डॉ. सदानंद मोरे यांची महाराष्ट्राची लोकयात्रा
डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) यांची मराठी विकिपीडियावर सध्या नमुद ओळखीनुसार ते मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत. २०१५ साली पंजाब मधील घुमान येथे २०१५ साली झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष आहेत.
त्यांचे साप्ताहीक सकाळमध्ये महाराष्ट्राची लोकयात्रा नावाचे सदर चालू आहे. ते मी अधून मधून वाचत असतो. बरीच माहिती मिळते.
हा घागा लेख काढण्याचा उद्देश त्यांच्या लेख मालेतील मागच्या लेखात "2 मे 1980 या दिवशी "दीनबंधू'च्या नव्या स्वरूपातील पहिला अंक मुंबईहून प्रकाशित झाला." ... "अखेर एप्रिल 1980 मध्ये "दीनबंधू' बंद झाले." ... असे उल्लेख आले आहेत जे प्रथमदर्शनी कालसुसंगत नसण्याची साशंकता वाटते या बद्दल जाणकारांकडून माहिती हवी. (डॉ.मोरेंना त्यांच्या रेडिफमेलवर मेल पाठवीले पण अद्याप उत्तर नाही आले)
अशा चुका राहुन गेल्या की त्या ज्ञानकोशातही कधीकाळी पोहोचू शकतात म्हणून अशा सदरांचे वाचन आणि चर्चा जरूरी आहे असे वाटते.
चर्चेत सहभागासाठी आभार.
💬 प्रतिसाद