Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ई-उपवास

र
रघुनाथ.केरकर
Wed, 08/17/2016 - 12:04
🗣 124 प्रतिसाद
आपण बर्‍याच प्रकारचे उपवास करतो, कुणी अमुक एक महिन्यात मांसाहार टाळतो, कुणी चपला वापरायचे टाळतो, कुणी एकवेळ जेवतो, कुणी आपल्या मागण्यांसाठी अन्न पाणी त्याग करतो. वैगरे वैगरे, मी सुद्धा दर शनीवारी न चुकता उपवास करायचो. मग पुढे शनीवारी लांबचे प्रवास घडायला लागले तेंव्हा मात्र शनीवारी उपवास करायचे सोडुन दीले. पण शनीवारचा मांसाहार करीत नाही.पण हे झाले ठरवुन केलेले उपवास. कधी कधी न ठरवता देखील उपवास घडतो.मागच्या आठवड्यात असाच उपवास मला घडला. शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी बदलापुर स्टेशन गाठलं, स्टेशन वर पोहचुन बघतो तर काय स्टेशन ला तुफ़ान गर्दी, लोक रेल्वे रुळावर उतरले होते. दोन लोकल्स च्या मोटरमन केबीन मध्ये आंदोलन कर्त्यानी ताबा घेउन दोन्ही गाडया मध्येच थांबवुन धरल्या होत्या. बर्राचा वेळ स्टेशन वर घुटमळत राहीलो, गाडया सुटायची काही चिन्हे दीसेनात, एव्हाना २० - २५ जणांना फोन करुन तिथला आंखो देखा हाल सांगीतला. मग १०-१५ फ़ोटु वेगवेगळ्या कोनातुन काढले, आणी पाउणतास टाईमपास करुन घरी परतलो. घरी परतताना मी जरा खुशीतच होतो, त्याची दोन कारणं होती एक म्हणजे भर पगारी रजा, आणी दुसरं म्हणजे चार दीवस आलेला वीकांत. लोकांचा रेल रोको माझ्या पथ्यावर पडला होता. शुक्रवार, शनीवार, रवीवार आणी सोमवार अशी सलग चार दीवसाची रजा मिळणार होती, कोकणात रहाणार्‍या चाकरमान्याना असे प्रसंग म्हणजे "सोनीयाचा दीनु". मी सुद्धा घरी आल्या आल्या जाहिर केलं की मी गावी चाललो. एवढा मोठा विकांत आहे म्हटल्यावर मी गावी जाणरच हे आई ला अभीप्रेत असल्याने तीने फ़ार काही प्रतीक्रिया दील्या नाहीत. बायकोने मात्र प्रश्नांचा भडीमार केला, तीला थोडक्यात समजावुन घरच्यांचा निरोप घेतला.सावंतवाडीपासुन १५ कीमी वर बांदा नावाचे एक गाव आहे, त्यात आरोस बाग नावाची एक लाहानशी वाडी आहे, तीथे माझे दुरचे नातेवाईक रहातात , मला त्यांच्याकडे २ दीवसांसाठी एका कामा नीमीत्त जायचं होतं. ऑफ़ीसचा ल्यापटॉप आणी दोन जोडी कपडे, एवढच सामान घेउन निघालो. बाय रोड थेट पनवेल गाठलं, पनवेल स्टेशन वर चौकशी केली तर कळालं कि १ वाजता कुठली तरी लेट झालेली गणपती स्पेशल येणार आहे. गाडीत बसल्यावर लक्षात आलं की मोबाइल फोन ची ब्याटरी ४५% वर आलिय. आनंदाच्या भरात ब्याग भरताना, पॉवर ब्यांक घ्यायला विसरलो होतो. "हुश्शार फ़ोन" असल्याने ब्याटरी भराभरा उतरते. आणी त्यातच सकाळी रेल रोको दरम्यान केलेली फ़ोटोग्राफी आणी फ़ोनाफ़ोनी यातच ब्याटरी उतरली होती. गाडी "हॉलीडे स्पेशल" गाडी असल्याने जुने डब्बे होते, आणी त्यात सुधा जनरल डब्बा असल्याने त्यात मोबाईल चार्जींग पॉईंट नव्हते, मग सगळ्यात आधी डेटा कनेक्शन बंद केलं, मग स्क्रीन लाईट कमी केला, नेटवर्क CDMA वरुन GSM केलं. रोहा येईस्तोवर ब्याटरी २५ टक्क्यांवर आली. आता मात्र फोन बंद करावा लागला. घरी फोन करुन तसं कळवल आणी फोन बंद केला. दर दोन तासांनी फोन चालु करुन घरच्याना कॉल करत होतो. आणी त्याच मुळे सावंतवाडी येइ स्तोवर मोबाईल ने दम तोडला. ल्यापटॉप वर मोबाईल चार्ज करावा तर ल्यापटॉप सुद्धा थंड पडला होता. गुरुवारी रात्री लेकाने त्यावर उशीरा पर्यन्त कुंफ़ु पांडा पाहीला होता. त्यामुळे ल्यपटॉप ची ब्याटरी कंप्लीट ड्रेन झाली होती. आता नातेवाईकांकडे पोहोचे पर्यंत बिना मोबाइल रहावे लागणार होते, कल्पनाच डेंजर होती. गाडी रात्री साडेनऊ ला सावंतवाडी स्टेशन ला पोहोचली. शेवटची एस टी जाउन अडीच तास झाले होते, रेल्वे स्टेशन वरच्या रिक्षावाल्याना विचारलं की बांदा ,आरोसबाग येणार का? तर कुणीच यायला तयार नव्हते. शेवटी ४०० रुपयाला एक जण तयार झाला. तो देखील बांदयातलाच होता म्हणुन तयार झाला. माझं सुदैव की त्याला माझ्या नातेवाईकंची वाडी माहीत होती. मी रिक्षात बसलो, रिक्षा बांद्याच्या दिशेने निघाली. वाटेत कीर्र काळोख होता आणी एकदम शांतता होती परीसरात फक्त अमच्याच रिक्षाचा आवाज होता. मध्येच एखाद दुसरा ट्रक हॉर्न मारुन निघुन जायचा. रिक्षा बांद्यात पोहोचली आणी डांबरी रस्ता सोडुन आमची रिक्षा कच्च्या रस्त्याला लागली. रस्ता प्रचंड खराब होता, उंटावर बसल्याचा फ़ील येत होता. एवढ्यात नेमका पाउस आला समोरची वीजीबीलीटी अवघ्या ५-७ मिटर वर येउन ठेपली. रिक्षा अगदी संथ गतीने हिंदकळत पुढे जात होती. घड्याळात ११.३० झाले होते. इतक्यात रिक्षावाला रिक्षा थांबवुन म्हणाला "तुमचा घर इला हा." मी बाहेर पाहीलं तर किर्र अंधार, मध्ये मध्ये काजवे पेटत होते. रिक्षावाल्याला विचारलं की कुठे आहे घर. तर त्याने रस्त्याच्या डावी कडे बोट दाखवलं आणी म्हणाला "ह्या काय सामक्या आसा" (हे काय समोरच आहे). इतक्यात एक माणुस रॉकेलचा दीवा घेउन आमच्या दिशेने आला. निटसं दीसत नव्हतं पण डोळे थोडे ताणल्यावर लक्षात आलं की हेच ते नातेवाइक ज्यांच्याकडे मी एवढ्या लांब आलो होतो. रिक्षावाल्याला त्याची बिदागी दीली आणी त्याला मोकळं केलं. रिक्षावाल्याने रिक्षा वळवुन माघारी जाण्यापर्यंतच रिक्शाचा आवज आणी प्रकाश होता, मग मात्र तो सुधा कमी कमी होत गेला. मग मी त्या नातेवाईक काकां बरोबर चालु लागलो. त्यांच्या मागोमाग मी एका पडवी सद्रुश्य खोलीत आलो. त्या पडवी सद्रुश्य घरात काळोख होता, कदाचीत लाइट गेले असावे असं मला वाटलं आतुन त्यांच्या पत्नी बाहेर आल्या, त्यानी अजुन मोठा रॉकेलचा दीवा आणुन एक टेबल सद्रुश्य वस्तुवर ठेवला. आणी त्या दीव्यासमोर मला बसायला एक खुर्ची ठेवली, दोन्ही कडच्या खुशाल्या वीचारुन झाल्यवर मी त्याना लाइट गेले आहेत का वीचारल तर त्या दीव्याच्या उजेडात काकांच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर एक छद्मी स्मित दीसलं, मला पुढे काही जास्त बोलवेना झाल. बाहेर धो धो पाउस कोसळत होता, वातावरणात वेगळाच गारवा होता. त्यात पायाखाली शेणाने सारवलेली जमीन होती. पडवी सोडली तर बाहेर सभोवताली गच्च अन्धार होता, वेगळाच अनुभव होता तो. एवढयात गरमागरम जेवण आलं. जेवण करुन आडवा झालो. पावसाच्या आणी रातकीड्यांच्या आवाजात कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी ७ ला जाग आली, पडवीतुन बाहेर येउन पाहीलं तर पाउस थांबला होता, बाहेर उन पडलं होतं. घरा भोवती गच्च झाडी होती, चुलीवर अंघोळीचं पाणी तापत होतं. चुलीच्या धुराचा वास मला माझ्या बालपणीची आठवण देउन गेला. मग नकळत पाय चुलीकडे वळले, चुलीच्या समोर बरुन मी विस्तवाचा शेक घेउ लागलो. थोड्याच वेळात ब्रश वैगरे करुन चहा नाष्टा झाला. एवढयात घरी फोन करायची आठवण झाली. ब्यागेतुन मोबाइल काढला आणी चार्जींग करायला निघालो. चार्जर हातात घेउन भिंतीवर लाइटीचा बोर्ड शोधायला लागलो. पडवीच्या सगळ्या भींती शोधल्या पण एकही बोर्ड सापडला नाही. साधी वायरींग पण दीसली नाही. काका माझा हा कर्यक्रम टक लाउन बघत होते. माझं त्यांच्याकडे लक्ष जाताच ते हसुन म्हणाले "लायट अजुन येउक नाय आसा. गणपती च्या नंतर येयत असा सरपंच सांगा व्हते." मी एकदम शांत झालो. मोबाइल आणी चार्जर पुन्हा ब्यागेत ठेवला. मला खुप प्रश्न पडले होते. कुठला प्रथम वीचारु हेच कळत नव्हतं. तरी सुद्धा न रहावुन मी बोललोच: मी: लायट केवा पासुन नाय आसा? काका: पैल्या पासुनच नाय आसा. मी : म्हणजे? काका: तरी ६० - ७० वर्षा झाली. मी: तुमी अर्ज करुक नाय काय? काका: गेल्यावर्षी केल्लो. सगळे कागद बनवन घेतले. मगे तो सायब बदाललो आनी ते कागद सुधा तेनी धापो केल्यान मेल्यानं. फुडल्या वाडीताकात लायट इली आसा. सरकारी बाईर सुधा पंपाक लायन इली, आमका देवकच लायट नाय आसा गवरमेंटाकडे.आमका आता सवय झाली आसा पन पावने सोयरे इले की पंचायत जाता. काकांच्या बोलण्यात विषाद जाणवत होता. मी कल्पनाच करु शकत नव्हतो की विजेशीवाय त्या काकांच्या कुटुंबाने इतके दीवस कसे काढले. खुप अस्वस्थ वाटायला लागलं, पुढचे दोन दीवस मी विना मोबाईल, विना ल्यापटॉप काढले. दोन दीवस सतत, प्रत्येक क्षणाला मला सारखा एकच विचार यायचा की विजेशीवाय इतकी वर्ष हे लोक कसे राहीले. ज्या कामा साठी आलो होतो ते काम उरकले आणी तीसरर्‍या दीवशी पुन्हा मुंबई ला जायला निघालो, सावंतवाडीहुन कोकणकन्या पकडली, गाडितच मोबाइल आणी ल्यापटॉपचार्ज करुन घेतला. मागचे दोन दीवस मी अपघाताने का होइना पण. इ-उपवास केला. कुठल्याही प्रकारचं ईलेक्ट्रीक किंवा ईलेक्ट्रोनीक यंत्र मी ह्य दोन दीवसात वापरलं नव्हतं परतीच्या प्रवासात रात्र भर फक्त डोक्यात एकच वीचार होता, काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु? ​टीप: पहीलाच प्रयत्न असल्याने शुद्धलेखन व मांडणी मधल्या चुकांकडे दुर्लक्ष करावे.​
वर्गीकरण
चर्चा
समाज

प्रतिक्रिया द्या
49043 वाचन

💬 प्रतिसाद (124)
अ
अरुण मनोहर Wed, 08/17/2016 - 12:15 नवीन
मिपावरील पहिल्या लेखनाचे अभिनंदन! लिहीत रहा. आता मिपा स्टाईल प्रतिसाद! क्रमश: लिहिणे राहिले का?
काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु?
मोदीना लिहा
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 08/17/2016 - 12:46 नवीन
बापरे!! बांद्याजवळच्या वाडीत ही परिस्थिती आहे? धक्का बसला.
काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु?
स्नेहांकीता ताईंना विचारले पाहिजे.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर Wed, 08/17/2016 - 12:53 नवीन
सावंतवाडी तालुक्यात अजुनही ३७० कुटुंबे अन्धारातच आहेत. आणी हा ऐकीव आकडा नाहीय, हि वस्तुस्थीती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सस्नेह Wed, 08/17/2016 - 15:25 नवीन
वाडी/वस्तीचा नेमका पत्ता मिळाला तर छडा लावता येईल आणि उपाययोजनासुद्धा. सध्या अशा विद्युतिकरणासाठी ब-याच सरकारी योजना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
र
रघुनाथ.केरकर Wed, 08/17/2016 - 15:38 नवीन
बाय रोड जायचं असेल तर कास मार्गे जावं लागतं. कोलेभाट आणी आरोस बाग च्या मध्येच हे घर आहे. तेरेखोल खाडीच्या अगदी शेजारी ऐलतीराहुन दगड भिरकावला तर तो पैलतीरी तोरशीत(गोव्यात) पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Wed, 08/17/2016 - 17:05 नवीन
पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
न
नाखु गुरुवार, 08/18/2016 - 06:16 नवीन
केरकर सर उत्तम स्फुट्/लेख अजून येऊद्यात असे अनुभवी लेख.. स्न्हेहांकिता तै : आज मला कळाले वीज आधी चमकते आणि मगच आवाज येतो ते.. तुमची तत्पर सहाय्य मदत (करण्याची तयारी/भूमीका) पाहून खूप खूप आनंद झाला... मिपाकर धर्म म्हणतात तो हाच असावा, अश्या दुर्गम वाड्यांवर विजेचा आणि विज्ञानाचाही उजेड पडू दे हीच गणरायाकडे मागणी.. नाखु मिपाकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/18/2016 - 08:31 नवीन
मिपाकर धर्म म्हणतात तो हाच असावा, अश्या दुर्गम वाड्यांवर विजेचा आणि विज्ञानाचाही उजेड पडू दे हीच गणरायाकडे मागणी.. +१०० ब्राव्हो स्न्हेहांकितातै !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
र
राजाभाउ गुरुवार, 08/18/2016 - 09:42 नवीन
+१०१ असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अर्धवटराव गुरुवार, 08/18/2016 - 21:36 नवीन
एक नंबर. आता सुषमा स्वराज मॅडमला 'भारताच्या स्नेहांकिता' असा किताब देण्याचा प्रस्ताव मिपा दरबारी दाखल करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Fri, 08/19/2016 - 07:27 नवीन
कैच्या कै... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अजया Fri, 08/19/2016 - 12:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
संजय पाटिल Sat, 08/20/2016 - 08:38 नवीन
याला आमचे कचकून अनुमोदन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ट
टवाळ कार्टा Fri, 08/19/2016 - 12:11 नवीन
पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित स्नेहांकिता - Wed, 17/08/2016 - 20:35 पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या.
अश्या कश्या इतक्या तत्पर तुम्ही... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
म
मोदक Fri, 08/19/2016 - 12:21 नवीन
पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या. तुम्ही पण..?? तुम्ही पण..????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
पैसा Wed, 08/17/2016 - 13:15 नवीन
छान लिहिलंत! तुमचे अनुभव लिहीत रहा. इतक्या लोकांकडे लाईट नाही तेही बांद्यासारख्या हायवेवरच्या गावात हे फार विचित्र आहे. त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काही करता येईल ना.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर Mon, 08/22/2016 - 15:06 नवीन
मागच्या शनीवारी कुणीतरी उपोषणाला बसले होते, पण त्याचा कही उपयोग झालेला दीसत नाही, काहीठीकाणी खुप दीवसांपासुन खांब येउन पडलेयत पण वीज आली नाही. एकीकडे सर्व ग्रामपंचायती फायबर ने जोडण्याचा काम जोरात चालु आहे, तर दुसरी कडे अजुन विजच नाही. खुप वीषण्ण करणारं चीत्र आहे. शनीवार संध्याकाळचा हा एक फोटो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Tue, 08/23/2016 - 20:10 नवीन
पण खरं सांगू का? मला तुमचं हे गाव एका अर्थी फार सुखी वाटतंय विजेसारख्या आधुनिक सुखसुविधा नाहीत तर. 'तुका म्हणे होय मनाशी संवाद| आपुलाचि वाद आपणांसी||' हे तिथे जास्त सोपं असेल असं वाटतं. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
र
रघुनाथ.केरकर Wed, 08/24/2016 - 07:50 नवीन
एक दोन दीवसच "आपुलाचि वाद आपणांसी" बरा वाटतो. पण नंतर मात्र अडचणी जाणवायला लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ब
बाळ सप्रे Wed, 08/24/2016 - 11:43 नवीन
तंबाखू सिगारेट व्यसनाच्या धाग्यावरील गांजाच्या अध्यात्मिक प्रतिसादाची आठवण झाली !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 08/17/2016 - 15:18 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 08/17/2016 - 16:17 नवीन
कोणी सांगीतले की एक दिवस टिव्ही बघू नकोस, मोबाईल वापरु नकोस तर आपण ते मुळीच ऐकणार नाही. त्यामुळे सक्तीने का होईना उपवास केलात त्याबद्द्ल अभिनंदन ! असा एखादा दिवसाचा ई उपवास मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे. आता मुळ मुद्द्याबद्द्ल. आपल्या नातेवाईकांबद्द्ल सहानुभुती आहेच. आमच्या आजी आजोबांनी देखील आत्तापर्यंत बिना वीजेचे आयुष्य व्यतीत केले. त्यामुळे बिना वीजेचे आयुष्य थोड्या वेळेकरीता का होईना पण बर्‍याच वेळा अनुभवले आहे. ठाण्यात देखील घरी बरीच वर्षे इन्वर्टर नव्हता. दोन वर्षांपुर्वी लावला मात्र आवर्जुन टिव्ही, फ्रीज, इंटरनेट राऊटर, गीजर ई. साधनांना बॅकअप दिलेला नाही. या वस्तूंशिवाय जगायची सवय असलीच पाहिजे असे माझे मत. (इतरांच्या मताचा आदर आहेच.) वाडीवर वीज जोडणी नाहीये, ६०-७० वर्षे वीज नाहिये म्हणजे त्यांना वीजेशिवाय जगायची सवय आहे हे नक्की. पारंपारीक वीजेऐवजी सोलार चा पर्यायाचा विचार करण्याची तयारी आहे काय ? वीजेवर मासिक किती खर्च करायची त्यांची मानसिक तयारी आहे ? या मुद्द्यावर विचार करावा. सध्या मी सोलार एनर्जी विषयावर लक्ष केंद्रित करत आहे. सोलार एनर्जीचा सुरुवातीचा सेटअप अजुनही महाग आहे मात्र काही गोष्टींवर सरकार सवलत देत आहे. साधारण ५-१० हजाराच्या बजेटमधे खेड्यातल्या छोट्या घराच्या प्राथमिक गरजा भागवता येतील काय या दृष्टीने अभ्यास चालू आहे. उदा. ५ ते ७ वॅट चे १ ते २ दिवे, १ पंखा, एक मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि एखादा रेडीयो ही खेड्यातल्या छोट्या घराची गरज असू शकेल असे वाटते. हा सेटअप कमीत कमी ५ वर्षे विनातक्रार चालवता येईल काय या दृष्टीने विचार करत आहे. म्हणजे साधारण महिना १०० रु वीज बील भरणारी व्यक्ती ह्या सेवेचा लाभ घेऊ शकेल. दैनंदिन मेंटेनन्स घरातल्याच किंवा लोकल माणसाला शिकवायचा असा एकंदरीत विचार आहे. अडचणींचा आणि त्यावरील उपायांचा विचार करत आहे. हा विषय मी वेगळा धागा काढून लिहिणारच होतो. मात्र त्याअगोदरच हा धागा आला. मिपाकरांनी आपले अभिप्राय कळविले तर अभ्यासास मदत होईल. कुणाकडे सोलार सिस्टीम वापराचा अनुभव असला तर उत्तमच. साधारण दिपावलीच्या सुमारास राहत्या सोसायटीपासूनच प्रयोग सुरु करायचे ठरविले आहे. तुमच्या नातेवाईकांसारखी अशी एखादी जेन्युईन केस असेल तर केवळ प्रायोगिक तत्त्वावर ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करायची देखील तयारी आहे. साधारण २०१७ च्या सुरुवातीला पुर्णपणे यात उतरायचे ठरविले आहे. बघूया कसे जमते ते !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 08/17/2016 - 19:30 नवीन
अरे वा मुटके साहेब, हि चांगली आयडिया आहे. 10 हजारापर्यंत तुम्ही म्हणताय तेवढी उपकरणे चालत असतील तर लै भारी. खरे सांगायचे झाले तर मलाही तेवढेच वीज लागती. दिवसभर मी हापिसात. तरीसुद्धा मी 700 रु बिल भरतो घराचे. तुम्ही याचे डिटेल्स जाहीर करा, जमेल तेवढी मदत करिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
क
कपिलमुनी Wed, 08/17/2016 - 21:02 नवीन
फार्म हाउस वर हा सेटअप नक्की उपयोगी पडेल. धागा काढून अधिक माहिती द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मोदक गुरुवार, 08/18/2016 - 20:28 नवीन
कुठे कुठे आहेत तुमची फार्महाऊसे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 08/18/2016 - 22:13 नवीन
यादी मोठी आहे , तुमचा पत्ता सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
न
नाखु Fri, 08/19/2016 - 04:57 नवीन
खेळायला न बोलावणार्यांचा निशेध. बदाम सात नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/19/2016 - 06:29 नवीन
हल्ली मिपावर पत्ते मागण्याची फेसण जोरात आहे असे निरिक्षण नोंदवत आहे ! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खटपट्या Wed, 08/17/2016 - 23:04 नवीन
धर्मराज, चांगली संकल्पना. यावर बोलायला आवडेल. सवडीने फोन करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 08/18/2016 - 07:30 नवीन
सौर उर्जे बद्दल खुप ऐकुन आहे, सुरवातीचा खर्च सोडला तर पुढे फार काही खर्च नसतो. पण मला काही प्रश्न पड्लेयत: १.पावसाळयात काय? आपल्याकडे ४ महिने पावसाळा असतो. २. मोटार वायंडींग असलेल्या वस्तुंच्या वापरावर मर्यादा येउ शकते का? ३. टेलीविजन संच चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/18/2016 - 07:35 नवीन
बॅटरीच्या रिकरिंग एक्स्पेंडिचरचे कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/18/2016 - 08:30 नवीन
उत्तम प्रकल्प ! सौर उर्जेसारख्या अपारंपारिक उर्जास्त्रोताबद्दलच्या व्यावहारिक पर्यायांसंबंधी इथेच एक वेगळा धागा काढून माहिती द्यावी असे सुचवतो. अश्या पर्यायांची जेवढ्या जास्त लोकांना माहिती होईल तितके चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
साधा मुलगा गुरुवार, 08/18/2016 - 08:44 नवीन
आपल्या प्रयोगासाठी शुभेच्छा आणि उत्सुकताही आहेच. मागे एकदा ठाण्यातील नागरिकाने सोलर आणि पवनचक्कीचा वापर करून विजेचे बिल कमी केले होते, abp माझा वर बातमी होती, त्याचा दुआ आता सापडत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
पैसा गुरुवार, 08/18/2016 - 09:18 नवीन
उत्तम प्रकल्प. आमच्या शेतघरात वीज कनेक्शन मिळणे फार अवघड दिसत आहे. त्यामुळे मी दोन वर्षापूर्वी सोलार उपकरणे, वापर याचा बर्‍यापैकी अभ्यास केला होता. आणि सुमारे २/३ महिने तिथे सोलर फॅन आणि छोटे दिवे वापरून काढलेही होते. धागा काढा. तिथे ते अनुभव लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
र
रघुनाथ.केरकर Mon, 08/22/2016 - 15:09 नवीन
वेगळ्या धाग्याची वाट बघतोय, तसे (सौर)विद्युत कुंपणावीषयी पण माहीती लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/17/2016 - 17:15 नवीन
स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही अशी अवस्था पाहिली की काय म्हणावे हे कळत नाही :( मिपालेखकांत सामिल झाल्याबद्दल अभिनंदन व स्वागत !
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 08/17/2016 - 19:00 नवीन
लेख आवडलाच, पण त्या बरोबरच स्नेहांकिता ताईंची तत्काळ मदतीची तयारीही लक्षणीय आहे, आणि त्या अनुषंगाने आलेला धर्मराज मुटके यांचा सौरशक्तीच्या वापराने वीजनिर्मितीचा उल्लेखही वाचनीय. त्यांच्या प्रयत्नांत पुढे काय होतं हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/17/2016 - 21:07 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 08/17/2016 - 21:29 नवीन
कोकनात लाईटीक येऊचा नाय की येऊन देऊचा नाय...
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 08/18/2016 - 07:34 नवीन
कोकाणात लायट इली पण आजुन ती सगळ्यापर्यंत पोचाक नाय, लाल फितीत अडाकली आसा असा वाटता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 08/18/2016 - 10:26 नवीन
पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित स्नेहांकिता - Wed, 17/08/2016 - 20:35 पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या. प्रतिसाद द्या
स्नेहांकिता यांच्या वरच्या प्रतिसादाला, तुम्ही अजून उत्तर दिले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 08/18/2016 - 10:32 नवीन
त्याना व्यनी केलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ज
जयन्त बा शिम्पि गुरुवार, 08/18/2016 - 00:20 नवीन
पहिलाच प्रयत्न असला तरीही छान जमले आहे. नवीन धागा कसा सुरु करावा याचे मार्गदर्शन कोणीतरी मला व्यनि पाठवून करील काय ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/18/2016 - 08:24 नवीन
तुम्ही अगोदर 18/07/2015ला मुहुर्तामागचं शास्त्र ! हा धागा काढला आहात ना, तसाच नवीन धागा सुरू करायचा असतो :) ;) आता विसर पडला असल्यास माहिती : मिपापानाच्या उजवीकडच्या रकान्यातल्या "आवागमन" शिर्षकाखाली असलेल्या "लेखन करा" या पर्यायावर टिचकी मारा, काम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 08/18/2016 - 06:53 नवीन
हौसला अफ़जाइ बद्दल सगळयांचे खुप खुप आभार.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/18/2016 - 07:09 नवीन
मला महिना २५० ते ३०० च्या वर बील जात नाही. कारण गरजा कमी. शिवाय माझ्याकडे गेल्या १० वर्षाचे वापरलेल्या युनिटच्या नोंदी आहेत. एक एक्सेल शीटच बनवली आहे ज्यात रोजच्या रोज मिटरमधल्या युनिटची नोंद करुन ठेवतो. ज्याने महिना किती युनिट वापरले जातात ते समजते.) त्यामुळे भविष्यात अतिरिक्त बिल आले तरी या नोंदीनुसार ते वाजवी करुन घेवु शकतो, धर्मराजजी तुम्ही सौर उर्जा वापरलीत की एक वेगळा धागा काढा म्हणजे सगळ्यांना त्याचा उपयोग होईल.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 08/18/2016 - 07:52 नवीन
लेख आवडला, विशेष करून यासाठी, की अन्य कुणी कदाचित लाईट नसल्याने स्वतःचे कसे हाल झाले ते रंगवून सांगितले असते आणि उगाच अजून लाईट नाही म्हणून खोटा उमाळा काढून सरकारला शिव्या घातल्या असत्या. तुमची खरी कळकळ लेखातून पोहोचली. तसेच तुमची खरोखर त्यांना वीज मिळावी यासाठीची धडपड करायची तयारीही पोहोचली. स्नेहाताईचा प्रतिसाद पाहूनपण खूप अभिमान वाटला. धर्मराजमुटके यांच्या उपक्रमाबद्दल औत्सुक्य आहे. हे यशस्वी झाले तर अनेकांचे कल्याण होईल. त्याबद्दल शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/18/2016 - 08:33 नवीन
बांद्याफुडल्या हेवा़ळेसारख्या अगदी कोपर्‍यातल्या गावात लायटी आसत आणि आरोसबागेत नाय म्हणजे अतिच झाला! गप कित्या रवलेसत लोक? आता स्नेहाताईन सांगला तसा करुन बघा. उपयोग होईत कायतरी.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 08/18/2016 - 09:51 नवीन
आरोसबागेत लायट आसा पण मांजरेकरांचा घर वाइच फुडे आसा, महावीतरणाक धा एक पोल घालुचे लागतले. पण तेंका काय सवड गावना नाय. ह्याच नाय तर , मांजरेकारांका पाणी हाडुक सुधा एक किलोमीटर येवचा लागता,पावसाचा पाणी उकळुन पितत,दारात न्हय(खाडी)आसा, डीसेंबर पर्यंत तेचा पाणी पीउक गावता, मगे खारा जाता, गिमात मात्र १ किलोमीटर वडी काडुचे लागतत, बाय मारुक परमीशन नाय कारण सात बार्‍यार हेंचा नाव कुळ म्हणान लागला. असा तलाटी सांगता. ह्या पावसात एका पडीयेचो पारो कोसातला, तर तलाटी सांगता कि सातबार्‍यार धनीयाची नावा आसत , तेवा नुकसान भरपाइ गावाची नाय. इतक्या सगळा असान पण ते नाराज नाय आसत, समाधान जगतत, फक्त लायटीचो वीषय इलो कि मात्र भितुरल्या भितुर खदखदतत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पैसा गुरुवार, 08/18/2016 - 09:54 नवीन
:( आम्ही समजत होतो हे असे राजस्थान आणि बिहारमधे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा