महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण
महाराष्ट्राच्या सत्तेचा निकाल मतदारांनी दिलेला आहे पण ह्या निकालाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे . आता तुम्ही बोलाल आपण का करावे हे तर राजकीय पक्षाची गरज आहे आणि काम आहे.
परंतु प्रत्येक निवडणुकीसोबत प्रत्येकाने काहीतरी शिकायला हवे मग तो मतदार असो व राजकीय पक्ष .
महाराष्ट्राच्या इतिहासातील युती आणि आघाडीची समीकरण ह्या निवडणुकीत संपुष्टात आली होती.अनेक वर्षांनी मतदारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले होते त्यामुळे जनतेची सुद्धा इथे खरी कसोटी होती.जनतेनेसुद्धा योग्य तोच निर्णय दिला आहे त्याब्बदल त्यांचे अभिनंदन
भाजपाने महाराष्ट्रात स्वतच्या बळावर लढण्याचा निर्णय घेतला होता तो चूक आहे बरोबर आहे ह्यावर बरीच चर्चा झाली . सामान्य जनतेला युती हवी होती अस काहीस चित्र उभ झाल होत . त्यानंतर त्यांच्यावर युती तोडण्याचा आरोप झाला कदाचित खरा असेलही परंतु त्यात त्याचं काही चुकल नाही असेच वाटत होते . कारण त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव झाली होती आणि ती आजमावून पाहणे त्यांना आता गरजेचे होते जे पुढे शक्य नाही झाले असते. भाजपाने मोदी लाटेचा वापर करण्यापेक्षा मोदी नावाच्या गंगेत हात धुऊन घेतले . "गोपीनाथ मुंडे" साहेबांच्या शिवाय #भाजप पहिल्यांदा राज्यातील निवडणूक लढवत होता त्यामुळेच महाराष्ट्रातील नेत्यामध्ये थोडासा उतावीळपणा आणि अनुभवाची कमतरता जाणवली.परंतु ती सारी भरून काढण्याच काम नरेंद्र मोदी यांनी केल होत . पहिल्याच सभेत आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेवर टीका करणार नाही हे सांगून लोकांची मन जिंकलीच आणि शिवसेनेला backfoot वर टाकल होत.त्यानंतर त्यांच्या सभा आणि पक्षाने इतर पक्षांसोबत मांडलेली गणित हे सार सर्वांनाच माहित आहे . मी म्हणेन कि ह्यात भाजपने खूप प्रयत्न केले सत्ता मिळवण्यासाठी आणि त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर यश सुद्धा आला आहे.परंतु हि मत देताना लोकांनी हाच विचार केला कि केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाच सरकार असाव जेणेकरून विकास आणि राज्यकारभार योग्य रित्या करता येईल.त्यामुळे पुढील पाच वर्षे भाजपने ह्या विश्वासास खरे उतरावे अशीच एक आशा आहे.
शिवसेनेबद्दल बोलायचं झाल तर माझी सुद्धा पसंती शिवसेनेसच होती परंतु जसा जसा निवडणुकीचा ज्वर चढत गेला त्यानंतर जी काही विधान शिवसेनेकडून केली गेली त्याचा फटका शिवसेनेस बसला अस वाटू लागल. जी काही मत ह्या निवडणुकीत मिळाली असतील ती बाळासाहेबांच्या बद्दल जो आदर त्यामुळेच मिळाली अस खात्रीने वाटत . कारण मराठी अस्मिता,अफझलखान,बापाचा अनादर ह्या मध्ये अडकलेली शिवसेना विकासाबद्दल काहीच बोलली नाही . तुम्ही जेव्हा एखाद्या निवडणुकीस उतरता तेव्हा एक चेहरा घेऊन उतरण गरजेचे असत त्यामुळे शिवसेनेने आपला कोणताही नेता मुख्यमंत्री म्हणून लोकासमोर आणला नाही उलट उद्धव मुख्यमंत्री बनतील कि नाही ह्याच्याच गप्पा मारत बसले . बाळासाहेबांनी #शिवसेना पक्ष घडवला होता, पक्षबांधणी केली होती परंतु तस आज काही दिसत नाही आणि त्याचा फटका आता बसला आणी बदल नाही झाला तर पुढेही बसत राहील. त्यामुळे तूर्तास शिवसेनेने विरोधी पक्षाच्या बाकावर बसून उत्तम अशा विरोधी पक्षाची भूमिका निभावावी पक्षबांधणी पुन्हा नव्याने करावी . पुढील पाच वर्षाच्या काळात खूप काही करता येईल आणि मग संधीच सोन कराव. कारण महाराष्ट्राच्या हितासाठी आता जवळ येण्यापेक्षा पूर्वीच एकत्र लढायला हव होत आणि आधीच तुम्हीच आम्हाला शिकवलेली मराठी अस्मिता जपण्याकरता भाजप सोबत जाऊ नये .
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांनी तर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. काही दिग्गजांना फटका बसला परंतु तो त्यांच्या घोटाळे , फुकाचे गर्व, अतिआत्मविश्वासामुळे मिळाला आहे. जनतेला गृहीत धरू नये हेच दोघांच्या नेत्यांनी शिकावं आणि आपली राजकारणाची दिशा ठरवावी.पवार साहेब आजूनही अप्रत्यक्षरित्या सत्तेत राहण्याचं प्रयत्न करत आहे ते पवार साहेबांच राजकारण आहे कळण आता तरी थोड अवघड आहे
मनसे ह्या निवडणुकीत खूपच मागे पडला मी तर म्हणेन अधोगती झाली.राज ठाकरे सारखा नेता ज्याकडे महाराष्ट्राने खूप अपेक्षेने पाहिलं आणि फक्त त्यांच्या वर्कृत्वाच्या जोरावर १३ आमदार निवडून दिले.पण अपेक्षेवर किती खरे उतरले हे जनतेने ह्या निवडणुकीत दाखवून दिले. त्यामुळे मराठी माणसाने मत दिल नाहीत अशी बोंब मारण्यात आता काहीच अर्थ नाही आहे.कारण "ये पब्लिक है ये सब जाणती है".आजकाल प्रत्येकाला विकास हवा आहे आणि तस विकासाच मोडेल मांडण्याची संधी नाशिक मध्ये होती पण ती सुद्धा हुकली होती . विकास आराखडा खूपच उत्तम होता पण तो शेवटच्या ओवर मध्ये सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता जो खरच फसला आहे.परंतु खरच वेळ नाही गेली आहे प्रत्येकाने लक्षात ठेवाव.
महाराष्ट्राच्या ह्या निवडणुकीत साऱ्या पक्षांचा पराभव झाला आहे जेव्हा "MIM" सारखा पक्ष ३ जागा जिंकवून आणू शकतो. हि चिंतेची बाब असली तरी त्यात नवल अस काही नाही आहे कारण "पेराल तेच उगवेल " असो महाराष्ट्राच्या हिताची आम्हालाही काळजी वाटते .
नवखा राजकीय विश्लेषक
यशवंत पालकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reformsमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reformsफक्त दोनच पक्ष असतील एक हिंदु आणि एक मुस्लीम त्यांची नांदी मात्र माझ्या मतदार संघातून झाली असे वाटायला लागले आहे.हा देश हिन्दूचा आहे तसेच भारतीय मुस्लिमांचाही आहे. असे नुसते म्हणून उपयोग नाही , व्यवहारात ही असेच असायला हवे. कॉन्ग्रेसने त्यांचे तुष्टीकरण करुन त्यांना मतांच्या राजकारणासाठी विनाकारण विशेष दर्जा दिला. आता भाजपच्या राज्यात तो मिळणार नाही म्हणून त्यांना अधिक असुरक्षित वाटू लागले आहे.आणि म्हणून ओवेसी सारख्यांचे फावते. अशी हिन्दू- मुस्लिम फाटफूट होणे म्हणजे पुन्हा एका नव्या द्वीराष्ट्रवादाला तोंड देणे होय. असा प्रसंग माझ्या आयुष्यात व भारताच्या भविष्यात न येवो.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reformsमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern