अजून खूप काही आहे हो आंबोलीत. बरेच काही म्हणावे लागेल. जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. परत जाल तेव्हा हेमंत ओगले नावाच्या इसमाला भेटा. आमचा मित्र आहे. नावाजलेला फुलपाखरू तज्ञ आहे. त्याच्याच रिसॉर्ट ला रहा.
आंबोली येथे उत्तम मांसाहारी जेवण नार्वेकर खाणावळ आणि सिल्वर स्प्रिंग रिसोर्ट येथे मिळेल.
सिल्वर स्प्रिंग रिसोर्ट रहायला ही खुप छान आहे. केवळ ४ रूम्स अस्ल्यामुळे बुकिंग लवकर करावे लागते..
http://silverspringresort.in/
सिल्वर स्प्रिंग रिसोर्ट मधे आम्हाला चुलिवर बनवलेले जेवण मिळाले होते.
आंबोली
२ वर्षापूर्वी आंबोलीला जायचा योग आला. माझा एक मित्र तिथे नेहमी जायचा. तो दर वर्षी आंबोलीला का जातो हे मला नेहमीच कोड पडायाच. एकदा अचानक त्याचा फोन आला.
मित्र:- येतो का रे आंबोलीला ?
मी:- कधी जाणार आहेस?
मित्र:- ऑगस्ट मधे
मी:- ठीक आहे , चल मी पण येतो या वर्षी तुझया बरोबर.
मित्र :- मी MTDC/ Silver Spring resort बुक करतो. गुरुवारी निघू आणि रविवार परत येऊ.
मी:- ओके.
त्यानंतर बर्याच दिवसानी त्याचा फोन आला, सिल्वर स्प्रिंग रिज़ॉर्ट नाही मिळाले पण MTDC मधे बुकिंग केलय. मी विचारले की जायचे कसे, तर म्हणाला की एस टी बस ने. मी तर गारच पडलो हे ऐकून. मुंबई-कोल्हापूर-आंबोली एस टी ने.. तो म्हणाला की 'एसटीचे आवडेल तीथे प्रवास' या योजनेचा फायदा घ्यायचा. आम्ही दोघांनी एसटीचा पास काढला आणि गुरुवारी रात्रीची ११ वाजता निघणारी 'ठाणे-कोल्हापूर' बस चे बुकिंग केले.
तो म्हणाला की मी गुरवारी येतो तुया घरी , आणि मग निघूया.
गुरवारी ऑफीस मधून घरी आलो आणि मोबाइलवर पहिले तर मित्राचे १० मिसकॉल. त्याला फोन केला तर तो म्हणाला की मी बसस्टंड वर आहे आणि रात्रीची कोल्हापूर बस रद्द झाली आहे , ८ वाजता डहाणू-कोल्हापूर गाडी येईल. घड्याळ्यात पहिले तर ७.२० झाले होते आणी अजुन माझी बॅग भरायची होती. जेवायचे होते, मोबाइल चार्जिंग करायचा होता. कशीबशी बॅग भरली आणी निघालो तसाच.
घरापासून बसस्त्यँडला जायला रिक्षाने १५ मिनिट लागतात. रिक्षात बसलो आणि परत याचा फोने आला,
मित्र:- डहाणू-कोल्हापूर गाडी आली १० मिनिट लवकर , तू कुठे आहेस?
मी:- रिक्षात बसलोय. गाडी थांबव.
मित्र:- प्रयत्न करतो.
इकडे मी टेन्शन मधे... रिक्षावाल्याला रिक्षा भरधाव न्यायला सांगितली.
क्रमश..
(पहिल्यांदाच लिहीत आहे,मिपाकरानी सांभाळून घ्यावे)
शेवटी बस पकड़ली, बुकिंग नसल्याने एकदम शेवट्ची सीट मिळाली. पुण्याला उतरुन पुणे-कोल्हापुर नीम-आराम बस पकड़ली. सकाळी ५.३० ला कोल्हापुरला पोहचलो. ६ वाजता कोल्हापुर-सावंतवाडी वाया अम्बोली बस पकडून ,४ तासचा प्रवास करून १० वाजता अम्बोली ला पोहचलो. तेथे उतरल्यावर निसर्गसौंदर्य काय असत याची जाणीव व्हययला लागली. सर्वत्र धुके पसरल होते,२-३ फुटावराचा माणुसही दिसत नव्हता. तड़क MTDC resort ला गेलो. थोडीशी पोटपूजा करून लगेच धबधबा पाहायला निघालो. २किमी चालत गेल्यावर धबधबा दिसला. फोटो वर टाकलेले आहेतच. भिजून आल्यावर तेथील भजी खाण्यात जी मजा आहे त्याचे सुख काय वर्णावे ?
धबधबा पाहून आल्यावर जेवायला सिल्वर स्प्रिंग रिज़ॉर्ट ला जेवलो आणि मग कावलेसाद ला गेलो. दरीतून येणारे पाणी ,समोर दिसणारे असंख्य धबधबे पाहून मन तृप्त झाले. दुसर्यादिवशी नांगरतास धबधबा पाहावयास गेलो, आणि तिथून . sugar .ला गेलो. सध्या तिथे उसांवर संशोधन चालू आहे. कमीतकमी उसापासून जास्तीत जास्त साखर देणारी जात विकसित करत आहेत.
२ दिवस मनसोक्त भटकंती केल्यावर परत आलो .. पुन्हा जाण्यासाठी ..............
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker Not