ईशान्येच राजकारण
उत्तर आणि पूर्व दिशांच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य. नागपूर हा भारताचा मध्य पकडल्यास बंगाल, आसाम, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपूरा हे प्रदेश इशान्येला आहेत. ब्रह्मदेश, चीन, भूतान आणि नेपाळ ह्या देशांच्या सिमा भारताच्या ईशान्येच्या राज्यांना टच करतात. अगदीच मोठी घटना असल्याशिवाय ईशान्येला काय -राजकारण आणि इतरही- काय शिजतय याची गंधवार्ता कानावर कमी पडते आणि चर्चा ही कमी होते.
गेल्या चार सहा महिन्यात इशान्येच्या शेजारच्या देशांबाबत कानावर पडल त्यात चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा झाला राष्ट्रप्रमूखांची तोंड-ओळख चांगली झाली तरीही भारत-चीन आंतरराष्ट्रीय संबंधांचा गुंता सुटणे अजूनही दूर आहे हे लक्षात आले. ब्रह्मदेशात अंशतः लोकशाही आली त्याचा भारताला नेमका फायदा कितपत होतो ते येत्या काळात समजेल. बांग्लादेशशी सिमाविवादांवर तडजोड झाल्याचे दिसले देशांचे म्हणून संबंधांना सुकर होण्याची दिशा थोडी मोकळी झाली तरीही त्या देशात मूलतत्व वादाचा प्रादुर्भाव वाढण्याचीच शक्यता तुर्तास तरी दिसते आहे. भूतान शांतीचाच देश आहे. नेपाळमध्ये स्थानिकांच्या राजकारणाची घडी बर्याच वर्षांनी सुरळीत होण्याची शक्यता एकीकडे दिसतानाच भारतीय वंशी मधेशींचा प्रश्न बराच गरम झाला भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये बराच तणाव आला पण त्या बातम्यांकडे उर्वरीत भारताचे जवळपास दुर्लक्षच झाले.
भारतीय इशान्य राज्यांमध्ये एकीकडे नागालँडच्या प्रश्नाची सोडवणूक होत असल्याची चर्चा होती पण भारत सरकारनी नेमके काय करार केले हे अद्याप गुलदस्तात आहे की माध्यमांनी दुर्लक्ष केले माहित नाही. इशान्येच्या कोणत्याही राजकारणा बाबत चर्चा करण्याचे स्वागत आहे. धागा या क्षणी काढण्यास कारण म्हणजे अरुणाचल प्रदेश मध्ये निटनेटके चालू असलेल्या राज्य व्यवस्थेला राजकीय साठमारीची नजर लागल्याचे दृश्य दिसते आहे ते स्पृहणीय वाटत नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Hold Each Other ft. Futuristic... :- A Great Big Worldमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र