नक्की कोण कुणाशी स्पर्धा करतेय?
या काथ्याकुटाचा संदर्भ नुकतेच वाचनात आलेले दोन लेख:
पहिला
आणि दुसरा सैराट लोकसत्ता
दोन्ही लेखात आधीच लक्ष्य (निषाण) ठरवून बाण मारलाय आणि मग त्या भेवती वर्तुळ काढलयं हे स्पष्ट दिसतेय.
लेख क्रमांक एक मध्ये प्रस्तावनेत स्थंभलेखिका म्हणते हा लेख दोन वर्षांचा लेखाजोखा आहे म्हणजे आधिक उणे या दोन्हींचा परामर्ष घेणे अपेक्षीत आहे. नेमकी हीच बाब अखंड शब्द फापट पसार्यामध्ये सापडत नाही.शिवाय जे काही चुकले असेल त्याचे परिणाम किंवा बरोबर्/उचीत असे काही घडलेच नाही असा दुजाभाव लेखात ठाईठाई दिसतो. मी म्हणत नाही या सरकारकडून चुका झाल्या नाहीत अगदी घोडचुकाही झाल्या पण कारर्कीर्दीचा ताळेबंद मांडताना जमा पण दाखवावीच खर्चाबरोबर.
दुस्र्या लेखात मध्ये मध्ये विनाकारण ब्राह्मण्य असा शब्दच्छल करून मूळ लेखा (विषया)लाच हरताळ फासला आहे. आणि तो सिनेमात कुठले पात्र कुठल्या जातीचे प्रतिनिधीत्व करते यात आपले शहाणपण वाया घालवले आहे.
काही मौक्तीके
तर शहरी मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व प्राप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीशी ‘कनेक्ट’ न होऊ शकलेल्या (म्हणून फेंगडय़ा पायाचा दाखविलेल्या) विजयने प्रेमभंग पचविला आहे
फॅण्ड्री’मध्ये नागराज मंजुळे यांनी भटक्या जब्या व बौद्ध पिराजी यांची दोस्ती दाखविली आहे. ‘सैराट’मध्ये त्यात मुस्लीम सलीम व गरीब मराठा मंग्याची भर पडली आहे. मात्र अजूनही त्यात गावकुसाच्या आत असणारा साळी, तेली, कुंभार, धोबी, सुतार, लोहार या ५२ टक्के ओबीसींची भर पडलेली नाही. ही भर पडल्याशिवाय भौतिक मुक्ती टिकविता येणार नाही.अता मूळ विषय:
- माधव गडकरीसार्ख्या प्रभुती संपादक असे पर्यंत लेख परखड व दोन्ही बाजू दाखविणारे समतोल्,तटस्थ नजरेने(कुठलाही पुर्वग्रह ने ठेवता) लिहिलेले असत.
- मिपावरही संपादकीय म्हणून एक सदर चाल्वून अगदी वेगळ्या आणि चाकोरीबाह्य विषयांवर लिहिले गेले होते.
- सध्या अश्या शब्दबुड्या आणि निव्वळ प्रतिमांचा मोरपिसारा फुलवून नक्की काय सांगायचे (का नाही सांगायचे) तेच न कळणारे ले़ख लोकसत्तात आहेत (ते वाचल्यावर जर काही कळाले तर) इथे मिपा भाषेत माडावेत म्हणून मिपा साक्षेपींना हे साकडे आहे.
- मिपावर सध्या आशयहीन आणि तर्कदुष्ट चर्चा प्रस्तावांचे पेव फुटले आहे,कुठलाही विषय आधीच ध्येय निश्चीत केल्यासारखा शब्दच्छल करून्,फाफट पसारा करून चर्चा इप्सीत स्थळापर्यंत पोहोचवण्याचा चंगच काही आयडींनी मांडला आहे.(सल्लागार त्यांना काही कानपिचक्या देत असतील असे त्यांच्या सध्याच्या वर्तनावरून तरी वाटत नाही).
- इथेच आणि हेच साम्य आहे म्हणून कोण कुणाशी स्पर्धा करतेय हा मुद्दा मांडला? आधिक उणे क्षमा, कारण मी मिपा नामवंत साहित्यीक्/काथ्याकुटकार्/विश्लेषक तर नाहीच पण एक सामान्य मिपा वाचकाच्या भूमीकेतून हे लिहिले आहे
. मिपा वारकरी नाखु