श्रीकृष्ण नारद संवाद
महाभारत घडून गेल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या वृद्धावस्थेत नारद त्यांना भेटायला आले होते . त्याचे सविस्तर वर्णन बहुधा भागवतात आहे. त्यावेळी श्रीकृष्ण व नारद यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली . त्यामध्ये कृष्णाने आपले मुलगे आपले ऐकत नसल्याबद्दल व बहुधा प्रद्युम्न या कृष्णपुत्राच्या उच्छृंखल पणा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती . त्यावर नारदानी आता आपले अवतारकार्य संपत आलेले असून पृथ्वीवरील मानवासारखे आपण पुत्रादिकांची चिंता करणे सोडून निजधामी गमन करण्याची तयारी करावी असा उपदेश केला . हा बहुधा कलियुगाच्या प्रारंभीचा काल असावा .
या सर्व प्रकाराबाबत मराठी वेबसाईट वर अथवा साहित्यात कुठे उल्लेख /चर्चा झालेली आहे का ? मिपाकरांपैकी कोणास याबाबत काही माहिती असल्यास जरूर चर्चा करावी . केवळ जिज्ञासेपोटी हा धागा काढत आहे.
धन्यवाद
ब्रह्मचर्येऽपि वर्त्तंत्या योगिन्या वा प्रमादतः ॥ प्रकृष्टं पुरुषं दृष्ट्वा वरांगं क्लिद्यते स्त्रियाः ॥ २७ ॥