Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतीय प्रसारमाध्यमे आणी विश्वासार्हता

J
Jack_Bauer
Mon, 09/07/2015 - 21:48
🗣 65 प्रतिसाद
लेखाच्या सुरवातीलाच नमूद करू इच्छितो की हे माझे वैयक्तीक विचार असून लेखाच्या शेवटी घेतलेला निर्णय हा मी माझ्यापुरता घेतलेला आहे. ९० च्या दशकापर्यंत बातम्या मिळवण्यासाठी दूरदर्शन/आकाशवाणी हे एकमेव साधन होते. संध्याकाळी ७ च्या मराठी बातम्या माझे वडील न चुकता पहायचे आणी अजूनही पाहतात. त्या बातम्यांना एक दर्जा होता आणी मुख्य म्हणजे कुठलीही सनसनी निर्माण करणे हा उद्देश नसायचा. पण आज काय स्थिती आहे ? २४ तास दळण दळल्यासारख्या News चानेल्स सुरु आहेत. दर्जाच्या नावानी तर बोम्ब ! कित्येकवेळा १ ओळीची बातमी आणी २० सेकंदांचे फुटेज परत परत परत परत एकदा active voice एकदा passive voice मध्ये सांगून आणी फुटेज repeat मोड वर लावून अर्ध्या तासाचा exclusive प्रोग्राम करतात. उदाहरण : "हे बघा ते येत आहेत " …… परत थोड्या वेळानी " हे पहा ते आपल्याला येताना दिसत आहेत " …… परत थोड्या वेळानी … " फ़क़्त आमच्या channel वरतीच यांना येताना दाखवण्यात येत आहे" …. अरे काय लावलंय ? काही तरी दर्जा ? पण लेखाचा उद्देश हा नाही, मुद्दा हा आहे की पत्रकारांच काम पूर्ण आणी खऱ्या बातम्या देणे हे आहे. पण आज तसे दिसतं नाही. आपण काही उदाहरणे पाहुयात : १. १६ एप्रिल २०१५ : कॅनडाने भारतीयांना वीसा ओन arrival ची घोषणा केली video नीट पाहिला तर इंग्लिश येणाऱ्या कोणालाही कळेल की कॅनडाच्या लोकांसाठी भारताचा हा वीसा ओन arrival प्रोग्राम आहे. Times of India आणी कित्येक अनेक माध्यमांनी ही चुकीची बातमी exclusive च्या नावाखाली रिपोर्ट केली. ह्यामुळे पुढे काही वेगळे पेच निर्माण झाले तर मेडिया जबाबदारी घेणार का ? २. मुस्लिम तरुणीला मुंबईत घर नाकारले : पोलिसांनी पूर्ण तपास केल्यावर ह्या बातमीत कोणतेही तथ्य आढळले नाही. त्या इमारतीत अनेक मुस्लिम राहत होते . ह्या बातमीमुळे जर समाजात तेढ निर्माण झाली आणी त्यातून काही दंगे आणी नुकसान झाल तर त्याला कोण जबाबदार ? ३. जसलीन कौर प्रकरण : The “Pervert” who “molested” Jasleen Kaur अश्या मथळ्याखाली बातम्या प्रसिध्द झाल्या. सत्य काय आहे हे न तपासता एखाद्याला गुन्हेगार म्हणून घोषित करून तसा अख्या जगाला सांगायचं. अनेक प्रत्यक्ष दर्शी लोकांनुसार असे काहीही घडले नाही. न्यायदान केल्यासारख त्या बातमीवर निकाल देणे हे news channels चं काम नाही त्यासाठी न्यायालये आहेत. इथे त्या मुलाने बदनामीला कंटाळून स्वतःचं काही बर वाईट करून घेतलं तर एका मुलाचा आयुष्य हकनाक उध्वस्त केल्याची media जबाबदारी घेणार का ? ४. section १२४ अ : Breaking Now: Maharashtra govt issues draconian diktat. 'Sedition charges for criticising state, central govt.' पण खरी गोष्ट अशी नाहीच आहे. ज्यांना हवा असेल तर महाराष्ट्र सरकारचे मूळ पत्रक इथे वाचू शकतात : ह्यात स्पष्ट लिहिले आहे की ज्यामुळे समाजात हिंसा , द्वेष पसरेल असे वाटेल तेव्हाच हे कलम लावण्यात यावे. ह्यात काय चुकीचे आहे ? media नि कसही बेताल reporting करायचं , वाट्टेल त्या बातम्या खर्याची शहानिशा न करता द्यायच्या आणी ह्यामुळे हिंसा आणी द्वेष पसरला तर कारवाई झाल्यास आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बुडाले म्हणून गळे काढायचे ? म्हणजे ह्यांना अधिकार मात्र हवा पण त्याबरोबर येणारी जबाबदारी मात्र नको. ह्या चुकीच्या बातम्या दिल्याबद्दल एका तरी चानेल ने दिलगिरी व्यक्त केलीये का ? एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चव्हाट्यावर आणून त्या जगाला दाखवायच्या, तेव्हा आपण एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतो हे कळत नाही आणी अश्या बेताल वागणुकीसाठी सरकारने नियम केला की लगेच कोल्हेकुई सुरु. ५. अजित डोवल हे पंतप्रधानाच्या एका दौर्यातील convoy मध्ये होते. ते दौरा सोडून अचानक भारतात परत आले. आपल्या माध्यमातील सो called expert लोकांची लगेच बडबड सुरु झाली . हे आंतरराष्ट्रीय संकेताच्या विरुध्द आहे, हा त्या दुसर्या देशाच्या सरकारचा अपमान आहे ,पंतप्रधानांनी अशी परवानगी दिलीच कशी ? फलाना ठिकाणा … दिवसभर तेच दळण दळत बसले होते , थोड्या दिवसांनी भारतीय सैन्यांनी operation म्यानमार केलं जिथे म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आणी operation planning मध्ये मुख्य होते अजित डोवल ! आपण ह्या माणसाबद्दल काही दिवसांपूर्वीच किती वीष पसरवत होतो हे विसरून भारतीय सैन्याचं गुणगान सुरू , गुणगान अवश्य करा पण आपण आधी जी घाण केली ती साफ कोण करणार ? ६. अनुराग कश्यपनी टाकलेल्या tweat वर कोणतीही शहानिशा न करता भारतीय माध्यमांनी इतक्या कहाण्या report केल्या आणी शेवटी कळलं की अनुराग कश्यप नी डोळ्यांसाठी prosthetics test केली आणी त्याचा तो फोटो होता. इतकी चुकीची बातमी दिवसभर मीठ लावून सांगितल्याबद्दल एकही माध्यमांनी दिलगिरी व्यक्त केली नाही भारतीय प्रसारमाध्यमांच्या double standard चा खरोखर वीट आलाय आणी माझ्या लेखी तरी ही सर्व भारतीय माध्यम त्यांची विश्वासार्हता गमावून बसले आहेत. काही माध्यमे चांगली असतील ही पण ओल्या बरोबर सुक जळले तसा हा काहीसा भाग आहे . आणी त्यामुळे मी माझ्या पुरता असा निर्णय घेतलाय की भारतीय माध्यमातील कोणतीही बातमी ही विदेशी माध्यमातील बातमीबरोबर जुळत असल्यासच त्या बातमीवर विश्वास ठेवायचा. आणी पूर्वी होतं तसं फ़क़्त दूरदर्शनच्याच संध्याकाळच्या बातम्या बघायच्या. आवश्यक ती बातमी आवश्यक त्या प्रमाणात कळते आणी तेही अर्ध्या तासात !

प्रतिक्रिया द्या
13220 वाचन

💬 प्रतिसाद (65)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/14/2016 - 09:51 नवीन
गेल्या १-२ वर्षांपासून मराठी वाहिन्यांवर व काही हिंदी वाहिन्यांवर सुद्धा एक विचित्र प्रकार दिसतो. मराठी वाहिन्यांवर जवळपास रोजच "सामना" या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात काय छापलेले आहे ते सविस्तर दाखविले जाते. शिवसेनेचे संजय राऊत व उद्धव ठाकरे आपल्या अग्रलेखात विश्वातील कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने तारे तोडत असतात व त्यांची मुक्ताफळे मराठी वाहिन्या ते रोज दाखवित बसतात. मराठीतील इतर कोणत्याही वृत्तपत्राच्या (मटा, लोकसत्ता, सकाळ, पुढारी. लोकमत इ.) अग्रलेखात काय लिहिले आहे हे कधीही वाहिन्यांवर दाखवित नाहीत. फक्त सामनाच्या अग्रलेखाला भरपूर प्रसिद्धी देतात. रोज अग्रलेखाला प्रसिद्धी द्यायला संजय राऊत म्हणजे काय आचार्य अत्रे आहेत का लोकमान्य टिळक? अनेकवेळा हिंदी वाहिन्यांवर देखील "दोपहर का सामना"तल्या अग्रलेखात काय लिहिले आहे ते दाखविले जाते. शिवसेना व या वाहिन्यांचे काही साटेलोटे आहे का असा संशय येत आहे.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव गुरुवार, 01/14/2016 - 09:56 नवीन
ह्या संशयात तेव्हढाच दम आहे गुर्जि जेव्हढा कि "महाराष्ट्र भाजपा आणि राष्ट्रवादि खाँग्रेस मध्ये काही साटेलोटे आहे का"
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 01/14/2016 - 11:03 नवीन
●आज तक-आम आदमी पार्टी,अरविंद कि जय हो!! (अंजनाओम कश्यप→आवरा यार कुणीतरी हिला. पुण्य प्रसून वाजपेयी→प्रेमपुजारी) ●इंडिया टीवी-कट्टर भाजप (रजत शर्मा→स्वतःच आणि मोदींचं बालपण हालाकित गेल्यामुळे मोंदीबाबत विशेष सहानुभूती,आणि त्यातूनच सुरू असलेला भाजप प्रसार.) ●एबीपी न्यूज-खोबरं तिकडं चांगभलं. (सगळे निवडणूक सर्वे भाजपच्या बाजूने झुकलेले,महाराष्ट्रात सेनेच्या 63 जागा पाहून चेहरे पडलेले,बिहारच्या वेळी ही तसेच.) ●झी न्यूज-सुधीर चौधरी DNA(डेली न्यूज अॅनलायसिस)छान विश्लेषण करतो, पण भाजपेयी आहे असं वाटतं. ●एनडीटीवी-बरं हाय (जास्त पाहत नाही त्यामुळे सांगू शकत नाही) ●टाईम्स नाऊ-छान आहे,पण (अर्नब गोस्वामी→ओरडू नका हो;कान फाटले) बाकिचे सगळे लिंबू टिंबू.
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर गुरुवार, 01/14/2016 - 13:22 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
ह
होबासराव गुरुवार, 01/14/2016 - 13:37 नवीन
एनडीटीवी-बरं हाय(जास्त पाहत नाही त्यामुळे सांगू शकत नाही) म्हणजे ज्याविषयी जास्त सांगितल आहे तुम्हि जास्त तर तेच पाहता. नवल आहे तुम्हि साम मराठि नाहि बघत ? एनडीटीवी ला रविश चे सगळेच प्रोग्राम छान असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 01/14/2016 - 14:22 नवीन
एनडीटीवी वर रविश असला तरच पाहतो. . . .नवल आहे तुम्हि साम मराठि नाहि बघत ? पाहतो. मी फक्त हिंदी चॅनेलचं सांगितलं. काय हो तुम्ही साम मराठीवाले तर नाहीत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 01/14/2016 - 14:48 नवीन
●एबीपी माझा-'माझा विशेष' भारी वाटायचं जेव्हा प्रसन्न जोशी असायचा. आता कधी कधी तेच रटाळ विषय चघळत बसतात. बहुतेक मराठीत नं. एक वर आहे. (हिंदीत जसं मोदी-मोदी तसं मराठीत ठाकरे-ठाकरे.शेवटी ट्यार्पी महत्वाचा नाही का?) ●आयबीएन लोकमत-वागळे गेले अन् सगळी मजाच गेली. आजचा सवालमध्ये आपल्या सोयीनुसार चर्चा घडवायचे ते.पण एक पत्रकार म्हणून त्यांना सलाम.ते होते तेव्हा चॅनेल नं.एकवर होतं. (इथेही ठाकरे नामाचा जप असतोच) ●जी 24 तास-उदय निरगुडकर अॅक्टिंग जास्त करतात असं वाटतं,असो हे चॅनेल लांब आहे त्यामुळे जास्त बघणे होत नाही. आयबीएन आणि माझा लागोपाठ आहेत,केबल हाय हो. ●टीवी9 मराठी - नया है यह अजून लै शिकायला पाहिजे.हिंदी चॅनेलचा जसा दिल्ली,यूपी,बिहारकडे जास्त कल असतो तसा यांचा मुंबईकडे.'टीवी 9 मुंबई' असं नाव पाहिजे होतं. निखिला म्हात्रे सोडून दुसरी अँकर नाही वाटतं? ●साम मराठी - त्यामानाने हे बरं वाटतयं.साधेपणा भावतो. (तंत्रज्ञान अजून उच्च वापरायला पाहिजे) असो, ●मी मराठी - खिशात नाही दाणा आणि बाजीराव म्हणा. वागळे आले आणि गेलेही,असो (बातम्या कमी अन् नुस्त्या जाहिरतीच लै.) ●जय महाराष्ट्र - हे चॅनेल आता आमच्यात दिसत नाही.प्रसन्न इकडे आला म्हणे,संपादक म्हणून!!! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
व
विजुभाऊ गुरुवार, 01/14/2016 - 13:35 नवीन
बहुतेक हिंदी न्यूज चॅनल्स अगदी बटबटीत पद्धतीने , कोणताही अभ्यास न करता आणि विचित्र गॉसीप करत दवंडी पिट्ल्याच्या पद्धतीने बातम्या देतात. ईंडिया टी व्ही त्यात अग्रणी. ( उदा: देखीये मंगलग्रह पर हसीना..) राज ठाकरे यांच्या कोणात्याच विधानाचा अर्थ समजून न घेता त्याम्च्यावर विखारी टीका या हिंदी चॅनेल्स नी केली. आणखी एक या बहुतेक चॅनेल्स वर उत्तर प्रदेश दिल्ली आणी बीहार च्याच जास्त बातम्या असतात. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या किंवा ग्रीक मधील ढासळत्या अर्थव्यवस्थेपेक्षा त्याना बलीया किंवा किन्नौर मधे सासुने सुनेला बदडले ही बातमी महत्वाची वाटते.
  • Log in or register to post comments
J
Jack_Bauer गुरुवार, 01/14/2016 - 21:30 नवीन
अगदी अगदी ... सध्या एखादी घटना घडल्यावर नक्की काय घडले ह्या साठी किमान ४/५ वेगवेगळी न्यूज चॅनल्स बघावी लागलात तेव्हा कुठे पूर्ण बातमी कळते. फ़क़्त एकाच चनल वर पहिला तर अर्धीच किंवा सोयीस्कर / चमचमीत भाग तेवढा कळतो. सगळ्या तिकनहुन असे सगळे चमचमीत भाग गोल केल्यावर मग पूर्ण चित्र उभे राहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ह
होबासराव गुरुवार, 01/14/2016 - 14:52 नवीन
●साम मराठी - त्यामानाने हे बरं वाटतयं.साधेपणा भावतो.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 01/14/2016 - 15:02 नवीन
अच्छा,, म्हणजे तुम्ही साम मराठीवाले आहात तर???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव गुरुवार, 01/14/2016 - 15:35 नवीन
आहो ना आम्हि सकाळ वाचत ना साम मराठि बघत ●साम मराठी - त्यामानाने हे बरं वाटतयं.साधेपणा भावतो. आमच्या मते तो साधेपणा नाहि तर, असो...स्टाफ सिलेक्शन साठि जि पहिलि अट आहे तिथे त्यामुळे एकदम बारामतित बसुन बातम्या ऐकल्या सारख वाटत ते चॅनेल बघताना.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 01/14/2016 - 15:54 नवीन
एवढं डिटेल काय माहित नाय ब्वाॅ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव गुरुवार, 01/14/2016 - 16:04 नवीन
अस कस अस कस =))
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 01/14/2016 - 17:39 नवीन
साम आणि सकाळ=पवार आम्ही नाही हं त्यांचे समर्थक आम्ही अपक्ष संधीसाधु आहोत. . . . . ●साम मराठी-राष्ट्रवादी,पवारधार्जिणे साधेपणा दिसतो, तो न भावण्यासारखा आहे. तंत्रज्ञानाची कमी आणि बरच काही.सुधारायला पाहिजे अजून. आता खुष का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा