अंतरे
कधी उमलत्या फुलांची उडून गेली अत्तरे,
सोबतीच्या क्षणांची कशी झाली एवढी अंतरे?
प्रश्न करून पोरके का निघून गेली उत्तरे,
घेतला निरोप ज्या ठिकाणी, का सुन्न तिथले सारे?
तू जाता सांग का आठवणींचे मृगजळ पाझरे
वेचले जिथे मोती, का उद्विग्न आज ते किनारे?
तुझ्या येण्याने कधीकाळी बहरली जी शहरे,
परतून तू जाता घरी,का अनोळखी वाटते मला सारे?
💬 प्रतिसाद
(2)
श
शार्दुल_हातोळकर
Mon, 12/05/2016 - 14:25
नवीन
आशय अत्यंत छान आहे.
- Log in or register to post comments
प
परिधी
Mon, 12/05/2016 - 19:58
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments