मोदी, ट्रंप आणि लोकसत्ता
http://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1335662/us-election-2016-analysis-by-girish-kuber/#
गेल्या काही दिवसात अमेरिकन निवडणुकांवरील लोकसत्ता मधील सदर वाचत होतो. त्यातच मागील काही दिवसापासुन भारतातील एन डी टी व्ही चे बंदीपुराण चर्चेत होतेच. मुळात एक्सप्रेस समुह हा सत्ताधार्यांच्या विरोधात लिहणारा आणि थोडा बातमी मागे किंवा पडद्यामागे पाहणारा असल्याने दररोज वाचतो. तसा दुसरा काही योग्य पर्याय नाही हे महत्वाचे कारण. हे माझे मत. गिरीश कुबेर संपादक झाल्यापासुन जरा 'सुमार' झाल्यासारखा वाटत होता. त्यात या अमेरिकन निवडणुकीच्या एककल्ली वार्तांकनाने जास्तच सुमार भासत होता. त्यावर आज ट्रंप निवडीने शिक्कामोर्तब झाले.
सर्वात आश्चर्य म्हणजे आजचे लोकसत्ताच्या वरील लिंक वरील गिरीश कुबेरांचे ट्रंप यांच्या निवडीवरील भाष्य पाहिले. त्यात त्यांनी आपले मत आणि वार्तांकन चुकले असे न म्हणता सरळ सरळ अमेरिकन जनता आणि लोकमत असमजुतदार आणि संकुचित झाल्याचा आरोप लावला. त्यांच्या निवडीने जगातील शांतता आणि सहयोग, बंधुता या सारख्या सदगुणांचा र्हास होतांना दिसत आहे. त्यांचे हे मत म्हणजे कळस आहे. खरच जनता इतकी मुर्ख असते का? मुळीच नाही. उलट हे फुरोगामी आपल्या प्रेमात ईतके बुडालेत की त्यांना सारासार विचार आणि जनमत यावर निरपेक्ष विचार शक्य होत नाही का?
मोदींच्या वेळीही असेच झाले होते. यांनी आपली मते लोकांवर लादण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. आजही ते लोकांचे कसे चुकले तेच थोडी भाषा बदलुन सांगत असतात. या फुरोगाम्यांच्या हे लक्षात कसे येत नाही की आपण दुसर्या बाजुचा विचार केला पाहिजे? या फुरोगाम्यांचे मोदी आणि ट्रंप या निवडणुकीत नुसतेच अंदाज चुकले नाहीत तर त्यांची आजपर्यंची खोट्या प्रचाराची मेहनत वाया गेल्याचे शल्य दिसते आहे. भारतात आणि अमेरिकेत उजव्या विचारांच्या विरोधात या डाव्यांची आणि धर्मनिरपेक्ष विचारांमागे दहशतवाद लपविणार्या वैचारिक फळीची विफलता आता समोर आलेली आहे. पण ते एका जुगार्यासारखे हरत चालले आहेत. प्रत्येक वेळी ते आपल्या चुकांमधुन, वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करुन मोदींना आणखी वेगाने जनतेत लोकप्रिय करीत आहेत. जे एन यु, उरी, सर्जीकल स्ट्राईक, नोटांचा बदल या प्रसंगी हे दिसुन आले. यात राजकीय आणि लोकप्रियतेत मोदी बाजी मारतांना दिसत आहेत. हेच आता ट्रंप निवडुन आल्यावर तेथील काही अमेरिका सोडुन जाण्याची भाषा करतांना ऐकले आहे. फक्त जागा बदलली की काय? हिलरी समर्थक जाळपोळ करीत आहेत. (ही एखादीच घटना असु शकते.)
खरच भारतात आणि जगात उजव्या शक्तींचा उदय झाला आहे का? भविष्यात यांची शक्ती अशीच वाढणार का?
लेख मुद्देसुद बनलाय बाप्पुचा मित्र नाखु
आज दै.लोकमतमधे प्रकाश बाळ यांचा चांगला लेख आहे.हम्म.