हवी हवीशी हुकुमशाही
http://indiatoday.intoday.in/story/27-congress-mps-suspended-from-lok-sabha/1/455905.html
आज लोकसभेत जे काही झाले ते अभूतपूर्व होते. संसदेचे कामकाज आक्रस्ताळीपणे बंद पाडून देशाचे आणि करदात्यांचे कोट्यावधी रुपये पाण्यात घालणार्या नतद्रष्ट कोंग्रेसी खासदारांना 5 दिवसासाठी निलंबित करून लोकसभा अध्यक्षा सुमित्राजी महाजन यांनी एक महत्त्वपूर्ण नवीन पायंडा पाडला . त्याबद्दल त्यांचे आभार आणि हार्दिक अभिनंदन .
मोदी सरकारकडून अशाच agressive attitude ची अपेक्षा सर्वच क्षेत्रात असून ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रान माजवून मोदीजी सत्तेत आले ,त्या गांधी परिवाराच्या भ्रष्टाचारी कारभाराची कडक व निष्पक्ष चौकशी करावी आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणुकी पूर्वी राहुल, प्रियंका ,सोनिया आणि वाड्रा यांच्यावर जे गंभीर आरोप केलेले होते , त्या गुन्ह्यांची चौकशी करून कडक शिक्षा / कारवाई करावी अशी अपेक्षा आहे .
मग ह्या मोदी सरकारच्या अशा agressive attitude ला कोणी हुकुमशाही म्हणून हिणवले तरी बेहत्तर. देशातील भ्रष्टाचार समूळ उपटून काढण्यासाठी आणि देशाला वैभवच्या सुवर्णशिखरावर नेण्यासाठी अशी हुकूमशाहीच हवी , असेच मोदींना मत देणार्या बहुतांश जनतेचे मत असावे! असे मला वाटते.
एकच दुरुस्ती :
आणी जाता जाता राजकारण धाग्यांना खफसारखी सूचना लावणे (फक्त तीन दिवसांऐवजी ३ तासांची शर्त ठेवणे) धुराळी धाग्याचा "वीट" करी नाखु