नरेन्द्र मोदी आणि २०१९
परवाच इन्डियन एक्स्प्रेस वॄत्तसमूहाने घेतलेल्या सर्व्हे मध्ये पन्तप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या नेतॄत्वाखाली भाजप सरकार वर जनतेचा पूर्ण विश्वास असून २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच विजयी होइल असा निष्क्रर्ष व्यक्त केला आहे.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/70-percent-indians-want-modi-back-as-pm-in-2019-over-50-percent-want-liquor-ban-app-based-poll-3010422/
ही एक अतिशय आशादायी बाब असून मोदींच्या नेतॄत्वाखाली भाजपने देशाला स्थिर आणि कणखर सरकार दिलेले आहे. आन्तरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत उंचावलेली असून आर्थिक आणी अन्य सामाजिक्/प्रशासकीय सुधारणांचा गाडा पुढे चालवून सरकारच्या कामगिरीचे ग्राउन्ड रिझल्ट्स दिसायचे असतील तर मोदी सरकार मोठ्या कालावधी साठी सत्तेत असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच याआधीच्या सरकारानी प्रचंड बिघडवून ठेवलेल्या गोष्टी सुधारायच्या तर पुरेसा वेळ हवाच .
पण त्याबरोबरच आणखी एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे आता केन्द्र सरकार असे म्हणत आहे की देशातील विविध निवडणुका एकत्र घेतल्यास प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ वाचेल . हे तात्त्विक दॄष्ट्या बरोबर असले तरी प्रॅक्टी़कली योग्य दिसत नाही . याचे कारण वाजपेयी सरकारने अशाच हव्यासापायी केन्द्र आणि राज्यातील सहा महिन्याचा कार्यकाळ वाया घालविला होता ,शेवटी लवकर निवडणुका घेवून केन्द्र आणी राज्य दोन्ही ठिकाणी आपटी खाल्ली होती हा इतिहास विसरू नये असे वाटते.
आपणास काय वाटते?
2019 मघ्ये उत्तर देईल ह्या प्रतिसादाला... तोवर वाट बघूया! ;)असे असेल तर "फक्त 9 प्रतिसाद, मोदी असून??? " येथे नक्की कसले प्रतिसाद अपेक्षित होते..?