किती भाग्यवान आम्ही!
किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
किती गंडलो आम्ही!
मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही,
'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले!
उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक!
नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच,
छातीठोकपणे सांगावेच कुणी!
आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या...
नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत,
असे पाय दाखवावेतच कुणी!
प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत?
'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत
अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही
असा त्रिशंकू भेटावाच कधी!
किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
💬 प्रतिसाद
(8)
स
स्रुजा
गुरुवार, 09/10/2015 - 20:50
नवीन
ह्म्म.. आवडली.
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 09/10/2015 - 20:51
नवीन
हम्म्म्! खरेय.
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 09/11/2015 - 11:17
नवीन
दुसरी (की दुखरी) बाजू वाचायला आवडेल.
कुणी आहे का हे आव्हान स्वीकारणारा !!!!!
साशंक नाखु
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Fri, 09/11/2015 - 11:32
नवीन
यातल्या उपहासातच दुखणे आहे.
अर्थात कुठल्याही बाजूने लिवणार्याचे वाचायला आवडेलच. स्वागत .
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
Fri, 09/11/2015 - 12:47
नवीन
देशाची ओढ वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही. परत या.
इथे काही नंदनवन आहे अशातला भाग नाही. पण निदान आपल्या स्वतःच्या घरात असल्याचं हक्काचं सुख!
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Fri, 09/11/2015 - 17:23
नवीन
आवडली कविता! पोटासाठी माणूस दूर जातो. स्वतःच्या देशात चांगल्या संधी नाहीत म्हणून किंवा अन्य कारणाने. पण गावची ओढ कायमच राहते. सुंदर!
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Fri, 09/11/2015 - 17:54
नवीन
छान लिहले आहे.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Wed, 09/23/2015 - 17:18
नवीन
समजून घेऊन वाचल्या बद्दल सर्वांचे आभार.
- Log in or register to post comments