स्वातंत्र्यदिनाची ही कविता लवकरात लवकर शिळी होवो...
💬 प्रतिसाद
(13)
म
मैत्र
Fri, 08/15/2008 - 13:18
नवीन
सलाम कवितेला आणि स्वातंत्र्य मिळवून ते टिकवून ठेवणार्यांना...
हजारे आमटे मेधा आणि कलाम... या सगळ्या अनागोंदी आणि चिड आणणार्या परिस्थितीत असे लोक आपलं काम नेटाने करत आहेत. हा विचार न करता की यातून काही घडेल किंवा नाही... सर्व भ्रष्टाचार गुंडगिरी फुटीर वृत्ती ला नजरेआड करून आपलं काम करत राहतात.. या कवितेत सगळ्या निराश करणार्या गोष्टींबरोबर हे उत्तमही तुम्ही दाखवलं आहे... धन्यवाद...
जय हिंद...
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 08/15/2008 - 13:24
नवीन
ओगलेशेठ,
साद्य परिस्थिती दर्शवणारे जळजळीत अभंग..
(निरुत्तर)केशवसुमार
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 08/15/2008 - 15:23
नवीन
अतिशय प्रखर अभंग..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Fri, 08/15/2008 - 16:22
नवीन
आवडली. अगदी मनापासून लिहिलेली वाटते.
- Log in or register to post comments
अ
अजिंक्य
Sat, 08/16/2008 - 14:06
नवीन
कवितेत आशय एवढा ठासून भरलेला आहे, की ओळीओळीतून अक्षरश: ठिणग्या पडतायत.
तुमच्यासारखीच आशा मीही करतो - ही कविता लवकरात लवकर शिळी होवो.
(एक शंका होती - नरोटी म्हणजे काय? झोळी का?)
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
- Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले
Sat, 08/16/2008 - 18:20
नवीन
नरोटी म्हणजे नारळाची करवंटी... खोबरे काढून घेतल्यावर राहते ते नारळाचे कवच... स्वातंत्र्याचे खोबरे नेते मंडळींनी खाल्ल्यावर सामान्यांच्या हातात जे उरते ते..
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 08/16/2008 - 16:35
नवीन
दिवसेंदिवस हे विदारक सत्य पेलणे अवघड होत आहे! :S :(
चतुरंग
- Log in or register to post comments
ब
बबलु
Sun, 08/17/2008 - 08:34
नवीन
हो तुम्हा कवी लोकांना ? आपल्याला तर बुवा नाही जमत.
असो... जब्राट कविता !! धगधगती मशाल आहे.
सत्तेला झोंबते। आधाशांची टोळी
महात्म्याच्या डोळी। पाणी दाटे
हे खासच.
(मिपा वरील कविता वाचून अचंबीत होणारा )....बबलु-अमेरिकन
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 08/17/2008 - 15:57
नवीन
लै भारी अन् प्रखर काव्य!
तात्या.
- Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™
Sun, 08/17/2008 - 16:28
नवीन
जबरा कविता आहे, नुसत्या ठिणग्या पडत आहेत शब्दामधुन.
आम्ही आता असा मनाला त्रास करुन घ्यायचे सोडुन दिले आहे. काही फायदा होत नाही.
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
Mon, 08/18/2008 - 03:47
नवीन
मनापासुन केलेले लिखाण!!
स्वगत : अमंळ लिखाणे बहुत जाहली, क्रीयेची आस उरी दाटली
आम्ही आता असा मनाला त्रास करुन घ्यायचे सोडुन दिले आहे. काही फायदा होत नाही.
ही मानसिकता बदलणे ही काळाची नितांत गरज.
शिवाजी स्वतःच्या घरी जन्माला घालणे गरजेचे
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Mon, 08/18/2008 - 03:57
नवीन
एकदम जळ्जळीत कविता....
अगदी मनापासुन लिहीलेली...
आणी मनापासुन आवडली....
हजारे, आमटे। मेधा नि कलाम
घ्यावा जी सलाम। सज्जनांचा
आमचाही सलाम घ्यावा....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 08/18/2008 - 04:10
नवीन
फारच सुंदर...
पुढार्यांच्या खाती। लाख आणि कोटी
रिकामी नरोटी। पामराची
अगदी खरं आहे..
भारतातील राजकारणी पैसे खाऊन खाऊन माजलेत साले ..
आणि सामान्य जनतेच्या हाती मात्र करवंटीच येते !!
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
- Log in or register to post comments