लता दिदी म्हणजे महाराष्ट्राची ठेव आहे. एखादी ठेव एकदा की बॅकेत जमा केली की कधीही जावे आणि व्याज घेत जावे अशी.
एकदा की एखादी तान आवडली की आनंदाचा ठेवा घेत जावा अशी.
आनंदाचे डोही आनंद तरंग...
तात्याची कविता मनाला भावली. आजचा दिवस फक्त दिदीसाठीच
तात्याराव,
आपलं हे संगीताला धरून झालेलं लेखन वाचून मी थक्क झालो.आपल्याला मानलं बुवा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
स्वरसाम्राज्ञी विषयी ...किंचीत कवी, आपण सुंदर शब्दात आमच्याच भावना मांडल्या आहेत.
कवी ग्रेस, यांचे लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर स्वगत माहेराहुनि गलबत आले वाचण्यासारखं आहे.
लता आजींना,
८०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या स्वरांनी आपण आम्हाला जिंकले आहेत. आमचे बालपण, तारुण्य आणि आता संध्याकाळच्या कातरवेळी, आपल्या सुरांची साथ शांत रात्री सुखावते.
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा।
गोडी गायनाची लावते वेड जीवा ।।
हे तुमचे शब्दांचे बुडबुडे अतिशय तरल आणि पारदर्शी आहेत. साधारण बुडबुड्यांमध्ये पाहिलं तर स्वतःच प्रतिबिंब दिसतं पण या तुमच्या बुडबुड्यांमध्ये केवळ अन केवळ लतादिदी, त्यांचं गाणं... आणि त्यांच्या आवाजातलं दिव्यत्व दिसतं आहे.
अतिशय सुरेख लेखन.
लतादिदीचं गाण्म म्हणजे ... आपल्यासाठी "अनंत हस्त कमलाकराने, देता किती घेशील दो कराने" असं आहे.. किती घ्यायचं हो.. झोळीच फटून जाईल पण तिच्या स्वरतला गोडवा.. त्याला अंतच नाही.
दिदिना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
लता ताईंच्या वाडदिवसा निमित्त अत्यंत औचित्यपूर्ण, सुंदर, काव्यात्म लेखन. आवडले. अभिनंदन.
रागरागीणींबाबत औरंगजेब असलो तरी लता ताईंचे गाणे ऐकणे, आस्वाद घेणे ,त्या सुरांवर विहरणे हा सुखानुभव त्यांच्या प्रत्येक गाण्यात अनुभवला आहे.
तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् आध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....!
- क्या बात है! अप्रतिम!
षड्ज, गांधार, रिषभ.... हे सगळे मला अडाण्याला फारसे समजत नाही. पण हे जे लिहीले आहे,
तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे...
तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे...
तिचं गाणं ही आमची गरज आहे...
तिचं गाणं ही आमची सवय आहे....
तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे....
तिचं गाणं हे आमचं औषध आहे...
तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे...
आणि
तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे...
इतकंच म्हणेन की,
अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा.
त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!
त्यात सारे काही मला जे वाटते तेही आले. आणि हीच भावना अनेक मानवांची आहे.
लता आजींनानिषेध ! लता अजुन १०० वर्षे लताच राहणार आहे.
तात्या कविता संदरच आणि ग्रेसच्या स्वगताचा तो दुवा...क्या बात है, डॉक्टरसाहेब, धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी