Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संभाजीराजांच्या मुक्ततेसाठी एकही प्रयत्न ????

ह
हेमंत लाटकर
Wed, 12/09/2015 - 06:19
🗣 16 प्रतिसाद
मिपाकरांनो, मला एक प्रश्न सतावतोय, संभाजीराजे संगमेश्वर येथील मुख्य सरदारांची बैठक संपवून रायगडाकडे 1 फेब्रुवारी 1689 रोजी रवाना होत असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरवर हल्ला करून संभाजी महाराजांना व कवी कलशांना पकडले व त्यांचा छळ करून 13 मार्च 1689 रोजी हत्या केली. पण या 40 दिवसाच्या काळात एकाही मराठी सरदाराने, वतनदाराने व मंत्र्याने शंभुराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही अथवा तहाची बोलणी करायला व शंभुराजांना सोडवायला एकही वकील औरंगजेबाच्या दरबारी पाठवला नाही. जनतेनेही कसलाही उठाव केला नाही. यामागचे काय कारण असू शकेल ?
वर्गीकरण
काथ्थ्याकुट

प्रतिक्रिया द्या
4254 वाचन

💬 प्रतिसाद (16)
प
प्रसाद१९७१ Wed, 12/09/2015 - 06:22 नवीन
जनतेनेही कसलाही उठाव केला नाही
भारतातल्या जनतेने गेल्या २ हजार वर्षात एकदा तरी उठाव वगैरे केला आहे का? काहीतरीच अपेक्षा तुमच्या हेला काका
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 12/09/2015 - 06:28 नवीन
असोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रमोद देर्देकर Wed, 12/09/2015 - 06:31 नवीन
अरे किती वेळा तेच तेच काका.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/09/2015 - 06:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
पिवळा डांबिस Wed, 12/09/2015 - 06:40 नवीन
यामागचे काय कारण असू शकेल ?
तुमची मुलगी जर आमच्या पराला देत असाल (कारण आमचं आता लग्नाचं वय राहिलं नाही!) तरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन!!! -मिपावीर पिडांकाका :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/09/2015 - 06:50 नवीन
मी स्वतः जातो सोडवायला महाराजांना पण ह्या पिडांकाकांचे काही ऐकू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पीके Wed, 12/09/2015 - 07:25 नवीन
त्यांचा प्रश्न काय.. तुमच्या चर्चा काय?.. बाकि चालुदे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ह
हेमंत लाटकर Wed, 12/09/2015 - 08:11 नवीन
@ पिंडाकाका, तुम्हाला राजकारणातल्या वाचाळ साठी बुद्धी नाठींची बाधा झाली का? @ अतृप्त आत्मा, आदळआपट का करता. तुमच्या पत्रिकेतील राहू केतू आज बरोबर नाहीत का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/09/2015 - 08:32 नवीन
@ अतृप्त आत्मा, आदळआपट का करता. >> आपला सदस्यकाळ :- 4 months 2 weeks ...,आणि तरी तुम्हाला माझं जुन नाव पूर्ण म्हैत आहे! @तुमच्या पत्रिकेतील राहू केतू आज बरोबर नाहीत का. >> असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
न
नाखु Wed, 12/09/2015 - 10:18 नवीन
सत्य वचन, सुमारे ७ महिन्यापूर्वी केलेल्या काव्यातून अदा अदा जोजवी कविवृंदा गोंधळाला यावे || बदा बदा प्रसवी बोबडकांदा गोंधळाला यावे ||१२|| स्वघोषीत होऊ कैवारी गोंधळाला यावे || अघोषीत भेटू रैवारी गोंधळाला यावे ||१३||

नसे मनाची तरी आस मानाची गोंधळाला यावे || नसे मानाची तरी आस मिपाची गोंधळाला यावे ||१४|| संपूर्ण काव्य इथे आहे

अवांतर (नसलेले) : बाकी सध्या कुठली शांती करताय इथे मिपावर काही शांती करायचीय वेळ काढणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बेकार तरुण Wed, 12/09/2015 - 07:35 नवीन
मला प्रश्न हा पडला आहे की त्या ८० दिवसाबद्दल मधल्या ३२६ वर्षात कोणीच असा धागा काढायचा विचार का नाही केला? नवीन धागा काढावा म्हणतो ह्या प्रश्नावर
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Wed, 12/09/2015 - 10:05 नवीन
हे घ्या. मिपावर या विषयावर खूप चर्चा झालीय. बरीच नवीन माहीती मिळेल येथे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण
आ
आनन्दा Wed, 12/09/2015 - 07:40 नवीन
हे घ्या.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 12/09/2015 - 09:56 नवीन
असले धागे काढण्याआधी वाचन वाढवा, म्हणजे चारचौघात हसे होणार नाही.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Wed, 12/09/2015 - 09:57 नवीन
हेमंत लाटकर , तुम्ही मायबोलीकर रुन्मेष चे डु आय तर नाही आहात? तो ही असे धागे काढुन लोकांची डोकी खराब करत असतो.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 12/09/2015 - 10:05 नवीन
छावा नावाची कादंबरी वाचनात आली होती त्यात असे वर्णन आहे की जी चूक औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या वेळेला केली.(आग्र्याहून सूटका) ती चूक त्याला करायची नव्हती. मराठे प्राणपणाने उठाव करतील अशी औरंग्याला खात्री होती म्हणून त्याने विशेष खबरदारी घेतली होती. जनता उठाव करेल म्हणून आजूबाजूच्या गावातील सर्व घोडे आणि जनावरे जप्त केले होते. पुरुषमंडळींना अटक केली होती. जो भेटेल त्याला भरपूर चोप दीला होता जेणेकरून उठाव करण्याची हींमत होणार नाही. खरे खोटे देव जाणे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा