वाघाच्या जबड्यात
कालची धक्कादायक बातमी अनेकांनी वाचली असेलच. दिल्ली येथील प्राणीसंग्रहालयात झालेली घटना. एक २० वर्षाचा तरूण पांढ-या वाघाच्या खंदकात्/पिंज-यात पडला आणि वाघाने त्यावर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात ऐकायला वाचायला मिळालेली काही मतं आणि त्यावर माझे विचार खालीलप्रमाणे.
१) पण तो पडला कसा पहिले म्हणजे? - महत्वाचं हे आहे की सुरक्षाव्यवस्था, आपातकालीन यंत्रणा गेली कुठे?
२) त्याच्याच उंगल्या नडल्या. / तो नशेत होता / त्याने आत्महत्या करायला उडी मारली असावी - हे काहीही असेल तरी ते काय आहे ते नंतर बघता आलं असतं. वाचवता का नाही आलं संग्रहालय प्रशासनाला
३) गर्दी पांगवण्यात सुरक्षारक्शकाचा वेळ गेला - की ना इंडियन वाली बात! हे बाकी आहे. प्रसंग काही असो, गर्दी जमणारच. फुकटात मनोरंजन.
४) व्हॉट्सॅप वर फेसबुक वर त्याचा व्हिडियो शेअर करण्यात आला - कहर. अर्थात दुसरी अपेक्षाच नाही. माणूस मरतोय समोर; व्हिडियो कसला काढतात अडानचोट? तद्दन कोडगेपणा, भावनाहीनतेचं उत्तम उदाहरण. सुरक्षारक्षकाला, पोलिसाला, फायर ब्रिगेडला बोलवाव; त्या वेळी जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं सोडून....
५) भिंत काही फार उंच नाहीये - वा! मग मार उडी.
६) लोकांनी दगड मारले म्हणे - त्याने बिथरला हो तो.
असो. सहज आठवलं, अमेरिकेला एकदा डोळ्यासमोर झालेल्या प्रसंगात एक व्यक्ती फुटपाथवर पडलेली होती, तिच्या तोंडातून फेस येत होता. प्रथमदर्शनी दारुडा, गर्दुल्ला असेल असं वाटत होतं. सोबत असलेल्या माझ्या नातेवाईकांनी ९११ ला फोन केला असता मोजून पाच मिनिटाच्या आत फायरची गाडी, कॉप, व अँब्युलन्स तिनही तिथे उभ्या होत्या. त्या माणसाला उचलून नेण्यात आलं. कुणाला 'तुम्ही कोण, तुम्ही तिथे काय करत होतात' इत्यादीपैकी एकही प्रश्न न करता. अर्थात; ती अमेरिका होती.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!