B .P . वर गावठी इलाज
मला B .P . चा त्रास आहे असे एका operation च्या आधी आढळले .म्हणून २ दिवस गोळ्या देऊन B .P . तात्पुरते कमी केले गेले व नंतर operation केले गेले.त्यावेळी,रक्तचाप कमी करण्यासाठी कायमच्या गोळ्या घ्याव्या लागतील असे सांगितले होते व मीठ कमी करायला सांगितले होते .
माझ्या वडिलाना एका माणसाने रक्त दाब कमी करायला (डॉक्टर नव्हता तो तरी) एक औषध सांगितले होते ते असे आहे .
खालील ५ गोष्टींचे चूर्ण (पावडर ) करून सकाळी दात घासल्यावर काही खाण्याआधी ते घेणे व ते थोडे तुरट / तिखट वगैरे असल्यामुळे त्यावर पाणी पिणे .
१) टेटू साल
२)अर्जुनसाल
३)आवळा
४)दालचिनी व
५) मेथी
ह्या सर्वाचे चूर्ण आयुर्वेदिक दुकानात मिळते .ते प्रत्येकी २५ ग्राम एकत्र करून ठेवणे .सकाळी याचे मिश्रण फक्त १ चमचा घेण पाणी पिणे .
यात side effect चा संबंध नसल्याने वापरायचे ठरवले .मी स्वत: १० हून जास्त जणाना सांगितले व गोळ्या बंद केल्या. याचा effect छानच आहे .माझा स्वत:चा रक्तचाप ९० - १४० च्या पुढे गेल्या ३ वर्षात गेलेला नाही(वय ४६ म्हणजे ते नॉर्मल आहे) .इतरानाही चांगला परिणाम जाणवत आहे .
फायदे
१) आयुर्वेदिक आहे .नो side effects
२) alopathy गोळ्या रक्तदाब कमी करायला उपयुक्त आहेतच पण कालांतराने त्याने किडनीवर वाईट परिणाम होतात .
३) आयुर्वेदिक औषध इतके स्वस्त आहे की दिवसाला एक रुपयापेक्षा कमी खर्च येतो .
विशेष म्हणजे ,मीठ कमी करायला सांगितले असूनही मी पुर्वीतकेच मीठ खातो .त्यामुळे चवीवर आघात नाही.
मी काही व्यवसायाने कुठला डॉक्टर नाही. याचा परिणाम चांगला का आढळतो हे मला माहित नाही .हे करणे एक प्रकारे अवैद्न्यानिक आहे पण याचे परिणाम खूप चांगले आहेत हे मला व मी सांगितलेल्या सर्वाना जाणवले .
संदर्भ - Shrinivas Shripad Vaishampayan
.
आधारित *
तीन वर्षापुर्वी इथे एका आयडीने फ्रॅक्चरवर धनगराचे औस्शध असा धागा काढला होता.....आणि hitesh सदस्यकाळ : 1 month 2 weeks ???