चला चर्चेद्वारे महाभारताचे ज्ञान वाढवू......
पुर्वार्ध
महाराजा प्रतीपने गंगेला दिलेल्या वचनानुसार आपला पुत्र शान्तनुला गंगेशी विवाह करण्याचा आदेश दिला व स्वत: स्वर्गाकडे प्रस्थान केले. वडिलांच्या आदेशानुसार महाराज शान्तनु ने गंगेशी विवाह केला. पण गंगेने महाराज शांन्तनु कडून एक वचन घेतले., कोणत्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही. महाराज शान्तनु ला आठ पुत्रे झाली. त्यातील सात पुत्रांना गंगेने गंगेत सोडुन दिले. (हे सात पुत्र म्हणजे मानव लोकात राहण्याचा शाप मिळालेले अश्विनी कुमार, त्यांना गंगेने गंगेत सोडून शापमुक्त केले) पण आठव्या पुत्राच्या वेळेस महाराज शान्तनुने हस्तक्षेप केल्यामुळे गंगा आठव्या पुत्रासोबत गुप्त झाली.
महाराजा शान्तनु काही काळ ब्रह्मचारी राहिले. एक दिवस आठव्या पुत्राची आठवण झाल्यावर गंगेकडे आपल्या पुत्राची मागणी केली. तेव्हा गंगेने देवव्रताला महाराज शान्तनुच्या हवाली केले. हा पुत्र परशुरामासारखा पराक्रमी होता. महाराज शान्तनुने त्याला हस्तिनापुरचा युवराज घोषित केले.
एक दिवस महाराज शान्तनु यमुनेच्या किनार्यावर फिरत असताना सत्यवती नजरेस पडली. तिचे सौंदर्य पाहुन महाराज शान्तनु तिच्यावर मोहित झाले. महाराज शान्तनु ने तिच्या पित्याकडे सत्यवतीशी विवाह करण्याचे विचारले. सत्यवतीच्या पित्याने विवाहाला मान्यता दिली. पण एक अट घातली. सत्यवतीला होणार्या पुत्राला हस्तिनापुरचा उत्तराघिकारी केले पाहिजे. देवव्रताने महाराज शान्तनुसाठी आजन्म बह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हापासून देवव्रताचे नाव भीष्म पडले.
महाराज शान्तनुचा सत्यवतीशी विवाह झाला.महाराज शान्तनुला सत्यवतीपासून चित्रानंद व विचित्रवीर्य हे दोन पुत्र झाले. महाराज शान्तनुचे काही दिवसानी निधन झाले. भीष्माने चित्रानंदाला राजगादीवर बसवले. गंधर्वा बरोबर झालेल्या युद्धात चित्रानंद मारला गेला. भीष्माने विचित्रवीर्याला राजगादीवर बसवले. विचित्रवीर्याचा विवाह अंबिका व अंबालिका बरोबर झाला. विचित्रवीर्याचा क्षयाने मृत्यु झाला. वंशविस्तारासाठी सत्यवतीने व्यास ऋषिनां पाचारण केले. ( व्यास म्हणजे सत्यवतीचा लग्नाआधी पराशर मुंनी पासून झालेला पुत्र) व्यासापासून अंबिकेला धृतराष्ट्र, अंबालिकेला पान्डु व दासीला विदुर असे पुत्र झाले.
उत्तरार्धातील माहिती चर्चेव्दारे प्रतिसादातून प्रत्येकाने थोडी थोडी सांगावी.
मध्यंतरी एपिक नव्याच्या वाहिनीवर , महाभारत या वर आधारित , धर्मयुद्ध नावाचा अत्यंत छान असा कार्यक्रम होता .ते धर्मक्षेत्र आहे.साधारण जे मत सामान्यपणं सगळ्यांना मान्य आहे, सर्वमान्य आहे त्याच्या विरोधी तुमची मतं असतात.माझ म्हणण यात तुम्हाला माझ एकट्याच च मत नाही महाश्वेतादेवींनी हि असे मत व्यक्त केले आहे असे म्हणत होतो. दुसर म्हणजे काल्पनिक कथाच आहे ती मात्र त्यांनी त्याद्वारे निषादीची बाजु वेदना व्यक्त केलेली आहे. जसे कर्णाची बाजु व्यक्त करण्याचा मृत्युंजय हा एक प्रयत्न होता. तो पर्यंत कर्णावर असा विचार क्वचितच व्यक्त झाला असावा. महाश्वेतादेवी कुंती व निषादी दोन्ही स्त्रीया आहेत माता आहेत व कुंतीचा मृत्यु व तिचा मृत्यु जळुन च होतो आदि समान धागे बांधुन ती कथा सुंदर कलात्मक जुळवणी करुन लिहीतात. त्यात त्या निषादी द्वारे कुंती ला जी मुख्य प्रवाहाची प्रतिनीधी आहे तीला तीच्या मुल्यांना (ज्या प्रकारे निषादी व तिच्या मुलाविंषयी उदासीनता खर म्हणजे त्यांचा मृत्यु जसा ओरखडा हि उमटवत नाही या बाबी ) आदि ती क्वेश्चन करते कुंती च्या कॉन्सस ला एक प्रकारे त्या सर्व अभिजन वर्गाला ती चॅलेंज करते तेच महाश्वेतादेवींनी दाखवुन दिलेल आहे. महाश्वेतादेवी हे सर्व परत कलात्मकतेने दाखवुन देतात हे विशेष.महाभारतकारांना नेमकं काय सांगायचं आहे ते महाभारत वाचून समजेलपुर्णपणे सहमत आहे मुळ उतारा वाचण व त्यावरुन मत बनविण नंतर ती मते कालसापेक्ष अनुभव सापेक्ष तपासुन/ ताडुन बघण हाच योग्य मार्ग बाटतो. मुळ उतारा वाचल्यावर (संस्कृत नाही मात्र मुळ संस्कृत चा मराठी अनुवाद एकापाठोपाठ ) मला अनेक नविन गोष्टी कळल्या कधी गंमत वाटते वन जाळणारा पक्षी जाळणारा कृष्ण अर्जुन सर्पसत्राच्या वेळची वर्णन वाचतांना वृक्षवल्ली आम्हा सोयरे गाण कॅसेट वर वाजत होत तेव्हा तुकाराम हे वसुधैव कुटुंबकम ला नंतरच्या काळातील असुनही अधिक जवळ होते असे वाटले. तुम्ही एकदा अर्जुन कृष्णा च्या सेलीब्रेट केलेल्या एका पार्टीचा मुळ मराठी संस्कृत उतारा एकदा वाचुन पहा तुम्हाला रोचक वाटेल इतक आजकालच्या पार्टीशी ते वर्णन मॅच होत. महाभारत इंटरेस्टींग आहे फुल ऑफ लाइफ आहे रामायणा सारख बोरींग एकसुरी नाही.