आपल्या मित्रांनो, आपन थंड राहूया !
आपल्या मित्रांनो, आपन थंड राहूया !
मित्रांनो, आपल्या इकडे त्याग केला कि तिकडची लोकं 'नौटंकी साला' असं जरी आपल्याला म्हणाली,
तरी भव्य सोहोळ्या मध्ये बाणांच्या शय्येवर पडलेल्या पितामहाने, अर्जुनाच्या कृपेने आपणास हि सुखनैव शय्या मिळाल्याचे म्हणताच, अर्जुनच्या डोळ्यात गंगा जमुना अवतरतात हे पाहून, आपन त्यांना 'नौटंकी साला' असं नाही बोलायचं, आपन थंड राहायचं.
कसाईखाण्यातून निवृत्त होताना, कसाई इमोसनाल होऊन, जर म्हणाला कि माझ्या हातून प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कोणी दुखावलं गेलं असेल, तर मला माफ करा, तर ते पाहून आपन त्यांना 'ड्रामा साला' असं नाही बोलायचं, आपन थंड राहायचं. हातात कोणताही दगड, काठी न घेता शान्तपने धरन धरलं असता, १४४ रखवालदारांनी जरी फरफरट खेचून नेलं, रखवालदारांना केसाचाही धक्का न लावता आपन सर्व सहन केलं, तरी आपण अराजकवादी असं जरी तिकडची लोकं आपल्याला म्हणाली, तरी आपन त्यांची 'क'मालिका पाहतच राहायचं ('क'मालिका या साठी कि त्या हिट्ट असतात न, तिकडे तुलसी पण खूप उगवलीय ना ), आपन मात्र थंड राहायचं.
आपन थंड का राहायचं कारण, सगळे पूजनीय वंदनीय आदरणीय व्यक्तिमत्वे हि तिकडेच आहेत, भारतमातेचे खरे सुपुत्र तिकडेच आहेत , खरे देशभक्त तिकडेच आहेत, भारत हि Landlocked भूमी आहे, व तिच्या सर्व बाजूने पाकिस्तान नामक देश पृथ्वी व्यापून राहिला आहे - असे भूगोलाचे अगाध ज्ञान असलेली मंडळी तिकडेच आहे, आणि एखाद्याला त्यांची मत पटत नसतील तर ती मंडळी त्यांना भारताबाहेर जायला सांगतात (भारताबाहेर म्हणजेच पाकिस्तानात, असे ह्यांचे समानार्थी शब्द आहेत), कारण मत न पटनार्याना ते भारताबाहेरच टिकेट घरपोच आणून देतात. भारताबाहेर म्हणजे अमेरिका नाही, कारण विसा प्रोब्लेम (सध्या नाही). त्रिखंडात हि ऐसी बुद्धिमान लोकं कुठेच नाही , हा विश्वास तिकडचाच आहे. आपन मात्र अडाणी (अदानी नाही ), आपण शतकानुशतके फक्त म्हणत राहूयात , 'आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा'
भारत हि Landlocked भूमी आहे, व तिच्या सर्व बाजूने पाकिस्तान नामक देश पृथ्वी व्यापून राहिला आहेहे मात्र सहीये, पाकिस्तानशी असलेल्या आपल्या पारंपारीक शत्रूत्वाचे नेहमीच आणि बरेच राजकारण केले जाते एवढे मात्र नक्की.