Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समर्थाचिया सेवका वक्र पाहे...

व
विकास
Fri, 03/18/2016 - 15:50
🗣 125 प्रतिसाद
गेल्या ६ ते ८ महीन्यांमध्ये असहीष्णुता आणि त्याला अनुसरून व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा सद्य भारत सरकारच्या कारभारामुळे होत आहे यावरून माध्यमात कशी आणि कुठल्या कुठल्या कारणाने चर्चा झाली, हे येथे सांगत बसायची गरज आहे असे वाटत नाही... :) हे सर्व चाललेले असताना वास्तवीक तमाम वृत्तपत्रे-माध्यमे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण कडक टिका करण्यात मागे पडत नव्हती. ही टिका केवळ सरकारवरच नव्हती तर बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानावर देखील तितकीच होती आणि अजूनही होते. काही वेळेस तर ती श्रध्दास्थानापेक्षाही दहशतवाद्यांना शिक्षा दिलेल्या कशा चुकीच्या होत्या, ते कसे बापडे होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयावर पण अप्रत्यक्ष टिका होती. अनेकांना ती आवडली नव्हती हे वेळोवेळी आलेल्या विविध सामाजिक माध्यमांतील प्रतिक्रीयातून स्पष्ट होत होते. तरी देखील वृत्तपत्रे आणि टिव्ही माध्यमांना त्यांच्या भावनांपेक्षा व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचे वाटले. व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचेच आहे आणि सत्याला धरून जर समाजोपयोगी टिका असली तर ती नेहमीच करावी अशा मताचा मी आहे. म्हणूनच, येथे एक स्पष्ट करू इच्छीतो की जी टिका ही सत्याला धरून असेल, तर्क-"सुसंगत" असेल ती कुणावरही केली असली तरी योग्यच आहे. वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम करणे हे नुसते पोटभरू संपादक नसल्याचे लक्षण आहे, ते समाजातील एका प्रमुख घटकाचे जिवंतपणाचे लक्षण आहे. आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे, १७ मार्चच्या लोकसत्तेत आलेला "असंतांचे संत" हा मदर तेरेसा - पोप/कॅथलीक संस्थेवर टिका करणारा अग्रलेख लिहीला गेला. अर्थात हा अग्रलेख देखील "सेक्युलरी समतोल" वृत्तीने लिहीला होता. म्हणजे असे की सुरवातीसच बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर यांना फटकावले होते, अशोकाचा बुद्ध धर्मप्रसार आणि सौदी अरेबियातील वहाबी धर्म वगैरे सर्वांना आणले होते. पण मूळ विषय होता, मदर तेरेसांना बहाल केले जाणारे संतपद आणि प्रामुख्याने टिका होती, ती कॅथलीक संस्थेवर आणि त्यांचा रोख राज्यविस्तारावर कसा असतो या संदर्भात. संतपद देताना चमत्कार कसे बघितले जातात या संदर्भात, वगैरे, वगैरे... ज्यांना सध्याच्या लोकसत्तेच्या अग्रलेखांचा रोख माहीत आहे, त्यांना (सेक्युलरी समतोलपणा असला तरी) सुखद आश्चर्य वाटले... वास्तवीक आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. जे लिहीले होते ते बुद्धीवादी होते आणि ज्यांच्या बुद्धीवादाचा कमीजास्त प्रभाव आहे अशा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवळकरांचे जे काही परखड विचार मदर तेरेसांबाबत होते त्याचेच ते थोडेफार प्रतिबिंब होते, असे कुठेतरी वाटले. (अर्थात ती कॉपी नव्हती हे देखील खरेच ध्यानात ठेवावेत). पण जो चमत्कार कुठल्याही संतपदाला पोचलेल्या व्यक्तीला उभ्या हयातीत जमला नसता, तो या निमित्ताने झाला! १७ मार्चच्या अग्रलेखावर १८ मार्चला लोकसत्तेच्या छापिल आणि ऑनलाईन आवृत्तीत, "असंतांचे संत - क्षमस्व! प्रिय वाचक!, ‘असंतांचे संत’ या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. – संपादक" अशी लोकसत्तेच्या वतीने नाही तर संपादकाच्या वतीने माफी मागितली गेली. अग्रलेख तात्काळ अप्रकाशीत केला गेला. २४ तासाच्या आत, बिगरसरकारी, बिनचेहर्‍याच्या, बिन (जाहीर) आवाजाच्या कुठल्यातरी अज्ञात शक्तीने एका वृत्तसंपदाकचे व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला. माझ्याकडे आकडेवारी नाही पण माझ्यालेखी सुसंगत तर्क आहे: लोकसत्ता हे मराठी वाचकांचे पत्रक. आजपर्यंत त्यात अनेकदा बहुसंख्यांकांच्या भावना दुखावणारे लिहून आले आहे आणि त्यावर अनेकांनी टिका देखील केली आहे. त्यामुळे हा लेख मागे घेण्याचे कारण बहुसंख्य असणे जरा अवघड वाटते. बहाई आणि बुद्ध धर्माचा उल्लेख आला असला तरी तो संदर्भापुरताच, पक्षि: टिका करणारा उल्लेख नाही. फक्त, त्यांच्याबद्दल पण लिहीले आहे असे for the record ठेवायला म्हणून आलेला आहे. म्हणजे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही. मग एकूण टक्केवारीच्या किती जण हे कॅथलीक आहेत जे मराठी आहेत आणि जे लोकसत्ता वाचतात आणि ज्यांनी तो अग्रलेख वाचल्याने त्यांच्या भावना दुखावल्या? लोकसत्तेच्या अग्रलेखांमधील प्रत्येक विचाराशी मी सहमत असेनच असे नाही, पण भाषा आणि माहितीसाठी ते नक्कीच चांगले असतात. तरी देखील असे वाटते की या अग्रलेखांना लोकसत्तावाचक मराठी समाज ही एक अपरीहार्य मर्यादा आहे. तरी देखील जर तात्काळ माफी मागावी लागत असेल तर खरेच धक्कादायक आहे. वास्तवीक जे झाले ते दुर्दैवी आहे... एक टिकात्मक अग्रलेख मागे घ्यावा लागला म्हणून नाही, मदर तेरेसा अथवा कॅथलीक्स वरील टिका होती म्हणून तर अजिबातच नाही. तर या प्रकरणात जो काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला गेला आहे, त्यासंदर्भात हे अधिक वाटले. कधी काळी समर्थ रामदासांनी, "समर्थाचीया सेवका वक्र पाहे..." असे म्हणले होते. अर्थात या घटनेत समर्थ कोण आहे, तसेच कोणी त्याच्या सेवकाकडे वक्र पाहीले हे स्पष्ट झालेच आहे. पण या निमित्ताने ज्यांना रामदासी वाड्मय आवडते, ज्याचा ते अभ्यास करतात, त्यांनी त्याचाच उपयोग करून, आपल्याला अभ्यास-साधनेतून आलेल्या विद्वत्तेच्या देणगीचे आत्मपरीक्षण करावे नाहीतर..
"जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे"
असे म्हणायची वेळ येऊ शकते.
वर्गीकरण
माध्यमे

प्रतिक्रिया द्या
51616 वाचन

💬 प्रतिसाद (125)
त
तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 13:05 नवीन
नाही ते समजले हो. पण माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या मुद्द्याबद्दल तुम्हाला ही गीता सांगावी वाटली ते कळले नाही. ह्यातले इतर कोण आहेत ते स्पष्ट केलेत तर मजसारख्याला समजेल तरी. बाकी, मिसळपाव चर्चांमधे उच्च अलंकारिक भाषेत एखाद्यास गाढव म्हणणे सर्वसंमत असावे. तेच आम्ही सरळ सरळ म्हटले की लोक पिसाळतात. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ग
गामा पैलवान Mon, 03/21/2016 - 07:55 नवीन
एच्चमंगेशराव, १. >> ( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . ) अगदी बरोबर बोललात पहा. आता हिंदू जागा होऊ लागलाय. नेमकं तेच तुमचं दुखणं आहे. वेलकम टू मिपा. २. >> २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे. जगाचे उकिरडे फुंकून पारितोषिकं मिळवायची वेळ अजूनतरी हिंदूंवर आलेली नाहीये. सुदैवाने वा दुर्दैवाने जे काही असेल ते. तरीपण तुमच्या सल्ल्याबद्दल आभार. आ.न., -गा.पै. जाताजाता : एच्चमंगेशराव हे बटाट्याच्या पुस्तकातलं नाव घेतांना तुम्हाला अजिबात लाज वाटली नसेल.
  • Log in or register to post comments
H
hmangeshrao Mon, 03/21/2016 - 11:54 नवीन
जागे होताय ? व्हा ! उत्तिष्ठितजाग्रत प्राप्य नोबेल सत्वरं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पैसा Mon, 03/21/2016 - 13:40 नवीन
जामोप्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao
त
तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 13:50 नवीन
और का? बाकी ह्या व्यक्तीचे इतके आयडी आले आणि ब्यान झाले. काय करतो काय हा असे ब्यान होण्यासारखे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ह
होबासराव Mon, 03/21/2016 - 15:12 नवीन
बास क्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 13:08 नवीन
माघार जरी चुकीचं पाउल असलं तरी त्यानिमित्ताने हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहोचला हे मात्र चांगलं झालं !!
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/21/2016 - 13:56 नवीन
सहमत. त्याच बरोबर, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज उठवणारे एकंदरीतच गप्प बसलेले पाहून आश्चर्य वाटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 14:10 नवीन
चॅनलवर उहापोह झाला नाही वा ट्वीटरवर ट्रेंड झालं नाही म्हणजे सगळ्यांना ही माघार घेणं पटलयं असा सोयीस्कर निष्कर्ष काढायचीही गरज नाही.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आजानुकर्ण Mon, 03/21/2016 - 15:06 नवीन
, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज
विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे. या वेळी केतकर आठवले. अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही. कुबेर यांची मात्र या सर्व प्रसंगात चांगलीच शोभा झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
व
विकास Mon, 03/21/2016 - 16:20 नवीन
विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे. पूर्ण सहमत. आपण निषेध केलात याचे चांगल्या अर्थाने आश्चर्य वाटले नाही. वास्तवीक, लेख लिहीताना हा मुद्दा डोक्यात पण नव्हता. मात्र काही प्रतिसाद ज्या पद्धतीने येऊ लागले त्यामुळे असे नक्कीच वाटू लागले. असो. अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही. खरे आहे. या वरून मला विनोद मेहतांची आठवण झाली. त्यांनी The Independent म्हणून एक नियतकालीक चालू केले होते. ज्या प्रमाणे आठवते त्याप्रमाणे ते अतिशय प्रोफेशनल होते. टाईम्स ला वगैरे सहज हरवू शकले असते. ते मुंबईतच चालू झाले होते, सुरवातीस ते मोफत वाटायचे आणि नंतर ते मुंबईतच बंद पडले.. या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता. महाराष्ट्रातील तमाम पक्ष एकत्र येऊन विरोधात बोलले होते. मला वाटते पवार मुख्यमंत्री असावेत तेंव्हा पण ते पण अर्थातच यावर आक्षेप घेण्यात पुढे होते. विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आला. त्याचे काय झाले ते आठवत नाही. पण त्यांनी, "जर-तर"च्या भाषेत मोघम माफी मागितली होती. म्हणजे आत्ता कसे, "वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो...." असे स्पष्ट म्हणले आहे. त्याउलट, तेंव्हा "जर वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल..." अशा अर्थाची माफी (म्हणजे, मी चुकलो वगैरे नाही) मागितली होती. तसेच अंतुलेंचे प्रकरण जेंव्हा बाहेर आले तेंव्हा, "अंतुलेंच्या साडूच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी, सिद्धीविनायका तूच सिद्ध हो" असा रविवारचा दृष्टीक्षेप लिहून माधव गडकरींनी हक्कभंग प्रस्ताव ओढवून घेतला होता. अर्थात पुढे काय झाले ते आठवत नाही. पण गडकरींवर कारवाई झाल्याचे ऐकीवात तरी नाही. पण या दोन्ही गोष्टी राजकीय होत्या... वर चर्चाप्रस्तावात म्हणल्याप्रमाणे, म.टा.चे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवळकर यांचा एक मदर तेरेसांवर ताशेरे ओढणारा लेख वाचल्याचे आठवते. त्यात, त्यांची एक आठवण देखील होती...(मी आता आठवणीतून लिहीत आहे) एकदा ते आणि मदर तेरेसा एकाच विमानात एकाच लाईन (रो मध्ये) बसले होते. संपुर्ण विमानातले सगळे जण या बाईंच्या पाया पाडून गेले. तळवळकरांना त्यांच्याबद्दल राग होता कारण त्यांचे काम प्रामाणिक वाटत नव्हते. शिवाय असले नमस्कार करण्यात इंटरेस्ट नसल्याने, ते करायला गेले नाहीत. थोड्यावेळाने फ्लाईट अटेंडंटकडून त्यांना एक चिठ्ठी मिळाली. मदर तेरेसांनी त्यात "गॉड ब्लेस यू" अथवा तत्सम आशिर्वादपर संदेश दिला होता. अर्थातच त्यात गर्भितपणे, "तू मला नमस्कार करायला आला नाहीस" अशा अर्थाचे निरीक्षण देखील केले होते असे तळवळकरांच्य लक्षात आले. वास्तवीक त्यांचा हा लेख वाचेपर्यंत इतर कुठल्याही तत्कालीन व्यक्तीप्रमाणे, मदर तेरेसांबद्दल माझे मत निगेटीव्ह नव्हते. पण तळवळकर म्हणतात म्हणल्यावर लक्ष गेले आणि नंतर कधीकाळी न्यूयॉर्क टाईम्समधे देखील तसेच नकारात्मक लेख वाचल्यावर खात्री पटली... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
श
श्रीगुरुजी Mon, 03/21/2016 - 18:15 नवीन
या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता.
अमेरिकन पत्रकार सेमूर हर्श (Seymour Hersh) यांनी १९८३ मध्ये The Price of Power: Kissinger in the Nixon White House हे एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी मोरारजी देसाई हे इंदिरा गांधींच्या सुरवातीच्या काळात सीआयचे हस्तक होते असा आरोप केला होता. हर्श यांचा असा आरोप होता की जॉन्सन व निक्सन अमेरिकेचे अध्यक्ष असण्याच्या काळात मोरारजी देसाईंनी भारताचे परराष्ट्र धोरण व स्थानिक धोरणाची महत्त्वाची माहिती सीआयएला २०००० डॉलर्स (तत्कालीन ३.४० लाख रूपये) च्या बदल्यात दिली होती. त्यामुळे मोरारजी देसाईंनी सेमूर हर्श विरूद्ध अमेरिकन न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. मोराराजी देसाई हेच मंत्रीमंडळातील हेर होते हे सेमूर हर्श यांना सिद्ध करता आले नाही. परंतु त्या आरोपामुळे मोरारजींची बदनामी झाली आहे हे मोरारजींच्या वकीलाला सिद्ध करता आले नाही व त्यामुळे तो खटला मोरारजी देसाई हरले. नतर १९८९ च्या उत्तरार्धात टाईम्स गटाच्या द इंडिपेंडंट या नवीन इंग्लिश दैनिकात पहिल्या पानावर मोठी बातमी देऊन विनोद मेहतांनी असा आरोप केला होता की सेमूर हर्श यांच्या पुस्तकात उल्लेख केलेला केंद्रीय मंत्रीमंडळातील सीआयए चा हेर हे मोरारजी देसाई नसून यशवंतराव चव्हाण होते. हा आरोप प्रसिद्ध झाल्यावर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली. मुंबईत व इतरत्र मोर्चे निघाले. आपले आरोप सिद्ध करण्यासाठी विनोद मेहतांना कोणतेही पुरावे देता आले नाहीत व शेवटी त्यांना माफी मागून आरोप मागे घ्यावे लागले. काही काळातच हे दैनिकही बंद झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
शलभ Mon, 03/21/2016 - 13:11 नवीन
१०० झाले. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 03/21/2016 - 15:09 नवीन
अह्हा हितेश दरेकर उर्फ मग्गा वापिस आयेला हय... काय जंत बर झालेत का?
  • Log in or register to post comments
H
hmangeshrao Mon, 03/21/2016 - 18:50 नवीन
अख्ख्या देशालाच जंत झालेत. २०१४ पासुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
मदनबाण Tue, 03/22/2016 - 05:18 नवीन
अख्ख्या देशालाच जंत झालेत. २०१४ पासुन संपादक सुट्टीवर गेलेत वाट्ट...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao
H
hmangeshrao Tue, 03/22/2016 - 05:30 नवीन
आमचे एक डी एच ओ ( म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ... म्हाणजे जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रातील डोक्टरांचे बॉस , ते स्वतः माळकरी होते.) आम्हाला सतत सांगायचे... भारत ही संतांची व जंतांची भूमी आहे. ( पेशंटला ताप , खोकला , डायरिया , अ‍ॅनेमिया , भूक नसणे , व्हिट्यामिन कमतरता , अ‍ॅलर्जी .... काहीही असले तरी जंताना विसरू नका. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बोका-ए-आझम Tue, 03/22/2016 - 19:02 नवीन
तुम्हीही याच देशात राहता, बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao
ह
होबासराव Wed, 03/23/2016 - 09:37 नवीन
कुठे घाणित दगड मारताय... इग्नोर मारो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 03/22/2016 - 05:12 नवीन
उठ सुठ केंद्रीय सरकारवर टीका करणाऱ्यांना मोदींचा काही पर्याय दिसतो आहे का,म्हणजे कोणती पार्टी हि मोदींपेक्षा चांगला कारभार देऊ शकेल,मुसळमान आणि बाकीचे सर्व वेमुला किंवा कन्हैय्या पंथाचे अल्पसंख्याक हे न भिता राहू शकतील,आर्थिक प्रगती हि सुसाट होईल,भ्रष्टाचार होणार नाही,पुरस्कार वापसी हि होणार नाही (आता ह्या उपटसुभं लेखकाना त्यांचे खाऊ सरकार असल्यावर पुरस्कार वापसी ची गरज काय)fti च्या विद्यार्थ्यांना आंदोलनाची गरज भासणार नाही,jnu ला हिंदुस्थान मुर्दाबाद वैगरे घोषणा दिल्या म्हणून कोर्ट कचेरीचे भय राहणार नाही, ओवेसी ला भारत माता कि जय म्हणायची गरज भासणार नाही,हिकडे राणे पुत्राला मराठ्यांचा नेता म्हणून स्थापित होता येईल,भुजबळ बाहेर येतील,तिकडे मालदा मधल्या निर्दोष मुस्लिमांना पोलिसांवर हल्ला करण्याचे भय राहणार नाही।तिस्ता ,पाटकर ह्या फोर्ड चा पैसा विना भय घेऊ शकतील,ग्रीन पीस हि संघटना पर्यावरण हाणीचे प्रकल्पाला विदेशी पैशाने विरोध करू शकतील।केजरिवाल ,सरदेसाई ,बरखा ह्यांना मोदींच्या नावाने कंठशोष करायची गरज भासणार नाही,है कोई
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 03/22/2016 - 07:45 नवीन
आज बोले तो कन्हैया मिलनेकु जा रा उस्से ! सबका प्यारा, राजदुलारा......अपना ही......पैचानो ??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
म
मितभाषी Tue, 03/22/2016 - 08:00 नवीन
बहुतेक लोकांना मोदीचाय व्हीजनबद्दल शंका नसावी. हे वाचाळवीर, भक्त, मनुवादी यांच्यामुळे जातीय तेढ वाढत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
म
मितभाषी Tue, 03/22/2016 - 08:02 नवीन
*मोदीच्या असे वाचावे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/22/2016 - 09:48 नवीन
विचारस्वातंत्र्याच्या दडपशाहीचे अजून एक जुने उदाहरण आहे. पण ही दडपशाही पुरोगामी विचारवंत समजल्या जाणार्‍यांनीच केली असल्याने त्याला दडपशाही म्हणता येणार नाही. १९८८ किंवा १९८९ मध्ये 'माणूस' नावाच्या साप्ताहिकात (त्यावेळी संपादक कोण होते ते आठवत नाही) बाळ गांगल यांनी 'महात्मा फुले व त्यांचा सत्यशोधक समाज' अशा शीर्षकाचा एक टीकात्मक लेख लिहिला होता. तो लेख प्रसिद्ध झाल्यावर प्रचंड वादळ उठले. ब्राह्मण संपादक असलेल्या सदाशिव पेठेतून प्रसिद्ध होणार्‍या साप्ताहिकात ब्राह्मण लेखकाने बहुजन समाजाच्या नेत्यांवर लिहिलेल्या टीकात्मक लेखाने एकदम जातीयवादी धुरळा उडाला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. विधानसभेत या लेखावर चर्चा होऊन कडक टीका करण्यात आली. पुण्यातील तत्कालीन महापौर (बहुतेक काकडे असावेत) आपल्या गाडीतून ४-५ जणांना घेऊन साप्ताहिकाच्या कार्यालयावर दगडफेक करून काचा वगैरे फोडल्याचे वृत्तपत्रातून आले होते. नंतर पुढे काय झाले ते आठवत नाही. माणूस साप्ताहिक नंतर केव्हा तरी बंद झाल्याचे आठवते. छगन भुजबळांनी १९९१ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा हे एक कारण वापरले होते. त्यांनी बाळासाहेब ठाकर्‍यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात "तुम्ही इतर मागासवर्गियांना राखीव जागा देणार्‍या मंडल आयोगाला विरोध केला, महात्मा फुल्यांची बदनामी करणार्‍या बाळ गांगल यांना पाठीशी घातले" असे आरोप इतर आरोपांबरोबर केले होते.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Tue, 03/22/2016 - 17:02 नवीन
महात्मा फुले नी पुण्यात वर्तमानपत्र काढल्यास प्रेस जाळून टाकू अशा जाहीर धमक्या दिल्या होत्या. म्हणून त्यांनी ते काम मुंबईतुन करावे लागले. हे सोयीस्करपणे विसरले जाते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा