Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

प
पिंपातला उंदीर
Sun, 08/03/2014 - 07:58
🗣 79 प्रतिसाद
I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh नुकतच मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू लिखीत 'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून झाल . बारू हे केवळ सिंग यांचे माध्यम सल्लागार नव्हते तर ते सिंग यांच्या अंतर्गत वर्तुळातले एक महत्वपूर्ण अधिकारी होते . २००४ ते २००९ या काळात सिंग यांच्यासोबत त्यांनी खूप जवळून काम केले आहे . UPA-2 च्या काळात जेंव्हा रोज भ्रष्टाचाराचे नवनवीन सुरस कथा कानावर यायच्या तेंव्हा विरोधकांनी सिंग यांची तुलना आपल्या मुलांच्या दुष्कृत्याकडे डोळेझाक करणाऱ्या धृतराष्ट्राशी करायला सुरुवात केली . यापूर्वी एकदा यशवंत सिन्हा यांनी सिंग याना शिखंडी ची उपमा दिली होती . पण बारू यांनी या आपल्या एके काळच्या बॉस ची तुलना भीष्म या व्यक्तिरेखेशी केली आहे . चुकीच्या पक्षात असलेला एक अत्यंत प्रामाणिक , विद्वान माणूस . भीष्माच्या आयुष्याची जरी शोकांतिका झाली असली तरी ते महानायक होते . मनमोहन सिंग यांच्या बद्दल असे म्हणता येईल का? . स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर ज्या काही थोड्या लोकांनी आपला न पुसणारा ठसा उमटवला आहे त्यात सिंग यांचे नाव नक्की येईल . १९९१ मध्ये देश आर्थिक गर्तेत सापडला असताना नरसिंह राव यांच्यासोबत सिंग यांनी हा आर्थिक शकट सांभाळला . इतकेच नव्हे तर या देशातल्या लाखो तरुणांना जागतिकीकरणाचे फायदे होतील अशी धोरण राबवली . दुर्दैवाने ज्या लोकाना या चे सर्वाधिक फायदे झाले तेच लोक आज त्यांच्यावर प्रच्छन्न टीका करताना दिसतात . दुसऱ्या महायुद्धात अविस्मरणीय विजय मिळवून दिल्यानंतर चर्चिल यांनी लोकांनी सार्वत्रिक निवडणुकीत घरी बसवलं होत . बर्यापैकी सरकार चालवून पण वाजपेयी यांच्यापेक्षा सोनियांना लोकांनी २००४ मध्ये पसंती दिली होति. लोकशाहीत जन मानसाचा अंदाज येणे कठीणच . आणि त्यात पण भारतासारख्या खंडप्राय , बहुविध , बहुभाषिक देशात तर अजूनच अवघड . मनमोहन यांच्या कारकीर्दीच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत . अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू . आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक . पण जेंव्हा विरोधक मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन करतात तेंव्हा सरसकट त्यांच्या १० वर्ष पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला मोडीत काढतात . पण हे खरे आहे का ? UPA-१ च्या काळात विकासदर ९ % वर पोहोंचला होता . सरकार साम्यवाद्यांच्या पाठीम्ब्यांवर असताना पण अमेरिकेसोबत अणुकरार करताना सिंग यांनी राजकीय धाडस दाखवून त्याना फाट्यावर मारल .( देशात तो पर्यंत काही भागात का होईना साम्यवाद्यांचे वर्चस्व होते त्याला ओहोटी लागण्याची प्रक्रिया तिथून सुरु झाली असे माझे निरीक्षण . चूभू द्या घ्या . या पतनाची सुरुवात करण्याचेश्रेय सिंग यांना द्यावे का ? ) २००९ मध्ये कॉंग्रेस ने जो विजय मिळवला आणि स्वतःच्या जागा मध्ये भर घातली त्याचे श्रेय बारू पूर्णपणे मनमोहन यांना देतात . यासंबंधी चे एक छान उदाहरण त्यांनी पुस्तकात दिले आहे . 'द हिंदू ' या दैनिकाच्या विद्या सुब्रमन्यम यांनी ग्रामीण तसेच मुस्लिम जनतेला प्रश्न केला होता . तुमच मत कुणाला ? त्यावर त्यांनी एकमुखाने उत्तर दिले होते . ' सरदार को '. ते सर्व जण सिंग याना नेक आदमी संबोधत असतो . सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते . विरोधक कायम सिंग यांच्यावर उत्तम अर्थ तज्ञ पण वाईट राजकारणी म्हणून टीका करायचे . पण नंतर दिग्विजय सिंग म्हणाले तसे सिंग यांच्यातल्या चलाख राजकारण्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले . सिंग हे राजकारण करण्यात पारंगत होते हे अमान्य करण्यात काही अर्थ नाही . १० वर्ष पक्षांतर्गत विरोधक , सत्ताबाह्य केंद्र , विरोधक यांना तोंड देऊन सरकार चालवणे काही खायचे काम आहे का ? बाह्य सत्ताकेंद्र हि भारतीय राजकारणाची खासियत बनत चालली आहे का ? गोविन्दाचार्यानी वाजपेयी यांना 'मुखवटा ' म्हणून संबोधले होते . सिंग यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द सोनिया यांच्या सावली खाली गेली हे नाकारण्यात अर्थ नाही . अनेक धोरण निव्वळ पक्ष संघटनेच्या (पक्षी -सोनिया ) आग्रहामुळे राबवावी लागली . सोनिया वरचा स्वयंसेवी संस्थांचा प्रभाव बहुश्रुत आहे . मंत्री मंडळातले अनेक ज्येष्ठ सदस्य प्रणव मुखर्जी , अर्जुन सिंग हे आपले reporting थेट सोनियांना करायचे . अनेक लोकांच्या मते राहुल गांधी यांनी जेंव्हा राजकारणाच्या गुन्हेगारीचे विधेयक 'nonsense' म्हणून फाडून फेकला होते तेंव्हा तरी आत्म सम्मान दाखवून सिंग यांनी राजीनामा द्याला पाहिजे होता . पण सिंग यांनी त्यावेळेस आपल्या पदाला चिकटून राहणेच पसंद केले २००९ नंतर आणि नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात मनमोहन सिंग यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर हल्ले झाले . सरकार ची धोरण , भ्रष्टाचार , अकार्यक्षमता यांच्यावर होणारी टीका हि बर्याच अंशी स्वाभाविक असली तरी त्यानिम्मिताने मोठ्या लोकांवर अतिशय घाणेरडी वैयक्तिक टीका करण्याचा ट्रेंड भारतीय राजकारणात रुजला हि खरी घातक बाब . म्हणजे सिंग हे एका 'बाई ' चे ऐकतात म्हणून त्यांच्यावर टीका करणारे लोक मी पाहिले आहेत . त्यांना सत्ताबाह्य केंद्र हा मुद्दा महत्वाचा वाटत नसून एक पुरुषासारखा पुरुष एका बाई चे कसे मुकाटपणे ऐकतो हा मुद्दा महत्वाचा वाटायचा . सर्वात धक्कादायक म्हणजे काही स्त्रिया पण हा मुद्दा हिरीरीने मांडायच्या . मनमोहन सिंग आणि सोनियांची आक्षेपार्ह morphed photograph सगळ्यांनीच पाहिली आहेत . इतिहासातले स्थान वैगेरे राहूच दे पण या देशाच्या अर्थकारणाला कायमचे वेगळे वळण देणाऱ्या सिंग यांचा सरसकट एकेरी आणि मन्नू वैगेरे उल्लेख करणे कितपत योग्य आहे . देशातील बहुतांश जनसमुदाय हा फारवेळ कुठल्याच लाटेखाली राहत नाही . कदाचित अजून काही वर्षांनी नकारात्मकते चे ढग विरून सिंग यांचे वास्तविक मूल्यमापन हा देश करेल हि अपेक्षा . इतिहास च माझे खरे मूल्यमापन करेल असे विधान करण्यामागे हाच मनमोहन सिंग यांचा उद्देश असेल कदाचित .

प्रतिक्रिया द्या
28250 वाचन

💬 प्रतिसाद (79)
प
पिंपातला उंदीर Sun, 08/03/2014 - 11:42 नवीन
@अनुप ढेरे थोडी mistake झाली . कॉंग्रेस ने २०० चा पल्ला ओलांडला आणि UPA ला एकूण बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडल्या . पण कोणावर अवलंबून राहण्याची गरज कमी राहिली .
  • Log in or register to post comments
स
संपत Sun, 08/03/2014 - 11:50 नवीन
छान लेख.मी स्वतः गोंधळात आहे कि युपीए १ आणि २ मध्ये एवढा फरक का पडला? एवढी अकार्यक्षमता अचानक कुठून आली? घोटाळ्यांच्या आरोपामुळे कि जागतिक मंदीमुळे ? सोनियाच्या हस्तक्षेपामुळे म्हणावे तर तो युपीए १ मध्येही असेलच कि. खर तर २००९ च्या विजयानंतर सिंग अधिक धडाडीने काम करतील अशी अपेक्षा होती. मला तरी काहीच कळले नाही. अर्थात जागतिक मंदीची धग भारताला फारशी लागून न देण्याचे श्रेय युपीए २ ला द्यावेच लागेल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 08/03/2014 - 13:13 नवीन
भारतात व्यापार व उत्पादन जग खुले केले गेले याचे प्रमुख कारण आमच्या उद्यीगपतींचा वा शास्त्रज्ञांची नालायकी. १९४७ ते १९९१ या सालात आपण साधी लहान बल्बची विजेची स्वस्त माळ निर्माण करायला शिकलो नाही. एन सी एल काढून किती नोबेल मिळाली या काळात ? सबब लोकसंख्येशी स्पर्धा करेल असा उत्पादनाचा दर्जा व पुरवठा दोन्ही ही नव्हते. रिक्षा घ्यायची तर दहा वर्षे वाट पहावी लागायची ही एक महत्वाच्या सर्वजनिक सेवेची अवस्था होती. मुलभूत सशीधनाच्या नावाने एक क्राय्जेनिक इन्जिनाचे सन्मान्य उदा सोडले तर बोंब आहे. आजही भारीभारी सर्जिकल उपकरणे भारतात तयार होत नाहीत. मॉलमधील बर्याचशा वस्तू दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक नाहीत. ( उदा स्प्रे ) आरोग्य शिक्षण सार्वजनिक वहातुक ई ला पराकोटीचे महत्व येणे गरजेचे आहे पण ही थेट उत्पादक क्षेत्रे नसल्याने त्यावर जीडीपी मधील नगण्य पैसा खर्च होतो.आपले खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकरणे . खाजगी क्षेत्राला संधी देऊन सरकारी बाबूना खाबूगिरीपासून लांब ठेवून सरकारी उद्योगाचे खाजगीकरण करून जनतेला भांडवल दारांच्या ताब्यात देणे या खेरीज बर्याच देशातील सरकाराना गत्यंतर नव्हते.त्यात नरसिंहरावानी ते केले त्यात वेगळे काही नाही. त्यानी समाजवादाचा अत्यंविधी केला. त्याचे काही चांगले परिणाम समाजाला दिसत आहेत. श्रीमंत लोकांसाठी थेट द्रुतगति मार्ग झाला तर त्यावरून गरीब माणूस कोल्हापूरवरून परळ ला जाउन शकतो. ही समाजवादी मुव्हच ठरली आहे. म्हणून कदाचित माझी ऐतिहासिक प्रधानमंत्री म्हणून नोंद होईल असे मनमोहन जी म्हणत आहेत. नरेम्द्र मोदी अजून रवीशास्त्री सारखे खेळत आहेत. भारतातील भ्रष्टाचार व जीवनावश्यक वस्तूंची महागाई या बाबत एकही क्रांतिकारी विचार त्यांचेकडे नसावा. सबब ते ही मौनी बाबा झाले आहेत. अजूनही भारतीय माणसाचे सार्वजनिक कॅरॅक्टर एतके खराब दर्जाचे आहे की त्याना त्याच्या लायकीचेच सरकार मिळत आहे मिळणार आहे. जे चांगले वाईट घडत आहे त्याचे श्रेय जनतेला तसेच सर्वसाक्षी काळाला ही आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/03/2014 - 13:16 नवीन
आवाज नसलेले कळसुत्र बाहुले ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 08/03/2014 - 13:35 नवीन
कोणताही 'इतिहास' म्हटला, तर तो कोणी लिहिलेला, हे आधी बघावे लागते.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 08/03/2014 - 16:26 नवीन
ऐतिहासिक वाक्य *yes3*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 08/03/2014 - 17:33 नवीन
अगदी खरी गोष्ट.
History is written by the victor -Churchil-
आणि विजेता हा सत्यवादी किंवा बरोबर असेलचं असं नाही. उदाहरण भारताचा इतिहास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
म
मदनबाण Sun, 08/03/2014 - 19:18 नवीन
कोणताही 'इतिहास' म्हटला, तर तो कोणी लिहिलेला, हे आधी बघावे लागते. "इतिहास लिहण्या आधी तो घडवावा लागतो... जे आपले आत्ताचे प्रंतप्रधान करत आहेत. तसेच कॉमन वेल्थ गेम्स मधे आपल्या देशातील खेळाडुंनी घडवला आहे. :) नरेंद मोदींचे नेपाळ मधील आजचे भाषण :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ए
एसमाळी Sun, 08/03/2014 - 14:34 नवीन
मी 2004 ते 2009 या upa 1 च्या काळातील भरभराटीचे श्रेय Nda 1 ला देईन.कारण धोरणाचा परिणाम दिसायला काही वर्षाचा काळ जावा लागतो.upa 2च्या काळातील अधोगती upa1 मध्येच चालु झालती.फरक एवढाच की upa 2 मध्ये सगळ उघड झाल.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 08/03/2014 - 16:43 नवीन
माननीय मनमोहन सिंग एक उत्कृष्ठ नोकर (एक्प्लॉई वा टीम मेंबर ह्या अर्थाने) नक्कीच होते,परंतु त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण (एम्प्लॉयर अथवा टीम लीडर बनण्याची क्षमता) खरोखर होते का? हा कळीचा मुद्दा आहे. तुलना करायचीच झाल्यास त्यांची तुलना मी सचिन तेंडुलकरशी करेन. सचिन एक उत्कृष्ठ खेळाडु होता पण कधीही एक उत्कृष्ठ कप्तान नाही बनु शकला. ही बाब विचारात घेता पुस्तकाचे An Accidental Prime Minister हे शीर्षकच बरेच काही सांगुन जाते.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sun, 08/03/2014 - 17:17 नवीन
आजवरच्या इतिहासात सर्वश्रेष्ट, सर्वात कणखर, भारताला सुवर्णयुगात नेऊन पोचवणारा, ही भूमी पुन्हा सुजलाम सुफलाम करुन दाखवणारा, असामान्य वक्ता, कुठलेही भाषण घ्या, ऐकत रहावेसे वाटेल, धीरोदात्त, जनतेशी वरचेवर संवाद साधण्याची हातोटी, अप्रिय असले तर हिताचे निर्णय त्वरित घेण्यात कुठलीही हयगय न करणारा, रिमोटवर चालणारा कळसूत्री बाहुला आहे असा संशयही येऊ नये असा पारदर्शक कारभार, कमालीचा स्वच्छ, कुठल्या सहकार्‍याचे पाऊल वाकडे पडते आहे असा संशय आला तरी तात्काळ त्याची उचलबांगडी करणारा रामशास्त्री बाण्याचा नि:स्पृह. असा महाप्रतापी नेता भारताला लाभला हे भारताचे अहोभाग्यच. असा धुरंधर काँग्रेस पक्षात निर्माण व्हावा हे त्या पक्षाचे पूर्वजन्मीचे पुण्य असावे. ह्या महामानवाला माझे कोटीकोटी दंडवत!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/03/2014 - 17:34 नवीन
निवडणुकीपूर्वीच्या मिपावर्च्या एका लेखमालेची आठ्व्ण झाली आणि एकाएकी ड्वाले पानाव्ले ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ध
धन्या Sun, 08/03/2014 - 17:41 नवीन
ते मफलरलाल खोकचंद कुठे असतात हल्ली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पुण्याचे वटवाघूळ Sun, 08/03/2014 - 17:53 नवीन
नक्की कोणती लेखमाला? गुजरात विकासाचे मृगजळ की सनी लिऑनीबरोबर सहा मिनिटे की मिपावरील सगळ्यात अजरामर लेखमाला---रूणझुणु रूणझुणु रे भ्रमरा (बेशर्त स्विकृती आठवते का?) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आनन्दा Mon, 08/04/2014 - 08:33 नवीन
बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 08/04/2014 - 19:45 नवीन
बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. Smile
हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 08/04/2014 - 06:51 नवीन
बाकी त्या न्युक्लिअर डिलची काहिही वासलात का लागेना त्या निमिताने त्यांनी बंगालमधील (आणि केरळमधील) स्वतःला ढुढ्ढाचार्य समजणार्‍या लाल तोंडाच्या मस्तवाल माकडांना त्यांची जागा दाखवून दिली हे मनमोहनसिंगांचे श्रेय नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Mon, 08/04/2014 - 19:51 नवीन
मला वाटते म.मोंना आपल्या एकुण कर्तबगारीचा व पदाचा परिणामकारक असा प्रभाव पाडता आला नाही चांगली १० वर्षे संधी मिळुनसुद्धा, ते नेहमीच कुणाचेतरी ओशाळ्यासारखे असे वागताना दिसले, मक्खपणे वावरले. त्यांनी काही राजकारण केले व आपल्याच पक्षाला आपल्या प्रभावाखाली घेउन त्याचे व देशाचे समर्थपणे नेत्रुत्व पंतप्रधान म्हणुन केले असे भासले नाही, त्यांचा खंबीर असा आधार कधीच कुणाला वाटला नाही, नेहमीच आश्रितासारखे वाटायचे, वागण्यात मोकळेपणा नव्हता. किंबहुना मी या खंड्प्राय देशाचा सामर्थ्यसंपन्न पंतप्रधान आहे हे ते विसरले होते किंवा असे म्हणता येइल ते या देशाचे सर्वशक्तिमान नायक आहेत असे सर्वसामान्यजनांच्या मनावर बिंबवण्यात अयशस्वी ठरले, अगदी बरीच चांगली कामे करुनसुद्धा.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 08/04/2014 - 21:23 नवीन
इतीहास ममोंचं योग्य परिक्षण करु शकेल असं वाटत नाहि. कर्तबगारीशुण्य राजपुत्र आणि असमाधानी राणि यांची मर्जी सांभाळत एका हुषार आणि सज्जन प्रधानाचं जे व्हायचं तेच झालं. अशी परिस्थिती निकट भविष्यात यायचे चान्सेस कमि आहेत. त्यामुळे ममोंवर सर्वात अधिकृत कमेण्ट्स त्यांच्या सहकार्‍यांचीच असतील, व सध्यातरी ति वाईट आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 08/04/2014 - 23:18 नवीन
द इकॉनॉमिस्ट या अमेरिकन नियतकालिकातील भारताविषयीचे जवळजवळ सर्वच लेख (आणि भारतीय नावाच्याच लेखकांनी/ लेखिकांनी लिहिलेले!) भारतद्वेष्टे (India-bashing) या प्रकारात मोडत असल्याचं माझं मत आहे, पण त्यांचा ३ मे २०१४ चा अंक याबाबतीत किंचित अपवाद वाटला. त्यातला Man out of time या लेखात काही मुद्दे चांगले मांडले आहेत. एक माणूस म्हणून नि:स्वार्थी असलेल्या मनमोहन सिंग यांचं एकीकडे राज्यकर्ता म्हणून काय चुकलं, किंवा दुसरीकडे त्यांनी घेतलेले कोणते निर्णय दूरदृष्टीचे / देशाच्या दृष्टीने भले होते, याचं विश्लेषण वाचनीय आहे. निवडणू़क निकाल जाहीर व्हायच्या आधी आठवडाभर आलेल्या या लेखात ही telling वाक्ये होती: "Mr Singh keeps a characteristic silence, but is an inevitable target for the BJP. The most spiteful critics, though, come from his own party. Congress expects a heavy defeat when national election results are broadcast on May 16th. It needs a scapegoat." अर्थात, सर्वच मुद्दे मला पटले नाहीत, पण शेवटी 'द इकॉनॉमिस्ट मधलं लिखाण आहे' म्हणून सोडून दिलं, discount :-) याच लेखावर आलेल्या प्रतिक्रियादेखील वाचनीय आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्पार्टाकस Wed, 08/06/2014 - 06:30 नवीन
मनमोहन सिंग यांची काही खास वक्तव्ये :- "देशातील साधनसंपत्तीवर सर्वप्रथम अधिकार अल्पसंख्यांकांचा आहे. नानावाटी आयोगाने १९८४ च्या दंगलीत जगदीश टायटलर दोषी आहेत हे जाहीर केल्यावर "जगदीश टायटलर निर्दोष आहे. मी त्यांना मंत्रीमंडळातून मुळीच काढणार नाही." "कॉमनवेल्थ खेळांमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही." "ए. राजा निर्दोष आहे." "अण्णा हजारेंनी निवडणूक लढवून जनतेतून निवडून यावे आणि मग जनलोकपाल आणावा!" स्वतः मनमोहन सिंग राज्यसभेचे सभासद आहेत. "राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सर्वाथाने योग्य आहेत!" "शिबू सोरेन, लालू यादव यांना मंत्रीमंडळातून काढणार नाही!" "चिदंबरमने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही!" "महगाईसाठी शरद पवार जबाबदार आहेत!" विरोधाभासाचा सर्वोत्कॄष्ठ नमुना! "मी हतबल आहे. आघाडी सरकारमुळे मला भ्रष्टाचाराविरुध्द काही करता येत नाही!" "मी दुर्बल नाही, कणखर आहे!" "मी कोणताही भ्रष्टाचार सहन करणार नाही!" दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी थॉमस यांची नेमणूक. सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी केल्यावर, "या प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण दोषी आहेत! मी नाही!" "नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे देशास घातक!" हे राजकीय विरोध म्हणून सोडून देता येईल. मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते. परंतु त्यांनी राबवलेल्या निर्णयांचं श्रेय नरसिंहराव यांचं काहीच नाही का? नरसिंहराव यांच्या काळात गांधी घराण्याची लुडबूड राजकारणात नव्हती त्यामुळे आर्थीक उदारीकरणाचे निर्णय राबवताना अन्न सुरक्षा योजनेसारख्या आतबट्ट्याच्या व्यवहाराला केवळ आले सोनियाच्या मना म्हणून राबवावे लागले नव्हते. परंतु, पंतप्रधान म्हणून त्यांनी फक्त 'येस बॉस!' इतकेच आपले इतिकर्तव्य मानले.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 08/07/2014 - 14:40 नवीन
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. ममोंनी बरीच पदे भुषवली पण कुठल्याच पदावर लक्षणीय काम केले नाही. एकेकाळी ममो सरकारीकरणाच्या बाजुला होते कारण इंदीरा गांधी पंतप्रधान होत्या. नंतर उदारीकरणाच्या बाजुने झाले कारण राव साहेब आले. त्यांना स्वताचे काही मत नाही आणि सत्व पण नाही. वरुन हुकुम आला की कागद्पत्र फक्त तयार करायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
प
प्रतापराव गुरुवार, 08/07/2014 - 15:16 नवीन
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. >>>>> नाही हो इतकही कमी लेखू नका त्यांना रावांशी त्यांची तुलना करू नका. माझ्या समजुतीप्रमाणे रावांवर हर्षद मेहताकडून एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप होता त्या काळात ती बरीच मोठी रक्कम होती. ममो ह्यांच्यावर असले आरोप कधी झाले नाहीत.
  • Log in or register to post comments
भ
भाते गुरुवार, 08/07/2014 - 20:04 नवीन
काही अपवाद वगळता, वरच्या सर्व प्रतिक्रियांमध्ये मनमोहन सिंग यांचे फक्त युपीए १ आणि २ या काळातले मुल्यांकन केले आहे. वरच्या प्रतिक्रिया वाचुन 'इतिहास मनमोहन सिंग यांचे (पंतप्रधान म्हणुन) मूल्यमापन कसे करेल ?' असे धाग्याचे शीर्षक आहे का अशी शंका आली. पंतप्रधान म्हणुन त्यांना कितीही नावे ठेवली तरी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (१९८२ - ८५) पासुन, भारताच्या योजना आयोगाचे ऊपाध्यक्ष (१९८५ - ८७), भारतीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार (१९९० - ९१) आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री ही त्यांची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे.
  • Log in or register to post comments
प
पुतळाचैतन्याचा Sun, 08/10/2014 - 18:36 नवीन
इतर अनेक लोक उपलब्ध असताना ..इतिहास या माणसाचे अनालिसिस करन्यत वेल घालवेल असे वाटत नाहि.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Mon, 08/11/2014 - 10:48 नवीन
धाग्यावर Score Settling होत आहे का ? मनमोहन २००९ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मत घेऊन का निवडून आले याचे तटस्थ विश्लेषण करण्यात कुणालाच रस नाही का ? कारण इथे अनेक लोक जस म्हणत आहे तसे मनमोहन अकार्यक्षम , कळसूत्री बाहुले असते तर लोकांनी त्यांना सलग दुसरी टर्म दिलीच नसती . अटलजींना (सलग २ पूर्ण काळ टर्म ) पण हि संधी लोकांनी दिल्या नाहीत मात्र भारतीय जनतेनी हा विश्वास मनमोहन यांच्यावर दाखवला . कुछ तो बात होगी . मी स्वतहा मोदी यांचा 'भक्त ' नाही . पण त्यांचे मूल्यमापन अजून ५ वर्षांनी केल्या जावे असे माझे मत आहे . चांगल्याला चांगले म्हण्याला काय हरकत आहे . नाहीतर आंधळेपण पोटी मोदी भक्तांनी जेखालच्या पातळीचे bashing केल ते आणि मोदी यांच जे हनन चालू आहे ते याच्यात फारसा गुणात्मक फरक नाही असे मला वाटते . बाकी हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे . यापूर्वी त्यांनी इंडिया shining चा भोपळा फोडला होता मोदी अपयशी ठरले त्यांना पण जनता बाहेरचा रस्ता दाखवेलच . चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते
  • Log in or register to post comments
स
संपत Mon, 08/11/2014 - 13:38 नवीन
हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे ह्याच्याशी सहमत. गेल्या काही निवडणुकांचे निकाल हा विश्वास बळकट करणारे आहेत. बाकी युपीए १ चे यश मी वर नमूद केले आहे. त्याचे श्रेय मनमोहन सिंघना देण्याचे नाकारणे अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
च
चौकटराजा Mon, 08/11/2014 - 13:10 नवीन
चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते ] आपले हे वाक्य मोलाचे आहे. या धाग्यात मी वर दिलेला प्रतिसाद काय सांगतो ? त्यातूनही मला वाटते की यातील यश काळाचे व अपयश हे मनमोहन यांचे आहे. कारण ते काय किंवा जाणता राजा(?) शरद पवार यांचे आरोग्य, शिक्षण, न्यायदान व निवडणूक प्रक्रिया या बाबीवर अजिबात लक्ष नाही. हे अनेक कॉंग्रेसी व भाजपा नेत्यांचे असेच आहे. भाजपा चा कारभार दगडापेक्षा वीट मऊ इतपतच ठीक चालेल. व हे कट्ट्रर भाजप वाल्यानाही ठाउक आहे. कारण सलमान गजाआड जाउ नये अशीच न्यायव्यवस्था हवी असाच दोघांचा अप्रोच आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 08/16/2014 - 15:29 नवीन
देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या तीन मूलभूत बाबी , सडक, रेल्वे, कृषी साठी लागणारी सिचाई सुविधा या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाजपायी सरकार ने ५ वर्षात जितके कार्य केले त्याचा १/४ कार्य ही गेल्या १० वर्षात झाले नाही. वाजपायी सरकार जर पुन्हा जिंकले असते तर चतुर्भुज योजना केंव्हाच पूर्ण झाली असती.dfc चे कार्य ही पूर्ण झाले असते. काही नदी जोड प्रकल्प ही पूर्ण झाले असते. रोजगार आणि देशाचा आर्थिक विकास कित्येक पट वाढला असता. मनमोहन सरकारने सर्वप्रथम नदी जोड प्रकल्पाला कचरा पेटी दाखविली आणि सडक आणि रेल्वे दोन्ही आधार भूत बाबींवर खर्च कमी केला. का? याचे उत्तर कोण देणार. आज ८० टक्के माल रस्त्यावरून न्यावा लागतो आहे त्या मुले वाहतूक खर्च कित्येकपट वाढला. देशाचा बिकास खुंटला. UPA-I मधेच मूलभूत बाबींवर दुर्लक्ष करण्यात आले. सर्व बाबतीत पीछेहाट झाली तरीही UPA पुन्हा जिंकली कारण विरोधी पक्षात नेतृत्वाचा अभाव होता. बाकी निवडणूक जिंकायचे म्हणाल तर केजरीवाल सारखा व्यक्ती ही निवडणूक जिंकू शकतो. बाकी अधिक बोलू शकत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा