Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा ??

अ
अत्रन्गि पाउस
Fri, 05/06/2016 - 04:47
🗣 139 प्रतिसाद
पोलिसांच्या राजेबद्द्ल ची हि बातमी वाचून एक सलत असलेला विषय मांडावासा वाटतोय. आपल्या कडे एकूणच रजा घेणे हे काहीतरी चूक, पाप, अनैतिक किंबहुना अनावश्यक आहे ...नाईलाज म्हणून रजा हा प्रकार अस्तित्वात आहे अशी काहीशी मानसिकता आहे. रजा देणारा, स्वत:च्या खिशातून काहीतरी मेहेरबानी म्हणून दिल्यासारखी रजा देतो आणि घेणारा रजा मिळाली कि 'हुश्श' करतो असे सर्वसाधारणपणे दिसते. पुलंनी म्हटल्याप्रमाने (विनोदाने का होईना) "कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची १२०० सुलभ कारणे" वगैरे हे ह्याच मानसिकतेची अपरिहार्य परिणती आहे. आपल्याकडे आपण जनरली १ २ दिवस रजा घेतो पण ती घेतांना काहीशी चोरटे पणाची भावना असते... रजेवर गेलास तरी फोनवर उपलब्ध राहा अशी मूक आज्ञा बॉसच्या चेहेऱ्यावर स्वच्छ लिहिलेली असते ...आणि क्वचित वेळीप्रसंगी रजा रद्द करून परत यावे लागण्याची उदाहरणे पाहिलेली आहेत. पाश्चात्य जगात लोक २ -२/ ३- ३ आठवडे रजा वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा अगदी सहज घेतांना दिसतात .. ...कामाची काही का आग लागेना रजा रद्द करून परत आलाय किंवा रजेवर गेलाच नाही ...असे मी कधीही पहिले नाही ... जे हक्काच्या रजेचे तेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्ट्यांचे, आपल्याकडे कुणीही कधीही कुणालाही फोन करून कामाचे बोलू शकतो, पाश्चात्य जगात सुट्टी सोडा कामाचे तास सोडून कुणी फोनवर एरवी प्रतिसाद सुद्धा देणार नाहीत (ह्याला अपवाद म्हणजे खरोखरीचे काहीतरी जबरदस्त कारण असते). ह्याच्यावर कडी म्हणजे रजा किती साठवता येते ह्यावर दिवसेंदिवस येणारी बंधने ...म्हणजे वरच्या रजांचे नं पैसे मिळणार नं त्या पुढे घेण्याची सुविधा मिळणार ...आणि त्या फक्त वाया जाणार म्हणजे पर्यायाने कर्मचार्याचे नुकसान ... माझा अनुभव खाजगी क्षेत्रातला आहे पण सार्वजनिक क्षेत्रात फार बरी परिस्थिती असेल असे वाटत नाही .. हे असे का ? बदलायला नको का ?काय करता येईल ? जाता जाता : माझ्यापुरते बोलायचे तर मी माझ्या टीम्स मध्ये रजेला कधीही नाही म्हणत नाही, कारणांची उलटतपासणी नाही किंबहुना रजा घेण्यासाठी उद्युक्त करतो ... जेणेकरून टीम मध्ये एक तणावरहित वातावरण निर्माण होते .. लोक एकमेकांची जास्त काळजी घेतात आणि एकमेकांच्या रजांमध्ये कामाची खोटी होऊ देत नाहीत ...आणि त्यातून काही खोटी झालीच तर मी जबाबदारी घेऊन कुणाला झळ बसू देत नाही आणि ह्यामुळे खरे तर उरला सुरला तणाव सुद्धा नाहीसा होतो ...
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
36382 वाचन

💬 प्रतिसाद (139)
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 12:36 नवीन
होमात टाकुन द्यायचा आधी फोन आणि मग जीवन मरणाच्या शपथा घ्यायच्या गोल गोल फिरुन. हा केवळ पिरा प्रतिसाद !! इतर सर्व परखड सत्य ! बादवे, ते बोका-ए-आझम, मृत्यंजय नाहीत... की तुम्ही त्यांचे गुपित उघडे केले आहे ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 05/06/2016 - 12:47 नवीन
एकाच प्रतिसादात दोन चार लोकांना रेफर करायची सवय आहे मला. काय तुम्ही लोक्स!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 12:52 नवीन
मग नावापुढे @ टाका. नाहीतर डुआयडीचा उगिचच आळ यायचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 05/06/2016 - 12:59 नवीन
कुणीतरी टाका रे तो @!!! किंवा सध्या समजुन घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बोका-ए-आझम Fri, 05/06/2016 - 14:29 नवीन
मी सप्तपदीच्या वेळी फोन का बरोबर घेऊन फिरत होतो हे मलाही आठवत नाहीये आज. मला वाटतं तो बहुतेक कुणाकडे तरी द्यायचा राहिला असावा. होमात टाकून न देण्याचं कारण बायकोनेच gift दिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आदूबाळ Fri, 05/06/2016 - 15:05 नवीन
होमात टाकुन द्यायचा आधी फोन
पेटत्या होमात फोन टाकला तर ब्याट्रीचा स्फोट होऊ शकतो. अपारंपारिक प्रकारे लग्न करायचं म्हटलं तरी अशा घातक गोष्टी करू नैत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 05/06/2016 - 17:12 नवीन
बायकोचा स्फोट होण्यापेक्शा बरं की ते!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 13:07 नवीन
निदान : याचा अर्थ बर्‍याच बाबतीत कंपनी तुमच्यावर अवलंबून आहे... पण त्याचबरोबर तुम्हाला "नाही" म्हणणे जमत नाही याचाही गैरफायदा घेतला जात आहे. ही केवळ तुमचीच नाही तर अनेक हुशार लोकांची समस्या आहे... कारण, बॉस लोक, इतर बाबतीत कितीही बावळट (दिसत) असले तरी, महत्वाचे काम आग्रह करून बुद्दू माणसाच्या (तेही तो सुट्टीवर असताना) गळ्यात मारून आपल्या पायावर धोंडा पाडून न घेण्याइतके नक्कीच हुशार असतात. उपाय : "How-to-say-no-at-work" अशी विचारणा गुगल्यावर करा. नको नको होतील इतके संदर्भ मिळतील. (या विषयांवर एक इंडस्ट्री तयार झालेली आहे आणि अनेक सल्लागार मिलिओनेर झाले आहेत.) त्यातून तुमच्या स्वभावाला आणि कंपनी कल्चरला साजेसे उपाय निवडा. एक एक करत टेस्ट डोज देऊन पहा. प्रयोगात उपयोगी ठरलेले सर्वात उपयोगी (एक/अनेक) उपाय जरूरीप्रमाणे वापरत जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
काळा पहाड Fri, 05/06/2016 - 15:38 नवीन
या सगळ्यात चूक तुमची आहे हे तुमच्या लक्षात आले का? एकदा गावाच्या बाहेर पडलं की ऑफिसमध्ये सांगितलेला मोबाईल (हा मुख्य मोबाईल पासून वेगळा ठेवावा) पाठिमागची बॅटरी काढून वेगळा केला तर पलिकडच्या माणसाला कायम औट ऑफ कव्हरेज एरियाचा मेसेज मिळतो. पण तसंही, मी मोबाईल नेणारच नाहीये असं सांगता आलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बोका-ए-आझम Fri, 05/06/2016 - 15:58 नवीन
आणि आता प्राॅब्लेम हा आहे की पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन असंही म्हणता येत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
न
नीलमोहर Fri, 05/06/2016 - 07:57 नवीन
भावनेच्या भरात लेखातील मुख्य प्रश्नाचे उतर राहिलेच, रजा घेणे हा अक्षम्य गुन्हा, कशानेही भरून न येणारे पाप ज्याचे परिमार्जन दुप्पट-चौपट कामाचा बोजा उचलून, अशक्य डेडलाईन्स पार पाडून कामगारांनी करायचे.
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Fri, 05/06/2016 - 08:28 नवीन
कोणत्या क्षेत्रात काम करताय यावरुन रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा हे ठरते.. बस्स... :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 05/06/2016 - 08:53 नवीन
काही हरामखोर ३६५ दिवस कामावर राहायला बघतात शिवाय संध्याकाळी सायबाच्या घरी जाऊन कसले घंट्याचे प्रश्न सोडवतात ते माहित नाही परंतू अशामुळे रजा मागणारे निमकहराम ठरतात उगाचच.अशा एकाला वर्षभरात एकही सिक लीव रजा न घेतल्याबद्दल एक प्लास्टिकचा टॅार्च मिळालेला तो त्याने घरी जाऊन "ओळखपाहू आज तुझ्यासाठी काय आणले?" म्हणत दाखवल्यावर तो टॅार्च बायकोने फेकला अन तुटला.ही श्टोरी "बायकांना कशी आणलेल्या गोष्टींची किंमत नसते" या मथळ्याखाली अरध्या कंपनीत सांगून स्वत:चे 'कौतुक' करून घेतले होते.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 05/06/2016 - 09:15 नवीन
हा हा हा बायकोने तो टॉर्च त्याच्या डोक्यात कसा हाणला नाही याचं आश्चर्य वाटलं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
आ
आदूबाळ Fri, 05/06/2016 - 10:22 नवीन
लौल - कहर किस्सा आहे.
तो टॅार्च बायकोने फेकला
याच्या ऐवजी तो टॉर्च बायकोने त्याच्या डोक्यात घातला आणि त्यानिमित्त सिक लीव्ह घ्यायला लागली, असा शेवट केला तर मस्त कथा बनेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
न
नाखु Fri, 05/06/2016 - 10:30 नवीन
टॉर्च मागायला दुस्र्या दिवशी दाराबाहेर कंपनीतल्या कर्मचार्यांच्या बायकांची रांग लागली (फक्त माच मिनिटांसाठी क्ष रुपये या बोलीवर).... कथा हातभार या धोरणाअंतर्गत नाखु अस्तरवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
M
mugdhagode Mon, 05/09/2016 - 03:32 नवीन
टॉर्च डोक्यात मारण्याआधी गाणे.. तेरा दो टकियों का टॉर्च और मेरा लाखों का सावन जाये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
कंजूस Fri, 05/06/2016 - 11:09 नवीन
९७,९९ आणि २००० साली विआरएस आवाहन केले त्यात जे गेले त्यांना बाकी रजांचाही पूर्ण हिशोब दिला गेला.नंतर २)००२ साली अधिकृत रित्या कंपनी बंद करून कंपनीने फक्त एकमेकांना निरोप द्या सांगितले तेव्हा याचे पंधरा महिने पाण्यात गेले. पुर्वी एलआइसी डेव ओफिसर आणि ओक्ट्रोय नाका कारकुन अजिबात रजा घ्यायचे नाहीत "धंधा" बुडेल म्हणून. मुद्दा असा की रजा न देण्याचे मालकांचे /सायबांचे नकारात्मक धोरण होण्यास हे चिकटु लोकही कारण आहेत.मालकांची गोष्ट वेगळी असते.रोज येऊन गल्ल्याला कुरवाळायला त्यांना मजा वाटत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मराठी कथालेखक Fri, 05/06/2016 - 09:09 नवीन
पोलिसांबद्दल मला बोलायचे तर माझ्या मते कामाच्या जुनाट पद्धती, अपुरी शस्त्रे व साधने (वाहने, GPS), अपुरे प्रशिक्षण तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे परिणामकारकरितीने काम न करता येणे यामुळे जास्त मनुष्यबळ लागते. उदाहरण द्यायचे तर एखाद्या बंदोबस्तासाठी ३-४ शस्त्रधारी, चपळ, चलाख (योग्य ते प्रशिक्षण मिळाल्याने) पोलीस पुरे पडावेत पण तसे होत नसेल किंवा राजकीय दबावामुळे ७-८ पोलीस दिले जात असतील तर तो मनुष्यबळाचा अपव्यय आहे. बाकी खासगी क्षेत्रात कामाच्या स्वरुपाप्रमाणे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असेल. माझ्या ऑनसाईट असलेल्या टीममेंबर्सना कधी कधी मोठ्या रजेसाठी (भारतात येण्याकरिता) क्लायंडकडून परवानगी नाकारली जाते. पण क्लायंटकडे वर्षातून तीन वेळा एका आठवड्याची सुटी असते त्यावेळी जर त्या सुटीला जोडून रजा घेतली सहज परवानगी मिळते.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 05/06/2016 - 09:24 नवीन
हक्क.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 05/06/2016 - 09:29 नवीन
इतकी वाईट परिस्थिती असते हे खरंच माहिती नव्हते. :(
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 05/06/2016 - 09:41 नवीन
धाग्यातील आणि नीमो, मृत्युंजय इ. च्या प्रतिसादाशी १०० टक्के सहमत ! रजा ही केवळ कागदावरच हक्काची असते. प्रत्यक्षात ती बॉसची मेहेरबानी असते. प्रामाणिकपणे (नुसतेच) काम करण्यार्‍यांना ती क्वचितच मिळते. काम करून चलाखीने वागणाऱ्यांना ती दांड्या मारून मिळते. आणि (काम न करता नुसती) चमचेगिरी करणाऱ्यांना ती विनासायास मिळते.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 05/11/2016 - 08:43 नवीन
+१००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 10:17 नवीन
सुंदर चर्चा चालली आहे. @ काळा पहाड, सुबोध खरे, नीलमोहर आणि मृत्युन्जय यांच्या बहुतेक मुद्द्यांना सहमती. याबाबतीत माझे म्हणणे थोडक्यात असे आहे... नोकरी असो वा व्यवसाय, सेवा देणारा (कर्मचारी / व्यावसायिक) आणि सेवा घेणारा (कंपनी / ग्राहक) यांच्या संबंधामधे कोणाला गमावण्याची कोणाला जास्त भिती वाटते हा कळीचा मुद्दा असतो (Who is afraid of losing whom, is the key.) दुसर्‍याला गमावणे ज्या बाजूला गैरफायद्याचे वाटते ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते. याचा सरळ अर्थ असा की, कर्मचारी किंवा व्यावसायिकाने आपली कामगिरी अशी ठेवली पाहिजे की तो सोडून गेला तर आपला सहजपणे न भरून काढता येण्याजोगा तोटा होईल असे कंपनी किंवा ग्राहकाला वाटले पाहिजे... हा तोटा जेवढा मोठा असण्याची शक्यता असेल व हे जितके सततपणे वाटत राहील, तितके जास्त चांगले. हे वरचढपणाचे समीकरण कर्मचारी-कंपनी / व्यावसायिक-ग्राहक संबंध बनणे, संबंध टिकणे, मान मिळणे, बढती/प्रिमियम मिळणे, शब्दाला वजन असणे, सुट्टी हवी तेव्हा / हवी तशी मिळणे, इ, इ, इ, सर्वच बाबतीत खरे असते.
  • Log in or register to post comments
अ
अभिनव Fri, 05/06/2016 - 10:38 नवीन
ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते. हे वरचढपणाचे समीकरण कर्मचारी-कंपनी / व्यावसायिक-ग्राहक संबंध बनणे, संबंध टिकणे, मान मिळणे, बढती/प्रिमियम मिळणे, शब्दाला वजन असणे, सुट्टी हवी तेव्हा / हवी तशी मिळणे, इ, इ, इ, सर्वच बाबतीत खरे असते. याचा सरळ अर्थ असा की, कर्मचारी किंवा व्यावसायिकाने आपली कामगिरी अशी ठेवली पाहिजे की >> हा टिपिकल भारतीय मानसीकतेचा अ‍ॅवरेज आहे. त्यापेक्षा ताकदवान असलेल्याने, बॉसने, कंपनीने, अधिका-याने एथीकली वागुन माणूस म्हणुन जगावे व इतरांनाही माणूस म्हणुन बरोबरीची वागणुक द्यावी असे का नाही प्रत्येकजण म्हणत? त्याएवजी (त्या त्या परिस्थितीत) कमकुवत असलेल्यानेच झुकावे व अपमान + नुकसान सहन करतच जगावे हेच सगळे का म्हणतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 11:51 नवीन
माझे म्हणणे जरा अजून स्पष्ट करून सांगतो... १. तुमचे म्हणणे नीतीमत्ता व उद्दात्त धोरणे जमेस धरून बरोबर आहे. पण, दुर्दैवाने हे जग त्या तत्वांवर ना कधी चालले, आताही चालत नाही आणि मनुष्यस्वभाव पाहता भविष्यातही चालण्याची शक्यता नाही. जेथे कोठे ते तसे चालले आहे असे वाटते तेथेही कायद्याच्या बडगा धाक/आदर/सवय ठेवून आहे म्हणून तसे होते *. तेथेही अनेक माणसे कायदा धाब्यावर बसवून किंवा अगदी समोरच्याला दाबाखाली ठेऊन मनमानी करता आली तर करतातच, हे काही गुपित नाही. कोणत्याही बाह्यशक्तीच्या दबावाविना स्वतःहून नीतिमान असणार्‍या माणसांचा या जगात सर्व जागी व सर्वकालीन मोठा तुटवडाच राहीला आहे. २. "मी सरळ आणि नीतिमान असले म्हणजे सर्व जग माझ्याशी तसेच वागेल." हे म्हणणे खरे असण्यापेक्षा नसण्याचीच जास्त उदाहरणे दिसतात. या वाक्यावर खरा विश्वास ठेवणार्‍या माणसाला आपण सज्जन आहोत असा सार्थ अभिमान वाटत असला तरी प्रत्यक्षात बहुतेक इतर त्याला बुळा समजून त्याचा फायदा घेतात, हे वस्तुस्थितीतले "विषारी सत्य" आहे. याला काही अपवाद असतीलही, पण अपवादांवर अवलंबून आपले जीवन आखले, तर यशही अपवादात्मक परिस्थितीतच मिळेल. ३. आपण काय करावे यावर आपला ताबा असतो. ४. इतरांनी काय करावे यावर आपला पूर्ण ताबा कधीच नसतो. मात्र, ४.अ) इतरांची कृती आपल्या विचारांप्रमाणे व्हावी यासाठी स्वयंप्रेरित (proactive) प्रयत्न करणे आपल्या हातात असते आणि / किंवा ४.आ) इतरांची कृती झाल्यावर त्याचे परिणाम/दुष्परिणाम पाहून आपली प्रतिक्षिप्त (reactive) क्रिया करणे आपल्या हातात असते. ५. गेलेला वेळ आणि परिस्थिती परत आणणे शक्य होत नाही आणि केवळ मानवी चांगुलपणाच्या भरवश्यावर प्रतिक्षिप्त राहिल्याने नुकसान होण्याचीच जास्त शक्यता असते. आता या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवरही, माझे इतकेच म्हणणे आहे की... अ) सगळे प्रयत्न वैध असावे असाच माझा सतत आग्रह होता/आहे/असेल. कोणतीही गैर अथवा अनैतिक गोष्ट करावी असे मी कधीच म्हणणार नाही. आ) दुसर्‍याने आपल्या बाबतीत कोणतीही अवैध अथवा अनैतिक गोष्ट करण्याअगोदर त्याला दहा वेळा विचार करायची गरज भासावी अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वयंप्रेरित (proactive) व वैध प्रयत्न करणे हे प्रत्येकाच्या १००% हातात असते, तसे करणे प्रत्येकाचा हक्क आहे, तो प्रत्येकाने केला पाहिजे आणि तसे करणे शहाणपणाचे आहे. इ) यात दर वेळेस यश मिळेलच असे नाही. पण, यात निदान आपल्या मनासारखे यश मिळण्याची खूपच जास्त शक्यता आहे... आणि महत्वाचे म्हणजे, आपले जीवन दुसर्‍याच्या चांगुलपणाच्या भरवश्यावर (? भ्रमावर) अवलंबून ठेवण्यापेक्षा स्वयंप्रेरित (proactive) व वैध प्रयत्न करणे खचितच जास्त सन्मानाचे आहे. =========================================== * : भारतात रस्ताभर कचरा करत फिरणारी माणसे सिंगापूरच्या चांगी विमानतळावर "उतरण्यापूर्वी" विमानातच आपल्या हातून काही कचरा नकळत खाली पडणार नाही ना याची खातरजमा करताना दिसतात. तीच माणसे भारतात परत आल्या आल्या आपल्या मूळ स्वभावावर उलटतात ! याबाबतीतली एक गम्मत अशी की, "सिंगापूरचा हा धसका माझ्याही मनात असतो" हे माझ्या एका जर्मन (ज्या लोकांचे शिस्त व स्वच्छतेच्या बाबतीत उदाहरण दिले जाते) दोस्तानेही बोलून दाखवले आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिनव
अ
अभिनव Fri, 05/06/2016 - 12:11 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 12:20 नवीन
आता तुमच्या ध्यानात आले असेलच की मी म्हणतो तशी मानसिकता भारतियांमध्ये अजून नीट रुजली नाही. स्वतःच्या बळावर "सन्मानाने" आपले महत्व राखण्याऐवजी; काहीही करून "बॉसची मर्जी राखण्यावर व त्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या मर्जीने मिळालेल्या फायद्याला योग्य निर्णय म्हणण्यावर" लोकांचा भर दिसून येतो. हाच आपला सर्वात मोठा दुर्गुण आहे... आणि त्यामुळेच "हाजी हाजी करणे" व "माझी पात्रता वाढवणे यापेक्षा जास्त वरिष्ठांची मर्जी रखण्यावर भर देणे" अश्या वसाहतवादी / संरंजामशाहीवादी सवयी भारतियांच्या मधे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही दिसतात. विकसित समाज / संस्था / देशाचे मूल्भूत लक्षण असे की ते वैध कायद्याप्रमाणे चालतात, एखाद्या माणसाच्या मेहेरबानीवर नाही. म्हणजेच, सर्वसामान्यपणे, योग्यता मिळवली की तिच्या स्तराचे योग्य ते वैध फायदे त्या व्यक्तीला मिळतात... बॉसच्या मर्जी अथवा गैरमर्जीवर नाही. यालाच कायद्याचे (rule based) राज्य म्हणतात. अर्थातच, तशी योग्यता मिळवणे प्रत्येकाच्या हातात असते, मग ती शिक्षणाच्या बाबतीत असो की अनुभवाच्या की कामगिरीच्या (performance) बाबतीत. माझा पहिला प्रतिसाद परत वाचलात तर असे दिसेल की, मी तर अजून एक पाऊल पुढे जाऊन तेथे म्हटले आहे की, उत्तम योग्यता आहे याच कारणानेच नाही तर आपल्या योग्यतेची दुसरी व्यक्ती शोधणेही कठीण आहे असा दबदबा निर्माण केल्यास त्या व्यक्तीचे स्थान बळकट झाले आहे असे समजावे (The person has arrived !). मग, त्या व्यक्तिला रजा, बढती, इत्यादी मर्त्य (mortal) गोष्टींची काळजी करावी लागणार नाही... त्या गोष्टी त्या व्यक्तीच्या मनात येण्याअगोदरच इतरेजन त्यांची पूर्तता करतील ! हुश्श्य ! जरा मोठा प्रतिसाद...खरे तर दोन प्रतिसाद... झाले. पण मूलभूत गैरसमज टाळण्यासाठी आवश्यक वाटले म्हणूनच हे लिहीले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मराठी_माणूस Fri, 05/06/2016 - 13:53 नवीन
स्वतःच्या बळावर "सन्मानाने" आपले महत्व राखण्याऐवजी; काहीही करून "बॉसची मर्जी राखण्यावर व त्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या मर्जीने मिळालेल्या फायद्याला योग्य निर्णय म्हणण्यावर" लोकांचा भर दिसून येतो.
एकदम पते की बात. अशा पध्दतीने मर्जी राखुन बाकीच्यावर अरेरावी करणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.स्वबळावर सन्मानाने जगणर्‍यांची अशा वेळी खुप परवड होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 18:14 नवीन
अशा पध्दतीने मर्जी राखुन बाकीच्यावर अरेरावी करणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.स्वबळावर सन्मानाने जगणर्‍यांची अशा वेळी खुप परवड होते. याबाबत असे म्हणता येईल की... जशी कंपनी आपल्याला हव्या त्या चांगल्या कर्मचार्‍यांच्या शोधात असते, तसेच चांगले (पक्षी : आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास असणारे आणि सन्मानाने राहण्याची इच्छा व धमक असणारे) कर्मचारी आपल्याला हव्या त्या चांगल्या कंपनीच्या शोधात असतात. कमी जास्त वेळाने दोघे एकमेकाला सापडले तरच तोच संबंध "प्रेमाचा" होतो... अन्यथा किंवा तशी संधी मिळेपर्यंत "तडजोडीचा मामला" चालू ठेवणे ही खर्‍या जीवनातली तडजोड करावीच लागते :) मात्र, वरच्या चांगल्या कर्मचार्‍यांच्या व्याख्येत न बसणार्‍यांना ती तडजोड बहुदा जीवनभर करावी लागते. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
र
रेवती Sat, 05/07/2016 - 14:41 नवीन
भयंकर सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अप्पा जोगळेकर Fri, 05/06/2016 - 14:07 नवीन
छान प्रतिसाद. फक्त एक भर अशी की आपल्या योग्यतेची दुसरी व्यक्ती शोधणेही कठीण आहे असा दबदबा निर्माण केल्यास त्या व्यक्तीचे स्थान बळकट झाले आहे असे समजावे एखादी कंपनी एका विशिष्ट माणसावर इअतकी वलंबून राहत असेल तर ते त्या कंपनीचे व्यावसायिक अपयश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 18:02 नवीन
एखादी कंपनी एका विशिष्ट माणसावर इअतकी वलंबून राहत असेल तर ते त्या कंपनीचे व्यावसायिक अपयश आहे. १००% खरे. म्हणूनच वर म्ह्टले आहे की... नोकरी असो वा व्यवसाय, सेवा देणारा (कर्मचारी / व्यावसायिक) आणि सेवा घेणारा (कंपनी / ग्राहक) यांच्या संबंधामधे कोणाला गमावण्याची कोणाला जास्त भिती वाटते हा कळीचा मुद्दा असतो (Who is afraid of losing whom, is the key.) दुसर्‍याला गमावणे ज्या बाजूला गैरफायद्याचे वाटते ती बाजू कमकुवत असते व तिचा विरुद्ध बाजू गैरफायदा घेऊ शकते. दोन्ही बाजूंना आपले स्थान उंचावण्याची समज, गरज आणि संधी असली तरच स्पर्धा निरोगी राहते आणि मगच एकमेकाला एकमेकाची किंमत "नीट" समजणे आणि राखणे शक्य होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 18:39 नवीन
अजून दोन तत्वे... १. वैयक्तीक आयुष्य असो वा कामाची जागा; कोणालाही मान दिला जात नाही, तो आपल्या कृतीने आणि कामगिरीने (परफॉर्मन्स) मिळवायचा असतो. (एखाद्या भोळ्या आईनस्टाईनला राबवून त्याच्या कामावर स्वतः नोबेल प्राईझ लाटणारे चलाख लोक जगभर सर्वत्र आहेत.) २. जेव्हा कर्मचार्‍याला खरी किंमत दिली जात नाही तेव्हा खालीलपैकी एक किंवा जास्त कारणे असू शकतात... ......(अ) कर्मचार्‍याला स्वतःची किंमत माहीत नाही ......(आ) कर्मचार्‍यामध्ये आपली किंमत वसूल करण्याची धमक अथवा व्यवहातचातुर्य (tact) नाही ......(इ) कंपनीमध्ये (पक्षी : बॉसमध्ये) कर्मचार्‍याची किंमत जाणण्याची समज नाही ......(ई) कंपनीमध्ये कर्मचार्‍याची किंमत जाणून तिचा योग्य सन्मान ठेवण्याची नियत नाही (अ) आणि (आ) कारणांमध्ये कर्मचार्‍याने स्वतःत योग्य ते बदल घडवून आणल्याशिवाय काही बदल होणे जवळ जवळ अशक्य आहे. (इ) किंवा (ई) या कारणांमध्ये कर्मचार्‍याने त्या कंपनीत कायम चिकटून राहणे त्याच्या दीर्घकालीन भविष्याच्या आणि (मानसिक व शारीरीक) आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. तडजोड करत चिकटून रहा, नवीन कंपनीच्या शोधात रहा आणि पहिल्या योग्य संधीचा फायदा घेऊन बाहेर पडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 05/07/2016 - 20:01 नवीन
प्रतिसादांशी सहमत! कॉर्पोरेट जगतात यशाची (किंवा सर्व्हायव्हलची) गुरुकिल्लीच आपण सांगितलीत! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Fri, 05/06/2016 - 14:29 नवीन
एक्का साहेबांचे दोन्ही प्रतिसाद एकदम चपखल आहेत. . "मी सरळ आणि नीतिमान असले म्हणजे सर्व जग माझ्याशी तसेच वागेल" हे म्हणणे म्हणजे "मी पूर्ण शाकाहारी आहे म्हणून सिंह मला खाणार नाही" असे म्हणण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
समीरसूर Fri, 05/06/2016 - 10:50 नवीन
मी आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ६ दिवस सुटी घेतली होती. मागच्या वर्षीदेखील एप्रिलमध्ये सलग ५ दिवस सुटी घेतली होती. पण मी या वर्षीच्या एप्रिल महिन्यातली शेवटच्या आठवड्यातली ६ दिवस सुटी जानेवारी २०१६ च्या पहिल्या आठवड्यात सांगून ठेवली हो. एक आऊट ऑफ ऑफीसचा ईमेल सेट करून ठेवला की मग सहसा कुणी त्रास देत नाही. इतक्या वर्षात आमच्या इथे मी एक गोष्ट शिकलो आहे. सुटी मागायची नाही; सरळ एक ईमेल टाकून द्यायची की मी या या दिवशी सुटीवर असणार आहे. सुटी घेऊ का असे आमच्या इथे कुणीच विचारत नाही. सरळ ईमेल टाकून द्यायची. अगदीच काही प्रोब्लेम असेल तर कुणीतरी विचारतं. मग अगदीच आवश्यक असेल तर सुटीचा प्लान थोडा बदलायचा; नाहीतर सरळ "माझे प्लान्स झालेले आहेत; सुटी रद्द करू शकत नाही" असे सुतकी चेहरा करून सांगायचे. बाकी दुसरे कुणी बिब्बा घालत नाही. आणि अप्रेजलवर वगैरे याचा काही परिणाम होत नाही. आणि झाला तरी मी विचार करत नाही. ;-) सुटी घ्यायची आहे तर घ्यायची आहे! कामाच्या वेळेला ऑफिसमधून आणि घरूनदेखील काम करावे लागते. तेव्हा तास मोजून नाही चालत. पण सुटीच्या वेळेला सुटीच! अगदीच अर्जंट असेल तर एखादा कॉल वगैरे....नाहीतर ऐश! :-)
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Fri, 05/06/2016 - 10:53 नवीन
शनिवार रविवार सुट्टी असून सुद्धा बद्दल रजां बद्दल चाललेली वरील आयटी हमालांची (!) तक्रारीच्या सुरातील चर्चा वाचून अंमळ मौज वाटली.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 05/06/2016 - 11:31 नवीन
9.5*5 = 47.5 तास 8*6 = 48 तास शनिवार-रविवार सुट्टीत आणि रविवार सुट्टीत काय फरक राहिला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
S
sagarpdy Fri, 05/06/2016 - 12:21 नवीन
९.५ च ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ग
गणामास्तर Fri, 05/06/2016 - 12:46 नवीन
१२*६ = ७२ तास आणि तुमचा ९.५*५ = ४७.५ तास बघा आता किती फरक राहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ट
टवाळ कार्टा Fri, 05/06/2016 - 13:25 नवीन
आयटीत १२*५ = ६० आणि काम झाले नाही तर आणखि (२*१२)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
ग
गणामास्तर Fri, 05/06/2016 - 13:34 नवीन
ते तर सगळीकडेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 05/06/2016 - 13:50 नवीन
तुम्हीच तर म्हणत आहात कि आयटीमध्ये वेगळे असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
अ
अप्पा जोगळेकर Fri, 05/06/2016 - 14:00 नवीन
साहेब. माफ करा मगर आपको नही लगता के ये आपकी काबिलियत पर सवाल है. १२*६=७२ तास काम जर एखादा व्यावसायिक करत असेल तर ठीक आहे. पण जर एखादा कर्मचारी हे करतो आहे तर १. तो कार्यक्षम नाही किंवा २. त्याच्या साहेबाचे एफ़र्ट एस्टिमेट चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
अ
अत्रन्गि पाउस Fri, 05/06/2016 - 14:03 नवीन
साहेबाचे नाही विकणाऱ्याचे ....काहीही कमीट करून येतात आणि डिलिव्हरीची मातृभगिनी एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
श
शिद Fri, 05/06/2016 - 11:36 नवीन
मित्राच्या लग्नाला सुट्टी मिळत नसल्या कारणानं मोठ्या भावानं त्याच्या लहान भावाला ड्युटीवर पाठवलं त्याबद्दल आलेली ही म.टा. मधील बातमी. सुट्टी मिळाली नाही की मग लोकं असे बेकायदेशीर मार्गसुध्दा काढू शकतात ह्याचं हे उदाहरण. लेखाबद्दल अतिशय सहमत...बाकी विचारलेल्या प्रश्नाचं माझं उत्तर आहे "रजा घेणं हा आपल्या वरीष्ठांचा हक्क असतो पण आपल्यासाठी पाप/गुन्हा असतो".
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 05/06/2016 - 12:44 नवीन
पोलिस खात्यात स्वत:च्या लग्नासाठी रजा पाहिजे असल्यास लग्नपत्रिका जोडावी लागते. त्यामुळे पहिल्या पत्रिका छापायला टाकाव्या लागतात. पुरुष पोलिसांनाही रजा ’पाळी’प्रमाणे मंजूर होते.पोलिस नोटीस मधे तसे प्रसिद्ध होते.पाळी मोजण्याचे अधिकार अर्थातच वरिष्ठांचे. त्यासाठीही कारकुनांना चिरीमिरी द्यावी लागते. माझ्या लग्नाच्या वेळी मी ’विनाविलंब’ रजा मागितली. ती मंजूर झाली नाही. मग मी ’त्वरीत’ रजा मागितली मग कुठे ती मंजूर झाली. सगळ्या अर्जात मे सो जा व्हावे हे लिहिणे क्रमप्राप्त असते. अर्जित+ धनार्जित रजे ला ’शिलिंडर’ रजा म्हणतात. तुमच्या भाषेत सरेंडर्ड लिव्ह १५ + ३० पाळी प्रमाणे मंजूर ३० + ३० " पैशाची गरज असलेले लोक धनार्जित मिळण्यासाठी कागदावर अर्जित रजेवर पण प्रत्यक्षात कामावर येतात.( वरिष्ठांची समरी पॊवर) कारण सोडत नाही म्हटल्यावर पैशे पण गेले व रजा पण गेली. शेवटी काहीच नसेल तर ’शिकात’ जाण्याचा पर्यात असतोच. दाक्तरला पैशे द्यावे लागत्यात.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 05/06/2016 - 13:40 नवीन
कर्मचार्‍यांच्या बाजुचे प्रतिसाद वाचले ! बर्‍याच अंशी सहमत आहे. मी देखील एका गावखात्यातल्या आयटी कंपनीमधे काम करत असतांना असेच अनुभव आले. आता मी स्वतः देखील एका छोट्या कंपनीचा मालक आहे. कंपनी कसली, पाच सात डोकी एकत्र करुन काम करतो म्हणून कंपनी. नाहीतर गावखात्याचाच कारभार. तर आमची कामाची पद्धत : काम असेल तर २४ तास काम करा. रविवार असला, सार्वजनिक सुट्टीचा दिवस असला तरी सुटका नाही. यात मी आणि माझे कर्मचारी सगळेच आले. काम नसेल तर सोमवार ते रविवार कोणताही दिवस असो, घरी तंगड्या पसरुन आराम करा. आमच्याकडे मेजॉरीटी कोकणी माणसं, तेव्हा चतुर्थीला आणि होळीला बोंबा मारत बसावं लागते पण एकमेकाच्या प्रेमापोटी सगळं अ‍ॅडजस्ट होते. आता एक सातारी, एक नगरी आणी बाकीचे कोकणी अशी भरती केलीये. त्यामुळे जास्त त्रास नाही. (कोणाला प्रादेशिक वादाचा वास येत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे) ८-१० दिवस सुट्टी हवी आहे, बिनधास्त घ्या. पण कमीतकमी १५ दिवस अगोदर कळवा म्हणजे पुढील नियोजन करणे सोप्पे होते. कालच एका कर्मचार्‍याने मला कळवले की मी ३१ ऑगस्ट २०१६ चे रेल्वे चे बुकींग केले आहे गणपतीसाठी. आता बोला !! ऑफीसमधे लेट आले तरी आणि घरी जायला उशीर झाला तरी घड्याळावर डोळा ठेवला जात नाही. बर्‍याच शेटजींनी तुम्ही युपी / बिहारी माणसं कामाला ठेवा. स्वस्तात काम होईल असे सांगीतले पण कंपनी पॉलीसी म्हणून यापासून कटाक्षाने दुर राहिलोय. अर्थात युपी / बिहारींबद्द्ल मला कोणताही आकस नाही. परीणाम काय तर गेल्या पाच वर्षात एकही कर्मचारी काम सोडून गेलला नाही. खोटं बोलून सुट्टी घेतलेली नाही. फोन बंद करुन ठेवत नाहित. कोणाचेही नातेवाईक अचानक आणि पुन्हापुन्हा मरत नाहीत. आय आणि माय कर्मचारी लव अवर कंपनी !
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Fri, 05/06/2016 - 13:40 नवीन
३ वर्षांपूर्वी.माझ्या लग्नासाठी मी १५ दिवस सुट्टीसाठी विनंती केली तर मला, तू कंपनीसाठी किती महत्वाचा वेगैरे आहेस, त्यामुळे कंपनीच खूप नुकसान होईल वेगैरे थापा मारून १५ दिवसाची सुट्टी १२ दिवसांवर मंजूर करत होते. मी १५ मिनिटांनी राजीनामा खरडून दिला. लगेच १५ दिवसांची सुट्टी मंजूर केली. त्याचा बदला म्हणून लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत आणि लग्न झाल्याच्या दुसर्या दिवसापासून पुन्हा बॉसचे फोन चालू होते. (लग्नाच्या दिवशी मी फोन बंद ठेवला होता ). ती बॉस अश्या कामासाठी फोन करायची जे जास्त महत्वाचे न्हवते, आणि मी ते काम ऑफिसमध्ये आल्यावर देखील करू शकत होतो.शेवटी वैतागून बॉसशी फोनवर बोलत असतानाच जोरात कचकचून शिवी घातली, तुझ्या आयची XX, समजत नाही का ग XX.निघ इथून साली XXX. ती बॉस म्हणाली तू मला कसा काय शिव्या देऊ शकतोस.मी म्हटलं तुम्हाला नाही आमच्या इथल्या म्हशीला घालतोय.पिकात शिरली होती.ती काय समजायचे ते समजली. त्यानंतर बॉसचा फोन नाही आला. १५ दिवसांची सुट्टी १७ दिवसात संपवून मी ऑफिसला आलो आणि पुन्हा राजीनामा खरडला. मंजूर करत न्हवते, शेवटी बिनडोक लोकांसोबत मला काम करायचे नाही असे मोठ्या साहेबाला सांगून नव्या कंपनीत रुजू झालो.आजतागायत इथेच आहे. परंतु इथे कधीच सुट्टी साठी कटकट झाली नाही. एखादे दिवशी शनिवार रविवार चुकून एखादे तासाभराचे काम येते, इतकेच. आधीची कंपनी फार मोठी होती, त्यामानाने सध्याची लहान आहे.पण पगार आणि समाधान जास्त आहे. कुठेतरी वाचले होते, कि तुम्ही चांगली कंपनी निवडू नका, चांगला बॉस निवडा. म्हणजे सुखी राहाल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा