छडी लागे
लग्नाच्या भूलथापा देऊन विद्यार्थिनीचे अपहरण
Narendra Modi govt wants to curb internet in India
आज दोन वेगवेगळ्या बातम्या वाचल्या ... कोणतेही सरसकटीकरण करण्याचा उद्देश नाही तथापि विकसित मानसिकतेकडे प्रवास करायचा तर आहे परंतु त्यासाठी लागणारे आचरण/बंधने स्वेच्छेने स्वीकारायची तयारी नाही अशी परिस्थिती दिसते ...
गेल्या कित्येक वर्षातील स्वातंत्र्य ह्या शब्दाचा बहुतांश (च्यायला हा शब्द वापरायची आता भीती वाटते) भारतीय लोकांनी भारतात लावलेला आणि अमलात आणलेला अर्थ हा "जबाबदारी पासून कोसो दूर असलेला स्वैराचार" असा दिसतो ...
आणीबाणी पर्व आमच्या पिढीने फक्त ऐकलेले ..अनुभवलेले नाही ...अनेक अनेक बाबतीत नकारात्मक असलेले ते पर्व शिस्तीच्या बाबतीत उपयुक्त होते असे आणीबाणीचे विरोधकसुद्धा मान्य करतात (हेही ऐकीवच)... वरच्या २ बातम्यांवरून आणीबाणी आठवावी अशी परिस्थिती नाही ..परंतु छडीचा धाक असला कि आपले देशवासीय लायनीवर राहतात आणि ते अंतिमत: सगळ्यांच्याच हिताचे ठरते हे सत्य सरकारने स्वीकारून पावले उचलायला सुरुवात केली आहे कि काय ?
..प्रसंगी थोडासा जोर लावून का होईना पण आवश्यक ती शिस्त बाणवणे आवश्यक आहे इतकी अवस्था आहे ...
परंतु त्याचवेळी ती शिस्त समाजातील सर्वच थरांना लागते आहे हे पाहणे आवश्यक आहे ...कारण पैश्याच्या जोरावर कुठलाही अनियमित कारभार नियमित करता येतो हा अनुभव ताबडतोब बंद झाला पाहिजे ...
💬 प्रतिसाद