माझी भूमिका
इथे नास्तिकवादी लेख लिहितो त्या संदर्भातील भूमिका थोडक्यात अशी:
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे मला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणून लिहितो. त्यात कुणाला हिणवण्याचा हेतू नसतो. प्रसिद्धीचाही नाही. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." हे जरी सत्य असले तरी याला व्यावहारिक मर्यादा आहेत. माझी क्षमता अगदीच तोकडी, तुटपुंजी आहे. केवळ मराठी भाषेत थोडे-फार लिहू शकतो. महाराष्ट्रातील अनेक दैनिकांना वाचकपत्रे पाठवितो. "आजचा सुधारक "(नागपूर) या मासिकात लेख लिहितो. इंटरनेटवर लिहितो. या विषयावर एक पुस्तक लिहिले आहे. दुसरे प्रकाशनाच्या मार्गावर आहे. एवढेच माझे प्रयत्न. कोणी म्हणतील ,"प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे श्रद्धा बाळगण्याचे, उपासनेचे घटनादत्त स्वातंत्र्य आहे. त्यांना--फलज्योतिष हे थोतांड आहे. वास्तुदिशाभूल, प्राणिक हीलिंग ही भंपक(स्यूडो) शास्त्रे आहेत. श्रीयंत्रे, रुद्राक्षे या निरुपयोगी वस्तू आहेत. बुवा, बापू, आध्यात्मिक गुरू यांच्यापाशी दैवी शक्ती नसते. मंत्रांत कोणतीही शक्ती सामर्थ्य नसते.--. असे सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय? " याचे उत्तर वर दिले आहे. माझ्या देशबांधवांच्या सामाजिक आचरणाची (वागण्याची ) चिकित्सा करण्याचा आणि माझ्या दृष्टीने त्यांतील योग्य-अयोग्य काय ते सांगण्याचा अधिकार मला घटनेने दिला आहे. धूम्रपान करणे अवैध नाही. पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून धूम्रपान करू नये असे आपण सांगतोच ना? तसेच हे आहे. वर उल्लेखिलेल्या निरुपयोगी वस्तू खरेदी करणे, तसेच होम-हवन-अभिषेक ,ग्रहशांती, नागबळी विधी इ.कर्मकांडे करणे यामुळे श्रद्धाळूंचा वेळ, ऊर्जा आणि पैसा वाया जातो. भाबड्या भाविकांच्या श्रमा-घामाची कमाई पुरोहितांच्या खिशांत जाते. श्रमिकांची आर्थिक स्थिती सुधारत नाही. प्रगती खुंटते. याची मला खंत वाटते. काहीजण म्हणतात तुम्ही आमच्या श्रद्धांना हिणवता. त्याने आमच्या भावना दुखावतात. म्हणजे जे लिहिलेले असते ते त्यांच्या बुद्धीला पटते. यात आपल्या मर्मावर नेमके बोट ठेवले आहे हे कळते. हे विधान सत्य मानले पाहिजे असे बुद्धीला वाटते. पण भावना ते सत्य स्वीकारण्यास धजत नाही. बुद्धीपुढे भावना हतबल होते म्हणून ती दुखावते. असे तर नव्हे? (याविषयीं इथे एक लेख लिहिला आहे.) श्रद्धाळू भाविकांनी वैज्ञानिकांना, बुद्धिप्रामाण्यवाद्यांना, निरीश्वरवाद्यांना कितीही दूषणे दिली, कांहीही म्हटले तरी विवेकवाद्यांना किंचितही वाईट वाटणार नाही. भावना दुखावणे तर दुरापास्तच. कारण त्यांच्या मेंदूत भावनेवर बुद्धीचे सदैव नियंत्रण असते. ................................................................................................
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे मला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहेबाकी जावूद्या.. तुम्ही घटना आणि संविधान वगैरे बोलत आहात तसेच मी सर्वोच्च न्यायालयाचा रेफरन्स देवून मत मांडले होते. त्यावेळी "अज्ञानमूलक आणि अशोभनीय" अशी शब्दयोजना केलीत ते शब्द योग्य होते का? राजेश कुलकर्णींची शाळा घेणे सुरू आहे इतकेही तुम्हाला कळाले नसेल तर अवघड आहे.मी ही उत्सुक आहे चौकटराजा - Thu, 19/11/2015 - 13:05 हे दिव्य अनुभव ऐकायला व त्यापेक्शाही अनुभवायला मी उत्सुक आहेच. बाकी नास्तिक याचा रूढ अर्थ देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणारा असा आहे ना ? शाळेत असताना अर्ध्या मार्कासाठी असाच अर्थ पाठ केल्याचे आठवतेय. मग मंत्र सामर्थ्य याला आव्हानात्मक विरोध व देव यान्चा काय संबंध ? एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. जप केल्याने माझ्या कोणत्याही मित्राला वा आप्ताला मनोविकारावर ताबा मिळाल्याचे दिसत नाही. धर्म पाळणारा माणूस नास्तिक असू शकतो. असे जर मी विधान केले तर इथे त्याला कुणाचा विरोध आहे का ? असल्यास कळवा मग पुन्हा कळफलक बडवायला मोकळा मी .
एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा संदीप डांगे - Thu, 19/11/2015 - 22:52 एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. यासाठी चौराकाकांशी बाडीस, काका नाद खुळा - Sat, 21/11/2015 - 09:13 उगाच नाही आम्ही पंखे तुम्चे !!!! बाकडा क्रमांक ८