Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

ग — गंगाधर मुटे, Wed, 06/24/2015 - 05:10

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?


गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

जुन्या काळचे डाकू तरी लै बेस व्हते
शेतावरच्या श्रमिकांना कधी लुटत नोयते
शोषकांच्या छाताडावर पुरणपोळी लाटे
तीर्थप्रसाद करुनशान भुकेल्यांना वाटे
शेतीच्या गच्चीवर आता सरकारच बसते?

उठसूठ होयनोय पाखुरा करते
'मुक्या'च्या चुलीपाशी झाडलोट करते
गावातला 'मुका' इथं फास घेऊन मरते
पोशिंद्याच्या मढ्यावर बांडगूळ चरते
'अभय'तेच्या मस्तीवर ऐदी फुसफुसते?

                         - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
2877 वाचन

💬 प्रतिसाद (4)
उ
उगा काहितरीच Wed, 06/24/2015 - 08:08 नवीन
मुटे साहेब , कविता आवडली (खरं तर असे म्हणायला मन धजावत नाही.) वास्तव आहे हे ही मान्य ! पण एक विचारायचं धाडस करतोय... शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीला सरकारपेक्षा कुठेतरी स्वतः शेतकरी चुकतोय असं नाही का वाटत तुम्हाला ? आत्ता भाजपा च्या काळात शेतकरी नाखुश, यापुर्वी कॉंग्रेसच्या काळात पण नाखूश . सरकारने नेमकं करावे तरी काय ? आणि का ? शेती हे एक उपजीविकेचे साधन धरले तर बाकी व्यावसायिक पण वेगवेगळ्या समस्यातुन जात आसतातचकी. मी चुकत पण असेल पण शेतीत फायदा नसेल तर विकून का नाही टाकत शेती ? शेतीचा भाव तर दिवसेंदिवस वाढतच जातो आहे . ज्यांना शेती नाहीच असेही भांडवलहीन लोक कष्ट करून वा शिकून पोट भरतातच की!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 06/24/2015 - 16:06 नवीन
मुटे साहेब, सरकार बदलली तरी व्यवस्था बदलत नाही. आई ए एस नावाची व्यवस्था ब्रिटीश काळापासून देशात राज्य करते आहे. तेच धोरण अजून ही राबवत आहे. जो पर्यंत या व्यवस्थेत बदल होत नाही, राजनेता जास्त काही करू शकणार नाही. ही व्यवस्था सर्वाना आपल्या तालावर नाचवते. (अनेक आई ए एस अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव आहे, टाकलेल्या रुळावरून कुणीच उतरायला तैयार नाही). त्याच चौकटीत कार्य करतात, कुणीच आपली स्वतंत्र बुद्धी वापरून निर्णय घेत नाही. त्याच फाईली आणि तेच निर्णय..... असंच चालू राहणार आणि साहेबांच्या कविताही....
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 06/24/2015 - 16:16 नवीन
आयला आता वाढवली ना एमेस्पी. ओतले साखर कारखान्यांच्या बोडक्यावर ६००० कोटी रुपये शेतकर्‍यांना द्यायला.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 06/24/2015 - 17:43 नवीन
रेकॉर्ड अडकली आहे. त्याच त्या चर्चा तेच ते प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा