Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो? -- 4 कारणे

अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 06:10
🗣 118 प्रतिसाद
4 कारणे... // --------------------------------------------------------------------------- पहिलं कारण- संख्या. या देशात 80 टकक्यांपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदुची आहे. नॅचरली- कोणत्याही धर्मावर होणाऱ्या टोटल टीकेपैकी -80 टक्के टीकासुद्धा -मेजोरिटी फॉलो करत असलेल्या धर्मातल्या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीबद्दलच होणार. याईतकं साहजिक काय? उदाहरणार्थ. हेच जर अमेरिका किंवा यूरोपमधलं घेतलं तर- तिथले प्रोग्रेसिव लोक करत असलेली टिका- बहुसंख्य वेळा ख्रिश्चनिटी 'च्याच' विरोधात असते. अमिरिकेतले ख्रिश्चन लोक, तिथल्या अल्पसंख्य हिंदू धर्मावर टिका करून काय मिळवणार? ---तसंच भारतात आपण अत्यल्प असलेल्या ख्रिश्चन धर्मावर --टोटल टिकेच्या 50 टक्के टिका करून काय मिळवणार?? --------------------------------------------------------------------------- दुसरं कारण: मी जन्मलो -त्या धर्मातल्या लहानपणापासून पाहत आलेल्या चुक बरोबर अशा साऱ्या गोष्टी बद्दल बोलताना मला नेचुरल कॉन्फीडेंस असतो. मी ठामपणाने एखाद्या गोष्टीला चुक तर चुक किंवा बरोबर तर बरोबर म्हणू शकतो. हेच मी (पुरेशा अभ्यासा अभावी) दुसऱ्या धर्माबद्दल बोलताना थोडासा तरी कचरेल... उदाहरणार्थ. मी हिंदू आहे अन जर मला इस्लामच्या ईद-उल-अध वर (हे नाव सुद्धा बरोबर आहे की नाही मला ठाऊक नाही) -टिका करायची म्हटलं-- तर त्याआधी ती मुळात साजरी का केली जाते?? याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार. या विरुद्ध -मी ज्या हिन्दू धर्मात जन्माला आलो त्यात फॉलो होणाऱ्या अंधश्रद्धा, जात-पात, भोंदू बाबा, फुकटे पुजारी, अंगात येणे, या चुकीच्या गोष्टी मी लहानपणा पासून पाहत आल्याने- यावर टिका करताना स्वत:च्या धर्माच्या (मुद्दाम न करताही- आपोआप झालेल्या अभ्यासामुळे) करणाऱ्या टिकेत एक कॉन्फीडन्स असतो. प्लस यात परत संख्या कामाला येते. आता 2015 च्या रिपोर्ट नुसार भारतात 80 टक्के हिन्दू 14 टक्के मुस्लीम 2 टक्के ख्रिश्चन 1 टक्का बुद्ध अन इतर 3 टक्के आहेत. त्यामुळे 10 पैकी टिकाकार घेतले तर- प्रत्येक धर्मावर होणारी टिका साहजिक अशी असेल... हिंदू 8% मुस्लीम 1.4% ख्रिश्चन 0.2% अन बुद्ध 0.1% म्हणजे हिंदू धर्माची होणारी समीक्षा 'कठोर' असणार यात वाद नाही. --------------------------------------------------------------------------- तिसरं कारण: मेजोरिटीचा-- माइनॉरिटी वरती सतत होणारा अन "न टाळता येणारा" परिणाम. म्हणजे कोणत्याही देशातल्या मेजोरिटीचं जेवढं रॅशनलायजेशन, सेक्युलरिजेशन आणि लिब्रलायजेशन होईल- तेवद्याच प्रामाणात त्या त्या देशातल्या माइनोरिटीजचंही -थॉट एंड बेहविरियल लिब्रलायजेशन "आपोआप" अन नकळत होईल. "आपोआप" -हा शब्द इथं फार महत्वाच्या आहे- कारण ही प्रोसेस अतिशय इम्प्लीसीट आहे. ठरवून न करता केलेली. अतिशय सोपं उदाहरण म्हणजे समजा 10 पोरांत 8 जन हुशार आहेत अन 2 थोड़े ढ. --तर त्या 2 ढ मधल्या, या 8 च्या संगतीत राहून ,एक तरी पोरगा हुशार होण्याची शकयता जास्त असते. And vice-a-versa! म्हणजे केरळ मधला मुस्लीम अन बिहारचा मुस्लीम यात साहजिक फरक असणार आहे. तसाच भारतातला मुस्लीम अन पकिस्तानला मुस्लीम यात खुप फरक असणार आहे. "माझ्या engg च्या वर्गातल्या, कित्येक मुस्लीम मूली इतर मुलींसारखं जीन्स टॉप घालायच्या." तेच पकिस्तान मधल्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना तिथे इंजिनिअरींग पर्यंत 'शिकू तरी देत असतील का?' हाच मला प्रश्न आहे. म्हणून हिंदू-- म्हणजे या देशातला बहुसंख्य समाज जेवढया कठोर समिक्षेला सामोरा जाईल अन जास्त लिबरल होईल तेवढाच इथला अल्पसंख्यक समाज सुद्धा आपोआप लिबरल होणार आहे यात काहीच शंका नाही. --------------------------------------------------------------------------- चौथं कारण. माझी टिका ही --माझा धर्म धुसमसत का होईना पण स्वीकारेल. पण दुसऱ्या धर्मातल्या कोणी माझ्या धर्मावर केलेली टिका (मग ती कितीही बरोबर असली) तरी ती- माझा धर्म स्वीकारेल का? उदाहरणार्थ: एखादा मुस्लीम म्हटला की "काय तुमच्या हिन्दू धर्मात ते फालतू अंगात येणे अन असले काय काय प्रकार असतात." आता अंगात येणे हा प्रकार कितीही खोटा असला तरी त्याबद्दल ची टीका मी एका मुस्लीमाकडूम (प्रैक्टिकली बोलताना) स्वीकारेल का??? कुठेतरी मनातल्या मनात मी त्याला 'आउटसायडर' च मानेल. मग मी त्याला काय उत्तर देईल की "आधी तुम्ही त्या बुरख्याचा फाल्तुपना बंद करा- आता आपण ईसवी सन 2016 मधे आहोत. ईसवी सन - 216 मधे नाही". प्रसंगी मी त्याच्या अंगावर सुद्धा जाईल. हिंसक होईल. पण हेच एक हिंदू म्हणून मी म्हटलो की "काय यार आपल्या धर्मात हे अंगात येणे काय -अन जातीयवाद पाळने काय- प्रकार बिलकुल फालतू आहेत." तर समोरचा व्यक्ती माझा विरोध् करेल. पण शेवटी टोकाला न जाता किंवा हिंसक न होता -- गप्प बसेल. कारण त्यांच्यासाठी मनातल्या मनात मी कुठेतरी "इनसायडर" असतो. त्यामुळे प्रोग्रेसिव हिंदू म्हणून -माझी हिंदू धर्मावर (कंपेरिटीवली जास्त) टिका होते.. . माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे... // (Constructive counter-arguments are Welcome as usual... :-) ) Article is inspired from T Manoj's view on religion...

प्रतिक्रिया द्या
21787 वाचन

💬 प्रतिसाद (118)
अ
अर्थहीन Mon, 10/10/2016 - 15:03 नवीन
बरोबर हेरून या वाक्याकडे दुर्लक्ष केलत... व्हेरी गुड... >> माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे... >> म्हणजे मी एकाच लेखात सगळ्या धर्माला धारेवर धरलं पाहिजे... कसल्या बाष्फळ अपेक्षा... वाह!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Mon, 10/10/2016 - 17:38 नवीन
अर्थहीन .. तुम्ही एकदा काय ते नक्की ठरवा... हिंदू धर्मावर टीका करण्याची चार कारणे देता.. आणि वर म्हणता की सर्व धरमांवर टीका करतो असेही म्हणता.. जर तुम्ही सर्व धर्मांवर टीका करत असाल तर मग अशी चार कर्णे द्यायची वेळ का यावी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
अ
अर्थहीन Mon, 10/10/2016 - 17:42 नवीन
अहो... मला जसं हिंदू धर्मात काही चुकीचं वाटतं त्यावर मी बोलतो... तसं इतर धर्मातल्या चुकांवर सुद्धा बोलला पाहिजे असं म्हणणे अयोग्य आहे --असं तुम्हाला वाटतं? ... वेळ वगैरे काही आलेली नाही माझ्यावर कशाची ... मला स्वतःला वाटलं कि मी का टीका करतो हे मी स्पष्ट करावं... मला वाटतं हा माझा हक्क असायला हरकत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Mon, 10/10/2016 - 17:52 नवीन
इतर धार्माबद्दल बोलले पाहिजे वगैरे मान्य... तुम्ही स्वाट: मात्र फक्त हिंदू धर्मा बद्दलच बोलता... इतर धार्माबद्दल नाही.. त्यमुळे निधर्मी असल्याचा आव आणु नये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
अ
अर्थहीन Mon, 10/10/2016 - 18:33 नवीन
एकाच लेखात सगळ्या धर्माबद्दल बोलणं मला शक्य नाही... --- बाकी आव आणून मला करोड रुपये मिळणार आहेत म्हणून मी आणतोय... तुम्हाला तोटा? इथून पुढे असल्या कमेंट्स ना उत्तर देणे बंद... तुम्ही शिव्या दिल्या तरी तुमचा आदर --मात्र तुम्हाला उत्तर देण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ आहे --असं स्वतः "अर्थहीन" लाच वाटतं नाही... यावारून समजा काय समजायचं ते... शिवीगाळ वगैरे...चालुद्या तुमचं आता बिनधास्त...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Mon, 10/10/2016 - 20:55 नवीन
मी तुम्हाला कधी शिविगाळ केला? बाकी चलुद्या तुमचे दुकान..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
अ
अमर विश्वास Mon, 10/10/2016 - 21:01 नवीन
तुम्हाला एका लेखात सर्वा धर्माबद्दल लिहीणे शक्या नाही.. मान्य.. मग बाकीच्या लेखांच्या लिंक्स द्या.. जेथे तुम्ही इतर धर्माबद्दल मतप्रदर्शन केले आहे,,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
A
amit१२३ गुरुवार, 10/13/2016 - 12:43 नवीन
@ अमर विश्वास ..पटलं आपल्याला ..4 कारणे सांगण्यामागचा हेतू काय ? @ अर्थहीन एकीकडे म्हणता मला खूप मोठी अपेक्षा होती कि इथे या लेखाला खूप चांगल्या "काउंटर" अर्ग्युमेंट्स येतील आणि दुसरीकडे तुम्ही बोलता आव आणून मला करोड रुपये मिळणार आहेत म्हणून मी आणतोय... तुम्हाला तोटा? नावडतीचे मीठ आळणी तसा प्रकार आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
D
Dipankar Mon, 10/10/2016 - 14:46 नवीन
हिन्दु आहात म्हन्णुन टिकेला आक्शेप नसतो निधर्मी म्हन्णुन घ्यायचे आणी टिका करणे याला आक्शेप असतो
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/10/2016 - 16:57 नवीन
तुम्ही हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहिता यामागची ४ कारणे समजली. परंतु हिंदू धर्मातल्या नक्की कोणकोणत्या गोष्टींविरूद्ध लिहिता आणि काय लिहिता ते सांगता का जरा. का टीका करतो हेच फक्त सांगण्यापेक्षा तुमच्यामते हिंदू धर्मातील टीकाकरण्यायोग्य गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि स्वीकारार्ह गोष्टी (असल्यास) कोणकोणत्या आहेत, त्या गोष्टी तुमच्यामते टीकाकरण्यायोग्य का आहेत, त्यावर तुम्ही कशाप्रकारे टीका करता व त्या गोष्टी सुधारण्यासाठी तुम्ही काय केले आहे किंवा काय करायला हवे हे सांगितले तर ते जास्त योग्य होईल.
  • Log in or register to post comments
अ
अर्थहीन Mon, 10/10/2016 - 18:27 नवीन
काही गोष्टी मी वरती सांगितल्याचं आहेत... अंगात येणे, बकरी कापणे, मुहूर्त पाहणे, ब्राह्मण कडून सल्ले घेणे., देवाच्या दानपेटीत पैसे टाकून मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची वेळ आले कि हात मागे घेणे... जातपात पाळणे... आणि ओ माय गॉड अँड PK मध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी... -- चांगल्या म्हणाल तर सर्वात महत्वाची गोष्ट मला हिंदू धर्माकडून सहिष्णू पणा शिकायला मिलाली हि वाटते... -- चुकीच्या गोष्टीवर टीका करून त्या करण्यापासून लोकांना परावृत्त करणे हे मला माझ्या बाजूने केलेलं काँट्रीब्युशन वाटतं... -- धन्यवाद श्रीगुरुजी....... तुम्ही योग्य अर्ग्युमेण्ट केली असं वाटतं --नाहीतर इथे काहीजण नुसते वैयक्तिक हल्ले करण्यापलीकडे काही करतात असं वाटतं नाही... --
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तेजस आठवले गुरुवार, 10/13/2016 - 16:30 नवीन
अंगात येणे, बकरी कापणे, मुहूर्त पाहणे, ब्राह्मण कडून सल्ले घेणे., देवाच्या दानपेटीत पैसे टाकून मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची वेळ आले कि हात मागे घेणे... जातपात पाळणे.
अर्थहीन जी, अंगात येणे हि गोष्ट फक्त हिंदूंपुरती मर्यादित नाही असे मला वाटते. बकरी कापणे हे तुम्ही बळी देणे अर्थाने म्हणत असाल तर ते चुकीचेच आहे. बाकी ब्राह्मणाकडून सल्ले घेणे यात काय चुकीचे आहे ? प्रत्येक धर्मात काही लोक असतात ज्यांचा सल्ला इतर लोक घेतात. चांगले आणि वाईट दिवस ते शोधून देतात(मुहूर्त ह्या अर्थाने) आणि त्यानुसार सल्ला मागणारा माणूस निर्णय घेऊ शकतो. ब्राह्मण काही त्यांना सक्तीने बोलावून घेत नाहीत आणि अमकी तमकी गोष्ट कराच अशी सक्ती करू शकत नाहीत.(एखाद्या गोष्टीची भीती घालणे हे एक अजूनच वेगळे प्रकरण आहे, आणि त्याला कुठलाच धर्म अपवाद नाही.... अमके तमके नाही केलेस तर तुझे वाईट होईल वगैरे वगैरे)
देवाच्या दानपेटीत पैसे टाकून मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची वेळ आले कि हात मागे घेणे.
हे हिंदू करतात ? ह्याचा काही विदा आहे का ? म्हणजे फक्त हिंदूच असे करतात ह्याचा काही विदा/ पुरावा आहे का ? माझ्या मते तुमचे हे विधान हे सरसकटीकरण आहे. माझ्या माहितीतही मध्ये किती लोक असे आहेत कि त्यांनी खूप रक्कम दान केली आहे आणि तिचा विनियोग त्याच कारणासाठी होतो आहे हे ते बघतात. हे सगळे हिंदू आहेत. (अवांतर : काही लोक दुसर्याने त्याच्या पैशाचे काय करावे हे ज्या आग्रहीपणे मांडतात ती गोष्ट मला फार खटकते. "इतका पगार कमावतोय, दिले *** रुपये दान तर काय जातेय ह्याचे!" असे अगदी सहज बोलून जातात. मुळात दुसर्याने त्याच्या संपत्तीचे काय करावे हे ठरवणारे आपण कोण हा विचार हे लोक कधी करणार देव जाणे. तो माणूस दान देईल/ पैसे खर्च करेल/ उधळेल नाहीतर कुजवून ठेवेल, आयजीच्या जीवावर बायजी उदार कशाला ? असो.) बाकी गरजू गरजू म्हणवणारे सगळेच प्रत्यक्षात गरजू नसतात हे सुद्धा काही अनुभवातून दिसून येते. त्यामुळे हे ज्याच्या त्यावर सोडून द्यावे हेच खरे.
जातपात पाळणे
हि गोष्ट चुकीची आहे, पण फक्त हिंदूंमध्ये हे आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल.इस्लाम ह्या शब्दाखातर सर्व मुस्लिम एकत्र येत असले/ येऊ शकत असले तरी त्यांच्यात पण एकी नाही.सुफी आणि शिया ह्यांची भांडणे आहेतच. अहमदिया मुस्लिमांना इतर मुस्लिम हे मुस्लिम मानत नाहीत असे ऐकले आहे. बोहरा मुस्लिम हे व्यवसायात जास्त असल्याने त्यांच्यात कर्मठपणा त्यामानाने कमी आहे आणि लवचिकपणा सुद्धा आहे.जातीपाती तर प्रत्येक धर्मात आहेत, गोव्यातल्या ख्रिश्चनांमध्ये पण सारस्वत ख्रिश्चन वेगळे आणि बाकीचे वेगळे असे ऐकले आहे. प्रोटेस्टंट वेगळे, कॅथॉलिक वेगळे हा भेद आहेच. त्यामुळे फक्त हिंदू धर्मातच जातीपाती आहेत असे जर तुम्ही म्हणत असाल तर ते संपूर्ण सत्य नाही. हिंदू धर्म लवचिक आहे हे मानण्यास कोणताही प्रत्यवाय नसावा. सर्वसामान्यपणे माझ्या धर्मात ज्या गोष्टी पाळल्या जातात त्यांना विरोध करण्याचे मला स्वातंत्र्य आहे ही एक फार मोठी बाब आहे. मला हवा तो ग्रंथ मी प्रमाण मानू शकतो, त्याप्रमाणे आचरण करू शकतो, काही दिवसांनी त्यातल्या काही गोष्टी नाही पटल्या तर सोडून देऊ शकतो, किंवा दोन विचारप्रवाहांमधून माझा माझ्यापुरताच एक स्वतंत्र आचरण मार्ग तयार करू शकतो. अशा प्रकारचे स्वातंत्र्य दुसऱ्या कुठल्या धर्मात असेल असे वाटत नाही( हा स्वधर्माचा दुराभिमान नाही). तुम्ही बाकीच्या धर्मांवर अश्या प्रकारचा लेख लिहिला असेल तर त्याची लिंक द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
म
मराठी_माणूस Fri, 10/14/2016 - 11:54 नवीन
देवाच्या दानपेटीत पैसे टाकून मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची वेळ आले कि हात मागे घेणे..
लोकसत्ते मार्फत चालावला जाणारा "सर्वकार्येशु सर्वदा" नावाचा उपक्रम आणि त्या अंतर्गत लोकांचा येणारा मदतीचा ओघ पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
ह
हेमन्त वाघे Mon, 10/10/2016 - 18:15 नवीन
मी फटू आहे , माझी फाटे आणि म्हणूनच मला तुलनेबे बारा हिंदू भर वाटतो झाले समाधान ?? तुमची लाल , कलाम लाल !!
  • Log in or register to post comments
अ
अर्थहीन Mon, 10/10/2016 - 18:28 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे
R
Rahul D Mon, 10/10/2016 - 18:39 नवीन
हा शब्द योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 10/10/2016 - 21:35 नवीन
तिसरं आणि चौथं याबद्दल मात्र शंका आहे. तिसऱ्याबद्दल जास्त. तिसरं कारण म्हणून तुम्ही जे मांडलंय त्याला trickle down theory म्हणतात. प्रामुख्याने अर्थशास्त्रात तिचा बराच प्रभाव होता. या theory नुसार जर श्रीमंत देशांनी गरीब देशांबरोबर व्यापार वाढवला तर श्रीमंत देशांमधली संपत्ती तिथे झिरपेल किंवा trickle down होईल. काळाच्या ओघात असं आपोआप होणार नाही हे सिद्ध झालंय. बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक यांच्यातही तसं आपोआप होण्याची शक्यता कमी आहे, rather नाहीच. जर १. अल्पसंख्यांक समाज बहुसंख्यांकांच्या जीवनशैलीला आपल्या जीवनशैलीवरचं आक्रमण समजायला लागला आणि २. अल्पसंख्यांक समाज जर आपल्या कमी संख्येमुळे स्वतःला असुरक्षित समजत असेल तर - असा समाज स्वतःला बहुसंख्यांपासून जाणीवपूर्वक वेगळं ठेवायचा प्रयत्न करेल. मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्ड आणि देवबांदी धर्मगुरूंनी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विरोध केलाय त्यामागे हेच कारण आहे. त्यामुळे असा समाज आपोआप लिबरल होणं शक्य नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी मुख्यतः स्त्रियांची परिस्थिती सुधरावी लागेल कारण कोणत्याही सामाजिक सुधारणा या स्त्रियांशिवाय होऊच शकत नाहीत. चौथं कारण फारच आशावादी वाटलं मला. आॅनर किलिंगच्या ज्या दुर्दैवी घटना आपल्या देशात आणि हिंदूंमध्ये झालेल्या आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं की हिंदू समाजही पूर्णपणे प्रागतिक किंवा पुरोगामी झालेला नाही. शहरांत कदाचित सुरूवात झाली असेल. गावांत अजूनही वेगळी परिस्थिती आहे. मी एका तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इंजिनियरिंग काॅलेजच्या वसतिगृहात ४-५ जातींचे वेगळे गणपती बसलेले पाहिले आहेत. बसवणारी मुलं १९-२० वर्षांची. एवढ्या लहान वयात जर जात डोक्यात पक्की बसली असेल तर ती पुढे निघून जाणं फार कठीण आहे. त्यामुळे दुसरा धर्म सोडा, आपल्या धर्माचे लोक ऐकून घेतील असंही नाही. हिंदू धर्मात तर असंख्य मतप्रवाह आणि विचारधारा असल्यामुळे धर्माच्या स्वरुपाबाबत एकमत होणं हे जवळपास अशक्य असावं.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/10/2016 - 22:00 नवीन
सहमत आहे बोक्याभाऊला आमच्या, ट्रिकल डाउन शक्य नाही कारण मुळात भारतात अल्पसंख्य लोक अब्राहमीक धर्मांचे किंवा सेमिटीक धर्माचे आहेत, ह्या मंडळींचे पूर्ण आयुष्य आजही 1200-2000 वर्षे आधीच थांबलेले आहे, ते ही एकाच पुस्तकाभोवती थांबलेले आहे. अश्यात बहुसंख्य लोकांनी कितीही ट्रिकल डाउन केले तरी ते शोषून घ्यायची वृत्तीच मुळात नसली तर पंचायत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/10/2016 - 22:04 नवीन
अजून एक, सेमिटीक धर्मांतील अचल वृत्ती पाहता हिंदू धर्म हा अतिशय वेगवान अन प्रवाही वाटू शकतो, किंबहुना काही प्रमाणात आहेच तरीही २१व्या शतकात माहिती/ज्ञानाचा महास्फोट झाल्यानंतर मात्र विलक्षण जास्त वेगाने धावणाऱ्या मानवी मेंदू पेक्षा ही प्रवाहगती फारच धीमी असल्याचे जाणवते.तस्मात हिंदूधर्मातही टिकेला स्कोप बराच उरला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अर्थहीन Tue, 10/11/2016 - 06:00 नवीन
सर धर्माचं आणि अर्थशास्त्राचा तत्वज्ञान वेगवेगळं आहे... याला एका धाग्यात गुंफत येईल असं मला वाटत नाही...! ... Law बोर्ड काहीही म्हणेल त्यांना अजून फार दिवस पाहिल्याइतकंच महत्व राहील असं मला खरंच वाटत नाही... माझे कित्येक मुसलीम मित्र आहेत जे पूर्णपणे भारतीय Way Of Life जगतात... ट्रिकल डाउन होत नाही असं मानलं तर मग आज कित्येक भारतीय मुलीनी बुरखा फेकून जीन्स अन टॉप का स्वीकारले... अन बहुसंख्यामुळे हे होत नाही असं मानलं तर पाकिस्तान इराण इराक मध्ये आजही का एवढ्या मोठ्या प्रमाणात बुरखा का अस्तित्वात आहे?? सॉरी मुद्द्याशी असहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 10/11/2016 - 07:11 नवीन
धर्माचं आणि अर्थशास्त्राचा तत्वज्ञान वेगवेगळं आहे... याला एका धाग्यात गुंफत येईल असं मला वाटत नाही...!
असहमत. धर्म आणि अर्थ हे दोन्हीही जीवनशैली ठरवतात. त्यामुळे त्यांचं तत्वज्ञान वेगवेगळं असू शकत नाही. नीतिमत्ता किंवा ethics याला धर्म आणि अर्थशास्त्र या दोन्हींमध्ये स्थान आहे.जागतिक पातळीवर इस्लामचं, विशेषतः वहाबी इस्लामचं मूळ सौदी अरेबियामध्ये आहे आणि सौदीच्या आर्थिक संपन्नतेचा आणि तिथल्या कडवेपणाचा संबंध नक्कीच आहे. हुप्प्या यांची मक्केतील उठाव ही मालिका याच विषयावर आहे. ती वाचा.
Law बोर्ड काहीही म्हणेल.त्यांना अजून फार दिवस पाहिल्याइतकंच महत्व राहील असं मला खरंच वाटत नाही...
फार दिवस हा फार गोंधळात टाकणारा शब्दप्रयोग आहे. जोपर्यंत आपल्या देशात समान नागरी कायदा लागू होत नाही, तोपर्यंत AIMPLB (All India Muslim Personal Law Board) ला महत्व आहे. ते आत्ताच तलाकच्या मुद्द्यावरुन सरकारशी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. त्यावरून काही तडजोड झालीच तर त्याला वेळ लागेल. समान नागरी कायद्यासाठी प्रत्येक राज्याची मंजुरी लागेल. झालंच तर आपल्या देशात कायदा मंजूर होणं आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणं यात फरक आहे. त्यामुळे इथेही असहमत.
माझे कित्येक मुसलीम मित्र आहेत जे पूर्णपणे भारतीय Way Of Life जगतात
भारतातील मुस्लिम हे भारताचे नागरिक असल्यामुळे त्यांची जीवनपद्धती ही भारतीयच म्हणायला पाहिजे. झालंच तर आपल्या देशात प्रचंड विविधता असल्यामुळे भारतीय way of life या गोष्टीला भारतीय जेवण या गोष्टीसारखाच विशिष्ट अर्थ नाही. झालंच तर तुमच्या मित्रांवरुन सर्व मुस्लिम समाजाबद्दल अनुमान कसं काढणार?
ट्रिकल डाउन होत नाही असं मानलं तर मग आज कित्येक भारतीय मुलीनी बुरखा फेकून जीन्स अन टॉप का स्वीकारले
असं झालंय पण त्याच बरोबर अनेक मुस्लिम मुली identity म्हणून हिजाब वापरायला लागल्या आहेत. पण त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. झालंच तर काॅलेजमध्ये किंवा आॅफिसमध्ये आल्यावर हिजाब न वापरणाऱ्या आणि घरी जाताना वापरणाऱ्या अनेक मुली आणि स्त्रिया आहेत. शिवाय हिजाबपासून पूर्ण सुटका नाहीच झालेली. टेनिस कोर्टवर खेळण्याचा पोषाख आणि बाहेर हिजाब घालणाऱ्या सानिया मिर्झाचा फोटो पाहिला असेलच तुम्ही.
बहुसंख्यामुळे हे होत नाही असं मानलं तर पाकिस्तान इराण इराक मध्ये आजही का एवढ्या मोठ्या प्रमाणात बुरखा का अस्तित्वात आहे??
पाकिस्तान, इराण आणि इराक हे इस्लामिक देश आहेत. इस्लाम हा तिथला अधिकृत धर्म आहे. भारताप्रमाणे हे देश धर्मनिरपेक्ष नाहीत. त्यामुळे तिथल्या स्त्रियांवर हिजाब आणि चादोरची (विशेषतः इराणमध्ये) सक्ती आहे. मीना प्रभूंच्या गाथा इराणी या प्रवासवर्णनात आणि आतिवास यांच्या भय इथले या अफगाणिस्तानमधील प्रत्यक्ष अनुभवांवरील पुस्तकांत याचा स्पष्ट उल्लेख आहे. परकीय स्त्रियांनाही हे नियम पाळावेच लागतात. त्यामुळे तुमच्या या मुद्द्याशीही असहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
C
chitraa Tue, 10/11/2016 - 14:18 नवीन
केवळ हिजाब वापरण्या न वापरण्यानं स्त्री मुक्त आहे किंवा नाही हे ठरते का ? https://en.m.wikipedia.org/wiki/Women%27s_rights_in_Iran
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सुबोध खरे Wed, 10/12/2016 - 06:36 नवीन
मोगा खान नुसता हिजाब/ चादर वापरण्याची सक्ती असेल तरीही त्या स्त्रीला स्वतःच्या मताप्रमाणे कपडे वापरण्याची परवानगी नाही हेच सिद्ध होत नाही का? बाकी समान हक्क कुराणातच नाहीत. मग व्यवहारात कुठून येणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? उत्तर आफ्रिका ते कोरिया या प्रचंड पट्ट्यात (इस्रायल आणि भारत सोडल्यास) कोणत्याच देशात लोकशाही नाही. (बाकी सगळे इस्लामी बहुल देश आहेत आणि इस्लामला लोकशाही मान्य नाही) समान हक्क पुरुषांनाच नाहीत स्त्रियांना कुठून येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
C
chitraa Wed, 10/12/2016 - 07:05 नवीन
हिजाब वापरूनही / सक्ती असुनही त्या देशात वुमन लिटरसी आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. अ‍ॅवरेज एज ऑफ वुमन अ‍ॅट मॅरेजही आपल्यापेक्षा जास्त आहे. बाहेर फिरताना बुरखा वापरुन हस्पिटलात रेगुलर नाइट ड्युटी करणारे स्टाफ मला माहीत आहेत... घरी परवानगी देत नाहीत म्हणुन नाइट ड्युटी टाळणारे इतर धर्मियही असतात. तात्पर्य : नुसता बुरखा असणे नसणे या एकाच फ्याक्टरवर काही ठरत नाही , पण अशी सक्ती नसावी , हेही मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Wed, 10/12/2016 - 15:05 नवीन
हिजाब वापरूनही / सक्ती असुनही त्या देशात वुमन लिटरसी आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे
मान्य.
अ‍ॅवरेज एज ऑफ वुमन अ‍ॅट मॅरेजही आपल्यापेक्षा जास्त आहे.
मान्य. पण का? इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली. नंतरच्या ८ वर्षांच्या इराण-इराक युद्धाने तर देश डबघाईला आला. त्यामुळे स्त्रियांना घराबाहेर पडून काम करणं अनिवार्य झालं. एक पिढी युद्धात नष्ट झाली. त्यामुळे साहजिकच पुढची पिढी लग्नाच्या वयात यायला वेळ लागला. दुस-या शब्दांत सांगायचं तर हे परिस्थितीच्या रेट्याने झालं. तिथल्या राजवटीने आपणहून घडवून आणलं नाही. तसं करणारा एकच माणूस. तुर्कस्तानचा मुस्तफा केमाल अतातुर्क. बाकी कुठल्याही इस्लामिक देशाने आपणहून स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीही केलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
C
chitraa Wed, 10/12/2016 - 15:31 नवीन
असेल. सौदी अरेबियातही असेच आहे... त्याचे क्रेडिट कोणत्या युद्धाला द्यायचे ? https://en.wikipedia.org/wiki/Education_in_Saudi_Arabia#Literacy According to the World Bank, there is gender disparity in literacy rate. In 2007, 85.0 percent of adult (people ages 15 and above) are literate and 98.1 percent of youth (people ages 15 – 24) are literate, 89.1 percent of male adults are literate and 79.4 percent of female adults are literate. As for youth literacy rate (people ages 15 – 24), 97.0 percent is literate, 98.1 percent of male youths are literate, and 95.9 percent of female youths are literate.[37] One of the World Bank reports suggested the relatively high adult literacy rate of Saudi Arabia, considering the continued low level of primary enrollment, derived from the successful use of religious organizations, particularly local mosques and local religious institutions such as Koranic schools for the provision of ancillary educational services, which is a trend of particular note in the MENA region.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 10/12/2016 - 16:16 नवीन
सौदी अरेबियाची भाषा अरेबिक, कुराणाची भाषा अरेबिक. म्हणजे एवढी सगळी साक्षरता फक्त एका भाषेपुरती आहे. तीही सक्तीची. अजून एखादं उदाहरण आणलंत तरी तिथे तेच सापडेल. तुर्कस्तान हा अपवाद. एक वेळ स्त्रियांच्या शिक्षणाचा मुद्दा जरी मान्य केला तरी नंतरचा भेदभाव नाकारता येणार नाही. एका शिक्षणाच्या मुद्द्याने बाकीचे सगळे अन्याय समर्थनीय ठरतात असं तुम्हाला वाटत असेल तर बोलणंच खुंटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
C
chitraa Wed, 10/12/2016 - 16:54 नवीन
त्यांची मातृभाषा व्यवहाराची भाष जी असेल तीच ते शिकणार ना ? नुस्त्या युद्धात पुरुषांच्या मरण्याने बायका साक्षर होतात तर महाभारत युद्धानंतर भारत हा विश्वातला टॉप स्त्री साक्षर देश झाला असता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
C
chitraa गुरुवार, 10/13/2016 - 07:38 नवीन
भारतात स्त्री शिक्षण नव्हते / बायका सती जात होत्या. का ? अहो , युद्ध्हामुळे .. तरुण पुरुष मरायचे , मग बायका सती जायच्या . इराणात स्त्रीशिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. का ? अहो , युद्ध्हामुळे .... तरुण पुरुष मरायचे , मग बायका शिकून नोकरी करायला लागल्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 10/13/2016 - 11:20 नवीन
तुमचे काही प्रतिसाद विचार करायला लावणारे असतात पण दरवेळी नुसती टीकाच उपयोगी नसते असे वाटते... बुरखा अथवा हिजाब घालायला भाग पाडणे हे बंधनाचेच प्रतीक आहे, हे तर मान्य असेल आपल्याला... आता तुलनेने आपल्याकडे त्यापेक्षा थोडे अधिक स्वातंत्र्य आहे असे म्हणता येईल, अर्थात हिंदू धर्मात वेगवेगळ्या जाती आपला अभिमान धरून असतात आणि त्याच्या नावाखाली आमच्या घरातल्या स्त्रिया अंगाचा एक भाग हि दिसणार नाही(किंवा कमीत कमी दिसेल) अशा साड्या/कपडे घालतात हे अभिमानाने सांगितले जाते. पर्यायाने स्त्रियांवर नकळत तसेच कपडे घालण्याचे बंधन येते, याला आपण संस्कार देखील म्हणू शकतो कारण अंग प्रदर्शन आपल्याकडे सभ्य मानले जात नाही. त्यात फारसे काही वावगे देखील वाटत नाही कारण प्रत्येक पाश्च्यात पद्धत अंगीकारणे म्हणजे प्रगत होणे नाही! आता काळानुसार हे अभिमान देखील पुसट होत चालले आहेत आणि स्त्रियांना त्यांच्या अधिकारांबद्दल मोठ्या आवाजात बोलणे शक्य होत आहे. हीच गोष्ट हिजाब अथवा बुरखा याबद्दल होऊ शकते. इस्लाम मध्ये विरोधाचा हा आवाज इतका मोठा आहे का? हे हि त्या धर्मातल्या प्रगतिशील लोकांनी पाहायला हवे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
C
chitraa गुरुवार, 10/13/2016 - 13:30 नवीन
हिजाब हे बंधन म्हणता म्हणता अंगभर साडी नेसून अंग झाकणे याला मात्र शालीनता ठरवुन मोकळे झालात ! अंग झाकणे ही शालीनता असेल तर हिजाब , पदर , नऊवारी , पल्लो वगैरे ज्या त्या धर्म आणि संस्कृतीचा प्रश्न झाला. मूळ तत्व सारखेच असेल तर बाह्यरुपावरुन वाद घालणे हास्यास्पद होइल. राहिता राहिला आवाजाचा प्रश्न ! तर आमच्या धर्मात आवाज जास्त आहे वगैरे जे बोलताय तो आवाज यायला दहा हजार वर्षे जावी लागली आहेत. त्यासाठी अनेकाना शेणगोळे , दगड , निखारे खावे लागले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 10/13/2016 - 13:46 नवीन
आपण प्रतिसाद नीट वाचलात का? मी साडीचे उदाहरण देऊन झाल्यावर खाली "हीच गोष्ट हिजाब अथवा बुरखा याबद्दल होऊ शकते." हे लिहिले आहे. उगाच काहीतरी पूर्व ग्रह धरून अर्थ लावू नका... पण मूळ मुद्दा हा मांडला होता कि बदल होतोय. त्याला किती हजार वर्षे गेली तितकीच वर्ष झाली कि मग मुस्लिम परिवर्तनाला सुरुवात करणार आहेत का? तसे म्हणणे असेल तर मग झालंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/13/2016 - 14:09 नवीन
तरी वडाची साल पिंपळाला लावणं काही जात नाही. महाभारत युद्धानंतर कशाला, युद्धाच्या वेळीच आणि त्याच्या आधीही भारतातल्या स्त्रिया साक्षर असणार. पण इस्लामी आक्रमणामुळे स्त्रियांवर बंधनं आली. बाकी इराणमध्ये युद्धात एक पिढी मारली गेल्यामुळे जी आर्थिक आपत्ती आली,त्यात स्त्रियांना शिक्षणाची आणि नोकरी करण्याची परवानगी तिथल्या सरकारला द्यावी लागली ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही हिंदूंना सुधरायला दहा हजार वर्षं लागली वगैरे जे म्हणताय त्याला तर काहीही आधार नाही. माणसाने १०,००० वर्षांपूर्वी शेती सुरु केली. तेव्हा धर्म ही संकल्पना जशी आज मानली जाते तशी नसावी. सती वगैरे चालीरीती फार नंतर आलेल्या आहेत. जेमतेम हजार वर्षे. दहा हजार वर्षांपासून वगैरे जे पालुपद तुम्ही तुमच्या प्रत्येक अवतारात आळवता ते साफ चुकीचं आहे. असो. Psuedo-science प्रमाणेच psuedo-history हाही प्रकार असतो हेच तुम्ही सिद्ध करताय. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
C
chitraa गुरुवार, 10/13/2016 - 15:03 नवीन
काही झालं तरी इस्लामी आक्रमण व मेकॉले हेच जबाबदार. सतीप्रथा रामायण महाभारतापासून आहे. तेंव्हा , माझ्या माहितीनुसार तरी , मोघल इंग्रज नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/13/2016 - 16:23 नवीन
हा दहा हजार वर्षे एवढा जुना आहे का? रच्याकने अनेक रामायणं लिहिली गेली आहेत. तुलसीरामायण, भावार्थ रामायण वगैरे. ए.के.रामानुजम यांचा त्यावर अत्यंत प्रसिद्ध लेख आहे. महाभारतातही अनेक गोष्टी नंतर समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सती प्रथाही अशीच नंतर समाविष्ट करण्यात आलेली असू शकते. शिवाय महाभारतात सती ही ऐच्छिक दाखवली आहे. माद्री सती जाते, कुंती जात नाही.(इथे रामायण आणि महाभारत हे प्रत्यक्षात घडलं असावं असं मानलेलं आहे) नंतर शिवकाळात शिवाजीमहाराजांचे वडील शहाजीराजे मरण पावल्यावर जिजाबाई सती गेल्या नव्हत्या. यावरून महाराष्ट्रात तरी सतीची सक्ती होत नव्हती हे समजतं. बंगालमध्ये होत असावी, कारण १८२९ मध्ये जो सतीवर बंदी घालणारा कायदा लाॅर्ड बेंटिकने केला तो राजा राममोहन राॅय यांच्या अाग्रहावरुन केला असणार. काहीही असो. १०,००० वर्षांपूर्वी धर्मच नव्हते, त्यामुळे त्याच्या नावावर चालणारा फालतूपणाही नव्हता. आणि इस्लामी आक्रमण हे जोहार अाणि सती यासारख्या प्रथा लोकांमध्ये रुजायला जबाबदार आहेच. वस्तुस्थिती आहे. नाकारण्यात अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही १०,००० वर्षे ही जी जुनी record लावताय ती बंद करा. उलट त्यामुळे आयडी बदलला तरी लगेच पकडले जाताय तुम्ही.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 10/13/2016 - 16:32 नवीन
जिजाबाई सती गेल्या नव्हत्या. यावरून महाराष्ट्रात तरी सतीची सक्ती होत नव्हती हे समजतं. जिजाऊ सती गेल्या नाहीत म्हणुन महाराष्ट्रात सती नव्हती हे वाक्य तुमच्या एरवी असणाऱ्या जबरी विश्लेषणात्मक लिखाणाला सूट होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/13/2016 - 17:10 नवीन
नंतर शिवकाळात शिवाजीमहाराजांचे वडील शहाजीराजे मरण पावल्यावर जिजाबाई सती गेल्या नव्हत्या. यावरून महाराष्ट्रात तरी सतीची सक्ती होत नव्हती हे समजतं.
सतीची सक्ती होत नव्हती असं म्हटलंय. स्त्रिया सती जाणं हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून असावं. पेशवाईतही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या आई गोपिकाबाई पती नानासाहेब पेशव्यांच्या निधनानंतर सती गेल्या नाहीत पण माधवरावांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या. अजून एक पुरावा म्हणजे ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थिनी या विधवा होत्या. त्यांनी दत्तक घेतलेले पुत्र यशवंतराव (चूभूद्याघ्या) यांची जन्मदात्री आई ही त्यावेळी विधवा होती. सतीसारखी प्रथा जर त्यावेळी असती आणि ज्या अमानुषपणे ती बंगालमध्ये होती, तशी असती तर त्याविरूद्ध ज्योतिबा नक्कीच उभे राहिले असते. पण तसं वर्णन त्यांच्या वाङ्मयात आढळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/13/2016 - 17:45 नवीन
http://www.misalpav.com/node/22806 हा जयंतकाकांचा २०१२ च्या श्रीगणेश लेखमालेत लिहिलेला लेख आहे. दीड-दोन हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राबद्दल असलेलं हे वर्णन आहे. त्यात स्त्रिया सुशिक्षित असल्याचं वर्णन तर आहेच, पण सती हा शब्द कुठेही सापडत नाही. स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्यही होतं. मग हा सगळा माहोल उध्वस्त होऊन स्त्रियांवर एवढी बंधनं का लादण्यात आली? इस्लामी आक्रमण हेच कारण दिसतं. १०,००० वर्षांपूर्वी स्त्रिया सती जात होत्या हा तर खोटारडेपणा आहे आणि त्याला कुठचाही ऐतिहासिक आधार नाही हे आमच्या नेहमीच्या यशस्वी डू आयडींना समजेल अशी आशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
C
chitraa गुरुवार, 10/13/2016 - 18:56 नवीन
महाभारतात माद्री सती गेली , कुंतीही जाणार होती. पण तू मुलांकडे बघ असे सांगून माद्रीने तिला परावृत्त केले. सती जाण्यामागे / न जाण्यामागे अशी अनेक कौटुंबिक कारणे असायची. बाहेरील कारणांमध्ये मुस्लिम आक्रमण हे एक कारण असू शकेल , पण सती प्रथेची सुरुवात व्हायचे ते नक्कीच कारण नव्हे. मराठ्यानी १६७० ला राज्य स्थापले ना ? नंतर पेश्वेही मोघलाना मार देत फिरत होते ना ? आणि तो औरंग्या ? तो तर बिचारा बुडाला ना ? आणि तरीही बंगालमधल्या स्त्रीया अशिक्षित राहिल्या किंवा पुण्यातील पेश्वीण सती गेली तर त्याला मोघलच जबाबदार का ? बरं , मोघलांची भिती फक्त रमाबाईनाच ? गोपिकाबाईना का नव्हती म्हणे ? औरंगजेबानंतरच जर मोघलाईला उतरती कळा लागली , तर सती अ‍ॅक्ट १८२७ ला का आला म्हणे ? तेंव्हा कोणते क्रूर मोघल सत्तेत होते म्हणे ? मोघलांच्या भितीने विधवा जाळून घेत होत्या म्हणे ! सधवा कुमारिका याना मोघल पळवुन नेत नव्हते की काय ? तो मेघदूताचा पुरावा ऐकुन तर धन्यच झालो ... प्रेमकाव्यात तरुणी , घट , बगिचा , मद्य , मोर हेच लिहिले जाणार ना ?की वरुन जाणार्‍या मेघाने खाली स्मशानात एका विधवेला लोक भाल्याने टोचुन चितेत ढकलत होते , याचे वर्णन करायला हवे होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/13/2016 - 19:26 नवीन
तुमसे न हो पायेगा! तुम्ही denial mode मध्ये आहात. अशा वेळी माणसाला सहानुभूतीची गरज असते. ती आहेच आमच्याकडून. Enjoy!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/13/2016 - 19:49 नवीन
औरंग्या बिचारा? उद्या अफजल खानाला पापभिरू म्हणाल...परवा कसाबला नेक बंदा म्हणतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
स
सुबोध खरे Fri, 10/14/2016 - 15:45 नवीन
पण अशी सक्ती नसावी , हेही मान्य आहे. तोबा तोबा इस्लाम खतरे मे है . जिहाद करो मोगाखानने कुराणाविरुध्द भाष्य केले. कुफ्र बेमुकद्दस लाहोल वला क़ुवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
व
विवेकपटाईत Tue, 10/11/2016 - 03:49 नवीन
आता काय करणार हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त दुसर्या धर्म बाबत लिहिले तर रासुका लागू शकतो.(उत्तर भारतात अनेक लोक जेलमध्ये बंद आहेत). हिंदू धर्म रुपी गंगा नदीत घाण टाकण्याची आणि स्वच्छ करण्याची परवानगी प्रत्येकाला आहे. शिवाय आपल्या देशात हिंदू धर्म विरुद्ध लिहिणार्यांना पुरोगामी, सेकुलर, प्रगतीशील इत्यादी उपाध्या आणि सम्मान हि मिळतात.
  • Log in or register to post comments
C
chitraa Tue, 10/11/2016 - 13:13 नवीन
http://indianexpress.com/article/explained/the-jain-religion-and-the-right-to-die-by-santhara/
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 10/11/2016 - 19:38 नवीन
अर्थहीन, तुमचा लेख वाचला. एक प्रश्न पडला आहे. आपल्या शरीराने आयुष्यभर घाण उत्पन्न केल्याखेरीज दुसरं काहीही केलेलं नाहीये. मग शरीरावर लोकं का टीका करंत नाहीत? उलट त्याला सुखावण्यासाठी लोकं कितीतरी मेहनत करतात. ते इतकं प्रिय का असतं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 10/13/2016 - 11:43 नवीन
हा लेख वाचून असा प्रश्न का पडला, हा प्रश्न मला पडलाय! :) "घाण" म्हणजे काय? शरीराने उत्पन्न केलेल्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकच नाहीत का? निसर्गाने बहाल केलेल्या गुण अवगुणांशिवाय शरीर वेगळे काही "निर्माण" करू शकते का? मग शरीरावर टीका कशासाठी करावी? "देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर" आणि कदाचित त्या आत्म्याला टिकवण्यापायी देहाची आपसूकच काळजी घेतली जात असावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/13/2016 - 16:22 नवीन
शब्दबम्बाळ, तुमचा प्रश्न अत्यंत समर्पक आहे. किंबहुना तो कोणीतरी विचारावा याच हेतूने उपरोक्त संदेश टाकला होता. जसं शरीराचं नैसर्गिक वर्तन असतं अगदी तस्संच मनाचंही नैसर्गिक वर्तन असतं. ज्याप्रमाणे शरीरावर टीका करून उपयोग नसतो, त्याचप्रमाणे धर्मावर टीका करूनही काहीच साध्य होत नाही. शरीराचे व्यापार बिघडले तर त्यावर टीका करायची नसते. औषध घेऊन रोग दुरुस्त करायचा असतो. त्याचप्रमाणे धर्म ही स्वत: आचरणात आणायची वस्तू आहे. त्याचा रोख इतरत्र जाऊ द्यायचा नसतो. भले इतरांचा धर्म बिघडला असला तरी त्यावर उत्तर म्हणजे आपण स्वत:चा धर्म स्वत:च कसोशीने आचरणात आणणे हे होय. टीका कितीही सयुक्तिक असली तरी तो उपाय नव्हे. बस एव्हढंच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
C
chitraa गुरुवार, 10/13/2016 - 15:18 नवीन
शरीर घाण करतं कारण ते एक थर्मोडायन्यामिक मशिन आहे. घाण शून्य व्हायला इन्पुट आउटपुट रेशो एक व्हावा लागेल , असे मशीन आस्तित्वात येउ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ध
धर्मराजमुटके Tue, 10/11/2016 - 19:43 नवीन
मला माझ्या धर्माबद्द्ल केवळ ऐकीव माहिती असते. आजुबाजुचे (कथीत) हिंदू लोक जसे वागतात त्यांचे बघून मी धर्म चांगला की वाईट ठरवतो. एखादी गोष्ट खरोखरीच धर्मसंमंत आहे काय ? हे तपासण्याइतका अभ्यास करण्याची तयारी नसणे / इच्छा नसणे हे ही मी हिंदू असून हिंदू धर्माविरोधात लिहिण्याचे कारण असू शकते. उपनिषदे पुराणे गहन आहेतच पण कमीत कमी मराठीत उपलब्ध असलेले गीता / ज्ञानेश्वरी / तुकोबाची गाथा / रामायण / महाभारत इ. प्राकृत ग्रंथांचा / कथांचा देखील कधीही वारा न लागल्यामुळे देखील मी हिंदू धर्मावर टिका करु शकतो. सगळेच्या सगळे आध्यात्मिक गुरु म्हणजे केवळ भोंदूच किंवा पुजा सांगणारा ब्राह्मण किंवा मंदिरातला पुजारी म्हणजे केवळ दलालच असे आपण स्वतः अगोदरच ठरवून टाकलेले असल्यामुळे देखील आपण स्वधर्मावर टीका करण्यास समर्थ होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'अच्छा जो देखन मै चला अच्छा न मिलिया कोय ! जो दिल खोजा अपना, मुझसे अच्छा न कोय' ही जी आपली धारणा झालेली असते तिच्यामुळेही आपण आपल्या धर्मावर टिका करु शकतो. अशी बरीच कारणे देता येतील. असो. विस्तारभयास्तव थांबतो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 10/12/2016 - 03:49 नवीन
परफेक्ट मुद्दा, पण मग या सगळ्याचा अभ्यास असणारेच जर काहीही न करता ढिम्म बसत असतील तर? आणि त्यांना काही सांगायला गेलो की लगेच ते सुद्धा वरचेच मुद्दे तोंडावर फेकतात काही गोष्टी या कॉमन सेन्सनेसुद्दा चुकीच्या आहेत हे समजू शकतात त्या बंद करायला पोथ्या पुराणे वाचायची काय आवश्यकता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा