महाराष्ट्राच्या स्वयंघोषित मराठी सम्राटांना काही प्रश्न
१. विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ? विधानसभेचे जागावाटप म्हणजे गणेशोत्सवातली खिरापत वाटण्यासारखं असतं का ?
२. विधानसभेसाठी युती तोडायची आणि केंद्रात व राज्यातल्या एक महापालिकेत ती कायम ठेवायची असा पवित्रा म्हणजे गल्लीत गोंधळ अनं दिल्लीत मुजरा नव्हे काय ?
३. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ?
४. समोरच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे आपला पक्ष जिंकला असं संविधानात कुठे लिहिलंय ?
५. केंद्रात बहुमतांनी सत्तेत असलेल्या सरकारनी आपल्यासमोर झुकावं ही अपेक्षा म्हणजे सूर्यानेच आता पृथ्वीभोवती फिरावं या अपेक्षेपेक्षा काय वेगळी आहे?
६. केंद्रातलं वाढीव मंत्रीपद जर आपल्याला नको होतं तर मंत्रीपदाच्या उमेदवाराला दिल्लीला तिथलं तापमान मोजायला पाठवलं होतं का ? आणी हे तापमान आपल्याला झेपणार नाही हे कळल्यावर वापस बोलावलं का ?
७. आपल्या शब्दकोशात सन्मान म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आणि लाचारी म्हणजे केंद्रीय मंत्रीपद असं लिहिलंय का ?
८. आधी भावकीत भांडणं करायची. नंतर सख्ख्या शेजाऱ्यांशी भांडायचं ! भविष्यात पुण्याला किंवा कोकणात स्थायिक होण्याचा आपला विचार आहे का ?
९. "भिजत घोंगडं " नावाच्या मराठी सिनेमाची निर्मीती करायला आपल्याला आवडेल का ?
१०. "अस्मिता " हा शब्द आपल्या पक्षातला कोणताही नेता न चुकता एकदातरी लिहू शकेल का ?
--चिनार
म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत ?माई एकटी येत नाहि ना कुठे. त्यांचे "हे" सोबत आसतात. *wink*