महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं विधानसभेत ‘आवाजी शक्ती’ दाखवून देत ‘विश्वास’ जिंकण्याची किमया साधली आहे. मात्र शिवसेना आणि कॉंग्रेसने हा प्रकार नियमबाह्य असल्याचे म्हटले असून शिवसेनेने मतदान पुन्हा घ्यावे तर काँग्रेसने अल्पमतातलं हे सरकार घटनाविरोधी असून या सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यपालांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे असे विविध बातम्या वाचून कळते.
१. आवाजी मतदान काय आहे ?
२. मतविभागणी कशी मोजतात ?
३. तसेच लोकसत्ताच्या एका बातमीनुसार हा मुद्दा तांत्रिक आहे की नैतिक एवढाच मुद्दा आहे त्यात कायदेप्रक्रियेचा संबंध येत नाही असे म्ह्टले आहे.
४. काही आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जय विदर्भ म्हणून घोषणा दिल्या त्या योग्य वाटतात काय ?
यावर जाणकारांकडून प्रतिक्रिया आणि माहिती अपेक्षित आहेत.
यानिमित्ताने भाजपा-रा.कॉ. आणि शिवसेना-काँग्रेस असे दोन वेगवेगळे गट एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे असे विविध वृत्तपत्रांतील लेखांखालील प्रतिक्रिया वाचल्यावर जाणवले.
💬 प्रतिसाद
(64)
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/13/2014 - 13:16
नवीन
नाना मरते नही :)
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 11/13/2014 - 13:28
नवीन
जर मतदान झाले असते तर शिवसेनेची आब्रू गेली असती.
भाजप्+राकाँ च्या आकड्यापेक्षा बरीच मते जास्त मिळाली असती.
शिवसेनेची बरीच मते फुटणार होती. लाज वाचवण्यासाठी त्यांना गोंधळ घालुन सभागृहातुन पलायन केले.
हा भाजप्+राकॉ, शिवसेना ह्यान्नी एकत्र येउन केलेला प्लॅन होता.
काँग्रेस ला मात्र वेडे बनवले.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 11/13/2014 - 13:50
नवीन
तुम्ही सांगितले..
खरे तर भाजपाने हे सर्व केवळ शिवसेनाची लाज वाचवण्यासाठी केले.
आणि बरीच द्वाड लोकं भाजपाला नावे ठेवतात..
बादवे , फडणवीसांनी अजून काय काय कानगोष्टी सांगितल्या हो तुम्हाला ;)
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
गुरुवार, 11/13/2014 - 13:44
नवीन
भाजपाला सर्व पक्षांची अब्रू झाकण्यात रस होता असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?+१
काही लोकं अजब तर्कत मांडत आहेत. भाजप स्वतः विरोधी पक्षांतली (तथाकथित) फूट झाकू पाहत होता काय? आवाजी मतदान घेवून पण लोकांत एनसीपीशी संग करणारा भाजप असाच मेसेज गेला आणि होणारी निर्भत्सना भाजप टाळू शकला नाही. मग उघड मतदान घेवून इतर पक्ष फोडले जरी असते तरी इभ्रत वाचली असती. भाजपने १२३ ते १४५ अंतर कसे कापले याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. ज्यांच्यावर आरोप करून सत्ता आणली त्यांचेच समर्थन घेवून सरकार बनवत आहोत ही बाब भाजपला झाकायची होती मात्र त्यासाठी खटपटी करूनही जे व्हायचे ते झालेच.भाजप एनसीपी यांचे सेटिंग आत्तापासून नाही खूप जुने आहे. सिंचन, आदर्श, कोळसा घोटाळे यांत भाजपही सामील होती. देवेंद्र स्वतः स्वच्छ असतीलही (ठामपणे आता यांच्या बद्दलही बोलता येत नाही) पण बाकी बरेच भाजपेयीचे एनसीपीशी साटेलोटे आहे.आता भाजपला एनसीपीशी केलेला संग पुढे महागात पडणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 11/13/2014 - 14:18
नवीन
सर्वच एकमेकांची अब्रू वाचवत होते
१. भाजपला राकॉं चा पाठींबा घेतला हे उघड पणे दाखवायचे नव्हते.
२. शिवसेनेला सर्व आमदार आपल्या बरोबर नाहीत हे लपवायचे होते.
३. राकाँ ला भाजपवर उपकार करायचे होते भविष्यासाठी.
तसेच शिवसेना पुढच्या २-३ महीन्यात मंत्रामंडळात दिसेल. अजुन शिवसेनेनी केंद्रातले मंत्रीपद सोडले नाही.
किंवा छभु नी जशी शिवसेना फोडली तशी पुन्हा फुटेल काही महीन्यात आणि मग भाजपचे बहुमताचे सरकार येइल.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
गुरुवार, 11/13/2014 - 14:24
नवीन
हे बरेच पटण्यासारखे वाटते.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
गुरुवार, 11/13/2014 - 14:58
नवीन
सेनेन केंद्रातल मंत्रिपद सोडल नाही तास भाजपने तरी कुठे गीतेंना काढलय? कारण केंद्रात भाजपला लोकसभेत बहुमत आहे पण राज्यसभेत एनडीए अगदीच कमकुवत आहे. मोठी विधेयके संमत करायला दोन्ही सभागृहात बहुमत असाव लागत किंवा लोकसभा/राज्यसभा अस संयुक्त अधिवेशन घेवून ते पारित कराव लागत. इथे शिवसेनेकडे असणारे २१ खासदार (लोकसभ १८, राज्यसभा ३) भाजप गमावायला तयार नाही. शिवसेना विरोधात जाणार नाही. केंद्रात आणखी एखाद फुटकळ पद आणि राज्यात पण ४-२ मंत्रिपदे दिली कि सेना मुकाट्याने बरोबर येईल हाच भाजपचा होरा होता म्हणून ते सेनेला खिजवत होते. सेना केंद्रातले वाढीव पद नाकारेल हे त्यांना वाटले नव्हते. आता मात्र एनसीपीची साथ घेतल्याने लोकांच्या टीकेचा भडीमार झाल्यावर भाजपेयी विचार बदलू पण शकतील. आता समजा सेना सरकारमध्ये आली तरी जास्त पदे द्यावी लागतील. माझ्या मते सेनेने विरोधातच बसावे. पवारांचा पाठींबा काय किमतीचा आहे हे फडणवीस आणि लोकांना पण कळेल. पवारांनी सरकार पाडले तरी तोवर भाजप जनतेसमोर एक्स्पोज झालेली असेल.हे पवारालंबी सरकार एनसीपीच्या मर्जीवरच चालणार.
सरकार कोसळून निवडणुका लागल्या तर परत मते मागायला जाताना ते एनसीपी वर टीका पण करू शकणार नाहीत.आधी भाजप सेनेला खेळवत राहिली मग सेनेने तेच केले .भाजप-एनसीपी छुपी युती उघड करणे हाच सेनेचा अजेंडा होता म्हणून त्यांनी चर्चेचे गुर्हाळ चालू ठेवून ऐनवेळी विरोधात बसणे पसंत केले.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 11/13/2014 - 15:02
नवीन
केंद्रामधला सरकार हे एनडीए चा आहे . भाजपा चा एकट्याचा नाहिये .म्हणून केंद्रीय मंत्रीपद सोडण्याचा प्रश्नच येत नाही
- Log in or register to post comments
स
सव्यसाची
Fri, 11/14/2014 - 19:54
नवीन
सरकार फक्त भाजपचेच आहे. राष्ट्रपतींनी जे पत्र पंतप्रधानांना दिले त्यामध्ये त्यांनी भाजपचे सरकार असाच उल्लेख केला आहे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
गुरुवार, 11/13/2014 - 15:09
नवीन
आमदार फोडणे एवढे सोपे राहिले नाही.२/३ आमदार फोडावे लागतात नाहीतर आमदारकी रद्द होवू शकते. समजा काही आमदार फुटले/ राजीनामे दिले तर निवडणुका लावून त्यांना परत निवडून आणावे लागणार. यात वेळ जातोच पण त्यासाठी किंमत पण मोजावी लागणार. आता पण जे लहान पक्ष, अपक्ष बरोबर आले आहेत त्यांच्या अपेक्षा पण पूर्ण कराव्या लागणारच नाहीतर ते कशाला बरोबर राहतील? त्यापेक्षा भाजपने आधीच सेनेला खिजवत न बसता योग्य वात दिला असता तर ६३ आमदारांच एकगठ्ठा समर्थन मिळून एक स्थिर आणि मजबूत सरकार मिळाल असत मात्र भाजपला सुटलेली हाव आणि सेनेच खच्चीकरण करायच्या नादात भाजपने राष्ट्रवादीला जवळ केले.आवाजी मतदानामुळे भाजपने एन्सिपिला विधन परिषदेत फायदा करून दिला आहे. कारण प्रत्यक्ष मतदानात एनसीपीने भाजपच्या बाजूने मत टाकले असते किंवा सभा त्याग केला असता तरी त्यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले नसते. आता एन्सिपिला वि. परिषदेत विरोधीपक्षनेते पद मिळेल. आत्ता पुरते सरकार तरले आहे पुढे एनसीपी सरकार मध्ये येवून बसली तरी आश्चर्य वाटायला नको.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 11/13/2014 - 15:30
नवीन
जे पुन्हा निवडुन येउ शकतील अश्या आमदारांना राजीनामा द्यायला लावुन भाजप तर्फे पुन्हा निवडुन आणणार आहेत.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Fri, 11/14/2014 - 18:17
नवीन
गंभीर चर्चा तर खुप झाली. जरा मिडियात / सोशल साईटवरचे हे फोटो बघा आणि जरा हसा बरं !
- Log in or register to post comments
त
तिमा
Sat, 11/15/2014 - 06:15
नवीन
आवाजी मतदान ही संकल्पना फक्त सुसंस्कृत राजकारणी नेत्यांसाठी आहे. जेंव्हा सगळे लबाड लांडगे एकत्र जमा होतात तेंव्हा ही पद्धत कशी चालेल ? यापुढे कुठल्याही चर्चेनंतर मतदान अनिवार्य केले पाहिजे.
- Log in or register to post comments
ग
गजानन५९
Sat, 11/15/2014 - 10:27
नवीन
अखेर भाजपने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव रडत खडत का होईना जिंकला, पण प्रश्न असा आहे कि शिवसेनेला इतके अपमानित करून या मोदी सेनेने काय साध्य केले ?
ज्या सेनेच्या साथीत गेली २५ वर्ष तुम्ही गळ्यात गले घालून फिरत होतात ती यांना अचानक इतकी नकोशी का वाटू लागली ?
मोदीसेना कदाचित ५ वर्ष इथे टीकेलही (ते पण आपल्या तथाकथित जाणत्या राजाच्या मनात असेल तर) पण जिथे स्वतः मोदी २७ सभा घेऊनही या लोकांना भ्रष्टाचार्वादी कॉंग्रेस (हे मोदींनी दिलेले नाव आहे )चा पाठींबा घ्यावा लागतोय तिथे पुढीलवेळी लोकांनी यांच्यावर का आणि कशासाठी विश्वास ठेवावा ?
सेना चुकली असेल, नव्हे मी मान्य करतो कि सेना चुकली पण या मोदी लाटेत आणि बाळासाहेब हयात नसताना उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले हे हि काही कमी नाही. खरे तर याच उद्धव ठाकरेंची (मी धरून) सर्वांनी खिल्ली उडवली होती (खील्ली सम्राट राज ठाकरेंनी तर पार वडे आणि सुप बीप काढले होते ते त्यांच्यावर उलटलेच आहे.) पण जितका संयम उद्धावनी गेल्या २ महिन्यात दाखवला (जो सेनेच्या विचार (खरे तर आचार) सरणीत कधीच बसत नव्हता.
वयक्तिक मला सेनेने विरोधात बसावे असे निकालापासून वाटत होते कारण साहजिकच भाजपसोबत सरकारमध्ये सेना गेली असती तरीही तिला कधीच तो आधीचा सन्मान मिळाला नसता. आता विरोधात बसून या कमकुवत सरकारविरुद राळ उठवून मान ताठ ठेवून वावरणे हेच खरे शहाणपणाचे ठरेल.
खरे तर मी पक्का भाजपेयी माणूस ( भाजपेयी अशासाठी कि वाजपेयींचे विचार पटायचे पण मोदि चे पटतील असे नाही रादर ७०% मोदी विचार पटत नाहीत ) पण या तावडे, फडणीस, राजीव(प्रताप) रुडी, माधव भंडारी आणि खडसे मामांनी इतका माज करून ठेवला म्हणून वैतागून गेलोय कि साला भाजप नाही निवडून आले तरी चालेल पण या मंडळींचा माज कमी करा.
असो साला गेल्या २ महिन्यातला राग बाहेर पडल्यामुळे आता कसे बरे वाटत आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2