भूतदया!! Human Rights!
गेले महिना-दिड महिना या गोष्टीवर लिहावे म्हणते आहे. पण जो प्रश्न पडलाय; तो नक्की कसा विचारावा ते कळत नाही आहे. भरीत भर म्हणजे वाद घालणे हा आमुचा प्रांत नाही, पण मला जो प्रश्न पडलाय तो काथ्याकुटातच येउ शकतो.
तर मंडळी बाली नाईन हे प्रकरण ऑस्ट्रेलियात अतिशय गाजते आहे. त्या बद्द्लची माहिती मी वर लिंक मध्ये दिली आहे.
ऑस्ट्रेलीयन लोकांना सगळ्यात स्वस्त हॉलीडेज म्हणुन इंडोनेशीया अन त्यातल्या त्यात बालीचे अतिशय आकर्षण! प्रवास अगदी नगण्य! खर्च तर त्याहुन नगण्य! अन ऑस्सी पासपोर्टला इंडोनेशियात असणारा मान! या सगळ्याचा परिपाक म्हणजे बागेत जावं तसे हे लोक इंडोनेशिया गाठतात.
पण इंडोनेशियाचा अँटी ड्र्ग्ज कायदा या लोकांना मानायचा नसतो, किंबहुना गरीब देशांच्या कोणत्याच कायद्याला हे लोक भिक घालत नाहीत. एक प्रकारचा माजोरडेपणा आहे या फर्स्ट वर्ल्ड म्हणवणार्यात. रेफरन्स साठी ही बातमी वापरता येइल.जापनिज स्त्री वरील अत्याच्यार या बाबतीत सुद्धा अमेरिकेने जापनिज कायदा न चालवुन घेता स्वतःचा कायदा वापरायच्या नावाखाली दोन्ही सैनिक डिपोर्ट केले अमेरिकेला अन चक्क सोडून दिले.
तर जेंव्हा ही बाली नाईन केस सुरु होउन त्यांच्या कायद्याप्रमाणे मृत्युदंडाची सजा फर्मावली गेली, तेंव्हा आख्खा ऑस्ट्रेलिया ढवळुन निघाला. अगदी त्सुनामी मदतीचा उल्लेख केला गेला . आणि त्याची रिअॅक्शन बघणेबल झाली.
तर मला विचारायच आहे ते एकच आज ऑस्ट्रेलिया ह्युमन राइटस, भूतदया वगैरेचा जो उल्लेख करते आहे, त्यामुळे मूळ संदेश काय जातो आहे? आता ही न्युज पहा. टीव्हीवर ही बातमी आली तेंव्हा त्या न्युज मध्ये या लहान मुलाची आई चक्क "व्हॉट द शिट? ऑन्ली ६.५ ग्राम्स ऑफ मारुअना." असं म्हणाली. बाहेरच्या देशात जाऊन तुम्ही काहीही करा, आम्ही आमच वर्चस्व वापरुन तुम्हाला सोडवुन आणू. रहा निर्धास्त!
आता हाच ऑस्ट्रेलिया जेंव्हा त्यांच्या बेस्बॉल् प्लेअरचा मृत्यु होतो, तेंव्हा जुवीनायल कोर्ट न वापरता मॅक्झीमम शिक्षेची अपेक्षा करते.
कालच या बाली नाईन मधला एकजण मरणाच्या प्रतिक्षेत असताना लगिन लावुन मोकळा झालाय! वर आज सकाळी न्युज मध्ये सांगितल जात होतं, या दोन जीवांना त्यांच आयुष्य जगण्याची संधी दिली जावी.
ड्र्ग्ज!! जे एका वेळी हजारो आयुष्य उध्वस्त करतात!! खुद्द ऑस्ट्रेलिया आज आईस च्या जहरी विळख्यातुन कसं सुटावे याचा उपाय शोधते आहे, तेंव्हा या बाली नाईन साठी इतक राजकिय वर्चस्व वापरणं योग्य आहे का? किंबा नैतिक आहे का?
यांच्या मते त्यांना डेथ न देता आजन्म तुरुंगात डांबुन खाउ पिऊ घालावे, आणि पोसत बसावे.
मरण देणे हे कधीच प्रशंसनिय नाही,पण ज्या अपराधाने आयुष्यच्या आयुष्य उद्ध्वस्त होते दुसर्यांचे त्याला ह्युमन राइटस कसे काय लागू होतात? मग जे या अपराधाला बळी पडतात त्यांच्या राइटसचे काय?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt