बाबासाहेब पुरन्दरे यान्ना "महाराष्ट्रभूषण" पुरस्कार
ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ श्री. ब.मो. ऊर्फ बाबासाहेब पुरन्दरे यान्ना महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्रभूषण" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे जाहीर केले आहे.९३ वर्षीय बाबासाहेबान्नी आपले जीवन शिवचरीत्राला वाहून घेतले आहे.वर्षानुवर्षे अनेक गावातून्,शहरातून्,गडान्वर अहोरात्र भ्रमन्ती करुन त्यान्नी असन्ख्य ऐतिहासिक पुरावे गोळा करून अस्सल शिवचरीत्र लिहिले.अत्यन्त ओघवत्या शैलीत लिहिलेल्या प्रभावी भाषेमुळे हे शिवचरीत्र घराघरात पोचले.
बाबासाहेबान्न्नी मराठी माणसान्ना शिवचरीत्राचे वेड लावले.नुसते शिवचरीत्र लिहून ते थाम्बले नाहीत तर आजवर शिवचरित्रावर असन्ख्य व्याख्याने देऊन त्यान्नी श्रोत्यान्ना मन्त्रमुग्ध करून सोडले.शिवचरीत्रावर आधारीत जाणता राजा हे महानाट्य लिहून हेच शिवचरीत्र दैदीप्यमान स्वरूपात स्टेजवर आणले.
बाबासाहेबान्नी १९५३ साली झालेल्या दादरा,नगर,हवेली भागान्च्या स्वातन्त्र्यसन्ग्रामात भाग घेतला होता.सुधीर फडके,बाबासाहेब अशा सव्वाशे जणान्नी या भागावर सशस्त्र हल्ला करून तिथून पोर्तुगीज सैनिकान्ना पिटाळून लावून हे भाग पोर्तुगिजान्च्या तावडीतून मुक्त केले आहेत.
काही टपोरी फॅसिस्ट सन्घटना हा पुरस्कार बाबासाहेबान्ना देण्यास विरोध करत आहेत्.परन्तु यातुन त्यान्चा कोतेपणा,जातीय वृत्ती व अज्ञानच दिसत आहे.अशा थोर इतिहासकाराला महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिल्याने या पुरस्काराचीच शान उन्चावली आहे हे नक्की.या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र सरकारचे व बाबासाहेबान्चे अभिनन्दन व बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.
मूळ कागदपत्रे उजेडात आणून त्यांआधारे इतिहासाची मांडणी करणे जितके आवश्यक तितकेच पुरंदरेस्टाईल इतिहासाचे कथाकथन हेही आवश्यक आहे. इतिहासाची आवड लागण्यासाठी पुरंदर्यांसारख्यांचे महत्त्व अफाट आहे. त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार जाहीर होणे अगदी सुयोग्य आहे.+१०० माननिय बाबासाहेब पुरंदरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! ======== @ लॉर्ड फॉकलन्ड : त्यांनी = tyAMnI श्रोत्यांना = shrotyAMnAमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आरटीओ दलालांकडून वर्षांला ८०० कोटींपेक्षा जास्त फस्त! मुंबईत ‘पंधरावं वरीस धोक्याचं', १५ वर्षांखालील १८५ मुलींचा गर्भपात