Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टिपू सुलतान - इतिहास

S
sagarpdy
Wed, 11/11/2015 - 10:38
🗣 11 प्रतिसाद
कालच कर्नाटकात टिपू सुलतान जयंती वादातून वरून दुर्दैवी घटना झाली. त्यात गिरीश कर्नाड यांनी "टिपू जर हिंदू असता तर त्याला आज कर्नाटकात ज्याप्रमाणे शिवाजीस महाराष्ट्रात मान मिळतो तसा मान मिळता" अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेवर तसेच कर्नाडांच्या वक्तव्यावर विविध राजकीय भाष्ये येत आहेत व पुढील काही दिवस येतीलच. या घटनेमुळे व कर्नाडांच्या वक्तव्यांमुळे काही प्रश्न पडले : १. टिपू सुलतानाचा इतिहास काय ? मुख्य राजकीय व सामाजिक कर्तबगारी काय ? (सिरियल फार लहानपणी पहिली, आठवत नाही. शालेय अभ्यासक्रमात तितकासा उल्लेख नाही). शक्य असल्यास संदर्भ कळवणे. २. हि कर्तबगारी खरच शिवाजींशी तुलना करण्या इतपत मोठी होती का ? शिवाजींनी केवळ मुघल व दक्षिणी शह्यांशी लढा देण्याबरोबर विविध सामाजिक सुधारणा केल्या. जरी पेशवाई काळातील मराठी राजवटीवर होत असली (बारगीर, काही इतर) तरी शिवाजीकालीन मराठी राजवटीवर टीका बघायला मिळाली नाही. (टिपू वर मिळाली - कुर्ग) ३. टिपू ची तत्कालीन भारतीय-अभारतीय सत्तांबरोबर युती/आघाडी कशी काय होती ?
वर्गीकरण
काथ्याकुट
इतिहास आणि संस्कृती

प्रतिक्रिया द्या
7467 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/11/2015 - 10:41 नवीन
टीव्ही वाहिन्यांवर सकाळपासून टीपू सुलतानावर काथ्याकुट सुरु आहेच. मी आपलं वाचत राहीन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 11/11/2015 - 11:02 नवीन
वा! रांगेतून दुसरी सीट आपली.... (मयसूर पाक आणि मयसूर मसाला डोसा चा फ्यान)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/11/2015 - 11:15 नवीन
मयसूर पाक आणि मयसूरचा मसाला डोसा चालतो पण मयसूरचा वाघ सिंह टीपू सुल्तानावर चर्चा का नको ? :) परंपरेने सुट्टी मिळत असेल तर द्यावी काय म्हणता ? उगं जिथे तिथे पॉलिटिक्स नको काय म्हणता ? -दिलीप बिरुटे (सहिष्णु)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/11/2015 - 11:26 नवीन
डागतरसायेब.... चर्चा फुडं जौ द्या की. आताच काय आपुन बोलनार न्हाय काय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मालोजीराव Wed, 11/11/2015 - 11:06 नवीन
टिपूला संपवण्यात मराठ्यांचा मोठा हात होता, टिपूला संपवून मराठ्यांना फायदा झाला कि तोटा हेही वाचायला आवडेल !
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 11/11/2015 - 11:07 नवीन
टीपू सुलातनचि जयंती हा एक राजकीय खेळीचा भाग आहे. वास्तविक टीपूचा जन्मदिवस हा २० नोव्हेंबर असताना हे १० तारखेला तो का साजरा करत आहेत? उत्तर सोपे आहे कांग्रेस हां टीपू सुलतानच्या नावाखाली भाजपावर शरसंधान करत आहे. मुस्लिम लोकांची जयंती साजरे करण्याची प्रथा कधिपासून सुरु झाली? बिहार निवडणुकीं नंतर ह्या सर्व कथाकथित सेक्युलरवाद्याना माज आला आहे.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 11/11/2015 - 11:08 नवीन
माझी सीट तिसरी!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 11/11/2015 - 11:55 नवीन
टिपू सुलतानचा इतिहास फार माहित नाही. पण तो मुस्लीम धर्मप्रसारक होता असे वाचले आहे. तसेही, धर्मप्रसारणात त्याने हिन्दूंवर वा अन्य धर्मियांवर कांही अत्याचार केले नसतील तर त्याच्या त्या कार्यालाही कोणाचा विरोध असू नये. त्याच्या कार्यकाळात मस्कतच्या उलेमांनी त्याची भेट घेऊन त्याच्या राज्यात इस्लाम बलवान करण्याच्या त्याच्या कार्याचा गौरव केला होता असेही वाचले आहे. ज्ञानपिठ पुरस्कारप्राप्त गिरीश कर्नाड ह्यांनी सामाजिक एकोपा राखण्याऐवजी दोन धर्मियांमधील तेढ वाढविण्याच्या कार्यास हातभार लावावा ह्याचे सखेद आश्चर्य वाटले. टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांची तुलना करता. टिपू सुलतानाचा राज्याभिषेक झाला तेंव्हा त्याला त्याचे वडिल सुलतान हैदर अली ह्यांच्याकडून वारसा म्हणून भलेमोठे साम्राज्य मिळाले. मात्र महाराजांना तत्कालीन तीन शाह्यांशी, पोराटोरांचे सैन्य जमवून, प्राणपणाने लढून झगडून, राजनितिक आणि सामरीक धोरणे राबवीत महाराष्ट्र राज्याची उभारणी करावी लागली. टिपू सुलतानचे राजकिय-प्रशासकिय कौशल्य, रणांगणावरील यश, इंग्रजांशी चिवट झुंज वगैरे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण अत्यंत विरुद्ध परिस्थितीवर मात करीत शून्यातून एक राज्य निर्माण करण्याची शिवाजी महाराजांची यशस्वी कारकिर्द जास्त कौतुकास्पद आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
म
मोगा Wed, 11/11/2015 - 13:06 नवीन
हेच लॉजिक लावले तर संभाजीमहाराजानाही वारसाहक्काने राज्य मिळाले होते. त्यांचे कौतुक करायचे की नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
आ
आरोह Wed, 11/11/2015 - 12:34 नवीन
स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे इतिहासाचे जाणूनबुजून/पद्धतशीरपणे distortion, manipulation करण्यात आले.ते का करण्यात आले हे सर्वांनाच माहीत आसवे.त्यामुळे फायदा झाला(कोणाचा) कि तोटा झाला हा एक स्वतंत्र विषय आहे.कोणीतरी म्हटलंय ना " Those who do not learn from history, are doomed to repeat it " एव्हढं बोलून मी माझं भाषण संपावतो.. धन्यवाद
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 11/11/2015 - 12:48 नवीन
टिपु सुलतान मांजा (पतंग उडवन्यासाठीचा दोरा) लै भारी असायचा . कुणाला आठवतो काय ? -(नॉस्ट्याल्जीक) आन्न्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा