कोण?
उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी
सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी
जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती
वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली
ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी
सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी
अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे?
तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी
भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे?
ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?
💬 प्रतिसाद
(4)
प
पैसा
Fri, 08/26/2016 - 08:44
नवीन
सुरेख! कविता खूप आवडली.
- Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू
Fri, 08/26/2016 - 08:50
नवीन
छान आहे कविता,
थोडी अगोदर (मे महिन्यात) आली असती तर समयोचित झाली असती.
- Log in or register to post comments
क
क्षमस्व
Sat, 08/27/2016 - 08:53
नवीन
छान।
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
गुरुवार, 09/01/2016 - 07:58
नवीन
सुंदर कविता.... आवडली
- Log in or register to post comments