वेगळा विदर्भ
काही वर्षांपूर्वी आमचा माणगांव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील बर्यापैकी मोठा तालुका होता. मात्र प्रशासकीय तसेच लोकांच्या सोयीसाठी या तालुक्याचे विभाजन करुन तालुक्याच्या पश्चिम भागाचा वेगळा तळा तालुका बनवण्यात आला. तेव्हा कुणीही मांणगांव तालुका तोडत आहेत असे कधी कानावर पडले नाही.
गेले दोनेक वर्ष रायगड जिल्ह्याचे विभाजन करुन माणगांवपासून दक्षिणेकडील तालुक्यांच्या दक्षिण रायगड जिल्हा बनणार आहे असे कानावर येत आहे. या नविन जिल्ह्याचे मुख्यालय माणगांव असेल असेही ऐकायला येते. मात्र रायगड तोडला जात आहे अशी भाषा कधी कानावर पडली नाही.
नुकतेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे झाले. कुठेही कसलाही आरडाओरडा न होता.
तेच देश पातळीवर. काही राज्यांचे विभाजन होऊन झारखंड, उत्तरांचल सारखी राज्ये बनलीच की. ताजे आंध्रप्रदेश आणि तेलंगणा हे विभाजन सोडले तर बाकी ठीकाणी कुठे विरोध झाल्याचे ऐकीवात नाही.
वेगळ्या विदर्भाबद्दल मित्रमंडळीत मते आजमावण्याचा प्रयत्न केला असता अशी माहिती मिळाली:
वेगळ्या विदर्भाच्या बाजूचे मुद्दे:
१. गडचिरोली, चंद्रपूर सारख्या दुरस्थ जिल्ह्यातील लोकांना प्रशासकीय कामासाठी तीन दिवस प्रवास करुन मुंबईत यावे लागते. मुंबईत येऊन काम न झाल्यास कुठे राहायचे हा प्रश्न भेडसावतो.
२. विदर्भाला विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. निधीचा खुप मोठा भाग इतर प्रबळ विभाग (उदा. पश्चिम महाराष्ट्र) नेतात.
३. काही राजकीय पक्षांना हा फक्त राजकीय मुद्दा म्हणून हवा आहे. निवडणूकांच्या वेळी हा मुद्दा उकरुन काढून लोकांच्या भावनांना हात घालता येतो. तसेच वेगळा विदर्भ झाल्यास आपली सत्ता कमी प्रदेशावर असेल ही भीती वाटते.
४. वेगळा विदर्भ झाल्यास विदर्भात ज्या राजकीय पक्षाचे प्राबल्य आहे त्यांचा तो बालेकिल्ला होईल आणि इतरांना तिकडे शिरकाव करता येणार नाही.
व्यक्तीशः मला कुणी "महाराष्ट्र तोडू नका" असं म्हणणारे कुणी सापडले नाही.
तुम्हाला काय वाटते?
💬 प्रतिसाद
(60)
स
स्वामी संकेतानंद
Fri, 10/17/2014 - 03:48
नवीन
ह्यालाच Central place theory असे नाव आहे. Walter Christaller ह्याने ही थेरी मांडली होती.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 10/17/2014 - 04:20
नवीन
स्वामीजी, आम्हा मुढांना जरा खोलात समजावून सांगा.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 10/17/2014 - 03:38
नवीन
जसे आंजावर नवीन संंस्थळे निर्माण होतात त्या नियमानुसार नवीन राज्यांची गरज आहे ;)
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 10/17/2014 - 07:23
नवीन
विदर्भ तर नक्कीच वेगळा करावा. कीती वर्ष पुणे, मुंबई ची लोक त्या लोकांचा भार वाहतायत.
पण तो मराठवाडा पण वेगळा करावा उरलेल्या महाराष्ट्रा पासुन. हा भाग तर सर्वांना खाली ओढतोय.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 10/17/2014 - 07:39
नवीन
मी काय म्हंतो, आता विदर्भ वेगळा करून र्हायलाच आहात तर हातासरशी आमचा सुबाभूळगाव बुद्रुक पण वेगळा करून टाका की!
मंजे काय की मुख्यमंत्री व्हायचं आमचं सात जन्मापासून उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण होईल!
आपला,
सरपंच (आणि अर्थातच भावी मुख्यमंत्री) सुबाभूळगाव बुद्रुक
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 03/26/2016 - 07:28
नवीन
वेगळा विदर्भ झाल्यावर आरटीओ चा नंबर कसा असेल? व्ही की डब्लू?
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Sat, 03/26/2016 - 08:08
नवीन
VD 01 - बुलढाणा
VD 02 - अकोला
VD 03 - अमरावती
and so on..........
शेवटी गडचिरोली
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 03/26/2016 - 10:02
नवीन
व्हीडी नको ओ.
व्ही बी तरी करा.
ट्रकवाले आधीच हैरान. ;)
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Sat, 03/26/2016 - 09:05
नवीन
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी आहे याला भागून २० राज्ये बनवावीत. प्रत्येक भाषिकांनी दिलेल्या राज्यातच राहावे व आपला आणि राज्याचा विकास करावा.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 03/26/2016 - 10:35
नवीन
विदर्भ म्हटला की पहिल्यांदा आठवतो सकाळ मधला बबन......
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2