठतरी प्रेम आणी दयाळुपणाही असतो, हेच गांधीच्या पुर्नजन्माच रहस्य आहे. जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्,नाहीतर परत आम्ही आदिम जमान्यात जावुन पोहचु. माणसाच्या प्रेमासाठी,वेदनेच्या हुंकाराठी,दुबळ्यांच्या विश्वासासाठी,हे गांधी तुला परत परत ही स्वकियांच्याच शिव्याशापांची आणी त्यांनीच केलेल्या तुझ्या खुनाची भळभळाणारी जखम घेवुन जन्मावेच लागेल्,भले कितीही वेदना होवु देत.दिनदलितांच्या वेदनांवर फुंकर घालण्साठी,रक्ताळेल्या जखेमेवर मलम लावण्यासाठी,गुलामाला माणुस बनवण्यासाठी, तुला जिवंत राहावेच लागेल.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा, पटकन राहुल-सोनिया-प्रियांका-राजीव या गांधीघराण्याबद्दल वाटला. अब की बार मोदी सरकार तरी गांधी घराणे आणि काँग्रेस अजून जिवंत आहेत आणि पुढच्या निवडणूकीला उसळी मारतील वगिअरे वगैरे आशयाचा ... असो, बाकी लेखातील विचारांशी सहमत !

गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे.
मित्रा, गांधित्व - महात्मा गांधींची तत्वे? ती जशीच्या तशी मान्य होणे किंवा आचरणात आणणे शक्य नाही. पण म्हणून त्यांचे विस्मरण करणे हे विसंगत ठरेल.
निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा लेख यावा
यावरून १९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ आठवली. पुण्यात एका ठिकाणी नाडी ग्रंथांचे वाचन चालले होते. त्यावेळी वाचनात पाण्याची बाटली गादीवर उलटल्यामुळे चादर ओली झाली. त्या घटनेचा संदर्भ घेऊन महर्षीनी म्हटले की आम्ही बाटली कलंडायची वाट पहात होतो.आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले.असा इतिहास सर्वश्रुत आहे.

@आता जसे अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

>> अंथरूण ओले झाल्याने त्याचादरीच्या आतील गादीच्या कापडाचे डिझाईन उठून दिसत आहे त्याप्रमाणे उद्याला त्या डिझाईनच्या आकृतीचा पक्ष निवडणुकीत विजयी होईल. ते डिझाईन फुलाचे होचते व नंतर बाजपेयींचे सरकार बनले. खपलो! खरच खपलो!! जाउन झोपतो आता ऑफिसात.

ज्यांच्या घरात लहान बाळं आहेत त्यांच्याकडे जवळ जवळ रोज काँग्रेस जिंकत असेल. =)) नाडीग्रंथ आणि चिकित्सेवर टिका करायचा कुठलाही हेतु नाही. :)

आणि पुढेही होणार नाही. आणि नेहरू तर अजिबात नाही. जबतक सूरज चांद रहेगा, गांधी-नेहरू का नाम रहेगा. जय गांधी सुतिकाग्रुह आणि जय नेहरू तारांगण. (अवांतर, बाकी दिवसा तारे दाखवणार्‍या वास्तूला "नेहरुंचेच" नांव देण्यात यावे, हा निव्वळ योगायोग की सरकारी विनोद.)

असो, आता तुम्ही म्हणताच आहात तर ह्या धाग्यात नेहरू नको. पण नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते (जे गांधी बाबांनी होवू दिले नाही) तर थोडा फरक पडला असता.अर्थात गांधीजींनी फार धोरणी पणाने हा निर्णय घेतला असावा. त्याची फळे अद्याप आपण चाखतो आहोतच. चाणक्य म्हटला की, चंद्रगुप्त येतोच्च तसेच आहे हो हे.असो, जय गांधी

अन कट्टा म्हटले की मूवी. पण चाणक्यनीती चालु असताना चंद्रगुप्त नीति मधे येत नाही कारणचाण्क्याने स्वत:चा कार्यभाग आटोपल्यावर चन्द्रगुप्तचा स्वत: होउन त्याग केला. असो लोकशाहीतला ल सुधा माहीत नसलेला चाणक्य आज सोडाच पूर्वी सुधा इंग्रजासमोर किती टिकाव धरु शकला असता शंकाच आहे. बेडकीने कितीही पॉट फुगवले गाय बनत नाही. वासरात लंगड़ी गाय शाहनी इतकच चाण्क्याचे महत्व. थोडक्यात चाणक्य संबोधुन गांधी यांचे डिग्रेडेश्न करू नका. कहा भोज कहा गंगू

चाणक्य नेमका कुठल्या काळातल्या इंग्रजांशी सामना करू शकला नसता? इसपू ३०० च्या आसपास इंग्लंडमधले मूळ केल्ट लोक अगदी मागास अवस्थेत होते. आदिवाशांपेक्षा एखादी पायरी वर. ते सुधारले रोमन आक्रमण व नंतरच्या जर्मानिक व व्हायकिंग टोळ्यांच्या आक्रमणामुळे. तेच इसपू ३०० च्या सुमारास मौर्य साम्राज्य ऐन भरात होते-वन ऑफ दि बिग्गेस्ट एंपायर्स एव्हर.

लोकशाही स्वीकारलेल्या काळातिल इंग्रजाशी सामना करू शकला नसता जे गान्धिने केले.

विषयांतर होतय पण खरच आर्य चाणक्य हा भारतीयच नव्हे तर जागतीक राजकारणाचा मुळपुरुष होता.सत्तेमध्ये मदांध धनानंद राजा आणी इंग्रज यात फारसा फरक नाहीच. असले अजय साम्राज्य चाणक्याने चंद्रगुप्ताला तयार करुन एकहाती उलथुन टाकले व त्याचे पुढे सर्वश्रेष्ठ गुप्त साम्राज्यात रुपांतर केले हे निच्छितच अद्भुत कार्य होय.भारतीय राजकिय पटलावर जी मोजकी नावे येतात त्यात आर्य चाणक्याचे नाव फार वरचे आहे.

फ़क्त त्याचा सिग्नीफीकंस लोकल भारतियांची सुन्दोपसूंडी यापलिकडे नाही. तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे. ज्या कोण्टेक्स्टमधे वाक्य लिहले आहे ते दुर्लक्शुन सिलेक्टिव रीडिंग नको

तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत एकवटु शकला नाही हेत्याचे प्रमुख अपयश आहे.
हे वाक्य तर अतिशय चूक आहे. परकीय आक्रमणाचे म्हणाल तर चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव केला नाही काय? अलेक्झांडर भारतात आला इ. जे म्हंटात ते अगदी मर्यादित अर्थाने खरे आहे. वाघा बॉर्डर ओलांडून एक पाऊल जर कुणी आत आला तर किंवा काश्मीरहून कन्याकुमारीला गेला तरीही तो भारतातच आला-पण फक्त टेक्निकली. अन हे एकवटणे इ. त्याने नंतर केलेच की. चंद्रगुप्ताकरवी सेल्युकसशी अलायन्स करून वेस्टर्न बॉर्डर सुरक्षित करवून घेतली. हे कार्य कमी महत्त्वाचे नाही. अलेक्झांडरला ओव्हर एस्टिमेट करण्यात अर्थ नाही. तो भारताच्या सीमेवरून जरा उगीच एखादे पाऊल आत आला अन परत गेला, इतकंच.

ते चंद्रगुप्ताचे कर्तृत्व आहे- नो डौट. पण त्याला शिकवणार्‍या चाणक्याचा त्यात काहीसुद्धा रोल नाही असं तर नाही ना? चुकीच्या आरोपाला ओव्हरएस्टिमेटिंग अन्सर असे समज फारतर..

ओव्हर एस्टिमेटेड इन व्हॉट सेन्स? नंद एंपायर तेव्हा किती मोठे होते याची कल्पना आहे का? त्याला प्रांतिक स्ट्रगल असे नाव देणे कालविसंगत आहे. मागच्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे-काश्मीर ते तमिऴनाडू हा भाग टेक्निकली एकाच देशात येत असला तरी चाणक्याच्या काळी ही सर्व महाजनपदे एकवटणे महाकर्मकठीण काम होते. त्याने लिहिलेल्या अर्थशास्त्रावरून त्याच्या व्हिजनची झेप कळते, सबब चंद्रगुप्ताच्या लढायांत त्याचा सल्ला अग्रभागी असण्याची शक्यता अगदी जास्त आहे. किमान अर्थशास्त्र पाहिलेला माणूस तरी चाणक्याला ओव्हरएस्टिमेटेड आहे असे म्हण्णार नाही.

वरील वाक्य लक्षात आले तर अर्थ शास्त्राकडे वळ्तो. सरकारी नोकरांची सर्व मालमत्ता दर3 वर्षानी जप्त करणेत येउन त्यांचे पदाप्रमाणे पुनर्वसन केले जात रहावे असे चाण्क्य म्हणतो. बाबा चाणक्या का लाल सलामाचे नेतृत्व करत आहेस ? अरे हो विसरलोच होतो, त्याला हेच तर उत्तम जमते. मिळालेली सत्ता / पदचालावयाच्याफंदात तो अगदी अरविंदा आहे.

पण या केसमध्ये आचरेकरानेच तेंडल्याची पहिली सेंच्युरी घडवून आणून त्याला टीममध्ये प्रवेश दिलेला आहे.. असो. बाकी हे नक्की कुठल्या दर्जाच्या सेवकाबद्दल बोलतो आहे तेही पहावे. व्यापार, जंगलव्यवस्थापन, इ. गोष्टींबद्दलचे विचारही पहावेत.

या कक्षेमधे आणले होते. भयानक अराजकवाद आहे हां नियम. असो, विचार तर केजुला अभिप्रेत ज्न्लोकपालाचे ही अतिशय उचित आहेत. पण ते चाणक्या तत्वज्ञाना प्रमाणेच सदोष आहेत. राहिला प्रश्न सेंचुरिचा आर यु शुअर तू नक्की काय चर्चा करतो आहेस हे विसरला नाही ते ? मी स्वत: मी स्वत: गांधी, आचरेकर यांना पहिल्या सेंचुरीचे क्रेडिट द्यायला नाकारले नाहिये. फ़क्त चाण्क्याने गल्ल्ली क्रिकेट खेळले, तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही(हे तर अजुनही भारताला जमले नाही म्हणा)

कारण या आरोपामागे तत्कालीन वस्तुस्थितीचा काही विचारच नाहीये.
तो कधी एखादे पराभूत मानासिकतेचे राष्ट्र गुलामगिरीतुन जेते बनवू शकला नाही की एखादे परकीय संस्कृति असलेले राष्ट्र/प्रदेश गुलाम बनावु शकला नाही
कलोनियलिझम मुळे भारतीयांच्या मनावर काही चुकीच्या गोष्टींचा पगडा बसलाय. परकीय संस्कृती असलेल्या राष्ट्रावर आक्रमण करणे हेच शौर्य अशी हास्यास्पद धारणाही त्याचाच एक भाग आहे. भारतीय संस्कृती असलेला भूभाग मोठा होता हा चाणक्याचा दोष कशावरून? युरोपात पदोपदी संस्कृती बदलते, भारतात ती तुलनेने एकसंध आहे हा चाणक्याचा दोष कशावरून? दुसरे असे, की संस्कृती सिमिलर असली म्हणून काय त्या राष्ट्रावर आक्रमण करणे सोपे होते? बळंच? अथेन्स आणि स्पार्टाची संस्कृती, भाषा सर्व काही सारखे होते. इतके असतानाही ३००-४०० वर्षे आपसांत भांडून भुसकाट पाडलेच की त्यांनी. कैकदा सख्खे लोकच सर्वांत मोठे वैरी ठरतात. महाभारत हे सर्वांत ज्वलंत उदा. संस्कृती सेम असली म्हणून ते राष्ट्र आपोआप आपल्या कह्यात येऊ शकते हा अतिशय चुकीचा समज आहे. शिवाय, खैबर खिंड ओलांडून बाहेर जाण्यात कॉस्ट किती अन बेनिफिट किती, तेही एकदा पहावे. हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती. आणि चाणक्याच्या वेळेस मुळात भारत गुलामगिरीतच नव्हता हाही त्याचाच दोष होता, नै? त्याच्या वेळेस जी परिस्थिती होती त्याप्रमाणे तो वागला. त्याच्या वेळी भारत पारतंत्र्यात नव्हता तर तो गांधी कशाला होईल झक मारायला? शिवाजी महाराज स्वतः अटकेपार का गेले नाहीत या विचारण्याला अर्थ नाही.

प्रश्न आपापसातील मतभेद विसरुत एकजुट होण्याचा आहे. इतर विस्त्रूत संस्कृती राखणारे प्रदेश काबीज करण्याचा आहे. आमचे पुर्वज यांव अन त्यांव करत मिरवायची फुकटची हौस असलेल्या देशाचा इतिहास कुरवाळताना स्वतःचे केवळ रक्षण करण्यातच अनेक कर्तुत्ववान लोकाम्ची सगळी शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च करावी लागली याची खंत वाटत नसल्याचा आहे. त्यांच्या बद्दल दुराभीमान संभवत नाहीच पण. आपण अल्पसंतुश्ट मात्र असु नये.
हिंदुकुश पर्वताआडचा प्रदेश इतका समृद्ध होता की बाहेर जाण्याची गरजच पडली नव्हती.
हीच हीच ती वृत्ती आत्मघाती अल्पसंतुश्टी, ज्यामुळे जग पादाक्रांत करण्याची आकांशाच मारली गेली. भुक्कड नेहरुइजम साला. जमीन खाद्य पिकवत नाय जाउद्या चिनच्या ताब्यात. काय बिघडते. हा विचार नसतो करायचा कुंपणाबाहेर जायची गरज काय, नायतर उद्या कुंपण राखताना पंचाइत होउन जाते. दुर्दैव आहे असल्या फालतु विचाराचे समर्थन करणारे भारतात मोदीराज्य अवतरले तरी अजुन आहेत. जर शिवाजीराजे पाश्चात्य परिसरात जन्माला आले असते तर आज महाराष्ट्र/भारत न्हवे अवघे जग पादाक्रांत त्यांनी केले असते त्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य मावळला नसता हा विचार एकदा पटला, भिनला की पुढील बर्‍याच गोष्टी सोप्या होतात. पण... आमचे पुर्वज फार शाहणे होते, ते कधीच चुकत न्हवते, त्यांच्यात सुध्हारणा करायला वावच नाही इतके परफेक्ट होते वगैरे वगैरे थोटांडे बंद केली पाहिजेत तर खरा गांधी समजेल.

इतिहासाचे अध्ययन न केल्यामुळे असल्या अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. चालायचेच. ब्रिटिशांनी एकदा राज्य केले की त्यांचे अनुकरण हेच प्रमाण मानल्या जाऊ लागतेच. आणि हो, इथे आपल्या पूर्वजांचा आंधळा अभिमान कुठेही नाही तर एक रिअलिस्टिक दृष्टी आहे फक्त. पुढील पिढ्यांनी नावाजावे म्हणून कुणी राज्य करत नव्हते तर आपले सामर्थ्य जमेल तसे वाढावे ही दृष्टी होती. आज शेकडो वर्षांनंतर बसून वाटेल तशा तुलना करायला काही जात नाही. हे फक्त भारतच कशाला, चीन व इराणबद्दलही लागू आहे. रोमन व ग्रीक साम्राज्यालाही तितकेच लागू आहे. राज्यकर्त्याला कॉस्ट/बेनिफिट रेशो कायम बघावा लागतो. उगीच हौस म्हणून कुणी आक्रमणे करत नाही- वरवर पाहता तसे वाटले तरी. सर्वांत महत्त्वाचे म्ह. २१व्या शतकातील जाणिवा १७व्या किंवा इसपू ३र्‍या शतकातील लोकांकडे का नव्हत्या म्हणूण गळे काढण्यात इतिकर्तव्यता मानायची असेल तर तसला वांझोटा आक्रोश करण्यात मला स्वारस्य नाही. पूर्वज काय जगातभारीच्च होते असे नाही पण त्यांनी ज्या चुका केल्या त्यांचेच माप पदरात घालूया. ज्या चुका केल्याच नाहीत त्यांबद्दलही त्यांना शिव्या घालण्यात मला प्वाइंट दिसत नाही, सबब चालूद्या.

गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे, त्याचा बाकीच्या चर्‍हाटाशी संबंध नाही. त्या दोहोंचा संबंध म्ह. श्वानं युवानं मघवानमाह आहे केवळ.

पण इतिहासाकडुन काही शिकायचे नाहीये तेंव्हा अशी मुक्तफळे निर्माण होतात. रिअलिस्टिक दृष्टी आहे इतीहास शिकुन न्हवे इतिहासापासुन शिक्षण घेण्यात असते. पण... चाणक्य ओवररेटेड आहे यात वाद नाही.

गांधी समजणे हा प्रकार पूर्णपणे वेगळा नाहीये, किंबहुना हाच केंद्रीय मुद्दा असुन सोबतच्या गोष्टीचा चर्‍हाटाशी संबंध जोडु नये. त्या दोहोंचा संबंध तेरा धियान किधर है रे तेरा हिरो इधर हय आहे केवळ.

मौर्यच्या एवजी चंद्रगुप्ताचे गुप्त झाले.गलतीसे मिस्टेक हो गया भाय. मालक मंडळी निदान या साठी तरी स्वसंपादनाची सोय द्या राव. *fool*

तुमचं बाबा पाटील! उद्या निकाल लागणार आणि अनेक लोकं विजयोन्मादाने धुंद होतील उद्या, त्यात हा तुमचा असला गांधींची स्तुती करणारा लेख वाचून तर चवताळूनच उठतील लोक. हा लेख काही इथे लोक टिकू देणार नाहीत, बघा बुवा!

जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्
कट्टर गांधीविरोधी असुनही हे वाक्यं प्रचंड आवडलं.

नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. आणि त्या हत्येचे समर्थन करणार्‍यांना हे लक्षातही येत नाही. नथुरामाने अविचारी पणाने गांधींची हत्या करून गांधींना अमर केले. अन्यथा काही दिवसांनी त्यांच्या अतिरेकी अहिंसेला तिलांजली दिली गेली असती. पण त्यासाठी त्यांना जगू देणे आणि अधिक अतिरेक करू देणे आवश्यक होते. असो. आता गांधी शहीद आणि अमर झालेच आहेत तर असे लेख येणे कोण थांबवू शकतो. पण सर्वोदयी जसे एका कालावधी नंतर जसे संख्येने फार सिमित झाले तसे गांधीवादी नक्की झाले असते असे वाटते. इत्यलम्.

>>> नथुरामाने गांधींना मारुन घोडचूक केली असे वाटते. +१ >>> नथुरामाने ...... गांधींना अमर केले. -१ बाकी चालू द्यावं असं स्वमत झालंय! ;)

की गांधींना गरीब ठेवायला आम्हाला महाग पडत आहे, म्हणुन मग त्याच २/३ जणांनी तर सुपारी नाय ना दिली त्यांना मारायची? ना राहील बांबु ना वाजेल बासरी. ना राहील पीठ ना बनेल भाकरी.