मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा ! (अजून येणे बाकी !!)
तुर्तासतरी क्षमा असावी, (उघडल्या उघडल्या एक कविता दिसावी अशी अपेक्षा असेल तर, किमान ह्या धाग्यातून स्फुर्ती घेऊन कुणी कविता बनवून प्रकाशित करत नाही तो पर्यंत) खरे म्हणजे इतिहासातल्या मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांना भारतात त्यांच्यावर एक चित्रपट रिलीज झाल्याचे कळले आणि मस्तानीला कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्या वाटल्या अशी एक कविता/ काव्य कल्पना सुचता सुचता माझ्या मनातल्या मनात राहीली, -कविता सुचताना लगेच लिहिणेबल माहोल नाही मिळाला का कोण जाणे उगाचच जरासे अस्वस्थ वाटते - हि कवि मनाची अस्वस्थता स्वतःपाशीच न ठेवता इतरांशीही शेअर करून, 'मस्तानी कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देते आहे' ह्या रुपक कल्पनेवर इतर कुणाला काही कविता सुचतात का पहावे असा उद्देश ठेऊन धागा काढला आहे. सध्या मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांबद्दल बरीच चर्चा चालू आहेच तर मिपाकर कवि/कवियत्री मंडळी कवितेतून जरासे अभिव्यक्त होऊ शकतील का ?मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा ! (अजून येणे बाकी आहेत बरें !!) :)
मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा येई पर्यंत मिपाकर कवि/कवियत्रींपुढे हे एक आव्हान आणि शुभेच्छा.
- हा दिवस नव वर्षाचा आरंभ दीन म्हणून साजरा करावा काय?
उनक चा खडा सवाल- दि १४ नोव्हेंबर पासून नवे वर्ष चालू करणेत यावे..
बाळ (बुद्धी) युवराजांची मागणी.- हुताशनी पौर्णीमेपासून नवीन संवस्तर किंवा साल चालू करावे.(आणि त्याचा विशेष भत्ता देणेत यावा)
दोन्ही सभागृहातील बोलके पोपट आणि (संधी) डोमकावळे बाकी कल्प्ना विस्तार इतरेजनांसाठी खुला ठेवला आहे. प्र.मात्र नाखु