Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला पडलेले काही YZ प्रश्न

N
NiluMP
Tue, 04/21/2015 - 12:07
🗣 24 प्रतिसाद
1. इग्रजांनी आपल्यावर राज्य केले नसते तर भारतात रेल्वे, दुरध्वनी आणि टपाल व्यवस्था सुरु होण्यास कोणते साल उजाडले असते? 2. भारतातील प्रमुख शहरांवर अणुबाॅम्ब हल्ला झाला तर ती शहरे परत पुर्ववत होण्यास किती कालावधी लागेल? 3. कोण सर्वउच्च न्यायव्यवस्था की धर्म व्यवस्था? 4. अनअधिकृत बांधकामाची deadline काय असेल की हे पण आरक्षणसारखे मारुतीच शेपूट होणार? 5. बोरिवली आणि विरार दरम्यान चैपदरीकरण होउन देखील त्या पटटयात जलद वसई, विरार लोकल सुध्दा स्लो का धावते? 6. भारत महासत्ता होणार अशी पुडी अधुनमधुन सोडली जाते हे खरंच शक्य आहे का? 7. जगात असा कोणता लोकशाहीप्रधान देश आहे का जेथे नेते निवडणूक सोडून इतर कोणत्यातरी वेगळया पध्दतीने नेते निवडूण येतात कारण मतदान म्हणजे व्होटबॅंक आणि व्होटबॅंक म्हणजे समस्या झोपडपटया, आरक्षण, घराणेशाही.

प्रतिक्रिया द्या
7952 वाचन

💬 प्रतिसाद (24)
प
पॉइंट ब्लँक Tue, 04/21/2015 - 14:25 नवीन
अजून एक YZ प्रश्न तुम्हाला पडायला पाहीजे "इतके YZ प्रश्न मला एकट्यालाच का पडतात.?" :) जोक्स अपार्ट, सगळ्यांनाच पडतात, काहींची उत्तरे नाहीत, आणि काहींची उत्तरे माहित असूनही त्यांच काही करण्याची हिंमत किंवा उत्साह बर्याच लोकांकडं नसतो.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Tue, 04/21/2015 - 15:42 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
छ
छोटा चेतन-२०१५ Tue, 04/21/2015 - 15:45 नवीन
पॉइंट ब्लँक बरोबर सहमत
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Tue, 04/21/2015 - 15:50 नवीन
कारण मतदान म्हणजे व्होटबॅंक आणि व्होटबॅंक म्हणजे समस्या झोपडपटया, आरक्षण, घराणेशाही.
हे सगळीकडेच असते असे कोणी सांगितले तुम्हाला ??
जगात असा कोणता लोकशाहीप्रधान देश आहे का जेथे नेते निवडणूक सोडून इतर कोणत्यातरी वेगळया पध्दतीने नेते निवडूण येतात
नै म्हंजे तुम्ही जगातल्या इतर देशांबद्दल विचारताय म्हणून वरील प्रश्न.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Tue, 04/21/2015 - 16:26 नवीन
मी भारतातील समस्या बद्दलच बोलतोय कारण ईतरत निवडणुका दोन पक्षात होते (अशी माहिती आहे) भारतात अनेक पक्ष आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Tue, 04/21/2015 - 17:03 नवीन
तुमच्या जगात इतरत्र फकस्त आम्रिकाच दिसतेय मग ? ;) अहो, उदा. ७ मे ला युकेच्या निवडणुका आहेत.. तिथे किती पक्ष आहेत ते तरी गुगलून पहा. इतर जगात अशी अनेक उदाहरणे आहेत त्याबद्दल आधी शोधून तरी पहा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 04/22/2015 - 10:59 नवीन
देश कुठ्लाही असो. जेवढे पक्ष अधिक तेवढी मतविभागणी अधिक. शिवाय प्रत्येक पक्षाची स्वतंत्र विचारसरणी ह्यामुळे स्थिर सरकार मिळेलचं असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ट
टवाळ कार्टा Wed, 04/22/2015 - 11:04 नवीन
नै...लोकशाहीत सरकार कसे असते हे जनता किती प्रगल्भ आहे त्यावरच ठरते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ह
हाडक्या Wed, 04/22/2015 - 11:28 नवीन
लोकशाहीत सरकार कसे असते हे जनता किती प्रगल्भ आहे त्यावरच ठरते
अगदी अगदी.
जगात असा कोणता लोकशाहीप्रधान देश आहे का जेथे नेते निवडणूक सोडून इतर कोणत्यातरी वेगळया पध्दतीने नेते निवडूण येतात कारण मतदान म्हणजे व्होटबॅंक आणि व्होटबॅंक म्हणजे समस्या झोपडपटया, आरक्षण, घराणेशाही.
पण त्यांच्या या प्रश्नावरुन असं वाटतंय की त्यांच्या मते भारतात जे चालतंय ते सगळ्याच जगात चालतंय आणि त्या व्यतिरिक्त जी लोकशाई आहे ती फक्त आम्रिकेत (अथवा द्विपक्षीय अध्यक्षीय लोकशाही असलेल्या राष्ट्रात) म्हणून बोललो. नै म्हंजे, स्वीडन, वगैरे असले देश तर खिजगिनतीतच नसतील, भले कितीही आदर्शवत लोकशाही असेल तिथे. अन मग जगात असंच चालतंय म्हणायच वरुन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पक पक पक Tue, 04/21/2015 - 16:18 नवीन
खरच वाय झेड प्रश्न आहेत.. :bigsmile:
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 04/21/2015 - 20:07 नवीन
मुंबई का? ;-)
  • Log in or register to post comments
N
NiluMP Tue, 04/21/2015 - 23:46 नवीन
S, Boss. S=Yes
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
N
NiluMP Wed, 04/22/2015 - 00:04 नवीन
Reason for my 1st ? [...first train journey in India between Bombay and Thane on 16 April 1853 in a 14 carriage long train drawn by 3 locomotives named Sultan, Sindh and Sahib. It was around 21 miles in length and took approximately 45 minutes....] extract from Wiki. 150+ वर्षा नंतरही हे अंतर कापण्यासाठी तेवढाच वेळ लागतो
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 04/22/2015 - 01:31 नवीन
४५ मिनिटे लागतही असतील. पण तेव्हाच्या मुंबई आणि ठाण्यामधे किती स्थानके होती? तेव्हा मुंबई आणि ठाण्याच्या मधे किती सिग्नल होते? लोहमार्गाच्या आजुबाजुला झोपडपट्टी होती का? तेव्हाच्या आणि आत्ताच्या स्थानकांच्या संख्येमधे दहापटीने वाढ झाली असेल असे जर ग्रुहीत धरले तर आताची लागणारी ४५ मिनिटे म्हणजे जलद सेवा म्हणावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP
N
NiluMP Wed, 04/22/2015 - 16:15 नवीन
तेव्हाच्या आणि आत्ताच्या लोकलचा वेग आपण ग्रुहीत धरला नाहीत आणि मी जलद लोकल बद्दल बोलतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Wed, 04/22/2015 - 21:10 नवीन
जवळ जवळ असणारी स्थानके आणी रुळांच्या बाजुला झालेली बांधकामे/झोपडपट्ट्या लक्षात घेता आताच्या लोकलचा कमाल वेग गाठता येणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP
N
NiluMP गुरुवार, 04/23/2015 - 00:28 नवीन
हयाला जबाबदार कोण?, प्रशासन, कायदा व सुव्यवस्था, राजकारणी की जनता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या गुरुवार, 04/23/2015 - 05:52 नवीन
तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं कारण सांगीतले. आता याला जबाबदार आपण सारेच. हे सगळे खपवून घेणारे सरकार आपणच निवडून देतो. सुधरेल हळू हळू. थोडा वेळ लागेल पण सुधारणा होणार हे नक्की. नवी पीढी हे सगळं खपउन घेईल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP
N
NiluMP गुरुवार, 04/23/2015 - 16:27 नवीन
आणि म्ह्णूनच माझ असे मत मतदान (निवडणूक) सोडून इतर कोणत्यातरी वेगळया पध्दतीने नेते निवडूण यावेत. यामुळे ह्या समस्या ५०% तरी कमी होतील कारण कोणत्याही व्होटबॅंकचे लाड खपवून घेतले जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्रमोद देर्देकर Wed, 04/22/2015 - 08:45 नवीन
+१ खटपट्या अरे त्यांना (NiluMP यांना)संध्याकाळची ५.१३ मि. ची अंबरनाथ गाडी पकडायला सांगा जी दादरहुन सुटते ती ठाण्यालाच थांबते. मोजुन फक्त २६ मि. लागतात.
  • Log in or register to post comments
H
hitesh Wed, 04/22/2015 - 10:15 नवीन
म्हमै म्हंजे सी एस टी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
N
NiluMP Wed, 04/22/2015 - 16:18 नवीन
मी रोज संध्याकाळची ६.०० ची कल्याण गाडी पकडतो जी दादरहुन सुटते. ३० मि. लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
च
चिनार Wed, 04/22/2015 - 10:41 नवीन
पुढील वाक्याचा धाग्याशी काहीच संबंध नाही. पण असे प्रतिसाद हल्ली सगळ्याच धाग्यांवर दिसतात. या धाग्यावर दिसला नाही म्हणून जर रुखरुख वाटली. "हे असले YZ प्रश्न विचारणं म्हणजे हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटायचं कारस्थान आहे !!!"
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 04/22/2015 - 22:13 नवीन
तसे हि णेफळे वस्ति कुठे उछाद घालत नाहित्...ते हि पाकड्यां सारखे आता अंगवळणी पडलेयत. हि सगळि वस्ति आर.एन्.आय (रेसिडेंट नॉन इंडियन) आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा