एका शेतकर्याची आत्महत्या
केजरीवाल नावाचा हिमनग पाण्यात किती आणि दिसतो किती
जे झाले ते खूपच दुखदायी होते पण खालील मुद्दये सौंशय उत्पन करतात
१. १० एकर शेत, २ फळबागाचा मालक.
२. फेटा बांधायाचा व्यावसाय करत होता.
३. आत्महत्येच्या दिवशी त्याच्याकडे १.५० लाख होते(शंका वाटते)
४. समाजवादी पार्टीतून २ वेळा निवडणूक लढला.
५. कॉंग्रेस मध्ये गेला होता.
६. आता आप मध्ये होता.
७ झी न्यूज (२३/०४/१५) दाखवलायानुसार, त्याचा भाऊ सांगतो आत्महत्येच्या चिट्ठीतले अक्षर त्याचे नाही, पुरावा
म्हणून त्याचे हस्ताक्षार दाखवले.
७. श्री मनीष सिसोदियानि बोलावले म्हणून दिल्लीला गेला असे घरचे सांगतात.
तसेही मतदारांनी जे चांगले वाट्टेल तिकडेच जावे कायमचे ह्या राजकारण्यांच्या मागे लागु नये..एक थोडासा फरक सुचवतो. तो असा...तसेही मतदारांनी जे देशाच्या दृष्टीने चांगले वाट्टेल तिकडेच जावे कायमचे ह्या राजकारण्यांच्या मागे लागु नये..कारण वैयक्तीक फायदा तात्पुरता असतो आणि त्यात देशाचा फायदा असेलच असे नाही. पण, देशाचा फायदा झाला तर तो प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे देशाच्या सद्य नागरिकांपर्यंतच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचतो. आजचे तथाकथित विकसित देश ज्या स्थितीवर पोहोचलेले आहेत, ते केवळ सद्याच्या पिढीच्या कर्तृत्वामुळे नाही तर त्यामागे देशाच्या भल्याचा विचार करणार्या अनेक पिढ्यांचा हातभार लागलेला आहे. ====== * प्रत्येक माणसाची कळत नकळत कधीना कधी चूक होतेच... तो माणूसधर्मच आहे ! मात्र ती चूक प्रामाणिकपणे पत्करून, त्या अनुभवांतून शिकून पुढे तशी चूक परत होऊ नये यासाठी प्रयत्न करणारा माणूस प्रामाणिक आणि प्रगतीशील असतो. त्याउलट, चूक डोळ्यासमोर धडधडीत दिसत असताना ती चूक नाहीच असे म्हणत, चुप्पी साधणारे किंवा तिचे प्रत्यक्ष समर्थन करणारे, अप्रामाणिक आणि/अथवा कांगावाखोर असतात. असे लोक इतर लोकांची दिशाभूल करता करता स्वतःच्याच खोट्या मायाजालात गुरफटून स्वतःचे नुकसान करतात, हे त्यांच्या मूर्खपणाचे फळ असते. पण त्याबरोबर त्यांच्यावर अंधविश्वास ठेवणार्या त्याच्या पाठीराख्यांचेही त्यापेक्षा जास्त नुकसान करतात, हे अक्षम्य आहे.