हार्दीक ते अन्सारी
ऑगस्टच्या मध्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून वादग्रस्त ठरणार्या मागण्या केल्या गेल्या. पहील्यांदा हार्दीक पटेल या विशीतल्या युवकाने पाटीदार पटेल समाजासाठी राखीव जागांची मागणी केली. नंतर काल म्हणजे ३१ ऑगस्टला मज्लीस-ए-मुशावरात च्या ५० व्या वर्धापन दिना निमित्त झालेल्या सोहळ्यात झालेल्या मा.उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लीम समाजासाठी विशेष हक्कांची (affirmative action) मागणी केली अथवा सुचना केली. यात राजकारण असू शकेल का? माझ्या सारख्याला नक्की वाटते. दोन्ही घटनांमधे राजकारण करणारे समान नसले तरी उद्देश समान असू देखील शकतो, असे मला वाटते. कुणाला तसे वाटणार नाही... पण तो या चर्चेचा मुद्दा नाही. नुसते कारण असो, समाजकारण असो अथवा राजकारण, पण या विषयाचा स्वतःला कुठल्याही बाजूने असलेला-नसलेला फायदा-तोटा अथवा स्वार्थ-परमार्थ स्वतःपासून दूर ठेवून यावर विचार करायला हवा, असे वाटते.
कुठल्याही मुक्त समाजात विषमता ही असतेच. (आणि मुक्त नसलेल्या साम्यवादी/हुकूमशाही राष्ट्रात स्वातंत्र्य नसते आणि समता तर कधीच नसते!). त्याची कारणे अनेक असतात. भारतासारख्या देशात अधुनिक भारत होण्याआधीच जातीव्यवस्थेमुळे विषमता होतीच. त्याकरता राखीव जागा सुचवल्या गेल्या. आंबेडकरांनी हे केवळ १० वर्षेच चालेल या अटीवर त्याला पाठींबा दिला. दुर्दैवाने १० वर्षांनंतर आंबेडकर राहीले नाहीत पण राखीव जागा मात्र फोफावतच गेल्या. १० वर्षात एखाद्या समाजाचे संपूर्ण भले होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या तशा राहील्या म्हणून बिघडले असे मला वाटत नाही. मात्र त्यातील फायदा ओळखत "आम्ही पण, आम्ही पण" असे म्हणत राजकारण्यांनी इतर अनेकांना त्यात गुंतवत स्वतःच्या मतपेट्या तयार केल्या. त्यात त्यांच्या समाजातील नक्की किती जणांचा खरेच फायदा झाला आणि ते ते समाज नक्की किती अधुनिक होत गेले, त्याला राखीव जागा असण्यामुळे कसा फायदा होत गेला, वगैरे संशोधनाचे विषय आहेत. पण त्याचे प्रामाणिक संशोधन भारतात होईल का? हा देखील एक मुद्दा होऊ शकतो... त्यात आता मा. उपराष्ट्रपती अन्सारी अजून एक पाऊल पुढे जाऊन मुस्लीम समाजालापण मागू लागले. जेंव्हा राष्ट्राची second in command असलेली व्यक्तीच असे म्हणू लागते तेंव्हा काळजीचे कारण वागते.
वास्तवीक भारतात, ज्यांना शिकायचे आहे ते कठीण परीस्थितीत शिकले आणि नावारूपाला आले - त्यात सर्व जाती धर्माचे दिसतील. मा. अन्सारी जेंव्हा मुस्लीम समाजाबद्दल म्हणतात तेंव्हा विचारावेसे वाटते की त्याच समाजातील किती जण हे अक्षरशः काव्य-शास्त्र-विनोद (आणि अर्थातच कला) हे तमाम भारतीयांमधे लोकप्रिय आहेत म्हणून? त्यांना नक्की कुठले विशेष हक्क मिळाले म्हणून ते नावारूपाला आले. मा. अन्सारी मला वाटते मोठ्या घराण्यातून आलेले असल्याने त्यांना कदाचीत झटावे लागले नसेल. पण एकीकडे पै. अब्दुल कलाम आणि दुसरीकडे बिस्मिल्ला खांन सारखे सामान्यातून येऊन असामान्य होऊ शकले ते केवळ त्यांच्या अथक परीश्रमामुळे...
पण या सर्व सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत जेंव्हा संपूर्ण समाजाला राखीव जागांच्या नावाखाली वेठीला धरले जाते तेंव्हा देशाचे काय होते हा प्रश्न आहेच पण नक्की आपण समाजातला घटक म्हणून काय मिळवतो याचा व्यक्तीगत विचार करण्याची गरज आलेली आहे असे वाटते.
आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्या अर्थाने मदत झाली पाहीजे. इतक्या वर्षांनी जर आपण अजून जास्तच राखीव जागा मागत असलो तर नक्कीच काहीतरी चुकते आहे का असा प्रश्न पडतो. आईन्स्टाईनच्या नावाने वापरले जाणारे एक वाक्य या निमित्ताने आठवते - Insanity means doing the same thing over and over again and expecting different results. असे तर आपले होत नाही आहे ना? जर तसे होत असेल तर नक्की आपण काय करायला हवे, जेणेकरून गरजूंनाच मदत होईल आणि विषमता ही संधी मिळण्यात रहाणार नाही?
हा धागा जातीयवाद अथवा धार्मिक वादासाठी काढलेला नाही. तेंव्हा कृपया तसा वापर करू नका. भले आपले (सकारत्मक/द्वेषविरहीत) मत कोणीही (राजकारणी) ऐकणार नसला तरी आपण नक्की काय विचार करू शकतो हे समजणे देखील एक स्वतःपुरते यश/स्वांत सुखाय ठरू शकते....
Insanity means doing the same thing over and over again and expecting different results. असे तर आपले होत नाही आहे ना?हा खरा कळीचा प्रश्न आहे. (माननीय उप-राष्ट्रपति श्री. अन्सारी यांनी केलेलं भाषण पूर्णत्वाने वाचायचं होतं. पण या शासकीय पानावरचा नेमका तोच दुवा ...August 31, 2015 : Remarks by Shri M. Hamid Ansari, Hon'ble Vice President of India at the Inauguration of the All India Majlis-E- Mushawarat Golden Jubilee in New Delhi on August 31, 2015 काम करत नाही असं दिसतंय....)आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्या अर्थाने मदत झाली पाहीजे.हे १०० टक्के खरे आहे. पण...आईन्स्टाईनच्या नावाने वापरले जाणारे एक वाक्य या निमित्ताने आठवते - Insanity means doing the same thing over and over again and expecting different results. असे तर आपले होत नाही आहे ना?यात आपण पी एच डी केलेली आहे, हे पण १०० टक्के खरे आहे. :(