Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अध्यात्म-विज्ञान समन्वय ?

य
यनावाला
Mon, 10/26/2015 - 17:56
🗣 174 प्रतिसाद
[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला] विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥ बहुत क्षेत्रीं विज्ञानसत्ता । लोपली अध्यात्म महत्ता । आध्यात्मिक इच्छिती आता । विज्ञानाशीं समन्वय ॥२॥ अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥ असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते सत्य मानणे भावबळे । सोपी व्याख्या श्रद्धेची॥४॥ विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी । बुद्धिमान जन यालागी । अध्यात्मासी धि:कारिती ॥५॥ विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक । अध्यात्म विद्येचे साधक । भ्रामक तत्त्वे मानिती ॥६॥ वैज्ञानिकां हवे प्रयोग । आध्यात्मिक करिती योग । प्रयोगीं ज्ञान संयोग । जे नच लाभे योगाने ॥७ ॥ प्रयोगांसी साधने नाना । अध्यात्मीं अष्टांग साधना । तियेने काहींच साधेना । भ्रांतज्ञाना व्यतिरिक्त ॥८॥ अध्यात्म मानी परलोक । विज्ञान एक इहलोक । वास्तव केवळ ऐहिक । पारलौकिक भ्रामक ॥९॥ आध्यात्मिक शोधिती ब्रह्म । विज्ञान निसर्गनियम ।ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥ वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥ समाज समस्या अनेक । विज्ञानाने सुटती देख । देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें ॥१२॥ अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥ असती मंडूक कूपात ।बाह्य जग तयां न ज्ञात । अध्यात्म तैसे संकुचित । विज्ञानक्षेत्र विशाल ॥१४ ॥ कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥ प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥ अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्‍या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥ तैसा प्रकार अध्यात्माचा । अंतिम सत्य शोधनाचा । कधी काळीं न संपायाचा । धुंडिती जे न असे ते ॥१८॥ वैज्ञानिक तत्त्वे शोधिती । सुधारणा शक्य मानिती । यास्तव होतसे प्रगती । विज्ञान क्षेत्रीं सदैव॥१९॥ आध्यात्मिक घरी बैसोन ।सुखे करो धारणा-ध्यान । तयाने समाधी लागोन ।डुल्लत राहो स्वानंदीं ॥२०॥ वा रिघोनी गिरिकुहरीं । ध्यानमग्न जाहल्यावरी । लोंबत राहो अधांतरी । ब्रह्मानंदांत डुंबत ॥२१॥ आम्हां ना सुतक-सोयर । ज्याचा त्याचा तो अधिकार । परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥ "जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥ आत्मानुभव व्यक्तिगत । "ब्रह्म आकळले " समजुत । भ्रम म्हणणे क्रमप्राप्त । प्रमाणाच्या अभावी ॥२४॥ अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥ ******************************************************************************************************
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
62429 वाचन

💬 प्रतिसाद (174)
द
दत्ता जोशी Sun, 11/01/2015 - 08:10 नवीन
<<< मनाविषयी काय? ते असते का? कुठे असते? कोणत्याही शरीरबाह्य अथवा शरीरांतर्गत संवेदनेला मेंदूने दिलेला प्रतिसाद म्हणजे मन.>>>> हि व्याख्या पुर्ण नाही. मेंदू आणि प्रतिसाद यांचा एकत्रित विचार केला तर आकलन, पृथक्करण, स्मृती, विचार आणि तर्क इ. गोष्टींचा प्रभाव प्रतिक्रियेवर पडेल. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही दिलेल्या प्रतिसादावरून मन आणि मेंदू या दोन भिन्न गोष्टी आहेत हे गृहीत धरायला आपली हरकत नसावी. मेंदू एकादी गोष्ट/ संवेदना प्राप्त करून त्यावर प्रक्रिया करून एक प्रतिसाद देतो मात्र पण त्या भावना/ संवेदना समजून घेणारे दुसरेच कोणी असते. असा निष्कर्ष यातून निघतो. <<<<< बुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी दिसते? मेंदूची ज्ञान मिळवण्याची आणि त्या ज्ञानाचा योग्य तो वापर करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी.>>>>>> मान्य. पण त्याबरोबर तर्क ( reasoning ) हा बुद्धीचा एक अविभाज्य घटक आहे. ( मराठीत विचार करून टंकणं जड जातंय). म्हणजे बुद्धी आणि भावना वेगळ्या गोष्टी असून बुद्धीच्या ठिकाणी भावनांना थारा नाही/ भावना जाणू शकत नाही. परत हाच मुद्दा इथे अधोरेखित होईल कि बुद्धी आणि भावना जाणारे कोणीतरी वेगळे आहेत. अर्थात मन हे बुद्धी (पर्यायाने मेंदूशी) फार घनिष्ट रित्या निगडीत आहे यावर दुमत नाही. <<<<< मानवाच्या भावनया खर्या कि खोट्या? खर्‍या. शरीरबाह्य अथवा शरीरांतर्गत परिस्थितीनुसार मेंदूमध्ये चेताप्रक्षेपक स्त्रवू लागतात आणि त्यांनुसार ज्या तीव्र संवेदना जाणवू लागतात त्या संवेदना म्हणजे भावना. आईचे ममत्व, प्रेम, राग लोभ, द्वेष, आनंद इ. भावना कशा दिसतात? कुठे असतात ? या सार्‍या भावनांशी संबंधित मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारची चेताप्रक्षेपके स्त्रवतात. उदा. आईचे ममत्व. आई जेव्हा ममतेने बाळाला जवळ घेते तेव्हा तिच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसीन स्त्रवत असते. >>>>>> मान्य. भावनांच्या प्रभावाने मेंदूत हे स्त्राव स्त्रवतात. उलट हि बहुतांश शक्य आहे. पण ऑक्सिटोसीन म्हणजे ममत्व नव्हे असे निश्चित म्हणता येईल नाही का? याच न्यायाने, इतर संप्रेरके हि बाह्य घटना, संवेदनांमुळे मेंदूने दिलेल्या प्रतिक्रिया असल्या तरी अशी संप्रेरके ( हा योग्य शब्द आहे ना?) म्हणजे त्या भावना नव्हेत. मेंदू जरी विविध माहिती संकलित करून पृथक्करण / प्रक्रिया करीत असला भावना या मनाशी निगडीतच असल्या पाहिजेत, मेंदूशी नाही हे उघड आहे. <<<<<< विज्ञानाच्या कसोटीवर यातल्या कोण कोणत्या गोष्टींचे गणिती सादरीकरण ( mathamatical representation ) करता येते किवा केले जावू शकते? मेंदूची संरचना तसेच मेंदूमध्ये स्त्रवणार्‍या चेताप्रक्षेपकांची पातळी मोजण्यासाठी विविध प्रकारची अत्याधुनिक उपकरणे आणि चाचण्या उपलब्ध आहेत. उदा. fMRI (Functional magnetic resonance imaging) या तंत्राने मेंदूतील उलाढालींचे आणि त्यायोगे मानवी भावनांचे आलेख स्वरुपात आरेखन करता येते. >>>>>> अंशतः मान्य. या प्रकारात मेंदूच्या कोणत्या भागात कधी रक्तप्रवाह वाढतो ( प्राणवायूच्या मागणीमुळे) याचे इमेजिंग केले जाते. माझ्या माहिती प्रमाणे fMRI चा मुख्य उपयोग विविध भावना उद्दीपित होताना तसेच भावनिक/ मानसिक प्रतिक्रिया देताना मेंदूचा कोणता भाग जास्ती कार्यान्वित होतो आणि किती प्रमाणात होतो हे समजून घेण्यासाठी तसेच मेंदूच्या विविध अवस्था समजून घेण्यासाठी केला जातो. (जागेपणीच्या भावना, जाणीव, झोप, स्वप्नारहित झोप, स्वप्ने, कोम, ब्रेन डेथ इ.). पण मानवी मन आणि भावना फक्त पेरिस्थिति सापेक्ष नसतात तसेच फक्त व्यक्तीसापेक्ष नसतात. तसेच त्यांच्यावर कोणतेही ठराविक, विशिष्ट ,भौतिक नियम लागू होत नसल्यामुळे मन, मानवी भावना आणि प्रतिसाद अतर्क्यच आहेत आणि म्हणूनच त्यांचे गणितीय मूल्यमापनही. जर तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची अधिक सविस्तर उत्तरे मिळवण्याची ईच्छा असेल तर Cognitive Psychology या विषयावर एखादे पुस्तक वाचा. Cognitive या शब्दाचा अर्थच मुळात "मानसिक घडामोडींशी संबंधित" असा आहे. ( related to mental activities आणि मेंटल चा अर्थ मनाशी संबंधित असाच आहे.). मानसशास्त्राची व्याख्या मन आणि आचरण/ व्यवहार ( behavior ) यांचे अभ्यास करणारी विज्ञान शाखा असा आहे. ( elaborate करतोय कृपया आपल्याला शिकवतोय असे समजू नये) Cognitive Science मध्ये मानसशास्त्र, neuroscience , तत्वज्ञान इतकेच काय कृत्रिम बुद्धिमत्ता ( artificial Intelligence ) इतक्या गोष्टी एक्चात्राखाली घेतल्या गेल्याने, AI शी संबंधित काम करत असताना याच्याशी थोडासा संबंध आला. पण सखोल अभ्यास नाही. गरजेपुरती माहिती मिळवली. एकूण माझा मुद्दा- मनाचे अस्तित्व, मनोव्यापार आणि मन हे शरीर आणि बुद्धीशी घनिष्ट संबंधित असून मनाचे अस्तित्व कोणत्याही शास्त्राने नाकारलेले नाही. <<<<लहानपणी गावाकडील कुणीतरी एक अभंग हमखास म्हणत असे, "मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्वभावे पुजा". बहूधा तुकारामांचा असावा हा अभंग. आता नक्की आठवत नाही. मात्र अभंगकर्ता ज्याला मन म्हणत आहे ते खरे तर मेंदू आहे. ज्या काळात हा अभंग लिहिला गेला त्या काळात अर्थातच शरीरविज्ञान प्रगत नव्हते. अन्यथा अभंगकर्त्याने नक्कीच "मेंदू इंद्रियांचा राजा, त्याची सर्वभावे पुजा" असे म्हटले असते.>>> असे नाही. उलट भारतीय तत्वज्ञानात मनाचा आणि कर्म (व्यवहार/ behavior )यांचा अभ्यास फार सूक्ष्मपणे केला गेला आहे. आज प्रगत राष्ट्रात बहुतांशी मानस शास्त्रज्ञ हेच शोधत आहेत. (गुन्हेगारी प्रवृत्तीचे मूळ, हिंसक प्रतिक्रिया/ व्यवहार इ.) मनुष्याच्या व्य्व्काराला कारणीभूत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा drive मनच असते हे भारतीय तत्व्ज्ञान्ने समजून घेतले आणि पुनः पुनः अधोरेखित केले. मनुष्याचे निर्णय हे विचारापेक्षा बर्याचदा मन आणि मनो भावनांनी प्रभावित असतात. भारतीय ( आध्यात्मिक) तत्वज्ञानात मनुष्याचे कर्म ( आचरण/ व्यवहार) हा केंद्रबिंदू असल्यानेच मनावर संयम आणि नियंत्रणावर सर्वंकष भर दिला गेला आहे. ( आवडी निवडी मेंदू ठरवणे शक्य नाही. समजा मला गोड आवडते- गोड या चवीची जाणीव जरी जीभ( ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी ( मेंदू) करून देत असले तरी आवड मनच ठरवते. म्हणजे मला काहीही आणि कितीही गोड आवडते का? तर याचे उत्तर नाही असे असू शकेल म्हणजे मला फक्त अमुक एककिंवा काही गोड पदार्थच आवडतो/तात तसेच इतपतच गोड आवडतात, हे आवडत नाही इ.इ. प्रत्येक ज्ञानेन्द्रीयाशी निगडीत अशा अनेक हव आणि नको असलेल्या भावना मनुष्याला त्या गोष्टी परत परत करण्यास किंवा मोहात पडण्यास प्रवृत्त करतात. आणि मनुष्याचे पतन होऊ शकते किंबहुना ते अटळ असते). म्हणून मनावर संयम, नियंत्रण , यासाठी मनो निग्रह आणि चिंतन ही कामे अंतरंगाची वेगवेगळी अंगे करतात. \याला भारतीय तत्वज्ञानात अन्तःकरण चतुश्टय ( मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार) असे नाव आहे. अर्थात यासर्वांमध्ये मेंदूचा सहभाग असेलच हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. यजुर्वेदाच्या ३४व्या अध्यायात आलेले शिवसंकल्प सुक्त हेच सांगते. सुसारथिरश्वानिव यन्मनुष्यान्नेनीयतेऽभीशुभिर्वाजिन इव हृत्प्रतिष्ठं यदजिरं जविष्ठं तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु । एकदा कुशल सारथी ज्या सहजतेने अश्वांचे नियंत्रण करतो, त्याच प्रमाणे मनुष्याचे नियंत्रण करणारे, हृदयास्थित, जे जरारहित असून अत्यंत चपळ असलेले माझे मन शिव( पवित्र) संकल्पाने भरून जावो.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 11/01/2015 - 12:27 नवीन
दिर्घ प्रतिसादासाठी धन्यवाद. मी ज्ञानाच्या बाबतीत भारतीय आणि पाश्चिमात्य असा भेदभाव करत नाही. किंबहूना एखादा विचार भारतीय आहे म्हणून तो मी टाकाऊ समजत नाही. याचे एक सुंदर उदाहरण आहे. डॉ. अल्बर्ट एलिस यांची Rational Emotive Behavior Therapy (REBT) ही भावनिक समस्यांवर एक परिणामकारक उपचारपद्धती आहे. जरा बारकाईने अभ्यास केला असता लक्षात येते की REBT आणि समर्थांचे "मनाचे श्लोक" यांची मध्यवर्ती कल्पना एकच आहे. जे डॉ. एलिस यांनी विसाव्या शतकात सांगितले ते आपल्याकडे समर्थांनी सतराव्या शतकातच सांगितले होते. (पण म्हणून मी मनाच्या श्लोकामधील सारेच स्विकारतो असे नाही.) मात्र आपल्या पूर्वजांनी जे म्हटले आहे ते सारेच आज कालसुसंगत असेल असेही नाही. काही हजार वर्षांपूर्वी किंवा काही शे वर्षांपूर्वीचे आकलन आजच्या उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या कसोटीवर घासून घ्यायलाच हवे या मताचा मी आहे. आपल्या मनासंबंधीच्या मतांशी मी असहमत आहे. मात्र तुम्हाला जे वाटते ते वाटण्याला माझा आक्षेप असण्याचे कारण नाही. We agree to to disagree. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
द
दत्ता जोशी Sun, 11/01/2015 - 14:18 नवीन
<<<<<<<<काही हजार वर्षांपूर्वी किंवा काही शे वर्षांपूर्वीचे आकलन आजच्या उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या कसोटीवर घासून घ्यायलाच हवे या मताचा मी आहे. >>>>> +१०००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मारवा Sun, 11/01/2015 - 10:05 नवीन
गाडगीळ एकदा एका पाश्च्यात्य देशात गेले होते. तेथील विदेशी श्रोत्यांसमोर ते मोक्ष समाधी एनलाइटनमेंट इ. विषयांवर बोलले एक व्याख्यान दिले. ते झाल्यावर तेथील एका व्यक्तीने त्यांना एक प्रश्न विचारला ठीक आहे हे सर्व मला हवे आहे यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे मला एक सांगा किती दिवसात वर्षांत मला हे सर्व मोक्ष इ. प्राप्त होइल काय काय कसे कसे करावे लागेल ते सांगा ? या वरील प्रश्नावर जी जशी प्रतीक्रीया माणुस देईल त्यावरुन अध्यात्म व विज्ञान च्या दृष्टीकोणातील मुलभुत फरक अधोरेखीत होतो.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Sun, 11/01/2015 - 12:56 नवीन
याच धर्तीवर एखाद्या संगीत विद्यालयात जाउन एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला की मला दुसरा हरिप्रसाद चौरसिया व्हायचे आहे आणि त्यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे ... काय प्रतिक्रिया येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्यारे१ Sun, 11/01/2015 - 13:11 नवीन
या शतकी धाग्यासाठी य ना वालावलकर आणि इतर सगळ्या वैज्ञानिक आध्यात्मिक सरांना काय भेट द्यावं ब्रं?
  • Log in or register to post comments
य
यनावाला Sun, 11/01/2015 - 17:51 नवीन
श्री. दत्ताजी जोशी विचारतातः मन म्हणजे काय ? ते कोठे असते ? बुद्धी म्हणजे काय ? या शंकांच्या निरसनाचा प्रयत्‍न: .. मन आणि बुद्धी मनाविषयीं माझी समजूत अशी आहे: व्यक्तीला दु:ख झाले की ती उदास होते. प्रसंगी रडते. आनंद झाला की ती उत्साहित होते. कधी हसते. गर्व झाला की उन्मत्तपणे बोलते, वागते. या प्रमाणे आविष्कारातून भावना समजतात. अगदी फोनवरच्या आवाजावरूनही भावना कळू शकते. आपण विचारतो," काय विशेष. आज अगदी खुषीत दिसताय!."आनंद, दु:ख, प्रेम, राग लोभ, मत्सर, इत्यादि भावना आहेत. श्रद्धा ही सुद्धा एक भावना आहे. सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. सर्व भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तसेच बुद्धीसुद्धा मेंदूतच उद्भवते. बुद्धीविषयीं :- मानवी मेंदू हे अब्जावधी मज्जापेशींपासून बनलेले, अत्यंत गुंतागुंतीचे, व्यामिश्र असे विद्युत-रासायनिक ( इलेक्ट्रो-केमिकल ) यंत्र आहे. मेंदूच्या अनेक क्षमता आहेत. त्यांतील जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, अपोहन (निरीक्षणांवरून तर्कसुसंगत निष्कर्ष काढण्याची क्षमता ), प्रतिभाशक्ती, अंत:स्फुरणशक्ती, आणि विवेकशक्ती या क्षमतांचा समुच्चय म्हणजे मानवी बुद्धी होय. म्हणजे बुद्धीची नऊ अंगे-- नऊ घटक-- आहेत. सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसात यांतील पहिल्या सहा क्षमता कमी-अधिक प्रमाणात असतात. प्रतिभा, अंत:स्फुरण, आणि विवेक या क्षमता प्रत्येक व्यक्तीत असतीलच असे नाही. मतिमंद व्यक्तीत स्मरणशक्ती आणि कल्पनाशकी हे घटक अल्प प्रमाणात असतात. क्वचित् अत्यल्प प्रमाणात तर्कशक्ती असू शकेल.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 11/01/2015 - 18:11 नवीन
हे सर्व गुंतागुंतीचं यंत्र कुठून आलं याबद्दल काही मत? आजचे वैज्ञानिक याविषयी ठामपणे काहीच का सांगू शकत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
स
संदीप डांगे Sun, 11/01/2015 - 18:41 नवीन
मांत्रिकजी, प्रश्नाचा रोख तयार उत्तराच्या अपेक्षेने असल्यास मुद्द्यात दम राहत नाही. उदाहरणार्थ "कुठून आलं" हे शब्द कुठून तरी अज्ञात ठिकाणाहून आलं असलं पाहिजे ह्याकडे रोख करतात. मग "कुठून आलं" हा प्रश्न आपसूक येतो. "वस्तू आहे म्हणजे निर्माता आहेच" ह्या गृहितकावर "कोणी निर्माण केलं" हा प्रश्न आपसूक येतो. प्रश्नच चुकीच्या गृहितकांवर आधारित असतील तर उत्तरे मिळणार नाहीत. फक्त निरर्थक अहंकाराचे वाद होतील. या विश्वात कोणतीही गोष्ट कुठूनही येत नाही. ती इथेच आहे, ती सतत बदलत असते, विज्ञान आणि अध्यात्म दोघेही हीच गोष्ट शोधण्याचा व सांगण्याचा प्रयत्न करतात. आपल्या वाटीत पडणारं चमचाभर तूप "कुठून येतं, कोण बनवतं" हे प्रश्न उत्तरांवर आधारित आहेत. म्हणुन ते व्यक्तिसापेक्ष, दृष्टिकोनसापेक्ष आहेत. "तूप कसं बनतं" हा प्रश्न म्हणजे विज्ञान व अध्यात्म आहे. तूप ही अवस्था आहे, लोण्याची. लोणी दह्याची, दही दुधाची, दुध चार्‍याची, चारा धरती+प्रकाश+ हवा+ पाणी यांची. हे तूप परत तिकडेच जाऊन मिळणार, त्याच हवेत, पाण्यात, जमिनीत, त्याचा प्रकाशही होईल. कशाचेही मूळ स्वरुप नसते. जे आहे ते सतत बदलत आहे. हे सतत बदल का व कसे होतात हे शोधणे विज्ञानाचे काम तर हे बदल आत्मसात करणे हे अध्यात्माचे काम. बाकी देव, इश्वर, परमात्मा, जगन्नियंता, निर्माता वैगेरे आपल्या मनुष्याच्या कल्पनेच्या भरार्‍या. माझ्या आधीच्या एका धाग्यात मी हेच मत मांडलं होतं की विज्ञान आणि अध्यात्म एकच आहे. लोक दोन्हीत गफलत करतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान एकच समजतात. अध्यात्म आणि धर्म-कर्म-पूजा-उपचार-श्रद्धा एक समजतात. बरेच आदिवासी वर्षानुवर्षे काही विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करत असतील, त्यांना पेपर वैगेरे लिहून-प्रसिद्ध करून त्यामागचे विज्ञान उकलता येत नसेल. इथे लाखो-अब्जो लोक मोबाइल वापरतात पण कितींना त्यामागचे विज्ञान ठावूक असते? लाखो-अब्जो लोक पुजा-अर्चा-कर्मकांड करतात, पण खरे अध्यात्म कितींना कळते? मुळात कर्मकांडात अध्यात्म नाहीच हेदेखील कितींना कळते? जगात घडणार्‍या समस्त उलाढालींचा परस्पर संबंध शोधणे हे दोहोंचे उद्देश्य आहे. विज्ञान बाहेरून आत येते, अध्यात्म आतून बाहेर जाते. अजुन बरेच लिहण्यासारखे आहे. असो. प्रगोंनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याला सहमती आहेच. विज्ञानवादी लोकांना अध्यात्म तर सोडा, विज्ञान तरी माहीत आहे का? तंत्रज्ञानाला विज्ञान असे संबोधुन, कर्मकांडाला अध्यात्म असे संबोधुन निरर्थक वादाचा, श्रेष्ठ-कनिष्ठेतच्या कलगीतुर्‍याचा खेळ रंगेल मस्त पण सत्य राहील निद्रिस्त. काय म्हणता...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मारवा Mon, 11/02/2015 - 00:24 नवीन
कुठुन आलं ? सांगता येत नाही मग बघा .... अस अस अस ही एक अध्यात्मिक बाजुने मांडली जाणारी काहीशी मजेदार भुमिका आहे. एक अखिल विश्वात काही समजा चार गोष्टी आहेत नक्कीच की ज्या अजुन आपल्या आकलनाच्या पुर्ण स्पष्टीकरणाच्या आवाक्यात आलेल्या नाहीत. अस म्हणूया की अनसॉल्व्ह्ड पझल्स आहेत. पण या साध्या सत्यापेक्षा अती महत्वाचा आहे तो त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण एक वैज्ञानिक त्याकडे एक सुंदर मिस्टरी एक कुतुहल म्हणून बघतो. त्यात एक पोटेंशियल त्याला दिसतं. त्याचा तो वेध घेण्याचा एका विशीष्ट शिस्तीत प्रयत्न करतो. आध्यात्मिक व्यक्ती एकदम निष्कर्षांवर उडी मारुन शोध प्रक्रीया च थांबवावी काहीतरी मानुन मोकळ व्हाव या शैलीत पुढे सरकतो. पुढचं अनसॉल्व्ड म्हणून मग आता आपापला वैयक्तीक निष्कर्षांचा इंडीव्हीज्युअल सबेज्क्टीव्ह ट्रुथ्स चा प्रसार करण्याकडे आध्यात्मिकाचा कल असतो. विचीत्र आग्रह आक्रमकता आदि अनेक बाबी त्यातुन जन्म घेतात. दोन्हींचा अनसॉल्व्हड मिस्टरी कडे पाहण्याचा दृष्टीकोण हा फरकाचा एक अत्यंत महत्वपुर्ण मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मारवा Mon, 11/02/2015 - 00:24 नवीन
कुठुन आलं ? सांगता येत नाही मग बघा .... अस अस अस ही एक अध्यात्मिक बाजुने मांडली जाणारी काहीशी मजेदार भुमिका आहे. एक अखिल विश्वात काही समजा चार गोष्टी आहेत नक्कीच की ज्या अजुन आपल्या आकलनाच्या पुर्ण स्पष्टीकरणाच्या आवाक्यात आलेल्या नाहीत. अस म्हणूया की अनसॉल्व्ह्ड पझल्स आहेत. पण या साध्या सत्यापेक्षा अती महत्वाचा आहे तो त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण एक वैज्ञानिक त्याकडे एक सुंदर मिस्टरी एक कुतुहल म्हणून बघतो. त्यात एक पोटेंशियल त्याला दिसतं. त्याचा तो वेध घेण्याचा एका विशीष्ट शिस्तीत प्रयत्न करतो. आध्यात्मिक व्यक्ती एकदम निष्कर्षांवर उडी मारुन शोध प्रक्रीया च थांबवावी काहीतरी मानुन मोकळ व्हाव या शैलीत पुढे सरकतो. पुढचं अनसॉल्व्ड म्हणून मग आता आपापला वैयक्तीक निष्कर्षांचा इंडीव्हीज्युअल सबेज्क्टीव्ह ट्रुथ्स चा प्रसार करण्याकडे आध्यात्मिकाचा कल असतो. विचीत्र आग्रह आक्रमकता आदि अनेक बाबी त्यातुन जन्म घेतात. दोन्हींचा अनसॉल्व्हड मिस्टरी कडे पाहण्याचा दृष्टीकोण हा फरकाचा एक अत्यंत महत्वपुर्ण मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
द
दत्ता जोशी Mon, 11/02/2015 - 20:05 नवीन
या विश्वात कोणतीही गोष्ट कुठूनही येत नाही. ती इथेच आहे, ती सतत बदलत असते, विज्ञान आणि अध्यात्म दोघेही हीच गोष्ट शोधण्याचा व सांगण्याचा प्रयत्न करतात. आपल्या वाटीत पडणारं चमचाभर तूप "कुठून येतं, कोण बनवतं" हे प्रश्न उत्तरांवर आधारित आहेत. म्हणुन ते व्यक्तिसापेक्ष, दृष्टिकोनसापेक्ष आहेत. "तूप कसं बनतं" हा प्रश्न म्हणजे विज्ञान व अध्यात्म आहे. तूप ही अवस्था आहे, लोण्याची. लोणी दह्याची, दही दुधाची, दुध चार्‍याची, चारा धरती+प्रकाश+ हवा+ पाणी यांची. हे तूप परत तिकडेच जाऊन मिळणार, त्याच हवेत, पाण्यात, जमिनीत, त्याचा प्रकाशही होईल. कशाचेही मूळ स्वरुप नसते. जे आहे ते सतत बदलत आहे. हे सतत बदल का व कसे होतात हे शोधणे विज्ञानाचे काम तर हे बदल आत्मसात करणे हे अध्यात्माचे काम. १. तेच तर धागाकर्ते म्हणत आहेत. तूप बने पर्यंत दुधाची जी स्थित्यंतरे आहेत ती सिद्ध ( proven ) आहेत. measurable आहेत, या स्थित्यांतारामागे काही निसर्ग नियम आहेत. विशिष्ट ज्ञान आणि कृती आहे ( विज्ञान) . तसे अध्यात्माचे नाही. आत्मा ( मनो) ,पुनर्जन्म ( संसार), मोक्ष ( निब्बाण) या गोष्टींना विज्ञानात थारा नाही. तूप होतेच असे कसे म्हणता येईल? दुधापासून तूप बनविण्याची कृती अनेक लोकांच्या संशोधनातून/ प्रयत्नातून आली असेल ना? जर ती मला माहिती आहे तर मी संगीत्ल्क्या नंतर कोणी दुसराही तूप बनवू शकेल ना? २. याच अनुषंगाने मांत्रिक भौंचा प्रश्न असा आहे कि तूप बनवणे हि कृती जरी सिद्ध असली तरी, गायीच्या शरीरात दुध कसे बनते? त्या दुधाचे दही- लोणी- तूप कसे बनते? हे निसर्ग नियम कोठून आले? कोणी ठरवले ? इलेक्ट्रो_केमिकल यंत्र कसे अस्तित्वात आले? विज्ञानाच्या कक्षेत असे यंत्र बनवता येवू शकेल काय? जर असा यांत्रिक मेंदू बनवणे शक्य असेल ( आहेच) तर ज्या नैसर्गिक मेंदूने हे यंत्र बनविले तो मेंदू बनविणारा निसर्ग कोठून आला? त्यालाही काही निर्मिती प्रक्रिया असेल ना? विज्ञानाच्या मते हि निर्मिती प्रक्रिया म्हणजे बिग बँग आणि उत्क्रांती. तुमची थियरी ( आधीपासून होते) विज्ञानाच्या आणि एकूणच सर्वच विश्व निर्मिती संकल्पना दुर्लक्षित करते. जर सगळेच आधी पासून होते तर ते तसेच किवा बदलाने पुढे राहणार आहे मग कशाचाही विचार करण्याची गरज काय? आध्यात्मिक मनुष्याचा हा प्रश्न असतो कि हे इलेक्ट्रो-केमिकल यंत्र बनवणारे आणि चालवणारे चैतन्य कोठून येते? अशी कोणती गोष्ट आहे कि जी गोष्ट यातून वजा केली तर हे इलेक्ट्रो-केमिकल यंत्र निर्जीव होईल ( with all ideal physical conditions )? आयुष्य म्हणजे फक्त शरीरात होणार्या रासायनिक प्रक्रिया -बदलांचा खेळ असेल तर मग झोंबी किंवा यंत्रमानव आणि मानव यांच्यात फरक काय? अशा रास्यानिक प्रक्रिया आणि बदलातून साकारणारे मानवी आयुष्य जर भय, निद्रा, आहार आणि मैथुन इतक्याच त्रिज्येत फिरून संपणार असेल तर इतर जीव जंतू आणि मनुष्य यात फरक तो काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सतिश गावडे Mon, 11/02/2015 - 20:30 नवीन
अशा रास्यानिक प्रक्रिया आणि बदलातून साकारणारे मानवी आयुष्य जर भय, निद्रा, आहार आणि मैथुन इतक्याच त्रिज्येत फिरून संपणार असेल तर इतर जीव जंतू आणि मनुष्य यात फरक तो काय?
या संबंधी मी वाचलेले दोन परिच्छेद इथे देतो. कदाचित या उतार्‍यांमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. लेखक युवल नोआ हरारी आपल्या "सॅपियन्स" या पुस्तकात "Know Thyself" या मथळ्याखाली लिहितो,
...So our medieval ancestors were happy because they found meaning to life in collective delusions about the afterlife? Yes. As long as nobody punctured their fantasies, why shouldn’t they? As far as we can tell, from a purely scientific viewpoint, human life has absolutely no meaning. Humans are the outcome of blind evolutionary processes that operate without goal or purpose. Our actions are not part of some divine cosmic plan, and if planet Earth were to blow up tomorrow morning, the universe would probably keep going about its business as usual. As far as we can tell at this point, human subjectivity would not be missed. Hence any meaning that people ascribe to their lives is just a delusion. The other-worldly meanings medieval people found in their lives were no more deluded than the modern humanist, nationalist and capitalist meanings modern people find. The scientist who says her life is meaningful because she increases the store of human knowledge, the soldier who declares that his life is meaningful because he fights to defend his homeland, and the entrepreneur who finds meaning in building a new company are no less delusional than their medieval counterparts who found meaning in reading scriptures, going on a crusade or building a new cathedral. So perhaps happiness is synchronising one’s personal delusions of meaning with the prevailing collective delusions. As long as my personal narrative is in line with the narratives of the people around me, I can convince myself that my life is meaningful, and find happiness in that conviction.
आधी निरिश्वरवादी असलेली आणि नंतर सश्रद्ध झालेली जेनिफर फुलवायलर If Atheism Is True, Does Life Still Have Meaning? मध्ये लिहिते,
If everything that we call heroism and glory, and all the significance of all great human achievements, can be reduced to some neurons firing in the human brain, then it’s all destined to be extinguished at death. And considering that the entire span of homo sapiens’ existence on earth wouldn’t even amount to a blip on the radar screen of a 5-billion-year-old universe, it seemed silly to pretend like the 60-odd-year life of some random organism on one of trillions of planets was something special. (I was a blast at parties.) By simply living my life, I felt like I was living a lie. I acknowledged the truth that life was meaningless, and yet I kept acting as if my own life had meaning, as if all the hope and love and joy I’d experienced was something real, something more than a mirage produced by the chemicals in my brain.
बहूधा हा परिच्छेद तिने निरिश्वरवादी असताना लिहिला असावा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
व
विलासराव Wed, 11/04/2015 - 06:04 नवीन
सगा लेखक युवल नोआ हरारी हे विपशयना टीचर आहेत. ते सध्या इतपुरीला ६० दिवसांच्या विपशयना शिबिराला बसलेले आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर १४ डिसेम्बरला मला फ़ोन करा. तुम्हाला त्यांच्याशी बोलता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
द
दत्ता जोशी Wed, 11/04/2015 - 11:07 नवीन
धन्यवाद सतीशराव, पण दोन्ही उतारे तेच सांगता आहेत. ज्याला सर्वसामान्यपणे आनंदी, अर्थपूर्ण आयुष्य म्हटले जाते ते वास्तविकपणे तसे नसते ( dilusion ). एकूण लिखाण पाहता, मला वाटतं ..So our medieval ancestors were happy because they found meaning to life in collective delusions about the afterlife हे लेखकाने इस्लाम आणि क्रिश्चन धर्मात असलेल्या इटर्नल हेवन किंवा इटर्नल हेल विषयी असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
संदीप डांगे Tue, 11/03/2015 - 21:30 नवीन
अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत जे नेहमी होत आलंय तेच इथेही परत झालंच. तूप हे एक अविरत बदलाचं म्हणून उदाहरण दिलंय. तुम्ही तूपाची निर्मिती करणारे, कृती, नियम वैगेरे बघत आहात. विशिष्ट ज्ञान व कृती म्हणजेच विज्ञान नसते. इथे प्रश्न तूपाचा नाहीये. पंचमहाभूतांच्या, मूलकणांच्या प्रवासाचा, स्थित्यंतराचा आहे. तूपाच्या ठिकाणी दुसरं काहीही घ्या. दूधच घ्या. गायीने चारा खाल्ला, दूध दिलं, दूध तान्ह्याबाळाने प्यायलं, त्याच्या शि-शूतून ते परत जमीनीला मिळालं. कुठलीही एक घटना घ्या. त्याला कार्यकारणभाव असतो. हजारो लाखो कारणं असतात. हजारो लाखो पैलू असतात. हजारो लाखो बिंदू एकमेकांशी जोडत ती घटना घडते. अशा हजारो लाखो घटना घडत असतात. ह्यामागचं तत्त्व शोधणे म्हणजेच अध्यात्म व विज्ञान. आखून दिलेल्या नियमांबरहुकूम एखादी वस्तू बनवणे हे तंत्र आहे, विज्ञान नाही. तूप बनवायचे तंत्र विकसित झाले. पण ते का बनवायचे, का वापरायचे, त्याचे उपयोगाचे परिणाम हे जे ज्ञान आहे ते विज्ञान. विज्ञान हरवलं तर तंत्रज्ञानाला अर्थ राहत नाही. हे परत तूपाचेच उदाहरण घेऊन सांगतो. जेव्हा केव्हा तूपाचा शोध लागला तेव्हा गायी, चारा, हवा-पाणी यांची परिस्थिती आजच्या परिस्थितीच्या अगदी विपरित होती. ज्या पद्धतीने तेव्हा गायीच्या दूधापासून तूप बनवले जात होते ती पद्धत आज फॉलो होत नाही. तेव्हा नगाला नग असे तूप डब्यांमधून मॉलमधे विक्रिस येते. आपण विकत घेतो, वापरतो. त्या ऋषी-मुनिंना ज्या दर्जाचे तूप मिळाले त्याच दर्जाचे आज मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे त्यांना जे फायदे-परिणाम मिळायचे ते मिळणेही दुरापास्त आहे. त्याकाळातल्या परिणामांच्या कथा ऐकून आज आपण मॉलमधून तूप आणतो. त्यांना तूपाने फायदा झाला तो आपणांसही होइल असा विश्वास ठेवतो. म्हणजे आपण विज्ञान विसरून कर्मकांडात (तंत्रज्ञानात) गुंततो. अध्यात्माचेही तेच आहे. ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत, येशूपासून बुद्धांपर्यंत आणि त्यांच्यासारख्या असंख्य महात्म्यांनी घसा कोकलून कोकलून जे सांगितलं ते उपलब्ध जनतेपैकी किती लोकांनी आत्मसात केलं? ज्या कोणा तुटपुंजा लोकांनी केलं त्यांनी मिळवलं, इतरांना ते कष्ट सहन झाले नाहीत त्यांनी फक्त करण्याचे अवडंबर केले. कठोर तपश्चर्या टाळण्यासाठी पुजा-कर्म-कांडं शोधून काढली. तंत्र विकसित झालं पण अध्यात्मातलं खरं विज्ञान मागेच राहिलं. विज्ञानाच्या मते हि निर्मिती प्रक्रिया म्हणजे बिग बँग आणि उत्क्रांती. तुमची थियरी ( आधीपासून होते) विज्ञानाच्या आणि एकूणच सर्वच विश्व निर्मिती संकल्पना दुर्लक्षित करते. जर सगळेच आधी पासून होते तर ते तसेच किवा बदलाने पुढे राहणार आहे मग कशाचाही विचार करण्याची गरज काय? आधुनिक विज्ञान हे फक्त अनुमानावर आधारित थेयरी मांडते, तेच संपूर्ण सत्य आहे हे कधीच मान्य करत नाही. बिग बँगबद्दलचं विज्ञानाचं नवं मत : No Big Bang? Quantum equation predicts universe has no beginning क्वांटम मेकॅनिक्सबद्दलच्या संशोधनांनी प्रचलित सर्वमान्य भौतिकी नियमांना जबरा फटका दिला होता हे आपणास माहित असेलच. त्यामुळे विज्ञान आज एक म्हणतं, उद्या एक म्हणतं तरी त्याच्या "असा अनुमान आहे बुवा की...." ह्या भूमिकेला परमसत्य मानणे हे अंधविश्वासाचे लक्षण आहे. दुसरा मुद्दा असा की सगळेच आधीपासून होते असे मी किंवा अध्यात्म कधीच म्हणत नाही. हे विश्व अनादि-अनंत आहे. जे आज आहे ते काल नव्हते, ते उद्या नसणार. जे सतत बदलत आहे त्याला धरून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्नच मनुष्यजन्मात हजारो दु:खांचे कारण बनतो. तो प्रयत्न सोडला तर परमसुख मिळतंच. पण ते सोडणं एवढं सहज नसतं. त्यासाठी विश्वाचा पसारा कसा सतत बदलत आहे ह्याचा अनुभव घ्यावा लागतो. एका क्षणाच्या लाखो तुकड्यांमधे सुद्धा आपलं शरीर एकसारखे राहिलो नाही हे जेव्हा जाणवतं तेव्हा खर्‍या अर्थाने मोक्षाची सुरुवात होते. त्याचाच विचार करायची गरज आहे. आता सामान्य मंडळींनी मोक्ष म्हणजे काय ह्याचा आपआपला अर्थ लावला आहे तो भाग वेगळा. आध्यात्मिक मनुष्याचा हा प्रश्न असतो कि हे इलेक्ट्रो-केमिकल यंत्र बनवणारे आणि चालवणारे चैतन्य कोठून येते? वरील विधान अनेको पुर्वग्रहांचा समुच्चय असल्याने उत्तर कठिण आहे. प्रथम आध्यात्मिक मनुष्य म्हणजे कोण? मनुष्याचे शरिर म्हणजे एक इलेक्ट्रो-केमिकल यंत्र आहे म्हणजे नेमकं काय? चैतन्य कशाला म्हणायचे? कोठून येते म्हणजेच कोठुनतरी येत असलेच पाहिजे याचा पुर्वग्रहातून काढलेला अनुमान. अध्यात्मिक मनुष्यास सांगू इच्छितो की हे यंत्र सेपरेट -वेगळे समजणे यातच सगळी गोम आहे. जेव्हा तुम्ही-आम्ही समुद्र म्हणतो तेव्हा समुद्र म्हणजे नक्की काय असते? खळाळणार्‍या लाटा, खारं पाणी, जीवजंतू, की एकत्र सगळं? समुद्र म्हणजे हे सगळंच परत किनाराही आणि त्यावरची हवाही. समुद्र असा वेगळा नाहीच. त्यातली व्हेलही वेगळी नाही. सगळी एकच आहे. हे सगळं विश्व एकच आहे. अध्यात्मिक मनुष्यास ती लिंक शोधणे महत्त्वाचे आहे. जोवर सगळं वेगळं-वेगळं दिसत राहिल तोवर कुणी स्वतःला आध्यात्मिक म्हणू नये. लिहिण्यासारखे बरेच आहे पण इथे नको. अशी कोणती गोष्ट आहे कि जी गोष्ट यातून वजा केली तर हे इलेक्ट्रो-केमिकल यंत्र निर्जीव होईल ( with all ideal physical conditions )? निर्जीव-सजीव ह्या मानवी संकल्पना आहेत. एखाद्या खडकात जे मूलद्रव्य असतील ते तुमच्या माझ्या सर्वांच्या शरिरात आहेत. त्या मूलद्रव्यांधे जी आंदोलने चालू आहेत ती सर्वांच्या शरिरात चालू आहेत. कुणीही सजीव वा निर्जीव नाही. कणकणमें है भगवान उगाच म्हणत नाही. निर्जीव वाटणारी एखादी गोष्ट खाऊन मरणारा जीवंत होतो, सजीव वाटणारी खाऊन धडधाकट मरून जातो. तेव्हा अशी काय गोष्ट आहे जी सर्वांमधे वास करून आहे? आयुष्य म्हणजे फक्त शरीरात होणार्या रासायनिक प्रक्रिया -बदलांचा खेळ असेल तर मग झोंबी किंवा यंत्रमानव आणि मानव यांच्यात फरक काय? आयुष्य म्हणजे फक्त शरिरात होणार्‍या रासायनिक प्रक्रिया-बदलांचा खेळ नाही असे आपले मत आहे असे जाणवते. हे मत पक्के असेल तर याशिवायही असे काही आहे ज्यावर आपण विश्वास ठेवता असे जाणवते. पण याशिवाय काहीही नाही हे मान्य करणे अवघड जात असेल तर अध्यात्माचा प्रवासही अवघड होईल. किंबहुना होतोच. कारण ध्येय आधीच स्पष्ट केलेले आहे. ते चुकीचे आहे हे कधीच लक्षात येत नाही, कारण त्या ध्येयापर्यंत पोचणे शक्यच नाही. कुणीही पोचले नाही. पण शरिराला फक्त रासायनिक प्रक्रिया मानणारे मोक्षाच्या ध्येयापर्यंत पोचलेत. कारण त्यांनीच जाणले की झोंबी, यंत्रमानव वा जिवंत मानव यात काहीच फरक नाही. अशा रास्यानिक प्रक्रिया आणि बदलातून साकारणारे मानवी आयुष्य जर भय, निद्रा, आहार आणि मैथुन इतक्याच त्रिज्येत फिरून संपणार असेल तर इतर जीव जंतू आणि मनुष्य यात फरक तो काय? आपण आज ज्या योनीत आहोत, ज्या जन्मात आहोत, ज्या देशात, ज्या धर्मात आहोत, त्यापेक्षा वेगळ्या जातीत, धर्मात, देशात जन्माला आलो असतो तर कसे वाटले असते याचे एक कल्पनाचित्र उभे करू शकतो. तसेच्या तसे असू शकत नाही. तस्मात् एखादा प्राणी हा मनुष्यापेक्षा कमी प्रतीचाच आहे हे मनुष्याच्या अहंकाराने मान्य केले आहे. आपणच श्रेष्ठ हा विचार जेव्हा त्यागला जाईल त्यावेळेस हे सर्व फरक नष्ट होतात. भय, निद्रा, आहार, मैथून याच्या चक्रांतूनच साधना करत मनुष्ययोनीत जीव पोचतो. जीवाला कुठल्याही योनीत मोक्ष वा सद्गती प्राप्ती होऊ शकते. अहंकारी मनुष्याला असे वाटते की फक्त मनुष्य योनीत असे घडते. सर्व पोचलेल्या लोकांच्या कथा-कहान्यांमधून असे सूचक संदर्भ उपलब्ध आहेत. अध्यात्म हा चर्चेचा, डेमोन्स्ट्रेशनचा, वादविवादाचा विषय अजिबात नाही. तो फक्त अनुभवाचा विषय आहे. योग्य गुरुंकडून मार्गदर्शनाद्वारे आत्मसात करण्याचा मार्ग आहे. जागेअभावी, वेळेअभावी, किंवा योग्य-मती अभावी मी इथे अजून जास्त चर्चा करणे शक्य नाही. त्याबद्दल क्षमस्व. माझा वरिल प्रतिसाद अजून हजारो प्रश्नांना जन्म देऊ शकतो हे माहिती आहे. प्रश्नोत्तरे खेळणे हे एका अध्यात्मिक व्यक्तिचे साध्य कधीही असू नये म्हणून आवरत आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
स
सतिश गावडे Wed, 11/04/2015 - 05:25 नवीन
अध्यात्म काय आहे आणि काय नाही यावर आपण एखादा लेख लिहू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/04/2015 - 05:37 नवीन
गावडेसर, चेष्टा नका हो करू गरिबाची. अध्यत्म लेखपाडून सांगता येत नाही. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. हिमालयात गेल्याअवर कसे वाटते हे लेख वाचुन नव्हे तर तिथे प्रत्यक्ष जाऊनच कळते. प्रात्येकाच्या वकुबाप्रमाणे हिमालय भासतो. आध्यात्माचेही तसेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Wed, 11/04/2015 - 06:02 नवीन
डांगेजी चेष्टा नाही हो. ती प्रामाणिक विनंती होती.
अध्यत्म लेखपाडून सांगता येत नाही. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. हिमालयात गेल्याअवर कसे वाटते हे लेख वाचुन नव्हे तर तिथे प्रत्यक्ष जाऊनच कळते. प्रात्येकाच्या वकुबाप्रमाणे हिमालय भासतो. आध्यात्माचेही तसेच.
प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा हे मान्य. पण कशाचा अनुभव घ्यायचा हे तर कळायला हवे ना. समजा "हे हे म्हणजे अध्यात्म" असे जरी सांगता येत नसेल तरीही काही तरि शब्दांत लिहिता येत असेल की. उदा, देव, धर्म, कर्मकांड, पुनर्जन्म याहून अध्यात्म वेगळं आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मांत्रिक Wed, 11/04/2015 - 05:38 नवीन
जीवाला कुठल्याही योनीत मोक्ष वा सद्गती प्राप्ती होऊ शकते. अहंकारी मनुष्याला असे वाटते की फक्त मनुष्य योनीत असे घडते. सर्व पोचलेल्या लोकांच्या कथा-कहान्यांमधून असे सूचक संदर्भ उपलब्ध आहेत. डांगे साहेब, हे काही लक्षात नाही आलं. कुत्री मांजरे हे परमात्म्याचेच रूप आहे हे आध्यात्मिक औपनिषदिक सत्य १०० टक्के मान्य, पण म्हणून त्या जीवांना मोक्षप्राप्तीसाठी साधना करताना कधी बघितले नाही. आता मोक्ष प्राप्तीसाठी साधारणतः खालीलप्रकारे प्रयत्न करता येईलः १) ज्ञान - वेद, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ यांचा अत्यंत सखोल गहन अभ्यास करुन व मग ते ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात आचरणात आणणे. २) कर्म - मी परमात्माच आहे या भावनेने जसं आयुष्य वाट्याला आलंय ते निर्विकारपणे सुख् दु:खापासून अलिप्त राहून जगणे. या प्रकारात प्रपंचाचा त्याग अपेक्षित नाही. ३) भक्ति - फारसं सांगावं नाही लागणार. म्हणजे संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर यांचा मार्ग आचरणार आणणे. ४) योग - प्रपंचाचा त्याग करुन अष्टांगयोग, ध्यान-धारणा-जप यांच्या मार्गाने साक्षात्कार गाठणे. मग आता या ४ मार्गांत चतुष्पाद जीव कुठे व कसा बसेल. हां, पुराणांत असे काही उल्लेख आहेत, की एखाद्या तपस्वी किंवा सत्पुरुषाच्या हस्तस्पर्शाने किंवा आशीर्वादाने एखाद्या चतुष्पादाला मुक्ती मिळाली. परंतु मग त्यात त्यांचे क्रेडिट नाही. आपणांकडे काही संदर्भ असल्यास वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विलासराव Wed, 11/04/2015 - 06:18 नवीन
आपण आज ज्या योनीत आहोत, ज्या जन्मात आहोत, ज्या देशात, ज्या धर्मात आहोत, त्यापेक्षा वेगळ्या जातीत, धर्मात, देशात जन्माला आलो असतो तर कसे वाटले असते याचे एक कल्पनाचित्र उभे करू शकतो. तसेच्या तसे असू शकत नाही. तस्मात् एखादा प्राणी हा मनुष्यापेक्षा कमी प्रतीचाच आहे हे मनुष्याच्या अहंकाराने मान्य केले आहे. आपणच श्रेष्ठ हा विचार जेव्हा त्यागला जाईल त्यावेळेस हे सर्व फरक नष्ट होतात. भय, निद्रा, आहार, मैथून याच्या चक्रांतूनच साधना करत मनुष्ययोनीत जीव पोचतो.जीवाला कुठल्याही योनीत मोक्ष वा सद्गती प्राप्ती होऊ शकते. अहंकारी मनुष्याला असे वाटते की फक्त मनुष्य योनीत असे घडते. सर्व पोचलेल्या लोकांच्या कथा-कहान्यांमधून असे सूचक संदर्भ उपलब्ध आहेत. ठळक केलेल्या ओळीशी सहमत नाही. बाकी तुमचे सगळे प्रतिसाद पटले. फक्त पटलेच नाहीत तर बऱ्याच गोष्टी साधनेमुळे अनुभवालाही आल्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
द
दत्ता जोशी Wed, 11/04/2015 - 11:10 नवीन
:-) हलके घ्या. हळु हळू तसा मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजेल आणि पटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
द
दत्ता जोशी Wed, 11/04/2015 - 11:12 नवीन
^^^^^^^^^^ वरील प्रतिसाद संन्दीप भाऊंसाठी होता. गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
द
दत्ता जोशी Mon, 11/02/2015 - 19:10 नवीन
आपल्या वाटीत पडणारं चमचाभर तूप "कुठून येतं, कोण बनवतं" हे प्रश्न उत्तरांवर आधारित आहेत. म्हणुन ते व्यक्तिसापेक्ष, दृष्टिकोनसापेक्ष आहेत. "तूप कसं बनतं" हा प्रश्न म्हणजे विज्ञान व अध्यात्म आहे. तूप ही अवस्था आहे, लोण्याची. लोणी दह्याची, दही दुधाची, दुध चार्‍याची, चारा धरती+प्रकाश+ हवा+ पाणी यांची. हे तूप परत तिकडेच जाऊन मिळणार, त्याच हवेत, पाण्यात, जमिनीत, त्याचा प्रकाशही होईल. कशाचेही मूळ स्वरुप नसते. जे आहे ते सतत बदलत आहे. हे सतत बदल का व कसे होतात हे शोधणे विज्ञानाचे काम तर हे बदल आत्मसात करणे हे अध्यात्माचे काम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्यारे१ Mon, 11/02/2015 - 19:15 नवीन
थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा. वदनिकवल घेता.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
द
दत्ता जोशी Mon, 11/02/2015 - 20:08 नवीन
थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा. वदनिकवल घेता..... :D :D .....बिस्मिल्लाह ...करा सुरु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
द
दत्ता जोशी Mon, 11/02/2015 - 18:40 नवीन
धन्यवाद. म्हणजे मन/ भावना आणि/ किंवा बुद्धी जर असते तर शास्त्रज्ञांना शरीरात ती कोठेच कशी सापडत नाही? मग ती आहे किंवा असते हे खात्रीपूर्वक आपण कसे सांगू शकता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
न
नगरीनिरंजन Mon, 11/02/2015 - 00:25 नवीन
रचना आवडली; पण "मी म्हणजे स्वनाम" हे पटले नाही. अतिरिक्त प्रोटीन्समुळे विकसित झालेल्या मेंदूत, एकत्रित जोडलेले शरीर, डोळ्यांनी "दिसणारे" जग, मुखातून येणारा आवाज इत्यादींमुळे लॉजिकली डिड्युस झालेली कल्पना म्हणजे मी. मी म्हणजे यापेक्षा लै भारी कै तरी असावं अशा अहंकारयुक्त भ्रमातून निर्माण झालेला शोध म्हणजे अध्यात्म. इतर सगळ्या प्राण्यांसारखेच आपणही एक आपोआप निर्माण झालेले प्राणी आहोत ही कल्पना अध्यात्मवाल्यांना सहन होत नसावी बहुतेक.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 11/02/2015 - 01:04 नवीन
मी म्हणजे यापेक्षा लै भारी कै तरी असावं अशा अहंकारयुक्त भ्रमातून निर्माण झालेला शोध म्हणजे अध्यात्म. इतर सगळ्या प्राण्यांसारखेच आपणही एक आपोआप निर्माण झालेले प्राणी आहोत ही कल्पना अध्यात्मवाल्यांना सहन होत नसावी बहुतेक. कदाचित एक जी. ए. चं विधान आहे मॅन इज द मेझर ऑफ एव्हरीथींग या कल्पनेवर कुत्रा का चांगला तो माणसाचा वफादार आहे. हिरवळ माणसाला नेत्रसुखद म्हणून चांगली अस काय काय गमतीदार आहे. इन शॉर्ट सर्व जगाकडे माणुस हीच एकमेव मोजपट्टी लाऊन बघणे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 11/02/2015 - 07:33 नवीन
विज्ञान आणि अध्यात्म या ज्ञानाच्याच दोन शाखा आहेत असे नि:संधिग्दपणे म्हणता येईल. या दोन्हीही ज्ञान शाखांचा उद्देश मनुष्य जीवन सुखी करणे हाच आहे. विज्ञान जगाला सुखी करण्याच्या नवनविन युक्त्या बाह्य साधनांचा आधार घेउन शोधते तर अध्यात्म हे तोच शोध अंतरंगात घ्यायला शिकवते. सध्यातरी परिस्थिती अशी आहे की दोन्ही बाजूनी ( वैज्ञानिक आणि अध्यात्मिक) घेतला जाणारा शोध असीम आणि अनंत आहे. विज्ञानाने मुलद्रव्ये शोधली, मग त्याचे अणु शोधले, मग रेणू, आता हिग्स् बोसॉन अर्थात देवकण शोधला, उद्या अजूनही पुढचे काहीतरी सापडेल. जस जसे पुढे जावे तस तसे त्या ही पुढे आणखी काहीतरी आहे याची पुन्हा पुन्हा जाणीव होत जाते. पण शोध काही थांबत नाही. दोन्ही मार्गांवरुन चालणार्या महान व्यक्तींना अजून पुढे बरेच काही आहे याची नक्कीच जाणीव आहे. म्हणुनच जेष्ठ तत्वज्ञानी सॉक्रेटीस असे म्हणतो की "मला इतकेच ठाउक आहे की मला काहीच ठाउक नाही". तर तीच गोष्ट सांगताना "जीये मार्गीचा कापडी महेश अजुनी" असे ज्ञानोबाराया म्हणतो. आपल्याला असे दिसुन येते की जस जशी विज्ञानाची प्रगती होते आहे तसतशा विज्ञानाच्या अनेक शाखांची सरमिसळ होते आहे . त्या शाखा बरेच ठिकाणी एकमेकांना पुरक असे काम करताना दिसतात. आध्यात्मात सुध्दा तसेच दिसते, अंतिम लक्ष गाठायच्या अनेक मार्गांची एकमेकात सरमिसळ झालेली पहायला मिळते. यात काहिच गैर नाही हे नैसर्गिकच आहे . विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही शाखांनी एकाच ठिकाणापासुन शोधाला सुरुवात केली आहे दोघांचे उद्दिष्ट एकच आहे. फक्त ते गाठण्याचे मार्ग सध्यातरी भिन्न आहेत. पण मला खात्री आहे की शेवटी हे दोन्ही मार्ग सुध्दा एकमेकांना येउन मिळतीलच आणि तेव्हा मग विज्ञान आणि अध्यात्म हा भेदच रहाणार नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 11/02/2015 - 08:12 नवीन
प्रत्यक्ष प्रयोगातून बाह्य विश्वाचा शोध घेणे म्हणजे विज्ञान, तर प्रत्यक्ष प्रयोगातून 'स्व' चा शोध घेणे हे अध्यात्म असे म्हणता येईल. दोन्ही 'प्रयोगा'त 'योग' आहेच. प्रत्यक्ष प्रयोगाशिवाय नुसती वांझोटी चर्चा म्हणजे वेळेचा अपव्यय. 'माझे' घर, 'माझे' वडील, 'माझा' हात, 'माझे' आरोग्य, माझे मन, माझ्या आवडीनिवडी, माझ्या भावना, या सर्वातला 'मी' काय आहे, कोण आहे, 'को हम?' ही जिज्ञासा 'स्व' चा शोध घेण्यास प्रेरित करते. शनिमहात्म्य, सत्यनारायण कथा, स्वामी-बुवांचे तथाकथित चमत्कार, अनेक प्रकारच्या भ्रामक समजुती वगैरेंचा या दोन्हीशी काही संबंध नाही. अध्यात्मिक अनुभूति ही कलासाधनेतून, साहित्य-कला-संगीत आस्वादातूनही गवसते. अगदी काहीही न करता शांत राहण्यातही गवसते. एकतानतेने, प्रेमाने कोणतीही कृति करतानाही गवसते.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/03/2015 - 09:19 नवीन
हा अनुभूतीच तर कळीचा मुद्दा आहे. ती व्यक्तिसापेक्ष असल्याने तसेच त्याचे हस्तांतरण होउ न शकल्याने तो गूढ प्रांत राहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
म
मोगा Mon, 11/02/2015 - 14:04 नवीन
.हा देश आनि हा धर्म लग्नच न केलेल्या , लग्नातून पळालेल्या , बाय्को घेऊन वनवासात गेलेल्या , बायको सोडून वनवासात गेलेल्या , ब्रह्मचारी , नवरा किंवा बायको सोडुन फीरणारे तंबोरेवाले / तंबोरेवाल्या .... इ इ अतीत्यागवादी बोळे अडकलेल्या सख्या गटणेंनी भरलेला व भारलेला अहे. अध्यात्माशी एकनिष्ठ रहा व विज्ञानाशीही. .... मिपाचं लाडकं व्यक्तीमत्व .. मोगा देशपांडे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 11/02/2015 - 16:49 नवीन
.... मिपाचं लाडकं व्यक्तीमत्व .. मोगा देशपांडे.
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मांत्रिक Wed, 11/04/2015 - 00:05 नवीन
सूफी संतांविषयी काय मत आहे दादूस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मारवा Mon, 11/02/2015 - 14:26 नवीन
तसचं मिपा चे पण आहेत हे आजचं कळलं.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Tue, 11/03/2015 - 09:25 नवीन
मन आणि बुद्धी ....@दत्ता जोशी मनोभावनाविषयीं श्री.सतीश गावडे यांनी उत्कृष्ट वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले आहे ते तुम्ही वाचलेच आहे. मला ते पटते.(प्रतिसाद ३१-१०) . या भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. !."आनंद, दु:ख, प्रेम, राग लोभ, मत्सर, इत्यादि भावना आहेत. श्रद्धा हीसुद्धा एक भावना आहे. सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. तेव्हा ते दिसण्याचा प्रश्न नाही. पण मनोभावनांचा आविष्कार दिसतो. भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तो मूर्त आहे. तो अर्थातच दिसतो. बुद्धीसुद्धा अमूर्तच आहे. म्हणून ती प्रत्यक्ष दिसण्याचा प्रश्न नाही.. माणसाच्या विविध कृतींतून त्याची बुद्धी व्यक्त होते.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Tue, 11/03/2015 - 17:04 नवीन
["...समन्वय" या पद्यरूप लेखातील कांही ओव्यांची श्री. प्रगो यांनी अभ्यासपूर्ण चिकित्सा केली आहे. त्या संदर्भात हा प्रतिसाद आहे.] * "विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता।" याचा अर्थ, " वैज्ञानिक सांगतात ते खरे असते, हे जनसामान्यांना कळते." असा स्पष्ट आहे. इस्रोने मंगलयान सोडले. ते ३००दिवसांत मंगळकक्षेत जाईल असे सांगितले. त्याप्रमाणे ६० कोटी कि.मि.अंतर ३०० दिवसांत पार करून ते पूर्वनियोजित स्थळी पोचले. नंतर मंगळाभोवती फिरू लागले. नियंत्रण पृथ्वीवरून केले. अशा अनेक प्रसंगी विज्ञान खरे ठरते. तसेच विज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाने निर्माण केलेली अनेक सुविधा-साधने लोक वापरतात. त्यामुळे विज्ञान उपयोगी आहे, खरे आहे, सांगते ते करून दाखवते हे त्यांना पटते. म्हणून," "विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता।" याचा अर्थ त्या सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला असा नव्हे. *विज्ञानामुळे माणसाची आश्चर्यकारक प्रगती झाली. जीवन अधिक सुख-सुविधापूर्ण झाले. कोट्यवधींचे दु:ख कमी झाले. अनेकांचे अकाली होणारे मृत्यू टळले. वाढत्या लोकसंख्येच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या प्राथमिक गरजा बर्‍याच प्रमाणात पुर्‍या होऊ शकल्या. मनोरंजनाची दालने घरा घरात पोचली. हे सर्व विज्ञानामुळे घडले. यात अध्यात्माचे योगदान शून्य आहे."एक शून्य मी", (पु.ल.देशपांडे), या पुस्तकातील काही सुवचने अशी:--"पूर्वी पंढरपुरच्या वारीत हजारो माणसे कॉलर्‍याने मरत असत. लाखो वारकर्‍यांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने ते मृत्यू थांबले नाहीत. ते थांबवले प्रतिबंधक लस शोधणार्‍या वैज्ञानिकाने." "आपल्या देशात इतके साधु-संत जन्माला आले. त्या ऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे वैज्ञानिक जन्माला आले असते तर हा देश अधिक प्रगत, अधिक सुखी झाला असता." "अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्‍यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही संत -महात्म्यापेक्षा अधिक मोठा वाटतो." पु.ल.नीं व्यक्त केलेल्या या अपेक्षा अध्यात्माच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. पण समाजावर शतकानुशतके प्रभुत्व गाजवणारे अध्यात्म, हिंदुधर्माला कलंकभूत ठरलेले चातुर्वर्ण्य संपवू शकले नाही. असेच आधु-संतही ते नष्ट करू शकले नाहीत. ते संपवले प्रजासत्ताक भारताच्या संविधानाने. *साधारणपणे इ.स.५०० पासून बहुसंख्य भारतीयांनी ऐहिकाकडे पाठ फिरविली. परलोकाचा ध्यास घेतला. इहलोक (हे जग) अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे, किंबहुना खोटे आहे, जे काही खरे, चिरंतन आनंदमय आहे ते सगळे तिकडे, परलोकी. असा समज सर्वत्र पसरला. तो कथा, कीर्तने, प्रवचने, यांमुळे जनसामान्यांच्या मनात दृढ झाला. बुद्धिमंतांचे डोळे तर तिकडेच लागलेले. कारण इहलोक भ्रामक. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. बाकी सारे अज्ञान. अध्यात्मापायी अनेकांची बुद्धी, ऊर्जा, वेळ आणि पैसा या गोष्टी वाया गेल्या. या अध्यात्मामुळे कोणता लाभ झाला? शेत नांगरण्याची पद्धत , बी बियाणे यांत काही सुधारणा झाली? धान्य उत्पादन वाढले? दळणा-कांडणाची सुलभ रीत शोधून आध्यात्मिकांनी स्त्रियांचे कष्ट कमी केले?( नांगर आणि जाते या साधनांत महाभारत काळापासून पेशवाईपर्यंत कांही सुधारणा झाली नाही असे अभ्यासक सांगतात.) वाहतुकीची साधने वाढून प्रवास सुखकर झाला? रात्रीचा अंधार दूर झाला? अध्यात्माने काय साधले ते तरी सांगावे! नीतिमत्ता वाढली म्हणता? मग भ्रष्टाचार,व्यभिचार,बालिकावरील अत्याचार यांत भारत देश अग्रगण्य कसा? अध्यात्मामुळे मन:शांती लाभते म्हणावे तर देशात मानसोपचार तज्ञांची संख्या अपुरी पडते आहे. "ब्रह्मवेत्ता न करी काम जे समाजा उपयोगी ।" असे म्हटले आहे ते या अर्थाने. पूर्वग्रह दूर ठेवून शुद्ध बुद्धीने विचार करावा म्हणजे अध्यात्माच्या वेडामुळे गेल्या दीड हजार वर्षांत आपल्या देशाची अपरंपार हानी झाली, आपण भौतिक प्रगतीत मागे राहिलो, पारतंत्र्यात पडलो हे पटेल. "अध्यात्मामुळे अनेकांचे आत्मे ब्रह्मरूप झाले, त्यांना मोक्ष मिळाला, अक्षय चिदानंदाची प्राप्ती झाली, त्यांचे जन्म-मृत्यूचे फेरे चुकले." असल्या भ्रामक समजुतीत ज्यांना खितपत पडायचे असेल त्यांच्याविषयीं काय बोलावे? .......................
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 11/03/2015 - 18:03 नवीन
यनावाला, तुम्ही सांगितली भारताची अधोगती अध्यात्मामुळे झाली नाही. त्यास हिंदूविरोधी राज्यकर्ते जबाबदार आहेत. आपण भारतीय शिवाजीमहाराजांची शिकवण विसरल्याची शिक्षा भोगत आहोत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
स
सतिश गावडे Tue, 11/03/2015 - 19:04 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोगा Wed, 11/04/2015 - 06:03 नवीन
आणि तरीही हिंदुविरोधी इंग्रजांचे पाय चेपायला गामा लंडनला गेलेत बरं का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ग
गामा पैलवान Wed, 11/04/2015 - 20:18 नवीन
काहीही हं मोगा. मी इंग्लंडला हिंदुत्वाची ध्वजा उंच धरायला आलो आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
संदीप डांगे Tue, 11/03/2015 - 22:37 नवीन
आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या दृष्टिकोनातून बघतो यावर बरेच अवलंबून असते. विज्ञानामुळे माणसाची आश्चर्यकारक प्रगती झाली. जीवन अधिक सुख-सुविधापूर्ण झाले. कोट्यवधींचे दु:ख कमी झाले. अनेकांचे अकाली होणारे मृत्यू टळले. वाढत्या लोकसंख्येच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या प्राथमिक गरजा बर्‍याच प्रमाणात पुर्‍या होऊ शकल्या. मनोरंजनाची दालने घरा घरात पोचली. हे सर्व विज्ञानामुळे घडले. यात अध्यात्माचे योगदान शून्य आहे. विज्ञानामुळे प्रगती झाली की अधोगती हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. "माझे सुखात चालले आहे ना?" एवढाच प्रश्न असेल तर त्यास विज्ञान लागत नाही. विज्ञानाच्या एक एका सुखसोयीमागे लपलेल्या एक एक दुखदायी वास्तवांना दुर्लक्षित करणे हे कितपत योग्य? कोट्यावधींचे दु:ख कमी झाले हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकाल? दु:ख कमी झाले नसून बदलले आहे. अकाली होणारे मृत्यू टळले तर लोकसंख्या भरमसाठ वाढली. तिच्या सगळ्या गरजा भरमसाठ वाढल्या, त्या पूर्ण करता करता नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रचंड ताण आला आहे. एक उपाय शोधता त्यावर आ वासून दुसरे प्रश्न उभे राहत आहेत. आजचे ग्राउंडब्रेकींग सोल्युशन्स उद्यासाठी खरंच ग्राउंडब्रेकींग असतील. उदा: सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स. प्रचंड प्रमाणात जमिनित जात आहेत. खाद्यपिकांसाठी उद्या ही एक गंभीर समस्या असणार आहे. महिलांना, मुलांना आज सोयीचे आहे पण पुढ्च्या पिढ्यांसाठी आपण एक मोठे डंपिंग ग्राउंड सोडून जाणार आहोत याबद्दल डायपरचा शोध लावण्याअगोदर विज्ञानाने काय विचार केला? "अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्‍यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही संत -महात्म्यापेक्षा अधिक मोठा वाटतो." माझी चप्पल शिवून देणारा चांभार मला डोईचे केस भादरनार्‍या न्हाव्यापेक्षा मोठा वाटतो. प्रत्येकाचं आपलं एक स्थान, महात्म्य असतं. उगा बैलाने दूध दिलं असतं तर किती बरं झालं असतं असं म्हणायला काय लागतं. पु.ल.नीं व्यक्त केलेल्या या अपेक्षा अध्यात्माच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. पण समाजावर शतकानुशतके प्रभुत्व गाजवणारे अध्यात्म, हिंदुधर्माला कलंकभूत ठरलेले चातुर्वर्ण्य संपवू शकले नाही. असेच आधु-संतही ते नष्ट करू शकले नाहीत. ते संपवले प्रजासत्ताक भारताच्या संविधानाने. बैलानं दूध द्यावं ह्या अपेक्षा बैलाच्या आवाक्याबाहेरच असणार. तुमचे वरील विधान म्हणजे चमत्कारिक स्वमतांधतेचा उत्कृष्ठ नमुना आहे. आपलं मत पटवण्यासाठी भारदस्त वाटेल असं काहीही ठोकून द्यावं? समाजावर अध्यात्माने कधीच प्रभुत्व गाजवलेले नाही. प्रभुत्व गाजवले ते अवडंबर करणार्‍यांनी, खोटे बोलणार्‍यांनी, जनतेला उल्लू बनवणार्‍यांनी. अध्यात्म म्हणजे पुजा-कर्मकांडं हेच सर्व समाजाचे मत बनवले, (तुमचेही तसेच झाले आहे.) हिंदूधर्माला कलंकभूत ठरणारी चातुर्वर्ण्य व्यवस्था लादली माणसांनीच, पाळली माणसांनीच. भारतीय संविधानही बनवले माणसांनीच, राबवले माणसांनीच. आकाशातून तर नाही पडले की कुठल्या प्रयोगशाळेत तयार झाले. चातुर्वर्ण्य म्हणा की आणखी काही वर्गाधिष्ठित समाज असणे ही समाजाची स्वत:ची मानसिकता आहे. विज्ञानाचे डंके वाजवणार्‍या, मी मी म्हणणार्‍या पाश्चात्त्य देशांमधेही वर्णभेद कसा पाळला जातो हे आपणांस जास्त ठावूक असावे. तस्मात् माणसे जिथून तिथून सारखीच असतात. हा देश तमाशाने बिघडला नाही की किर्तनाने सुधारला नाही. साधारणपणे इ.स.५०० पासून बहुसंख्य भारतीयांनी ऐहिकाकडे पाठ फिरविली. परलोकाचा ध्यास घेतला. समृद्धतेतूनच वैराग्य जन्माला येतं. भारतीय समाजाने गुप्तकाळात ऐहिकसुखाची परमावधी गाठली. सर्व मिळाल्यावर पुढे अजून काही तरी मिळवायचे राहते आहे, संपूर्ण समाधान मिळत नाही. संपूर्ण समाधान हे अध्यात्मातच आहे याचा शोध लागल्यावर ऐहिकाकडे पाठ फिरवणे सूरू झाले असेल. स्वघोषित बाबा बुवांनी परलोकाचा ध्यास वैगेरे व्याकूळ जनतेच्या गळी उतरवले. इहलोक (हे जग) अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे, किंबहुना खोटे आहे, जे काही खरे, चिरंतन आनंदमय आहे ते सगळे तिकडे, परलोकी. असा समज सर्वत्र पसरला. तो कथा, कीर्तने, प्रवचने, यांमुळे जनसामान्यांच्या मनात दृढ झाला. बुद्धिमंतांचे डोळे तर तिकडेच लागलेले. कारण इहलोक भ्रामक. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. बाकी सारे अज्ञान. अध्यात्मापायी अनेकांची बुद्धी, ऊर्जा, वेळ आणि पैसा या गोष्टी वाया गेल्या. आपणास खरेच अध्यात्माबद्दल कणभरही माहित नाही हे वरील विधानावरून स्पष्ट होते. पोथ्या-पुराणांमधली वर्णने म्हणजे अध्यात्म असे जर वाटत असेल तर खरंच अभ्यास वाढवा. इहलोक अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे म्हणजे नक्की काय याचा अर्थ शोधा. इथेच राहून इहलोकात गुंतून न पडणे म्हणजेच परलोक सिद्ध करने, चिरंतन आनंद इथेच याच आयुष्यात मिळवता येतो हे जनतेस कधीच समजले नाही. चुकीच्या मार्गदर्शनाचे फळ अजून काय? अध्यात्मापायी अनेकांची बुद्धी, उर्जा वेळ आणि पैसा वाया जातो ह्या गोष्टी विज्ञान विज्ञान चा जप करणार्‍या पाश्चात्त्य देशांना बहुधा कळल्या नाहीत. भारतातले अनेक अध्यात्मिक गुरु तिकडे जाउन प्रसिद्ध झालेत ते... कधी विचार करा असे का झाले. जिथे सर्व सुखं पायाशी लोळण घेतात, आयुष्यात आता काहीच मिळवायचे शिल्लक राहिले नाही तरी मनाची अशांतता दूर होत नाही. तिथे विज्ञान माघार घेतं आणि अध्यात्मच मदतीस येतं. अभागी, गरिब, भौतिक विवंचनेत अडकलेल्या मनुष्यास अध्यात्म वापरताच येत नाही. तो टाळ कुटत बसतो, प्रभुच्या कृपेची वाट पाहत. त्याला प्रभूची कृपा हवी असते दोन वेळेची भुक भागवायला, बायकोला मूल व्हायला, आईची गुडघे दुखी दूर व्हायला, बहिणीला सासरी नीट वागणूक मिळायला. पण अध्यात्म ह्यासाठी नाही हे कुणीच त्या खुळ्याला सांगत नाही. अध्यात्म ह्या सगळ्या कचाट्यातून बाहेर निघण्यासाठी आहे. या अध्यात्मामुळे कोणता लाभ झाला? शेत नांगरण्याची पद्धत , बी बियाणे यांत काही सुधारणा झाली? धान्य उत्पादन वाढले? दळणा-कांडणाची सुलभ रीत शोधून आध्यात्मिकांनी स्त्रियांचे कष्ट कमी केले?( नांगर आणि जाते या साधनांत महाभारत काळापासून पेशवाईपर्यंत कांही सुधारणा झाली नाही असे अभ्यासक सांगतात.) वाहतुकीची साधने वाढून प्रवास सुखकर झाला? रात्रीचा अंधार दूर झाला? परत तेच. बैलाकडून दूधाची अपेक्षा. अध्यात्माने काय साधले ते तरी सांगावे! नीतिमत्ता वाढली म्हणता? मग भ्रष्टाचार, व्यभिचार, बालिकावरील अत्याचार यांत भारत देश अग्रगण्य कसा? अध्यात्मामुळे मन:शांती लाभते म्हणावे तर देशात मानसोपचार तज्ञांची संख्या अपुरी पडते आहे. बेछूट गोळीबार...? प्रथमतः एक गोष्ट स्पष्ट करतो यनावालावलकरजी. नीतीमत्ता तर विज्ञानानेही वाढत नाही. निष्पाप व निरागस शहरवासीयांवर दोन दोन अणुबॉम्ब टाकतांना नीतीमत्ता फारच उचंबळून आली होती का? भ्रष्टाचार, व्यभिचार व बालिकांवरील अत्याचार, नीतीमत्ता यात विज्ञानाने नेमके काय काम केले ते तरी सांगा. मानसोपचार तज्ञांची गरज का वाढते आहे त्याचे कारण विज्ञान देईल काय? योग्य पद्धतीने आध्यात्मिक जीवनपद्धती आत्मसात करणार्‍यास मनःशांती लाभतेच. कर्मकांडं वा अवडंबर करणार्‍यास नाही. कितीही गॅजेट्स, कार, मोठे मोठे बंगले बाळगले तरी मनःशांती लाभत नाहीच. आधुनिक विज्ञानाने कितीही उड्या मारल्या तरी मनःशांती देणारं औषध कुठ्ल्याही प्रयोगशाळेत बनणार नाही. तुमचा मूळ मुद्दा, अध्यात्म वर्सेस विज्ञान नसून, प्रयत्नवाद वर्सेस दैववाद हा आहे. हे आपण आधीच स्पष्ट करून घ्यायला पाहिजे होते. विज्ञानाची बाजू मांडतांना तुम्ही गरज नसतांना, माहिती नसतांना अध्यात्मावर चिखलफेक करत आहात हे आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रमाद करत आहोत ह्याबद्दल क्षमस्व. कारण दैववाद म्हणजेच अध्यात्म अशी अगदी चुकीची, अवैज्ञानिक संज्ञा आपण तयार करून अज्ञानी जनतेची दिशाभूल करत आहात. हे आपले वर्तन एका विज्ञानवाद्यास शोभणारे आहे का याबद्दल आत्मचिंतन करावे. आपणास दैववादाचीच चिरफाड करायची असेल तर तीच नीट करावी, न कळणार्‍या प्रांतात घुसखोरी करून उपयोग नाही. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
अ
अर्धवटराव Wed, 11/04/2015 - 04:28 नवीन
तुम्ही 'सातच्या आत घरात' सिनेमा पाहिला आहे का? "महाराज.. गाढवापुढे गीता वाचायला माझी काहिच हरकत नाहिए... पण गाढवं जागी हाएत का झोपलेली ते तर बघुन घ्या" - इती मकरंद अनासपुरे. एंजोय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मांत्रिक Wed, 11/04/2015 - 05:41 नवीन
प्रतिसाद आवडला डांगे साहेब...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मूकवाचक Wed, 11/04/2015 - 06:44 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
भ
भाऊंचे भाऊ Wed, 11/04/2015 - 06:41 नवीन
अर्धवटराव म्हणतात तसे गाढवं जागी हाएत का झोपलेली ते तर बघुन घ्या हे फार महत्वाचे असल्याने एकुणच किअतपत गांभीर्याने चर्चा करावी याला स्पश्ट मर्यादा आहेत. लिंबु टिंबु ना अर्धराज्य माफ हे विसरु नका. मुलांशी मुल बनुन खेळा...

आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
द
दत्ता जोशी Wed, 11/04/2015 - 10:12 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
द
दत्ता जोशी Wed, 11/04/2015 - 10:44 नवीन
आधुनिक विज्ञानाला दुषणे देत नाही. कारण या मार्गावरून परत फिरणे मानवाला आता अशक्य आहे. पण एक गोष्ट प्रामाणिक पाने सांगा - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अनेक सुख सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी अशा प्रत्येक शोधामुळे पर्यावरणाला अत्यंत घातक दूरगामी परिणाम झालेत त्याची चर्चा विज्ञान उघडपणे करत नाही. आज जगभर जनुकीय तंत्रज्ञानाने बनवलेले अन्न घटक, रसायने आणि रासायनिक खतांपासून होणार्या दुष्परिणामां विषयी जागृती होत आहे. वाहतुकीची साधने, उर्जा निर्मिती, दूर संचार या साधनांनी जरी आज दैनंदिन जीवन व्यापून टाकले असले तरी त्याचे ( साधनांचे आणि त्यांच्या अतिवापराचे) अदृश्य आणि दूरगामी वाईट परिणाम आहेतच हे अमान्य करण्यात हशील नाही ( जरी या गोष्टी सोडून देने आजच्या युगात अशक्य असले तरी). हरित वायू उत्सर्जन, ओझोनथराची हानी, प्रदुषित हवा, पाणी, जमीन यामुळे अन्न घटकात वाढणारे शिसे, पारा, आणि इतक घातक रसायने या हाताबाहेर गेलेल्या गोष्टी नियंत्रणात आणण्यात विज्ञानाला यश येईल? विविध तंत्रज्ञानामुळे, वाढणारा किरणोत्सार मानवाचे भविष्य सुकर करत आहे कि धोकादायक? ( हे फक्त भारतासारख्या प्रगतीशील देश किंवा अप्रगत राष्ट्रांपुर्तेच मर्यादित नाही हे लक्षात घ्या) अजून एक महत्वाची गोष्ट- जरी यामुळे सर्वसामान्यपणे मानवी जीवन सुकर झाले आहे हे मान्य करतांनाच हे सर्व तंत्रज्ञान ( दळणवळण, संरक्षण, दूर संचार, वाहन निर्मिती, अगदी वैद्यक) १००% व्यापार केंद्रित आहे हे लक्षात घ्या. ज्या व्यक्तीकडे हे विकत घेण्याची ताकत नाही त्याला यापैकी कशाचाही फायदा पोचणे शक्य नाही. विविध अध्यामिक, धार्मिक संस्था मोफत धर्मादाय शाळा, कोलेज, दवाखाने, अन्नछत्रे चालवितात याची आपण माहिती करून घेतलेली दिसत नाही. मोठमोठे व्यावसायिक दवाखाने आज रुग्णाला दाखल करून घेताना प्रथम रुग्णाच्या आर्थिक परिस्थिती ची खात्री केल्याशिवाय दाखल करून घेत नाहीत. यात आपल्याला कोणालाच काहीच चुकीचे वाटत नाही. मग विज्ञान अशा व्यक्तीपर्यंत खरच पोचते का ? मानसोपचारांची गरज कशामुळे वाढली आहे? अध्यात्मामुळे कि आणि कशामुळे याचा विचार व्हावा. विज्ञानाची कास जरूर धरावी पण डोळसपणे. एकांगी विचार कधीही धोकादायक आणि विनाशकच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
द
दत्ता जोशी Wed, 11/04/2015 - 10:10 नवीन
सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. तेव्हा ते दिसण्याचा प्रश्न नाही. पण मनोभावनांचा आविष्कार दिसतो. भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तो मूर्त आहे. तो अर्थातच दिसतो. बुद्धीसुद्धा अमूर्तच आहे. म्हणून ती प्रत्यक्ष दिसण्याचा प्रश्न नाही.. माणसाच्या विविध कृतींतून त्याची बुद्धी व्यक्त होते.
वालावलकर सर, प्रतिसादासाठी धन्यवाद. म्हणजे मन, बुद्धी भावना या अमुर्थ गोष्टी असतात सिद्ध करता येत नाहीत हाच माझा मुद्दा होता. कोणतेही मूर्त स्वरूप नसतांना, भावना मन बुद्धी आहे किंवा यावर आपला आणि विज्ञानाचा पुर्ण विश्वास आहे आणि ते असण्याची ग्वाही देताना आपण (वैज्ञानिक सिद्धता देत येत नसल्याने ) तर्क लावता ( बुद्धी, भावना कृतीतून व्यक्त होतात). खरेतर तर्क हे तत्वज्ञानाचे अंग आहे पण विज्ञानालाही कधी कधी तर्क, गृहीतके यांचा आधार घ्यावाच लागतो. आणि आपणही त्याला नाकारत नाही याचे करण अगदी सोपे आहे ते म्हणजे स्वानुभव. भावना, बुद्धी, विचार, मन ( व्याख्या काहीही करा) इ. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची महत्वाची अंगे अमूर्त, अदृश्य असली तरी आपण कोणीही त्या नाकारू शकत नाही कारण या गोष्टी अनुभव सिद्ध आहेत. विज्ञान सिद्ध नाहीत. मग जर तत्वज्ञानाने काही अमूर्त गोष्टी तर्काच्या आधारे मांडल्या तर त्या विज्ञान कसोटीवर सिद्ध करा म्हणणे सयुक्तिक होणार नाही. कोणत्याही रासायनिक बदल/ प्रक्रिया/ प्रतिक्रिया शरीरात घडत असल्या तरी जीव ज्यामुळे जिवंत असतो ते चैतन्य ( तुम्ही काहीही नाव द्या) नाकारण्यात मला तरी काहीच अर्थ दिसत नाही. विज्ञानाचे सगळे सिद्धांत आपण वाचतो आणि विश्वास ठेवतो. सगळे सिद्धांत आपण प्रयोगशाळेत सिद्ध करून मग विश्वास ठेवत नाही. त्याच प्रमाणे अध्यात्मिक मनुष्य काही तात्त्विक सिद्धांतांवर विश्वास ठेवतो. मग अशा व्यक्तीला अडाणी का म्हणावे? इथे असलेल्या कोणालाही अद्वैत ज्ञान, मुक्ती यांचा प्रत्यक्ष अनुभव नाही/ नसावे ( किमान मला तरी नाही) पण कोणीतरी हे अनुभव घेतले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे जावे लागते. कारण असे अनुभव भौतिक शारीरिक अनुभवांच्या पलीकडचे असतात. जेव्हा तुकाराम महाराज या अद्वैतानुभावाचे वर्णन त्यांच्या अभंगात करतात- अणु रेणूया थोकटा तुका आकाशाएवढा गिळूनी सांडिले कलेवर, भव भ्रमाचा आकार ( माया) सांडूनी त्रिपुटी दीप उजळला घटी, ( अद्वैत) इथे तुकोबारायांनी हे सांगितले त्यावर का विश्वास ठेवावा? याला तर्क आहे कि असे खोटे सांगण्यामागे तुकोबारायांचा काहीच वैयक्तिक स्वार्थ नसावा. ( नाहीच). शेवटी स्वतः तुकाराम बुवाच सांगतात- तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता. ( अवांतर : इथल्या शब्दांची रचना- अणु रेणू सुमारे ४०० वर्षापूर्वी झाली आहे यावर थोडा अभ्यास करायचा आहे कोणी केला असल्यास कृपया माहिती देणे.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा