संसद सदस्य ते गोंधळी - एक प्रवास
गेले काही आठवडे संसदेत प्रचंड गोंधळ चालू आहे. वृत्तवाहिन्यांमध्ये आणि वर्तमानपत्रात याबद्दल बरेच लिहिले आणि बोलले गेले आहे, त्यामुळे मी या विषयावर धागा काढणारच नव्हतो. एक अशी आशाही होती की किमान शेवटच्या दिवशी सगळ्या पक्षांना (सन्माननीय अपवाद सोडून) सुबुद्धी येईल आणि 'G.S.T.' पारित होईल. पण आता अधिवेशन संपले काही ठोस हाती न लागता. खूप वाईट वाटले. म्हणून हा धागा प्रपंच.
कॉंग्रेसने तर होईल तेवढे बालिशपणाचे प्रदर्शन केले. मला वाटते 'ललित मोडी' हा मुद्दा पूर्ण अधिवेशन वाया घालवण्याएवढा महत्त्वाचा नक्कीच नव्हता. फार फार तर दोन दिवस या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडता आले असते. पण कॉंग्रेसच्या युवराजांना कोणता मुद्दा किती ताणावा तेच समजत नसावे किंवा 'G.S.T.' पारित होऊ नये म्हणून ही रणनीती आखली गेली असेल. पण हे करण्याच्या नादात आपण देशाचे किती नुकसान करत आहोत हे निदान कॉंग्रेसच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला तरी समजायला पाहिजे होते. मला तर असे वाटते की युवराजांना आपली रेषा मोठी करता येत नाही, म्हणून ते मोदींची रेषा छोटी करायचा प्रयत्न करत असावेत. संसदेत किती गोधळ घालावा याला काही मर्यादा आहे की नाही? संसदेबाहेर महात्मा गांधी पुतळ्यासमोरही तोच तमाशा. मंगळवारी तर हद्द झाली - पीठासीन अधिकार्यावर कागदाचे बोळे फेकण्यात आले. अरे, शाळेत असताना आम्हीसुद्धा शाळेत बराच धुडगूस घातला, पण मुख्याध्यापकांवर कागदी बोळे कधी फेकले नव्हते. मला वाटते प्रत्येक पदाची एक प्रतिष्ठा असते आणि ती किमान संसदसदस्यांनीतरी पाळली पाहिजे. कॉंग्रेस म्हणते - भाजपनेही असेच केले होते. अरे, पण त्यांनी या प्रकारे आणि एवढा गोंधळ आणि तमाशा केला नव्हता; आणि मी म्हणतो त्यांनी अंगाला चिखल फसला म्हणून तुम्हीपण फासावा का? मला वाटते अणुकाराराच्या वेळी मनमोहन सरकारला आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या पायाभरणीच्या वेळी नरसिंह सरकारला त्यांनी मदतच केली होती. कॉंग्रसचे वर्तन दिवसेंदिवास जास्त धोकादायक होऊ लागले आहे, मागे एक पाकिस्तानी अतिरेकी असलेली बोट आपल्या गस्ती / आरमाराने बुडवली, तर म्हणे ती स्मगलाराची असावी असा शोध 'शर्मांनी' लावला आणि नेहमीपणे पाकिस्ताने त्याचा फायदा उचलला. आपल्या सैनिकांना मारणार्या नागा बंडखोरांना (खपलांग गट) आपल्या सैनिकांनी ब्रह्मदेशात घुसून मारले, तर त्यावरसुद्धा टीका आणि त्याचे चुकीचे विश्लेषण. नागा बंडखोरांच्या एका मोठ्या गटाबरोबर समझओता केला, तरी यांच्या पोटात दुखू लागले. जीवन विमा, अपघात विमा, पेन्शन योजना लागू केल्या तर म्हणे त्या आमच्या योजना पण मोदींनी फक्त नव्या स्वरूपात मांडल्या! अरे, पण मी म्हणतो, त्या योजना तुमच्या होत्या तर तुम्ही सत्तेवर असताना त्या तुम्हाला लागू करायला कोणी रोखले होते? त्याचे उत्तर नाही.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले पाहून वाटले - चला, आता निर्णयप्रक्रियेत अडथळे कमी येतील. पण त्यानंतर तीन राज्यांत झालेल्या निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळालेले पाहून वाटले - अरे बापरे, अशाने विरोधी पक्ष नामशेष होतील, जे लोकशाहीला घातक आसेल, आणि दिल्लीत 'आप' जिकल्यानंतर वाटले - चला, थोडे बॅलन्स झाले. (आता मात्र वाटते, चूकच झाली.) आणि कॉंग्रेसबद्दल थोडी कणवही वाटू लागली होती. पण आत्ता चाललेला कॉंग्रेसचा गोंधळ पाहून वाटते की या पक्षाला ४० जागा तरी का मिळाल्या? लिहिताना वाईट वाटते, पण मला वाटते पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि कॉंग्रस पुरस्कृत आर्थिक दहशतवाद यात फारसा फरक उरला नाहीये.
मला एका गोष्टीचे वाईट वाटते, ते म्हणजे पंतप्रधानांनी निदान शेवटच्या दिवशी लोकसभेत येऊन या पावसाळी अधिवेशनावर टिप्पणी करायला पाहिजे होती.
ता. क. - आपले पवार साहेब तिसर्या मोर्चाची बांधणी करत आहेत. पण मला वाटते हे 'G.S.T.' पारित करून घ्यायच्या व्यूहरचनेचा / मोदीनीतीचा भाग असावा. कारण आपले पवार साहेब जेव्हा straight drive मारायची position घेतात, तेव्हा ते खरे तर sweep मारतात आणि साहेबांनी फटका मारला की हे दुसर्या संघाला समजते. असो, बरेच खरडले.
असल्या राहुल गांधीपेक्षा हा थायलंडला जायच्या आधिचा राहुल गांधी बरा होता.खी खी खी.....