माझी केरळ आणि तामिळनाडु सहल भाग-१
"फिराला जायाचं , फिराला जायाचं"
"पण कुठं जायाचं "
"केरळला"
"का? तिकडेच का?"
तो आहे ना जळावु गणेशा त्याने त्याच्या केरळच्या धाग्यात जे काही फोटो टाकलेत त्यानं अशी जळजळ झाली की २ इनो पाकिटे घेवुनही जाईना, तेव्हा म्हंटले की तिकडे जावुनच यावे. मगच जीव शांत होईल.
तरी एका नातेवाईकांनी पाय ओढलाच.
वाss जावुन जावुन केरळलाच जाताय का? "अरे केरळांत आणि आपल्या कोकणांत फरक तो काय? आपल्या गावी जसे डोंगर तसेच तिकडचे त्यात विशेष ते काय? आणि हो छत्री घ्या नाहीतर पाऊस गाठेल. "
म्हंटले येवुदे की, इथे उकाड्याने हैराण आहे म्हणुन तर भिजायला जातोय. आणि येताना तुमच्यासाठी घेवुनच येतो त्याला.
मग एका यात्रा कंपनीकडे जावुन बुकिंग करुन आलो. आणि २१ ते १ जुन असा कार्यक्रम ठरला. या सहलीत श्री. गणेशा आणि श्री. कंजुश काका यांचे छान मार्गदर्शन मिळाले.
या यात्रेत मी महाभारताची वेगळी कथा.. या धाग्यावरिल "महाभारतयुद्धानंतर शकुनी स्वर्गाला व्हाया केरळ गेला." या श्री.विकासच्या प्रतिसादानुसार ते देऊळ कुठे सापडते का ते पहात होतो. अनेक देवाळांना भेटी दिल्या तेव्हा तिथल्या पुजार्यांना विचारले असता काही माहिती मिळाली नाही.
यात्रा सुरु-
२१ तारखेला सकाळी ८. ३५ ला मंगला एक्र्पेसने कल्याण सोडले आणि गाडी केरळला पोहोचायच्या आधीच गणेशाच्या फोटोसारखे केरळचे दर्शन होईल असे दृष्य नजरे समोरुन जायला लागले.
गाडीने जसे पनवेल सोडले तसा बाजुचा निसर्ग हिरवागार झाला. संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आम्ही राजापुरला पोहचलो. आणि सकाळ होईस्तोवर गाडीने संपुर्ण गोवा आणि कर्नाटक पार केले होते. सकाळी उठलो तर पहिल्या केरळच्या स्टेशनचे दर्शन झाले नाव होते कोयिलांडी. लोहमार्गाच्या दोन्ही बाजुला सगळी नारळाच्या झाडांची माडी होती. या झाडांच्या माडीत तिथल्या लोकांची टुमदार एकमजली बंगले आहेत. तर थिरुरला केळीच्या बागा पहायला मिळाल्या. काही ठिकाणी मोठ्या नद्या समुद्रला जावुन मिळत होत्या. धावत्या गाडीतुन त्याचे काही फोटो घेतले.
अखेर सकाळी १०.४५ ला एर्नाकुलमला गाडी पोहचली. तिथुन पुढे मग मलाबार पर्ल हॉटेल. तेव्हा या सहलीत ४० जण सहभागी असल्याचे लक्षात आले. पण सगळेच जण एकमेकांना अनोळखी होतो. पुढे ओळख झाली.
आजचा दिवस पुर्ण विश्रांतीचा होता. पण आम्ही दुपारी थोडीशी वामकुक्षी घेवुन संध्याकाळी ५.०० वाजता जवळच असलेल्या एका पावाकुमलम या महादेवाच्या देवळात गेलो. संपुर्ण देवळात आतमध्ये आणि बाहेरच्या भिंतींना दर ६ इंचावर चौरसाकृती लाकडी पट्ट्यांमध्ये पणत्या ठेवण्यासाठी जागा केली होती. दररोज त्यातल्या काही तर सणासुदीला सगळ्याच पणत्या तेवत असतात असे तिथल्या पुजार्यांनी सांगितले.
पावाकुमलम देवूळ.
पणत्या ठेवण्यासाठी केलेली खास योजना.
पणत्या ठेवण्यासाठी केलेली खास योजना जवळुन.
एव देवळासमोर एक धातुचा खांब होता. तो ऊंच आकाशात गेला होता. नंतर तेथिल प्रत्येक मंदिरात असे खांब देवळाच्या दाराशी उभे केलेले आढळले.
तिथून पुढे मग आपल्या मुंबईसारखे तिथेही मरिन ड्राईव्ह आहे तिकडे फिरायला जा अशी माहिती मिळाली. तेव्हा तिथल्या स्थानिक बसने प्रावास केला. या बसच्या खिडक्यांना मुंबईच्या बेस्टच्या बससारखी लोखंडी जाळी नव्हती. खिडकी संपुर्णपणे उघडी होती. पावसाळा आला की वर बांधलेली कापडी कनात खाली सोडायची की झालं काम.
मरिन ड्राईव्ह ही खुप सुंदर जागा आहे. विशेष म्हणजे समुद्र किनारा स्वच्छ आहे. (नंतर हीच स्वच्छता सगळीकडेच पहायला मिळाली कोणत्याही नदीत एकही प्लास्टीकची पिशवी तंरंगताना पहायला मिळाली नाही की कुठेही रस्त्यावर घाणीचे ढिगारे पाहिले नाहीत.) इथे पेरियार आणि एक कोणती तरी नदी येवुन मिळते. पण मुंबईच्या मानाने गर्दी कमी होती. या ड्राईव्हच्या फुटपाथवर एक बोटीच्या आकाराचे हॉटेल होते. पण ते पुर्णपणे रिकामे होते.
किनार्यावरुन परताना संध्याकाळी केरळची प्रसिध्द केळ्याची भजी, अननस आणि कैरी यांचे कॉकटेल सरबत घेतले. फिरत फिरत हॉटेल वर आलो. तिकडे ८.३० नंतर रस्याला तुऱळक गर्दी होती. रात्री ९.०० वाजता जेवताना दुसर्या दिवसाच्या कार्यक्रमाची टुर मॅनेजरकडुन माहिती मिळाली. तेव्हा कळले की याच मरिन ड्राईव्हला जावुन तिथुन बोटीने शिपयार्ड, डचपॅलेस, पाहुन संध्याकाळी मुन्नारसाठी रवाना व्हायचे आहे. अशा रितीने पहिला दिवस पार पडला.
क्रमशः
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक