कळसुबाई शिखर
गेल्या विकटगडाचा चांगला अनुभव आल्यामुळे शिवशौर्य ग्रुप सोबत हरिहर गड आणि कळसुबाई ट्रेक करायचा नक्की केलं. ऑनलाईन पैसे भरून नोंदणी करून ट्रेक च्या दिवसाची वाट पाहत होतो, काय काय घ्यावे ह्याची पूर्ण लिस्ट साईट वर दिलेली असताना पण पहिलाच "स्टे ट्रेक" असल्यामुळे अतिउत्साहात जास्त वस्तू ब्यागेत भरल्या. ठरल्या दिवशी संध्याकाळी बस मध्ये बसून हरिहर गडाला जायला निघालो. बस मध्ये काही ओळखीचे चेहरे दिसले त्यांच्यासोबत गेल्या ट्रेक च्या आठवणी निघाल्या. नाशिकच्या मुंबई नाक्यावर ट्रेक लीडर योगेश शिरसाट बस मध्ये चढला, सोबत अजून एक दोघे होते. रात्री ३ वाजता एका आश्रमात पोचलो, तिथे थोडा वेळ आराम करून सकाळी हरिहर गडासाठी निघणार होतो.
आश्रम
आश्रमाच्या आवारातील मारुतीराया
सकाळी ६ वाजता ट्रेक लिडरच्या शिटीने जाग आली तर सर्वात शेवटी उठणारा मीच असल्यामुळे थोडस शरमल्यासारख झाल. मग पटापट आन्हिक उरकून ब्याग भरून ठेवली, आणि ग्रुप च्या सदस्यांनी केलेला फक्कड चहा घेतला. ट्रेक लीडरने सर्वाना सूचना दिल्या, नवीन ओळखी झाल्या.
हरिहर गड मागच्या बाजूने
हरिहर गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, ते नेढ, वरून दिसणारा अप्रतिम नजारा डोळ्यात साठवत फिरत होतो. ग्रुपचा नाशिक मधील एक सदस्य क्रिकेट मैच सोडून सर्वांसाठी गरम गरम पुलाव घेऊन आला होता. दोघांच्या खांद्यावर ५० लोकांच जेवण होत आणि इतका गड चढून आले होते. त्यांना कोपरापासून हात जोडले, कारण इतक गरम जेवण ब्यागेत भरून चालण म्हणजे तव पाठीवर घेऊन चालण्यासारख होत. सर्व गड फिरून झाल्यावर उतरताना रोप लावून उतरलो. चढताना पायाऱ्याकडे तोंड करून चढल्यामुळे त्या सरळसोट पायऱ्या धोकादायक वाटल्या नव्हत्या, पण आता उतरताना ती उंची बघून ……… कपाळात आल्या होत्या.
कातळ पायऱ्या ज्याकरता हा ट्रेक करावा
गड उतरताना एक ग्रुप फोटो काढण्याच्या नादात रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्याने गावात उतरला. ट्रेक लीडरने तिथल्या तिथे त्यांची कान उघडणी केली, आणि पुढच्या ट्रेक साठी सूचना दिल्या. बसमध्ये बसून आता कळसुबाई साठी चाललो होतो, एका गावातल्या बोर्ड वर लिहील होत "कळसुबाई माता मंदिर" तर चुकून आम्ही त्या गावात शिरलो. विचारल्यावर कळलं कि आम्हाला पुढच्या बारी गावात जायचं होत. मग परत बस फिरवून एकदाच मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. जेवून लवकर झोपी गेलो कारण सकाळी लवकर उठून ट्रेकला लवकर सुरुवात करायची होती.
थोड्या चालीतच आम्ही बऱ्यापैकी उंचीवर पोचलो होतो. चढत असताना एका ठिकाणी थांबून लिंबू सरबत पियालो. लिंबू सरबताने अशी काही एनर्जी आली की डायरेक्ट शिडीजवळ येउन थांबलो. आता पायऱ्या आणि शिड्यांची वाट होती. बऱ्यापैकी थंडावा आणि धुकं होत. शेवटच्या टप्प्यावर येताना एका टपरीवजा दुकानात ग्रुपचे काही मेंबर कांदा भजीवर ताव मारताना दिसले मग काय आक्रमण, मनसोक्त हादडून झाल्यावर समोरच असलेल्या विहिरीतून थंड बर्फासारख पाणी पियालो. त्या पाण्याची चव खूपच छान होती. वरती जाऊन कळसुबाईच दर्शन घेतलं, तिची खणा-नारळाने ओटी भरली.
कळसुबाई माता प्रसन्न
ग्रुप मध्ये (नवीन) लग्न झालेले आमचे जोडपे असल्यामुळे आमच्याकडून मातेची ग्रुपकडून ओटी भरली. नंतर माझ्या बायकोला उखाण्यासाठी सगळ्यांनी पिडलं, म्हटलं माझ्यावर पण हे सरकणार म्हणून थोडस मागे मागे जात होतो. बायकोचा उखाणा संपताच ज्याची भीती होती तेच झाल मला उखाणा घ्यायला सांगितलं मग काय रहाणेचा उखाणा घेऊन सर्वांची वाहवा मिळवली. नशीब ग्रुप मधले कोणी होम मिनिस्टर बघणारे नव्हते नाहीतर काय खर नव्हत. प्रत्येक ट्रेकला अशा काही न काही गोष्टी घडतात की तो ट्रेक चांगलाच आठवणीत राहील.
ओटी भरून झाल्यावर देवीची आरती केली, ग्रुप मधील शार्दुलने प्रतिज्ञा म्हटली. ग्रुप मधील एका मुलाचा त्याच दिवशी वाढदिवस होता, हरिहर गडावर पाय लचकल्यामुळे तो खरतर कळसुबाई ट्रेक करणार नव्हता पण फोनवरून वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे सावकाश चालत त्याने ट्रेक पूर्ण केला. प्रतिज्ञा झाल्यावर त्याने महाराजांवर एक छानसा पोवाडा गाऊन दाखवला. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस इतक्या चांगल्या ठिकाणी साजरा झाल्यामुळे तो खूप खुश होता.
उतरताना ग्रुप मधील सौरभच आणि माझ लदाख प्रेम सारखच असल्यामुळे त्याच्याशी चांगली गट्टी जमली. येताना लदाखचा प्लान केला, कस जायचं कुठे थांबायचं अस बोलण चालू होत. नंतर निवांत भेटून प्लानिंग करू अस ठरवून ट्रेक ची सांगता केली.
यावेळेला फोटो खूपच कमी काढले त्याबद्दल माफी असावी.
जगप्रवासी
आश्रम
आश्रमाच्या आवारातील मारुतीराया
सकाळी ६ वाजता ट्रेक लिडरच्या शिटीने जाग आली तर सर्वात शेवटी उठणारा मीच असल्यामुळे थोडस शरमल्यासारख झाल. मग पटापट आन्हिक उरकून ब्याग भरून ठेवली, आणि ग्रुप च्या सदस्यांनी केलेला फक्कड चहा घेतला. ट्रेक लीडरने सर्वाना सूचना दिल्या, नवीन ओळखी झाल्या.
हरिहर गड मागच्या बाजूने
हरिहर गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, ते नेढ, वरून दिसणारा अप्रतिम नजारा डोळ्यात साठवत फिरत होतो. ग्रुपचा नाशिक मधील एक सदस्य क्रिकेट मैच सोडून सर्वांसाठी गरम गरम पुलाव घेऊन आला होता. दोघांच्या खांद्यावर ५० लोकांच जेवण होत आणि इतका गड चढून आले होते. त्यांना कोपरापासून हात जोडले, कारण इतक गरम जेवण ब्यागेत भरून चालण म्हणजे तव पाठीवर घेऊन चालण्यासारख होत. सर्व गड फिरून झाल्यावर उतरताना रोप लावून उतरलो. चढताना पायाऱ्याकडे तोंड करून चढल्यामुळे त्या सरळसोट पायऱ्या धोकादायक वाटल्या नव्हत्या, पण आता उतरताना ती उंची बघून ……… कपाळात आल्या होत्या.
कातळ पायऱ्या ज्याकरता हा ट्रेक करावा
गड उतरताना एक ग्रुप फोटो काढण्याच्या नादात रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्याने गावात उतरला. ट्रेक लीडरने तिथल्या तिथे त्यांची कान उघडणी केली, आणि पुढच्या ट्रेक साठी सूचना दिल्या. बसमध्ये बसून आता कळसुबाई साठी चाललो होतो, एका गावातल्या बोर्ड वर लिहील होत "कळसुबाई माता मंदिर" तर चुकून आम्ही त्या गावात शिरलो. विचारल्यावर कळलं कि आम्हाला पुढच्या बारी गावात जायचं होत. मग परत बस फिरवून एकदाच मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. जेवून लवकर झोपी गेलो कारण सकाळी लवकर उठून ट्रेकला लवकर सुरुवात करायची होती.
थोड्या चालीतच आम्ही बऱ्यापैकी उंचीवर पोचलो होतो. चढत असताना एका ठिकाणी थांबून लिंबू सरबत पियालो. लिंबू सरबताने अशी काही एनर्जी आली की डायरेक्ट शिडीजवळ येउन थांबलो. आता पायऱ्या आणि शिड्यांची वाट होती. बऱ्यापैकी थंडावा आणि धुकं होत. शेवटच्या टप्प्यावर येताना एका टपरीवजा दुकानात ग्रुपचे काही मेंबर कांदा भजीवर ताव मारताना दिसले मग काय आक्रमण, मनसोक्त हादडून झाल्यावर समोरच असलेल्या विहिरीतून थंड बर्फासारख पाणी पियालो. त्या पाण्याची चव खूपच छान होती. वरती जाऊन कळसुबाईच दर्शन घेतलं, तिची खणा-नारळाने ओटी भरली.
कळसुबाई माता प्रसन्न
ग्रुप मध्ये (नवीन) लग्न झालेले आमचे जोडपे असल्यामुळे आमच्याकडून मातेची ग्रुपकडून ओटी भरली. नंतर माझ्या बायकोला उखाण्यासाठी सगळ्यांनी पिडलं, म्हटलं माझ्यावर पण हे सरकणार म्हणून थोडस मागे मागे जात होतो. बायकोचा उखाणा संपताच ज्याची भीती होती तेच झाल मला उखाणा घ्यायला सांगितलं मग काय रहाणेचा उखाणा घेऊन सर्वांची वाहवा मिळवली. नशीब ग्रुप मधले कोणी होम मिनिस्टर बघणारे नव्हते नाहीतर काय खर नव्हत. प्रत्येक ट्रेकला अशा काही न काही गोष्टी घडतात की तो ट्रेक चांगलाच आठवणीत राहील.
ओटी भरून झाल्यावर देवीची आरती केली, ग्रुप मधील शार्दुलने प्रतिज्ञा म्हटली. ग्रुप मधील एका मुलाचा त्याच दिवशी वाढदिवस होता, हरिहर गडावर पाय लचकल्यामुळे तो खरतर कळसुबाई ट्रेक करणार नव्हता पण फोनवरून वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे सावकाश चालत त्याने ट्रेक पूर्ण केला. प्रतिज्ञा झाल्यावर त्याने महाराजांवर एक छानसा पोवाडा गाऊन दाखवला. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस इतक्या चांगल्या ठिकाणी साजरा झाल्यामुळे तो खूप खुश होता.
उतरताना ग्रुप मधील सौरभच आणि माझ लदाख प्रेम सारखच असल्यामुळे त्याच्याशी चांगली गट्टी जमली. येताना लदाखचा प्लान केला, कस जायचं कुठे थांबायचं अस बोलण चालू होत. नंतर निवांत भेटून प्लानिंग करू अस ठरवून ट्रेक ची सांगता केली.
यावेळेला फोटो खूपच कमी काढले त्याबद्दल माफी असावी.
जगप्रवासी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas