Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नगरपालिका निवडणुका २०१६.

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 11/27/2016 - 06:48
🗣 64 प्रतिसाद
महाराष्ट्रात सध्या नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मतदान चालू आहे.२०१४ साली झालेले सत्तांतर ,त्यात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेलेला जनाधार.अच्छे दिनची दाखवलेली स्वप्ने ,या पार्श्वभुमीवर या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या निवडणुका १६४ ठीकाणी होत आहेत ,या निवडणुकांचे निकाल लगेच उद्या लागणार आहेत ,त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.जे मतदार आहेत त्यांनी जरुर आपला मतदानाचा हक्क बजवावा.धन्यवाद.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
10603 वाचन

💬 प्रतिसाद (64)
श
श्रीगुरुजी Sun, 11/27/2016 - 09:03 नवीन
नानासाहेब, एकीकडे म्हणता की माझे डोके कोठेच चालत नाही, मला व्यवहारज्ञान नाही आणि दुसरीकडे अनेक विषयांवर धागे काढत असता. असो. बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परीषद इ.) काँग्रेस/राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. काही महापालिकांमध्ये शिवसेना सत्तेवर आहे. या सर्व ठिकाणी भाजप हा मुख्य खेळाडू कधीच नव्हता. काही किरकोळ अपवाद वगळता भाजप सर्वच ठिकाणी सुरवातीपासूनच ४ थ्या क्रमांकावर आहे. शहरी भागात असलेल्या २२ महापालिकांमध्ये सुद्धा नागपूर या एकाच महापालिकेत भाजप सत्तेवर आहे. यावेळच्या निवडणुकीतही काही वेगळे घडेल असे वाटत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुकीत दिलेला कौल हा केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या कारभारावर जनतेने दिलेली प्रतिक्रिया आहे असे मानणे चूक ठरेल. अर्थात या निकालानंतर 'जनतेने मतपेटीद्वारे नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे' असा चुकीचा निष्कर्ष काढण्यात येईलच.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 11/27/2016 - 09:13 नवीन
असा चुकीचा निष्कर्ष काढण्यात येईलच.
अगदी अगदी. अ‍ॅपद्वारे ५ लाख लोकांनी नोटाबंदीला पाठिंबा दरशविल्याच्या योग्य निर्णया सारखाच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 11/27/2016 - 09:18 नवीन
विषय काय आणि भकताय काय? अर्थात अशी मुक्ताफळे अपेक्षितच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
संदीप डांगे Sun, 11/27/2016 - 10:59 नवीन
गुरुजी, त्वाड्डा जवाब नही! कसं काय व्हायचं काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न पूर्ण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 11/27/2016 - 15:57 नवीन
स्वप्न एका रात्रीत प्रत्यक्षात येत नसतं. काँग्रेसमुक्त भारताच्या दृष्टीने वाटचाल २०१३ च्या डिसेंबर पासूनच सुरू झाली आहे. दस्तुरखुद्द मोदी, भाजप, काँग्रेस व राहुल त्यासाठी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत आहे. आधी लोकसभेतून काँग्रेसची उचलबांगडी झाली. नंतर बर्‍याच राज्यातून काँग्रेस हद्दपार झाली. कालांतराने इतर सत्तास्थानेही जातील. जाणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 11/28/2016 - 07:52 नवीन
मग शतप्रतिशत भाजप काय? विरोधी पक्ष नकोच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 11/28/2016 - 10:16 नवीन
काँग्रेस, सप, बसप, राष्ट्रवादी, आआप असे देशदोही व अतिरेक्यांचे समर्थक असलेले, भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले, जातीयवाद व गुन्हेगारीचे राजकारण करणारे पक्ष विरोधी पक्ष म्हणून सुद्धा नको. हे फक्त विरोधासाठीच विरोध करतात. अफझल गुरू, याकूब मेमन, बाटला हाऊसमधील अतिरेकी, इशरत जहां इ. अतिरेकी देशविरोधी कृत्य करीत असले तरी मुस्लिमांच्या मतांसाठी यांचा त्यांना पाठिंबा, देशाचे तुकडे करण्याची भाषा करणारा कन्हैया कुमार यांचा हिरो, देशात दंगली घडविणार्‍यांना हे मंत्रीपद देणार. असले पक्ष देशात नकोच. एकवेळ विरोधी पक्ष नसला तरी चालेल, पण विरोधी पक्ष हवा म्हणून असली उपद्रवी टोळकी नकोत. पप्पू, सिब्बल, लालू, केजरीवाल, मनमोहन, पवार, गुलाम आझाद इ. गणंगांचा समावेश असलेले पक्ष देशाची वाट लावणार. त्यापेक्षा नवीन पटनाईक, माणिक सरकार इ. नेते असलेला पक्ष असेल तर तो पक्ष विरोधी पक्ष म्हणून नक्कीच हवा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 11/28/2016 - 10:25 नवीन
हे तर कोण कोणाकडे कसे बघतो त्यावर अवलंबून आहे ना? प्रचलित भाषेत चष्म्याच्या रंगावर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 11/28/2016 - 10:31 नवीन
कोणत्याही रंगाचा चष्मा वापरला किंवा चष्मा अजिबात न वापरता उघड्या डोळ्यांनी पाहिले तरी मी वर लिहिले आहे तेच दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Mon, 11/28/2016 - 12:27 नवीन
हे तर कोण कोणाकडे कसे बघतो त्यावर अवलंबून आहे ना? प्रचलित भाषेत चष्म्याच्या रंगावर?? हो. मात्र मातृभूमीशी इमान राखणार्‍यांनी कोणताही चष्मा लावला तरी त्यांना याकूब मेनन, कसाब, अफझल गुरू हे क्रांतीकारक वाटू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पक्षी Tue, 11/29/2016 - 13:00 नवीन
कन्हैया कुमार यांचा हिरो
कन्हैया कुमार तोच ना ज्याची वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट झाली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Sun, 11/27/2016 - 11:39 नवीन
>>>अ‍ॅपद्वारे ५ लाख लोकांनी नोटाबंदीला पाठिंबा हे कोण कधी म्हणाले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
संदीप डांगे Sun, 11/27/2016 - 11:53 नवीन
शब्दात पकडणार नसाल तर सांगतो, नरेंद्र मोदी ऍप चा सर्वे आहे तो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पुष्कर जोशी Sat, 12/03/2016 - 02:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Sun, 11/27/2016 - 10:31 नवीन
श्रीगुरुजी,भाजप हा सर्वोत्तम पक्ष आहे ना ? मग लोक स्थानिक पातळीवर त्या पक्षाला निवडून का देत नाहीत? तुमचा प्रतिसाद म्हणजे आधीच हार मानल्यासारखे नाही का वाटत?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 11/27/2016 - 10:56 नवीन
हा हा हा, नका हो असे प्रश्न विचारू. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/27/2016 - 14:19 नवीन
@हा हा हा, नका हो असे प्रश्न विचारू. ››› Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Sun, 11/27/2016 - 16:02 नवीन
श्रीगुरुजी,भाजप हा सर्वोत्तम पक्ष आहे ना ? मग लोक स्थानिक पातळीवर त्या पक्षाला निवडून का देत नाहीत? तुमचा प्रतिसाद म्हणजे आधीच हार मानल्यासारखे नाही का वाटत?
नानासाहेब, एकीकडे म्हणता की माझे डोके कोठेच चालत नाही, मला व्यवहारज्ञान नाही आणि दुसरीकडे असे प्रतिसाद देत असता. असो. भाजप हा विधानसभा व लोकसभेसाठी सर्वोत्तम पक्ष आहे यात अजिबात शंका नाही. लोकसभेसाठी बहुतांश मतदार उमेदवाराला मत न देता पक्षाला मत देतात. विधानसभेला हेच मतदान बर्‍याच प्रमाणात पक्ष व काही प्रमाणात उमेदवार बघून होते. मात्र स्थानिक पातळीवरील मतदान हे पक्ष पातळीवर न होता व्यक्तीपातळीवर होते. भाजप हा स्थानिक स्वराज्य संस्था पातळीला पक्ष म्हणून सुरवातीपासूनच अत्यंत दुर्बल खेळाडू आहे. यावेळीही त्यापेक्षा काही वेगळे होण्याची फारशी शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
स
समीर वैद्य Mon, 11/28/2016 - 20:58 नवीन
147 पैकी 47 पालिका भाजप-सेने च्या युतीकडे. 147 पैकी 52 ठिकाणी नगराध्यक्ष भाजपचे... 25 ठिकाणी सेनेचे. स्थानिक पातळीवर अजून काय वेगळ निवडून द्यायचं हो? 2011 च्या निवडणुकीत भाजप चौथ्या क्रमांकावर होता. 2016 ला पहिल्या क्रमांकावर ।।।।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
स
संदीप डांगे Mon, 11/28/2016 - 21:02 नवीन
तेही गुरुजींचा अंदाज चुकवून! ब्राव्हो, अभिनंदन, सर्जिकल स्ट्राईक सुरु जणू सगळीकडे! नोटबंदी झाल्याने जे वाटण्यात अपयशी ठरले ते हरले! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर वैद्य
अ
अर्धवटराव Mon, 11/28/2016 - 21:15 नवीन
याला म्हणतात श'हा' - कटश'हा' :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद गोडबोले Tue, 11/29/2016 - 09:33 नवीन
विनोद बाजुला राहु दे पन
नोटबंदी झाल्याने जे वाटण्यात अपयशी ठरले ते हरले! ;)
ही विचारसरणी लोकशाहीला मारक आहे असे वाटत नाही का ? आपण सरळ सरळ बहुसंख्य जनता पैसा खाऊन मत देते , बहुसंख्य जनता भ्रष्टाचारी आहे असे म्हणत आहोत ! हा लोकमताचा सरळ सरळ अपमान नव्हे काय ? अमेरिकेतही ट्रंप निवडुन आल्यावर डेमोक्रॅट्सने "नॉट माय प्रेसिडेन्ट" वगैरे चळवळी सुरु केल्या तशातलाच हा प्रकार नाही का वाटत... हे म्हणजे माझा माझ्या पक्षाचा मेंबर निवडुन आला तर हिप हिप हुर्र्रे अन हेच दुसर्‍या पक्षाचा मतदार निवडुन आला तर बहुसंख्य लोकांचा निर्णय चुकला, आम्ला मान्य नाही , किंव्वा बहुसंख्य लोकं बावळट किंव्वा भ्रष्टाचारी आहेत !!! हे म्हणजे ते गिरिश कुबेर , कुमार केतकर , अनंत बागाईतदार ह्यांच्या सारख्या हुच्च विचारवंतां सारखे झाले =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
संदीप डांगे Tue, 11/29/2016 - 11:31 नवीन
अरे अरे, कुठे जातंय हे सगळं! बहुसंख्य शब्दाचा आधार घेऊन आपला प्रतिसाद आहे. आपली लोकशाही निवडणूक ही बहुसंख्य मत पद्धतीवर नाही होत. ज्याला इतरांपेक्षा जास्त मत मिळतात तो निवडून येतो. शंभर मतदारांपैकी सरासरी 60 टक्के मतदान होतं, त्यात जेवढ्या मेजर पार्ट्या तेवढी डिव्हीजन होतात. फायनल जिंकणाऱ्याला 31 टक्के मतं मिळाली तरी सरकार स्थापन करता येतं. 31% टक्के मत तेही मतदानात भाग घेतलेल्या लोकांचीच म्हणजे 'बहुसंख्य' मतं असं आपलं इंटरप्रिटेशन असलं तर काय म्हणावं? ज्याला इतरांपेक्षा मत जास्त तो पहिला.. मूलभूत वैशिष्ट्य आहे आपल्या निवडणूक पद्धतीचे. बाकी, निवडणुकीत पैसे वाटून मतदार विकत घेतले जातात, पैसे टाकून आमदार खासदार विकत घेतले-पळवले जातात, हे आपल्यासाठी नवीन असेल असं वाटत नाही. तुमच्या माझ्यासारखे सुज्ञ मतदारांमुळे लोकशाहीचे काही वाकडे होत नाही. जो अधिक व जास्तीत जास्त पैसा टाकेल त्याला जास्तीत जास्त मते फिरवता येतात, 5 10 टक्के मते फिरवली व दुसऱ्याची तोडली तर विजय पक्का. बाकी इतरही कंगोरे असतात. पण सद्सद्विवेक बुध्दी असणारे मतदार हा काही लोकशाहीचा कणा नाही. कटू पण सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
संदीप डांगे Tue, 11/29/2016 - 11:33 नवीन
31% हे उदाहरण आहे, सार्वत्रिक सत्य नाही याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद गोडबोले Tue, 11/29/2016 - 11:41 नवीन
बहुसंख्य = बहु + संख्य = जास्त + संख्येने ! एका देशात ९९ पक्ष असतील अन समजा त्यातील ९८ पक्षांना प्रत्येकी १ % मत मत मिळाले अन ९९व्या पक्षाला २ % मते मिळाली आणि ९८ पैकी कोणीही एकमेकाशी युती करायला तयार नसेल तर ९९वा पक्षच सत्तेचा खरा दावेदार आहे ! लोकशाही ही इतकी सरळ सोप्पी आहे ! बस्स ! PERIOD . हे पटत नसेल तर लोकशाही मोडीत काढायला कोणाचीच हरकत नाही पण हा निर्णय निवडणुकीच्या आधी व्ह्यायला पाहिजे, निवडणुक हरल्यावर नाही इतकेच :) अवांतर : 1% हे उदाहरण आहे, सार्वत्रिक सत्य नाही याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/29/2016 - 11:46 नवीन
मला काही समजलं नाही, काय म्हणायचे आहे नेमकं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/01/2016 - 16:42 नवीन
इतके साधे गणित समजत नसेल तर खरंच अवघड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विशुमित Tue, 11/29/2016 - 11:44 नवीन
नोटबंदी असल्याकारणाने पैसे वाटण्याचे काय काय फंडे उमेदवारांनी वापरले, हे सुद्दा रोचक आहे. खालील बातमी पाहू शकता. या बातमी मध्ये फक्त भाजप ला च टार्गेट केले आहे पण हा फंडा इतरांनी पण वापरला असेल या शंकेला वाव आहे. http://www.loksatta.com/mumbai-news/bjp-get-benefits-of-demonetization-in-nagar-palika-election-1349859/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Tue, 11/29/2016 - 16:25 नवीन
ह्म्म.. मी बघितलेल्या एका ठिकाणी उमेदवाराने प्रेशर कुकर वाटले. फक्त मेख अशी होती की निवडणुकीच्या आधी फक्त खालचे भांडे दिले आणि निवडून आलो तर झाकण देईन असे सांगितले . :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे Tue, 11/29/2016 - 16:43 नवीन
कहर! ;) :) खात्रीची मते न मिळाल्यामुळे अनेक वस्त्यांवर हल्ले झाल्याच्या वार्ता मागे कधीतरी ऐकल्या होत्या, बहुतेक पुणे भागात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
वरुण मोहिते Sun, 11/27/2016 - 11:27 नवीन
काय गुरुजी छ्या . सगळं मूड गेला .आधीच बोललात भाजपा हरणार असं. येणारेत जास्त जागा थोड्या मागील वेळेपेक्षा .
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sun, 11/27/2016 - 14:33 नवीन
मान्य करायला हिम्मत लागते. गुरुजी नि ती दाखवली .. काय आहे सोशल मीडिया मधले ऍक्टिव्ह लोक आणि मतदार लोक हे वेगवेगळ्या देशात राहतात. एक इंडिया वासी आणि एक भारत वासी ... त्या मुळे .. २०१४ मध्ये लोकांनी १ चान्स दिला .. आता परत देतील असे वाटत नाही .. १) तूर डाळ आणि इतर दाली यातील गैरव्यवहार २) टोल ची पूर्ण वसुली होऊन हि सुरु असलेली लूट http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/express-way-toll-should-be-stopped-says-sajag-nagarik-manch/articleshow/55642408.cms ३) सात लाख कोटी NPA आणि त्याच्या कडे दुर्लक्ष .. पण कॅशलेस ची जनतेवर होणारी जबरदस्ती .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 11/27/2016 - 16:08 नवीन
सोशल मिडिया ही आता फक्त इंडियावासीयांची मक्तेदारी राहिलेली नाही. आपण २०१४ मध्ये चूक केली असे मतदारांना वाटले तर २०१९ मध्ये ते ती चूक सुधारतीलच. विद्यमान सरकारचा निम्मा काळ संपलेला आहे. अजूनतरी मे २०१४ च्या परिस्थितीत फार बदल झाला आहे असे दिसत नाही. १९ नोव्हेंबरला वेगवेगळ्या राज्यातील ४ लोकसभा व ८ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली. त्यातील निकाल मे २०१४ च्या निकालांशी बरेचसे मिळतेजुळते आहेत. पुढील निम्म्या काळात जे होईल त्यावर २०१९ ला काय होईल ते ठरेल. तूर डाळ, टोल, NPA, सध्याचा नोटाबंदीचा निर्णय इ. गोष्टींचा या पोटनिवडणुकीवर परीणाम झाला नाही. या गोष्टींचा परीणाम अजून अडीच वर्षांनी होईल अशी समजूत करून घेणे धाडसाचे ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/27/2016 - 17:27 नवीन
निवडणुकांवरील धागा आणि त्यावर मी सहभाग घेणार नाही असे फार कधी (किंबहुना कधीच) होत नाही. पण मला नगरपालिका निवडणुकांविषयी फार माहिती नाही कारण तिथे स्थानिक पातळीवर निकाल लागतात. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या प्रबळ असतात तर अशा कुठल्यातरी स्थानिक आघाडीला उभे करून राज्य आणि देश पातळीवर एकमेकांविरोधात असलेले पक्ष स्थानिक पातळीवर हातमिळवणी करू शकतात.इतकी गुंतागुंत मला माहित नाही. तसेच स्थानिक पातळीवर स्वतःच्या कर्तुत्वावर जिंकून येऊ शकतात. उदाहरणार्थ अगदी १९९७ पर्यंत मुंबई महापालिकेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १-२ नगरसेवकही स्वतःच्या स्थानिक लोकप्रियतेवर निवडून येत असत.पण अर्थातच माकपला मुंबईतून विधानसभा किंवा लोकसभेची जागा जिंकणे अशक्यच होते. नगरपालिका निवडणुका म्हणजे तालुक्याच्या ठिकाणच्या निमशहरी भागात होतात. इतक्या ठिकाणची स्थानिक गुंतागुंत मला माहित नाही. त्यामुळे या धाग्यावर माझा पास.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Mon, 11/28/2016 - 07:45 नवीन
राष्ट्रीय मुद्दयाना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांशी जोडणार्या आय. डी. ना माझा सर्वप्रथम शि.सा.न. नगरपालिका आणि नगरपंचायतीत स्थानिक मुद्दे महत्वाचे असतात. मी जिथे राहतो त्या कराडला कुठेही प्रचारात नोट्बंदीचा मुद्दा नव्हता. अगदी कुठल्याही पक्षाने ह्याचा उच्चारही केला नाही. तेव्हा उगाच नरेन्द मोदि अ‍ॅप वैगरे वरचे मुद्दे मुर्खपणाचे आहेत हे नमुद करतो. अर्थात काही ठणठणपाळांकडुन दुसरी अपेक्शाही नाही. कराड्ला प्रचाराने सुदैवाने पातळी सोडली नाही. सातार्यात मात्र पुर्णपणे धुळवड खेळली गेली. पत्यातले राजे म्हणावेत अशा या दोघानी एक्मेकाची सर्व अंडीपिल्ली बाहेर काढली. त्यातुन जे कदाचीत फक्त सातार्याच्या प्रजेला ( जनतेला नाही ) ते सर्व महाराष्टाला समजले. प्रत्येक ठिकाणाचे प्रश्न आणि उमेद्वाराचे कार्य त्याला निवडुण देते. मनसे विषयी नाराजी उभ्या महाराष्ट्रात असताना जुन्नरमधुन त्यांचा आमदार निवडून आलाच की. विधानसभेच्या वेळी मी कितीही मोदी समर्थक असलो तरी मत प्रुथ्वीराज चव्हाणांना दिले होते. कारण कराडसाठी त्यांनी चांगले काम केले. तेव्हा या निवड्णुकावरून राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे निष्कर्श काढ्णे मला तरी चुकीचे वाट्ते.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Mon, 11/28/2016 - 08:27 नवीन
मी हि प्रतिक्रिया लिही पर्यंत कराडचे निकाल हातात आले आहेत. जागा :- २९ काँग्रेस :- १६ भा.ज.प. :- ०४ रा. काँ. :- ०६ नगर विकास आघाडी. :- ०३ नगर पालिका प्रुथ्वीराज चव्हाणांकडे. नगराध्यक्षपद भा.ज.प. कडे. पाच वर्षात चोविस तास पाणीपुरवठा , रस्ते आणि मुख्यमंत्र्याकडुन आलेला निधी अडवून धरणार्या भ्रष्तवादिचे तोंड चांगलेच फुटले.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 11/28/2016 - 09:34 नवीन
नानासाहेब, एकीकडे म्हणता की माझे डोके कोठेच चालत नाही, मला व्यवहारज्ञान नाही आणि दुसरीकडे अनेक विषयांवर धागे काढत असता.
कळत नाही म्हणूनच असले धागे काढतात ना! तुम्ही पण ना गुरुजी, कोणाशी प्रतिवाद करताय? Why waste your precious time and energy on fools?
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Mon, 11/28/2016 - 10:00 नवीन
बाकी दुर्गविहारी स्थानिक पातळींवरील निवडणूक अश्याच असतात हे सगळ्यांना माहित आहे त्यात काही नवीन नाही हो . कोण कोणाच्या गळ्यात गळे टाकेल सांगता येत नाही. ते गुंतागुंतीचं आहे . त्यामुळे असा कोणी संबंध लावत नाही . पण भाजपा ऐकलं कि आमचे गुरुजी पटकन येतात हे एकदम भारी असतं. अवांतर ._ @ गॅरी हो बरोबर आहे आज पण अलिबाग ची नगरपालिका शेकाप ने राखली अतिअवांतर -तुमचे प्रतिसाद एका बाजूने झुकताना दिसत आहेत सध्या . विशेषकरून इतकी वर्ष तुम्ही लिहिताय तरी यावेळी जरा जास्त वाटत आहे .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/28/2016 - 10:23 नवीन
शेकाप, निधर्मी जनता दल इ. मृतवत पक्षांना सुद्धा एखाद्या नगरपालिकेत बहुमत मिळाले आहे. बर्‍याच ठिकाणी स्थानिक आघाड्या पुढे आहेत. जयंत पाटील, पंकजा मुंडे, आर आर पाटलांचे कुटुंब, पृथ्वीराज चव्हाण, बबन लोणीकर, राणे इ. अनेक दिग्गजांना आपापल्या भागात धक्का बसलेला आहे. मनसे या निवडणुकीत कोठेच दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ब
बोका-ए-आझम Mon, 11/28/2016 - 10:59 नवीन
मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजपची सत्ता इतकी वर्षे आहे. पण २००४ मध्ये मुंबईतल्या ६ पैकी ५ लोकसभा जागा काँग्रेस - राष्ट्रवादीकडे गेल्या. २००९ मध्ये तर ६ पैकी ६. आत्ता २०१४ मध्ये त्या परत शिवसेना आणि भाजपकडे आल्या. हे सगळं होत असताना २००७ आणि २०१२ या दोन्ही महापालिका निवडणुकींमध्ये शिवसेना आणि भाजप युती सत्तेत आली. म्हणजे लोक स्थानिक पातळीवर आणि राज्य/देश पातळीवर वेगळा विचार करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नाखु Mon, 11/28/2016 - 11:29 नवीन
नाही बोकाभाऊ. तुरगटवाडीत ग्रामपंचायतेत भाजपाचा पराभव झाला अगदी एक ही जागा नाही निवडून आली (आधीही शून्य्च असताना) मोंदींवर टिका करण्यासाठी याचा वापर करणार. नोटा बंदी आणि इतर............ तसेच निवडून आला स्वकर्तुत्वावर तर पक्षामुळे आला असे पक्षाचे कट्टर पाठीराखे म्हणणार म्हणजे त्या माणसाचे/उमेदवाराचे काही कर्तुत्व नाहीच का? स्थानीक निवडणूका ह्या अगदी छुप्या युत्या आणि तू मला मदत कर मी तुला करतो अश्याच चालतात उगाच नाही पुण्यात सर्व पुर्व कलमाडी सध्या विविध ठिकाणी स्थिर झालेत. पुण्यात जर भाजपा आली तर नक्की काय सम्जायचे? आणि शिवसेना आली तर काय सम्जायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
वरुण मोहिते Mon, 11/28/2016 - 11:39 नवीन
भाजप . काल हार मानली होती तुम्ही, मी बोलो होतो कि भाजप ला जास्त जागा मिळणार मागील निवडणुकांपेक्षा . आता ह्यात नगराध्यक्ष पद निवडणूक हा अजून एक मुद्दा आहे. तो नंतर बोलू . बाकी मनसे ला एक पालिका मिळाली आहे वाटतं तिथे पण शिवसेनेचा नगराध्यक्ष ....असो . खरा धक्का मुंडेंना आहे इतके मत नोंदवू इच्छितो .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/30/2016 - 10:03 नवीन
मला वाटलं होतं की या निवडणुकीत २०११ प्रमाणेच मतदान होईल. पण बर्‍याच प्रमाणात तसे झाले नाही. २०११ मध्ये ४ थ्या क्रमांकावर असलेला भाजप चक्क १ ल्या क्रमांकावर आला तर राष्ट्रवादी १ ल्या क्रमांकावरून ३ र्‍या क्रमांकावर घसरला. एकूण नगराध्यक्षांची पदे, नगरपालिकेत बहुमत व एकूण नगरसेवकांची संख्या या तीनही भागात भाजपच पहिल्या क्रमांकावर आला. निमशहरी भागातील समीकरणे बदलत आहेत असे दिसत आहे. अनेक दिग्गजांना आपले गड गमवावे लागले. भाजपला खानदेश, विदर्भ व काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राने हात दिला. परंतु कोकणात भाजपची डाळ शिजली नाही तर मराठवाड्यात मोठा फटका बसला. मनसे हा पक्ष मृत झालेला आहे हे या निवडणुकीत नव्याने सिद्ध झाले. फेब्रुवारी २०१७ मधील १० महापालिका निवडणुकीनंतर या पक्षातील बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई इ. नेते शिवसेना किंवा भाजपची वाट धरतील व हा पक्ष अधि़कृतरित्या नष्ट होईल. राष्ट्रवादी सुद्धा मनसेच्याच मार्गावर आहे. २०१९ या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप व काँग्रेस या दोनच पक्षांचे अस्तित्व शिल्लक असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वामन देशमुख Wed, 11/30/2016 - 11:02 नवीन
२०१९ या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप व काँग्रेस या दोनच पक्षांचे अस्तित्व शिल्लक असेल.
माझ्या मते, साधारणतः २०१९ या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप व शिवसेना हे दोनच मुख्य पक्ष व इतर किरकोळ पक्ष अस्तित्वात राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/01/2016 - 11:11 नवीन
तसं वाटत नाही. २०१९ मध्ये आपल्या पक्षांची गंभीर परिस्थिती ओळखून राष्ट्रवादी व काँग्रेस पुन्हा एकदा युती करतील. आपणच भाजपपेक्षा मोठे, आपल्यामुळेच भाजप वाढला, महाराष्ट्रात आपणच भाजपचा मोठा भाऊ, आपलाच जनाधार भाजपपेक्षा जास्त या भ्रमात शिवसेना २०१९ मध्ये सुद्धा असेल व जर यदाकदाचित युतीची बोलणी झाली तर जागावाटपाच्या जुन्या २००९ च्या फॉर्म्युल्याचाच आग्रह धरून बसेल. परंतु आपल्या वाढलेल्या ताकदीची जाणीव असणारा भाजप सेनेला अजिबात किंमत देणार नाही. त्यामुळे ते दोघे स्वतंत्र लढतील. आपापसात युती केल्याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादीला होईल. भाजपची परिस्थिती मोदींच्या पुढील अडीच वर्षांच्या कामगिरीवर अवलंबून राहील. शिवसेनेची स्थिती न घरका ना घाटका अशी होऊन २०१४ च्या तुलनेत कमी आमदार व खासदार निवडून येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
अ
अमर विश्वास Mon, 11/28/2016 - 14:44 नवीन
अरे.. भाजप चक्क नंबर एक.. हे नगरपालिकेचे मतदान नरेंद्र मोदींचे अँप वापरून झाले काय ?
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 11/28/2016 - 17:52 नवीन
काय हे! कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा! किती ही (विरोधी पक्षांबाबत्)असहीष्णूता! परत एकदा आक्रोश दिन केला पाहीजे! रच्याकने, आजच्या आक्रोश दिनाचे काय झाले. एनडीटिव्हीचा निषेध! त्यांच्या गृहपानावर आक्रोश दिन कसा यशस्वी झाला याची बातमी दिलेली नाही!
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 11/29/2016 - 10:10 नवीन
महाराष्ट्रात तरी दोन्ही काँग्रेसांनी आक्रोश दिन साजरा केला ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Tue, 11/29/2016 - 16:08 नवीन
वापी मध्ये ४४ पैकी ४१ जागा भाजपाने जिंकल्या, काकणपूर-कांसद (सुरत) मधे २८ पैकी २७ जागा जिंकल्या. गोंडल तालुका पंचायतीत २२ पैकी १८ जागा जिंकल्या आणि सात पैकी पाच जिल्हा पंचायती भाजप जिंकला आहे...
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 11/29/2016 - 16:32 नवीन
आणि हे देश बंद करायला निघाले होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा