Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेक इन इंडिया...

ब
बाबा पाटील
Fri, 10/03/2014 - 09:55
🗣 42 प्रतिसाद
मा.पंतप्रधानांनी एक चांगली घोषणा केली आहे,मेक इन इंडिया,खर तर हे घडायलाच हव,किंवा आपण जर दैनंदिन वापराच्या गोष्टी घेतल्या तर त्यातल्या किती गोष्टी या भारतात बनलेल्या असतात्,किंवा परदेशातील उत्पादित आहेत. बर्‍याचदा हे कळतच नाही की आपण वापरत असलेली वस्तु देशांतर्गत उत्पादित आहे की परदेशात बनलेली आहे. जागतिक आणी देशस्थ अर्थकारणाचा विचार करता,मेक इन इंडिया वस्तु वापरण कधीच चांगलेच ठरेल,परंतु दर्जा राखलेल्या उत्तम अश्या वस्तु ज्या देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादित केल्या आहेत्,त्या कुठल्या कुठल्या हे जाणकार सांगु शकतील का ?

प्रतिक्रिया द्या
14683 वाचन

💬 प्रतिसाद (42)
प
पैसा Fri, 10/03/2014 - 12:23 नवीन
अनेक वस्तूंचे सुटे भाग परदेशात तयार होतात आणि तिथून आयात केरून ती वस्तू भारतात जुळणी केले जाते. कधी परदेशस्थ कंपतीच्या भारतातल्या युनिटमधे वस्तू तयार होतात. तर कधी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय भारतात असते पण वस्तू परदेशात तयार झालेली असते. की ज्या कंपनीचा फायदा भारतातच रहातो आणि गुंतवला जातो त्या कंपन्या भारतीय म्हणाव्यात? यातल्या नेमक्या कोणत्या वस्तूला स्वदेशी म्हणावे शंकाच आहे! मला वाटतं फक्त आपण रोज जे जेवतो ते, बहुतांश कपडे आणि कुंभार इ. लोकांनी तयार केलेल्या वस्तू एवढ्याच गोष्टी संपूर्ण स्वदेशी ठरतील. बर्‍याच शंका आहेत. उत्तरे कोण देतंय बघूया!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Fri, 10/03/2014 - 12:27 नवीन
बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या उत्पादनांची हल्ली लोकसत्तासारख्या मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रातही पुर्ण मुखपृष्ठ भरुन जाहीरात असते. कुणाला काही अनुभव आहे का या उत्पादनांचा?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 10/03/2014 - 14:16 नवीन
गेल्या वर्ष भर पासून वापरीत आहे, उत्पादनाचा दर्जा उत्कृष्ट कोटीचा आहे. साबण असो वा शेम्पू त्याच दर्जाच्या बाहेर मिळणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत किमंत जवळपास २/३ आहे. शिवाय,आवळा, ब्राह्मी,खस,बेल,पण इत्यादी शर्बते ही आहेत. शिवाय फळांचे रस इत्यादी पण आहेत. बिमार लोकांसाठी दलिया हा आरोग्यवर्धक सकाळच्या नाश्त्या साठी सर्वश्रेष्ठ पदार्थ म्हणता येईल. (यात गहू,सालीची मुगाची डाळ, बाजरा, तीळ,तांदूळ, इत्यादी असल्यामुळे संपूर्ण भोजन आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
र
रेवती Fri, 10/03/2014 - 14:22 नवीन
अरे वा! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/04/2014 - 13:02 नवीन
दालिया सोडून बाकि सगळ्या ला+++१११ दंतकांती टूथपेस्ट पण चांगली हाय! :) गेली दिड वर्ष हेच सर्व वापरून समाधानी राहिलेला - आत्मु! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
स
संचित Sun, 10/05/2014 - 12:48 नवीन
मी सुद्धा गेले २ वर्षं तेल,शाम्पू च्यवनप्राश आणि काही इतर प्रोडक्ट वापरतो आहे. बरेंच चांगले आहे. वापरताना १००% नैसर्गिक असल्याचा अनुभव होत राहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 10/06/2014 - 14:25 नवीन
त्यांची मसाला बिस्कीटे आणि मारी पण छान आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संचित
म
मार्मिक गोडसे Sat, 10/04/2014 - 07:37 नवीन
शरीराच्या सफाईसाठी दिव्य फार्मसीची सगळीच उत्पादने उच्च दर्जाची आहेत. आंघोळीचे साबणं व शांपू उत्तमच. अ‍ॅसिडीटीसाठी अविपत्तिकर चूर्ण व पोट सफाईसाठी हरीतकी चूर्ण मस्त व स्वस्तही. आवळा कँडी एकदा खाऊनच बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
म
मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 12:37 नवीन
जाहीरात श्रेष्ठ.. त्यामुळे वस्तू कुठलीही असो, जाहीरात महत्वाची. १९६५ ===> काय तुमच्या पावडरीत मीठ आहे? २०१४ ====> काय तुमच्या टूथ-पेस्ट मध्ये मीठ नाही? इथे भारतात ग्राहक हा अजगर आणि परदेशी कं. म्हणजे गारूडी... असो, अद्याप टोपाझ आणि विको वापणारा मुवि.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 10/03/2014 - 12:38 नवीन
मी वापरते रामदेव बाबाची बरीच प्राॅडक्ट्स.त्याची अॅलो जेल,ज्युस,फेसवाॅश,सितोपलादि चुर्ण ,बदाम तेल आणि महानारायण तेल वापरते.चांगली अाहेत.बर्याच काळापासुन वापरते अाहे.इतर बहुराष्ट्रिय कंपन्यांच्या तोडीची उत्पादनं आहेत.अजूनतरी काही त्रुटी अाढळलेली नाही.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 10/03/2014 - 13:09 नवीन
मेक इन इंडिया: खरं तर हे कधीच घडायलाच हवं होतें! यामुळे एक तर जास्तीत जास्त भारतीय कामगारांना रोजगार मिळेलच, पण देशातील पैसा देशातच राहयला तर त्याचा अजून चांगला उपयोग होईल. दुसरे म्हणजे करांच्या रूपाने भारत सरकारला खूप मोठी रक्कम दर वर्षी हमखास मिळत जाईल, जी परत भारतीयांच्या कल्याणासाठी वापरता येईल. तिसरे म्हणजे या निमित्ताने बरेच अभारतीय नागरिक परत आपल्या देशात येवू शकतील, कारण येथील रोजगार क्षमता वाढलेली असेल. प्रत्येकाच्या खिशात जास्त पैसे शिल्लक राहिल्याने ती व्यक्ती जास्तीत जास्त खरेदी करून अर्थव्यवस्थेला चालना देवू शकेल. त्यामुळे अप्रत्यक्ष रोजगाराच्या (उदा: डॉक्टर, वकील, शिक्षक, वाहतूकदार,रस्ते बांधणी वगैरे) अगणित संधी तयार होतील. यात अमूल, निरमा, गोदरेज, संतूर, बबुल/डाबर, मायक्रोमॅक्स, एशियन पेन्ट्स, अरविंद, रेमंड्स सारख्या भारतीय ब्रांडला प्राधान्य दिले पाहीजे. व यात सर्व भारतीय उत्पादकांनी स्वत: पुढाकार घेवून आपल्या वस्तू जागतिक दर्जाच्या बनवल्या पाहिजेत. पण यात पुढचे पावूल अधिक महत्त्वाचे असणार आहे ज्याची तयारी आत्तापासुनच झाली पहिजे. तयार होणाऱ्या मालाचे संशोधन स्वामित्व सुद्धा भारतीय लोकांकडे असले पाहिजे. कारण बराच पैसा "रॉंयल्टी"च्या रूपाने देशाबाहेर जात आहे. यात दोन उदाहरणे देवू इच्छितो. १) मारुती सुझुकी ची प्रत्येक कार भारतात बनवली जात असली तरी प्रत्येक कारमागे ठराविक रक्कम (जी २% ते ६% असते) सुझुकी जपानला रॉंयल्टी च्या स्वरुपात जात असते. हि रक्कम २०१३-१४ मधे रु २४८६करोड आहे. २)कोका कोलाची बाटली भारतातच जरी बनली असेल तरी प्रत्येक कोकने भरलेली बाटली बनवायचा खर्च फक्त ६० पैसे येतो. पण कोक बनवायला जो सिक्रेट फाॅर्मुला जो भारतात आयात होतो त्यासाठीच २ रुपये/बाटली दिले जातात. याव्यतिरिक्त जाहिराती साठी कितीतरी पैसा भारताबाहेर जात असतो, जो करोडोमध्ये असतो. त्यामुळे मी असे म्हणेल कि जे वस्तू/पदार्थ भारतात संशोधित आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे. असे नसले तर ते भारतात जरी बनत असतील तरी त्याचा भारतीयांना फार कमी उपयोग होतो.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 10/03/2014 - 16:31 नवीन
मारूती सुझुकी व कोकाकोला ह्या दोन्ही वस्तूंची संशोधने भारतात झाली असा आपला दावा आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 10/03/2014 - 17:50 नवीन
नाही. ही दोन्ही उदाहरणे "बराच पैसा "रॉंयल्टी"च्या रूपाने देशाबाहेर जात आहे." याचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
आ
आनन्दिता Fri, 10/03/2014 - 20:52 नवीन
आँ.?. राँयल्टी?. मिपावर मोजी लाट आलेय की काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 10/06/2014 - 14:26 नवीन
आणि हो.. थम्सअप या कोकाकोलाच्या लोकप्रिय ब्रांडचे संशोधन भारतात झाले होते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Mon, 10/06/2014 - 17:38 नवीन
पण १९९३ मध्ये पारलेने तो ब्रांड कोका कोला या अमेरिकेतील अ‍ॅटलांटा(जॉर्जिया)स्थित मुख्य कार्यालय असलेल्या विदेशी कंपनिला विकलेला आहे त्यामुळे त्याची राॅयल्टीही अमेरिकेतच जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
निनाद मुक्काम … Fri, 10/03/2014 - 14:27 नवीन
लेख व प्रतिसाद वाचतोय एक मात्र नक्की स्वदेशी चा पुरस्कार करा, त्यासाठी उत्तेजन द्या मात्र कृपा करून चीनी मालावर बहिष्कार अश्या प्रकारची विधान ह्या जागतिकीकरणाच्या काळात करू नका , उद्या भारतात बनविलेल्या अमेरिकन बाजारपेठेसाठी बनवलेले भारतातील आयटी मालावर अमेरिकेत बहिष्कार टाकला तर भारतात आपली आयटी हब टिकेल का.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 15:48 नवीन
यातील भारतीय वस्तुंचे वर्गिकरण करता येइल काय ? १) टुथ ब्रश/पेस्ट - पेप्सोडेंट्/ कोलगेट/ओरल-बी २) चहा - रेड लेबल/ ताज ३) साबण / दव्ह/पिर्र्स्/लाइफबॉय्/ संतुर्/इत्यादी ४) तेल - पॅराशुट् / बजाज अलमंड ५) हेअर जेल - सेट वेट/ पॅराशुट ६) विविध परफ्युमस ७) कॉर्न फेल्क्स ८) घरातील विजेचे दिवे ९) संसार उपयोगी वस्तु १०) वाहने ११)पेन १२) संगणक यातील ढोबळ वर्गिकरण करता येइल का ?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 10/03/2014 - 18:49 नवीन
१) टुथ ब्रश/पेस्ट - पेप्सोडेंट् २) चहा - रेड लेबल/ ताज ३) साबण / दव्ह/पिर्र्स्/लाइफबॉय्/ पाॅँडस इत्यादी ह्या वस्तु हिंदुस्तान लिवर भारतातच बनवते परंतु ह्यांचे स्वामित्व युनिलीवर ह्या विदेशी कंपनीकडे आहेत, ज्यांचे कार्यालय लंडन (युनायटेड किंगडम) मध्ये आहे. कोलगेट टूथ पेस्ट/ पामोलिव साबण ह्या वस्तु भारतातच बनवल्या जातात परंतु ह्यांचे स्वामित्व न्यूयॉर्क स्थित कोलगेट पामोलिव विदेशी कंपनीकडे आहेत. जिलेट ब्लेड्स ह्या वस्तु भारतातच बनवल्या जातात परंतु ह्यांचे स्वामित्व जिलेट या बोस्टन(अमेरिका)स्थित कंपनीकडे आहेत. टाइड वाशिंग पावडर/ ओरल-बी टूथ पेस्ट/ हेड एंड शोल्डर शाम्पू/ ओले/ रिजॉइस/ लॅकोस्टे/ओल्ड स्पाइस ह्या वस्तू भारतातच बनवल्या जातात परंतु ह्यांचे स्वामित्व प्रॉक्टर आणि गॅम्बल या विदेशी कंपनीकडे आहेत, ज्यांचे कार्यालय सिनसिनाटी (युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका) येथे आहे. केलॉग्ग्ज कॉर्नफ्लेक्स ही विदेशी कंपनीकडे आहे, ज्यांचे कार्यालय मिशिगन(युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका)येथे आहे स्कोडा, वोल्स्वॅगन, होंडा, टोयोटा, ह्युंदाई,मारुती सुझुकी ची वाहने भारतात बनतात परंतु ह्या मुळात विदेशी कंपन्याचे भारतीय कंपन्याबरोबर जॉईन्ट वेंचर आहेत. हिरो मोटर्स, टीवीएस, बजाज, टाटा, महिन्द्रा आणि महिन्द्रा, रॉयल इनफिल्ड, आयशर मोटर्स हे वाहन १००% भारतीय आहे. सेट वेट/ पॅराशुट हे ब्रांड मॅरीको या १००% भारतीय कंपनीकडे आहे. संतुर् हा ब्रांड विप्रो या १००% भारतीय कंपनीकडे आहे. मायक्रोमेक्स मोबाईल व एलसीडी, ईगल फ्लास्क, अजंता क्लॉक ह्या १००% भारतीय कंपन्या चीन/तैवान मधून सर्व वस्तू बनवून आणतात. अधिक माहिती गुगलकाका देतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
द
दशानन Fri, 10/03/2014 - 19:00 नवीन
अहो, अशी लिस्ट काढायला गेले तर अंगावरचे कपडे पण राहणार नाहीत हो... ;) "मेक इन इंडिया!" आहे, स्वदेशीचा नारा नाही आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 10/03/2014 - 19:14 नवीन
भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू. कपड्याचे भरपूर ब्रांड भारतीय आहेत उदा.: अॅरो, रेमंड्स, दिगजाम, मयूर, सियाराम, मदुरा कोट्स. आता अशीच वेळ आली आहे कि विदेशी ब्रांड्स ला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी "मेक इन इंडिया!" शिवाय पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Fri, 10/03/2014 - 19:24 नवीन
मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया.. यात फरक आहे, एवढेच सांगतो. *अॅरो, रेमंड्स, दिगजाम, मयूर, सियाराम, मदुरा कोट्स. हे सर्व मेक इन इंडिया आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
द
दशानन Fri, 10/03/2014 - 19:28 नवीन
>>>भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू. आभारी आहे, आभारी आहे, किमान कोणाला तरी जाणवले मी भारतीय नाही आहे ;) >>>विदेशी ब्रांड्स ला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी "मेक इन इंडिया!" कसं??? अहो जवळपास ७०-८०% विदेशी ब्रांड्स हे भारत, चीन, बंगालादेश येथे निर्माण होतात, त्यांना आधी घरी पाठवावे लागेल मग आपला "मेक इन इंडिया" लागू होईल. बर, आपण असे समजून चालू कि आपण असाही प्रयत्न केला, पण तंत्र? ते देखील बाहेरून येते.. आजच्या घडीला आपण पूर्ण भारतीय वस्तूच वापरायचे ठरवले तर "खादी"चे कपडे आणि पुन्हा १९४७ पासून सुरवात करावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 10/03/2014 - 20:18 नवीन
विदेशी कपडे बऱ्याच वर्षांपासून भारतात बनत आहेतच की! उदा:अॅरो हा ब्रांड पीव्हीएच कॉर्प या अमेरिकन कंपनीचा आहे. परंतु त्यांचे सर्व उत्पादन अरविंद मिल्स भारतातच करते. वॅन हुसेन ऑस्त्रेलीयन ब्रांड आहे. या ज्ञानावर भारतीय काही मागे राहिले नाहीत. फ्लाइंग मशीन, रफ आणि टफ, एक्षस्कॅलीबर, न्यूपोर्ट, रेमंड, पार्क अवेन्यू, कलरप्लस, पॅर्क्स, लुइ फिलिप, लक्सर हे जुने व त्यातल्या त्यात अगदी नवीन सांगायचे झाले तर "कॉटन किंग" ह्याचे सारे उत्पादन १००% भारतीयच आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट: क्रीस्तजन्मापुर्वी १००० वर्षे आधी किंग सोलोमन भारतातीलच कपडे वापरत असे, तेव्हा परत एकदा भारतीयांनी आपली कला व ताकद दाखवून द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
म
मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 09:24 नवीन
कलर प्लस आणी लुइ फिलिप भारतीय आहेत? नक्की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Sat, 10/04/2014 - 11:32 नवीन
Colorplus Fashions Limited is a subsidiary of Raymond Apparel, Ltd., (Originally founded in 1993 by Mr Rajan Mudaliar in Chennai) Louis Philippe is a brand of Aditya Birla Group company Madura Fashion & Lifestyle (started in 1989)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अनुप ढेरे Sun, 10/05/2014 - 17:10 नवीन
"मेक इन इंडिया!" आहे, स्वदेशीचा नारा नाही आहे..
हेच म्हणतो. कुठही विका पण भारतात बनवा असा नारा आहे. भारतीय कंपन्यांच्याच वस्तू वापरा असा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
न
निमिष ध. Fri, 10/03/2014 - 15:53 नवीन
मला वाटते आहे की धागाकर्त्याचा मेक आणि मेड या मध्ये गोंधळ झालेला आहे. मेक इन इंडिया म्हणजे जे माहिती तंत्रज्ञानात झाले आहे ते बाकीच्या उद्योगांमध्ये पण व्हावे ही इच्छा. तुम्ही तुमच्या वस्तू किंवा कुठलेही उत्पादन भारतात तयार करून घ्या. काही वेबसाईट तुम्हाला पर्याय देतात - तुम्हाला काही तरी तयार करायचे आहे आणि तुमच्याकडे मनुष्यबळ नाही तर आम्ही ते दुसऱ्या देशात (इथे अपेक्षित - भारत) तयार करून देऊ. या मागे मोठा उद्देश रोजगार निर्मिती हा आहे. परंतु कॉस्ट कटिंग मध्ये कामगारांचे हक्क पायदळी तुडवले जाऊ नये ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 16:13 नवीन
भारतात रोजगार निर्मिती करणारी उत्पादने,ज्यांचा जास्तीत जास्त फायदा इथल्या अर्थव्यवस्थेला होतोय.बस इतकच अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.
ब
बहुगुणी Fri, 10/03/2014 - 23:01 नवीन
'मॅन्युफॅक्चरिंग' मध्ये आपण नेमके कोठे आहोत याची काही माहिती काढायचा प्रयत्न केला. Image removed. Image removed. Image removed. आधिक माहिती इथे सापडली. वरील बरीचशी चर्चा 'भारतात उत्पादित होऊन, भारतात वापरली जाणारी उत्पादनं' अशा दिशेने चालली आहे असं वाटलं; स्वदेशीचा अभिमान ठीक आहे, पण मला वाटतं मोदींनी 'Make in India' म्हंटलं तेंव्हा त्यांना 'भारतात उत्पादित होऊन, जगभरात वापरली जाणारी उत्पादनं' असं अभिप्रेत असावं. हा विचार असेल तर सध्या उत्पादित होणार्‍या वाहनं, कपडे, औषधे, चर्मोद्योग, हस्तकलेशी निगडित अशा वस्तू वगैरे गोष्टींपलिकडे जाऊन जागतिक बाजारपेठेसाठी भारत काय उत्पादित करू शकतो ते तपासणं महत्वाचं ठरावं. मला वाटतं यात अगदी विमानं, शस्त्रास्त्रे, जहाजं, वेगवान आधुनिक रेल्वे गाड्या, अंतराळयानं, वगैरेंपासून घरगुती वापराची उपकरणे (वॉशिंग मशिन्स, ड्रायर्स, स्वयंपाकघरातील विद्युत उपकरणें, रेफ्रिजरेटर्स, कूलर्स, कुकिंग रेंजेस, इत्यादि), लाकडी व धातूचे फर्निचर, सेमिकंडक्टर्स, औद्योगिक वापरासाठी आणि रस्ते/इमारती बांधणीसाठीची मशिनरी, agricultural harvesters तसेच ३-डी प्रिंटर्सपर्यंत अनेक उत्पादनं येऊ शकतील. फळांपासूनची उत्पादने आणि परदेशी चवीला उतरतील असे processed भारतीय खाद्यपदार्थ हेही यात अंतर्भूत होऊ शकतील. यांपैकी काहींसाठीचं तंत्रज्ञान प्रयत्नपूर्वक वर्षे आणि पैसे गुंतवून अवगत करून घ्यावं लागेल तर इतर काही उत्पादनं थोड्याच कालावधीत indigenously निर्माण करता येतील. यांतली low-hanging fruits कोणती हे ओळखणं भारतीय उद्योजकांना अवघड जाउ नये, आणि अर्थात्, जागतिक बाजारपेठेत उतरण्याआधीपासूनच दर्जाची जबरदस्त तयारी करावी लागेल हे उघडच आहे. या लेखातील प्रतिसादांत भारतातील उद्योगांची वरील दिशेने तयारी कितपत आहे ते वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 10/04/2014 - 04:09 नवीन
>>पण मला वाटतं मोदींनी 'Make in India' म्हंटलं तेंव्हा त्यांना 'भारतात उत्पादित होऊन, जगभरात वापरली जाणारी उत्पादनं' असं अभिप्रेत असावं. सहमत आहे. आणि भारतात उत्पादित होऊन जगभर वापरली जाणारी उत्पादनं म्हटलं की इतरत्र उत्पादित झालेली उत्पादन भारतात वापरली जाणं हे अध्याहृतच आहे. अवांतर: चीन मध्ये बनलेली पण इथल्या स्थानिक कंपन्यांच्या नावे विकली जाणारी उत्पादने (उदा. व्हिडिओकॉन, बजाज) स्वदेशी म्हणावीत की विदेशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
म
मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 09:35 नवीन
चीन मध्ये बनलेली पण इथल्या स्थानिक कंपन्यांच्या नावे विकली जाणारी उत्पादने (उदा. व्हिडिओकॉन, बजाज) स्वदेशी म्हणावीत की विदेशी? व्हिडीओ़कॉन चे स्वतःचे कारखाने औंरंगाबाद, भरुच, कलकत्ता, काशिपुर, हैदराबाद, बेंगलोर इत्यादी ठिकाणी आहेत. सरसकट त्यांची उत्पादने चीन मध्ये बनतात हे चुकीचे विधान झाले. व्हिडीओ़कॉन ची काही उत्पादने चीनमध्येही होतात. चीन मध्ये त्यांचे स्वतःचे कारखाने आहेत. कंझ्युमर एलेक्ट्रॉनिक्स सेगमेंट मध्ये नविन टेक्नोलॉजी वर आधारित प्रॉडक्ट्स मध्ये काही सुट्ट्टे भाग आयात होतात. त्यामुळे अशी उत्पादने व्हिडीओ़कॉन सारख्या कंपन्या परदेशातुन (यात चीनही आले) आयात करतात. पण सरसकटपणे व्हिडीओकॉनचे उत्पादन चीन मध्ये होत नाही (मोठ्य्या प्रमाणावर तिकडे होते असेही नाही). सॅमसंग ही कोरियन कंपनी आहे. त्यांची बरीच उत्पादने चायना मधल्या त्यांच्याच कारखान्यात (आणी इतरांच्याही) तयार होउन सॅमसंग इंडिया तर्फे भारतात विकली जातात. मग सॅमसंग कोरियन कंपनी की चायनीज की भारतीय? तर कोरियनच. त्यांच्या नावाने उत्पादन विकले जात असेल आणी ती मूळ कंपनी कोरियन असेल तर त्यांचा माल तयार कुठे होतो किंवा विकला कुठे जातो हे महत्वाचे नाही तर कंपनी कुठली हे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 10/04/2014 - 12:46 नवीन
>>व्हिडीओ़कॉन ची काही उत्पादने चीनमध्येही होतात. तीच विशिष्ट उत्पादने स्वदेशी समजायची की विदेशी. बजाजचे कारखाने चीनमध्ये नाहीत. त्यांनी आयात केलेली उपकरणे देशी की स्वदेशी? खालच्या चित्रातले उपकरण त्यावर कुठल्याही कंपनीचे नाव असले तरी पूर्णपणे चीनमध्येच बनलेले असते. ते देशी की विदेशी? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 15:29 नवीन
माझा उख्य उद्देश व्हिडीयोकॉनची उत्पादने चीनमध्ये तयार होतात असे सरसकट प्रतिपादन योग्य नाही त्याला होते. व्हिडीयोकॉन ही मूळ भारतीय कंपनी आहे आणि त्याची उत्पादने मुख्यत्वेकरुन भारतातच तयार होतात. काही सुट्टे भाग चीनमधुन येतात. काही उत्पादने चीनमध्ये तयार होत असतील पण व्हिडीयोकॉनच्या कारखान्यात तयार होत असतील तर ती मेड इन चायना भारतीय उत्पादने समजावीत ;). आता मुख्य धाग्याच्या विषयावर वळुयात. मेक इन इंडिया मध्ये मला वाटते भारतात "उत्पादन" होणारी असे गृहीत धरले असावे. कंपनी परदेशी असली तरी चालेल. जसे चायना मध्ये चायनीज कंपन्यांसाठी समजा २५% उत्पादन होत असेल तर चायनाबाहेरच्या मोठ्या कंपन्या उरलेले ७५% उत्पादन करत असतील (उलटेही असेल. मी फक्त उदाहरण देतो आहे). उदा. सॅम्संग, अ‍ॅप्पल, एल्जी, नोकिया सगळ्या परदेशी कंपन्या पण उत्पादन चीनमध्ये करतात. त्या चीनमध्ये उत्पादन करतात म्हणुन चीनी कंपन्या होत नाहित पण उत्पादन चीनी होते. त्याचा फायदा काही अंशी चायनाला होतो आणि काही अंशी त्या कंपन्यांना. ही दोघांसाठीही विन विन सिच्युएशन असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 10/04/2014 - 19:03 नवीन
बरोबरच आहे. मेक इन इंडिया म्हणजे भारतात बनवा; कंपनी कुठलीही असो. माझा रोख कंपन्यांची नावे घेऊन ही उत्पादने स्वदेशी आहेत असे जाहीर करणार्‍यांवर होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
विटेकर Sat, 10/04/2014 - 01:50 नवीन
"भारते एव उत्पादयिष्यामः" या मंगल निश्चयासह सीमोल्लघनासाठीं कोटि कोटि मंगल कामना !
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 10/04/2014 - 07:14 नवीन
माझ्यामते धान्य, फलोत्पादने व खनिजद्रव्य (metal ore) हे आपल्याकडे भरपूर प्रमाणात होतात. शेतीसोबत पशुपालन हा ही फायद्याचा पूरक व्यवसाय आहे. त्यांत जर value addition करून दहा पट जास्त भावात परदेशात विकता आले तर भारताला जास्तीत जास्त फायदा होईल असे वाटते. त्यामुळे Engineering व Food processing, Leather हे भावी काळात महत्वाचे व फायद्याचे ठरतील.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sat, 10/04/2014 - 10:29 नवीन
विको टरमरिक, विको वज्रदन्ती, विको पेस्ट
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 10/04/2014 - 13:45 नवीन
आमच्या अल्पमतिप्रमाणे कंपनीला जिथे रोयल्टी मिळते तेथील ती कंपनी मग उत्पादन चंद्रावर का होईना. एखादी वस्तु भारतात तयार झाली का याला महत्व नाही . तिचा दर्जा काय आहे याला महत्व. उद्या केवळ लेबर स्वस्त म्हणून स्वीस कंपनी भारतात आली व येथीलच तंत्रज्ञानाचा वापर करू लागली तर त्यात काय अर्थ ?
  • Log in or register to post comments
ग
गजानन (verified= न पडताळणी केलेला) Sat, 10/04/2014 - 14:31 नवीन
हे सगले आता लिहिने सोपे आहे हो. या आधी का नाही केले.
  • Log in or register to post comments
स
स्पार्टाकस Sun, 10/05/2014 - 08:10 नवीन
इथले सर्वजण मेड इन इंडीया आहेत ना नक्की?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 08:56 नवीन
इथे कंपनीची मालकी महत्वाची नसुन, "मेक इन इंडीया" म्हणजे, उत्पादने भारतात बनवा ( कोणीही ). त्यामुळे भारतात रोजगार निर्मीती होइल. भारतीय कंपनीने चीन मधुन उत्पादन करुन भारतात विकले तर ते चीनी उत्पादन च ठरते. भारतीयांना रोजगार मिळत नाही. विक्रीतुन जो काही फायदा होतो तो त्या कंपनीच्या मालकांना फक्त. टाटा स्टील ने कोरस विकत घेउन चालवले, त्याचा भारतात काही फायदा झाला नाही ( कामगारांना ). मोदींना "मेक इन ईंडीया" मधे भारत हे Manufacturing Hub बनावे अशी इच्छा आहे त्या योगे रोजगार निर्मीती होइल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा