(दोन दिवस मुंबईत गेले,दोन दिल्लीत गेले)
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून.....
(मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे)
------------------------------------------------------
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले
शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली
मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली
जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले
कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले
दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले
तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.
भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झालो
पडणारी सीट,कशी जिंकून द्यावी,याच निवडणूकीत शिकलो
झोपडपट्टीतील दादाने इलेक्शनचे धनुष्य छान पेलले
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
(बिन खात्याचा मंत्री)
अमोल केळकर
४/११/२०१४
मला इथे भेटा
💬 प्रतिसाद
(7)
व
विवेकपटाईत
Tue, 11/04/2014 - 13:21
नवीन
दिल्लीची वारी फुकट गेली वाटते. ...कविता आवडली
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 11/04/2014 - 13:25
नवीन
नेमकी !
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Wed, 11/05/2014 - 04:46
नवीन
धन्यवाद
अमोल केळकर
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 11/05/2014 - 05:08
नवीन
२००४ मध्ये नवे केंद्र सरकार स्थानापन्न झाल्यावर रामदास आठवले व थोरले साहेब यांच्याबद्दल एकदम फर्मास दोन फुल एक हाफ आले होते. सदर विडंबन वाचून त्याचे स्मरण झाले.
- Log in or register to post comments
र
रामदास
Wed, 11/05/2014 - 07:06
नवीन
दो इंतजारमें याची आठवण झाली.
- Log in or register to post comments
प
पुतळाचैतन्याचा
Wed, 11/05/2014 - 09:41
नवीन
छानजमालि आहे कविता...आवडलि
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Fri, 11/07/2014 - 03:45
नवीन
भट्टी जमलिय.
- Log in or register to post comments