ट्रम्प, ध्रुवीकरण आणि तिसरे महायुद्ध
वरवर पाहता या गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही असे दिसू शकेल. पण गेल्या २-३ वर्षातील घटना पाहता आजची निवडणूक माझ्यासाठी हा नवीन विषय सोडून गेली.
२ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या लोकसभेच्या निवडणूकांनी याची सुरुवात झाली असे म्हणता येईल.. त्यापूर्वी या गोष्टी नव्हत्या असे नाही पण सामान्यपणे प्रमाण दिसण्याइतके नव्हते.
५ गोष्टी मला समान धाग्यात ओवल्यासारख्या दिसतात.
१. अरब स्प्रिंग, आयसिसचा उदय आणि अरब निर्वासित.
२. भारत-पाकिस्तान ताणलेले संबंध, भारतात आलेले उजव्या विचारसरणीचे सरकार, आणि त्यानिमित्ताने उजव्या विचारांचा सोशल मिडियावर सुरू झालेला धुमाकूळ.
३. चीन ची सुरू झालेली दादागिरी.
४. ब्रेग्झिट, आणि त्यानिमित्ताने युरोपियन दिशांमध्ये दिसणारे उजव्या शक्तींचे प्राबल्य (ज्याला काही कारणे आहेत अर्थात.)
५. भारतीय राजकारणात झालेल्या मोदींच्या उदय आणि ज्याप्रकारे ट्रंप ने कँपेनिंग केले, तसेच सतत चर्चेत राहणे, रॅडिकलाईझ करणारी विधाने (जी मोदींनी टाळली होती, पण त्यांच्या पाठिराख्यांनी केली होती), आणि त्यानिमित्ताने त्यांना मिळालेला पाठिंबा.
सोशल मिडिया या सगळ्यात अर्थातच महत्वाची भूमिका बजावत आहे यात शंका नाही, पण त्याबरोबरच दुसरा प्रश्न असा आहे की जगातून (तथाकथित?) उदारमतवाद हळूहळू हद्दपारच होत अहे की काय? सरकारे कशी वागतील हे माहित नाही, पण लोकांचा कल सरळसरळ प्रांतवाद, धर्मवाद वंशवादाकडे झुकताना मला दिसतो. याचा नेमका परिणाम काय होईल? तसेही तिसरे महायुद्ध ओव्हरड्यू आहे असे म्हणतात. मग अश्याप्रकारे होणारे ध्रुवीकरण जगाला तिसर्या महायुद्धाकडे नेईल की काय?
हे खरेतर उजवी मंडळी सत्तेवर आली त्यात जनतेच्या बदलत्या मताचे प्रतिबिंब आहे. असे मला वाटते. आणि तीच धोक्याची घंटा आहेहे खरे मत असेल तर तो "भाबडेपणा (नेव्हिटी)" आहे, आणि खरे मत नसेल तर (त्यामागचा उद्येश) अत्यंत धोकादायक आहे ! डावे सत्तेवर असले की वार्ताहर, विचारवंत व इतिहासकार संत-संन्यासी प्रवृत्तीचे असतात / बनतात काय !? डाव्यांचा या बाबतीतला इतिहास अजिबात गुप्त नाही आणि अजिबात अभिमानस्पद नाही... आणि त्याला गुगलबाबासुद्धा प्रमाण आहेत ! =)) राजकारणात सर्व सारखे, त्यामुळे कोळश्याने किटलीला काळे म्हणणे खूप विनोदी दिसते ! समतोल मत असे असावे... कोणीही सत्तेवर आले तरी "जनतेला खरी माहिती मिळावी व त्यावरून तिला आपले मत बनवता यावे" अशीच माध्यमे असावीत... हे मत जरी आदर्शवादी वाटले तरी कोणत्याही राजवटीवर त्याच दिशेने वाटचाल चालू ठेवण्यासाठी लोकांचा दबाव असला पाहिजे.