मस्त शैली आहे.
पण नैतिक बोध पटला नाही. हा वादविवादात्मक मुद्दा पटवण्यासाठी अतिलघुकथेचा आवाका फार लहान आहे.
चित्रकाराने मॉडेलला नेमके किती शुल्क द्यावे - हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ लिओनार्दोने अमुक मॉडेलचे चित्र काढले आणि "स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन" आपल्याला "मोनालीसा" चित्रात दिसते. त्या मोनालीसा चित्राची किंमत करोडो रुपये आहे. मॉडेलला मोबदला मिळाला, त्याच्या कितीपट चित्राची किंमत आहे?
एक "मॉडल"ला किती पैसे मिळावेत आणि एका भिकार्याला पैसे किती मिळावेत हे सर्वस्वी वेगळे प्रश्न आहेत असं मला वाटतं. मॉडल्सतर पैसे देऊन स्वतःची चित्र/छायाचित्र काढून घेत असतील, पण भिकार्याचं काय, ज्याला दोन वेळचं धड खाणंही परवडत नाही?
भिकूने अजयकडून भीक मागितल्याचा तपशील अतिलघुकथेत आलेला नाही.
अजयने "फोटो काढतो" म्हणून सांगितले आणि भिकूच्या कुटुंबाने संमतीच नव्हे पोझेसही दिल्यात.
समजा अजयला पारितोषिक मिळाले नसते - मग त्याने दिलेल्या ५०-५० रुपयांचा काय हिशोब लावावा? अजयला प्रत्येक वेळी पारितोषिक मिळतच असते, तर मग कदाचित त्याच्यापाशी ५०-५० रुपये देताना ५०००ची शाश्वती होती, त्याने निव्वळ नफा किती ठेवायला पाहिजे, कलात्मक फोटोचे मूल्य किती लावायला पाहिजे, वगैरे हिशोब करता येतील.
समजा - भिकू होताच भिकारी. आणि अजय व्यावसायिक छायाचित्रकार होता, आणि पुरस्कार नव्हे त्याला अमुक रुपये फोटो-विक्रीतून मिळणार अशी शाश्वती होती. व्यायसायिक छायाचित्रकाराने भिकार्यांचे फोटो काढण्याच्या वेळी कुठले निकष वापरावेत असे तुम्हाला वाटते? आपल्या पगाराचा/मिळकतीचा किती अंश त्याने भिकूला द्यावा - १०%, २०%, ५०%... वगैरे? यासाठी काय हिशोब वापरावा?
येथे माझा हा नैतिक आक्षेप नव्हे की असा हिशोब करू नये. अतिलघुकथेचा आवाका या मोठ्या प्रश्नासाठी फार लहान आहे, अशी साहित्यिक टिप्पणी आहे.
छायाचित्रकाराने गरीब भिकूला किती पैसे द्यावेत ह्याचा काही व्यावहारीक हिशोब मांडता येणार नाही.
त्या व्यावसायिक छायाचित्रकाराला 'फ्रेम' मध्ये पोटेन्शियल दिसले. म्हणून तो ५० रुपयांचा जुगार खेळला. तो हरला असता तरी त्यात काही गैर नव्हते. पण तो 'तो' जुगार जिंकला. त्याला पारितोषिक मिळाले. ५००० रुपये मिळाले. मानमरातब मिळाले असणार. व्यावसायिक बढती मिळाली असेल. त्यातून पुन्हा आर्थिक लाभही झाला असेल. त्या छायाचित्रकाराच्या जागी मी असतो तर त्या गरीब भिकूला गाठून पुन्हा हजार - दिड हजार नक्कीच दिले असते. कृतज्ञतेच्या भावनेतून.
असो. कथेचा आत्मा, म्हणजेच, भिकूचे प्रारब्ध मनाला स्पर्शून गेले. छायाचित्रकाराने त्याला लुटले, त्याच्या गरीबीचा गैरफायदा घेतला किंवा तो त्याला विसरला म्हणून नव्हे.
हा माझा व्यक्तिगत दृष्टीकोन आहे.
व्यवहारिक जगात सगळ्यांनाच तडजोडी कराव्या लागतात. थोडा फायद्याच्या बाजूला जो आहे त्याने यथाशक्ती जाण ठेवून कृतज्ञता ठेवावी हा विचार पटण्याजोगा आणि मुख्य म्हणजे अमलात आणण्याजोगा आहे.
चतुरंग
शेजारी फाटक्या गोधडया, चिंध्यांची गाठोडी ठेवलेली होती. साडीच्या चिंध्या पांघरलेल्या बायकोचा फाटका पदर डोक्यावर होता.
शिवराज पाटील यांच्यावर या लघुकथेचा काही परिणाम होइल का?
रेवती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी