तर भाषणस्वातंत्र्याच्या या कथेतले ढोंगी कोण ? हंस की बगळा ??
"एक बदक, एका मोराला 'कबुतर' म्हणाला" असे हंसाने बगळ्याला सांगितले; तर मोराला 'कबुतर' म्हणावयाची चूक कोणी केली? बदकाने का हंसाने ? कोणताही शहाणा माणूस चूक (असलीतर) बदकाची आहे म्हणेल, हंस बगळ्याला जे घडले आहे ते सांगतो आहे पण बगळा हंसाशी उलटा कसा भांडतो बघा बदकाचा संवाद माझ्या समोर कुणी म्हटला हंसाने म्हटला म्हणजे बदक नव्हे तर हंसच दोषी आहे.
असा विचीत्र न्याय लावून, आज राज्यसभेत काँग्रेसच्या आनन्द (??) शर्मा (?) नामक नेत्याने कमाल करून दाखविल्याचे येत असलेल्या बातम्यांवरुन दिसते (संदर्भ: एनडीटीव्ही डॉटकॉमवर बातमीतील ७वा मुद्दा २६/२.१६ दुपारी दिडवाजता जसा दिसला)
राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरीष्ठ सभागृह आहे. उर्वरीत भारतात आणिबाणी असेल तेव्हासुद्धा संसद सदस्यांचे संसद सभागृहातील म्हणजे लोकसभा अथवा राज्यसभेतील भाषण स्वातंत्र्य अबाधित असते. संदर्भ (सभागृहाने बनवलेल्या निती नुसार एखादा उल्लेख फारतर कामकाजातून वगळता येऊ शकतो) उद्देश सरळ आहे संसद सदस्यांना त्यांची जी काही बाजू असेल ती कोणत्याही आडकाठी शिवाय मांडता आली पाहीजे.
JNU मध्ये पौराणिक देवता दुर्गेच्या महिषासूरमर्दीनी रुपाचा काही विद्यार्थ्यांकडून अनमान केला जात होता असा उल्लेख राज्यसभेत मंत्रि स्मृती इराणींनी घेतला. JNUच्या 'त्या' डॉकुमेंटात जे काही आहे ते राज्यसभेत स्मृती इराणींनी वाचून दाखवले.
एनडीटीव्ही डॉटकॉमवर बातमीतील ७वा मुद्दा बरोबर असेल तर आता हे आनंद शर्मा तुम्ही राज्यसभेत वाचूनच कसे दाखवले म्हणून स्मृती इराणींच्या नावाने गहबज करत आहेत. म्हणजे त्यांना (की काँग्रेसला ?) राज्यसभेतील भाषण स्वातंत्र्य मान्य नाही, JNUती विद्यार्थ्यांनी भाषणस्वातंत्र्याचा अनावश्यक वापर केला तो मात्र मान्य आहे असा हा विचीत्र न्याय आहे. राज्यसभेतील भाषण स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे ते हिरावून घेणे कुणाच्याही बसची बात नाही पण असे विचीत्र बादरायण संबंध दाखवून सर्वसामान्य जनतेला येडा का खुळा नेमके काय समजण्याचा प्रयत्न हि मंडळी करत आहेत ?
संसदेच्या ज्येष्ठ सभागृहात काहीतरी गुणात्मक चर्चा कराना देशाचा पैसा का वाया घालवतात ते आकलना पलिकडे आहे.
स्मृती इराणींसारख्या एका कलावंताला तुच्छ ठरवण्याचा कट यामागे शिजतो आहे काय?फॅसीझमचे व्यवच्छेदक लक्षण नंबर ११ब्राम्हणी समाजव्यवस्थेने आपल्यावर हे सर्व थोपले.आदर्श राजांना असुर म्हणुन हिणवले. रावणावर महात्मा रावण पुस्तक आहे. बळी, महिषासुर यांचीही गौरवपर पुस्तके आहेत, हिरण्यकश्यपुचेही गुणगाण आहे. मोदी यायच्या आधिपासुन अशा विचारधारा आहेतअहो पण मुळात रावण ब्राह्मण होता आणि अटलबिहारी वाजपेयी ज्या वंशाचे आहेत (कान्यकुब्जवंशीय कनौजी ब्राह्मण) ते लोक नियमीतपणे रावणाची पुजा करतात. :))